शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
4
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
7
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
8
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
9
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
10
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
11
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
12
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
13
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
14
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
15
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
16
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
17
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
18
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
19
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
20
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
Daily Top 2Weekly Top 5

आयडिया ऑफ इंडिया टिकवण्याचं आव्हान; काँग्रेसनं बदल स्वीकारायला हवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2021 05:52 IST

आयडिया ऑफ इंडिया टिकली तरच देशाची एकात्मता आणि अखंडता टिकणार आहे. हे देशातील आम जनतेला पटवून देण्यासाठी काँग्रेसलाही तशी मोहीम राबवावी लागेल.

राजकीय घराणेशाहीची टीका आता बोथट झाली आहे. काँग्रेसच्या नेतृत्वपदी नेहमीच नेहरू-गांधी घराण्याचे वर्चस्व राहिल्याने ही टीका विरोधी पक्षांकडून केली जात होती. त्या विरोधी पक्षांनाही सत्ता मिळताच त्यांचीही घराणेशाही सुरू झाली. मात्र काँग्रेसच्या घराणेशाहीला एक वलय आहे. शिवाय काँग्रेसमध्ये नेहरू-गांधी घराण्याचे उदात्तीकरणदेखील करण्यात आले आहे. परिणामी या घराण्याशिवाय इतरांना नेतृत्व करण्याची संधी मिळत नाही. पर्यायाने काँग्रेसमध्ये छोटी-मोठी बंडखोरी अनेकदा झाली आहे. आजही पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र आदी राज्यांत काँग्रेस विचारांचे बंडखोर पक्ष सत्तेत आहेत. तेथे नेहमीच नेतृत्वाच्या वादावरून सुमारे सत्तर वेळा छोटी छोटी बंडाळी झाली आहे. पण संपूर्ण देश पातळीवर काँग्रेसला पर्याय कोणी देऊ शकले नाही. भाजपची सत्ता आणि बहुमत हा काँग्रेसला पर्याय नाही. ती सत्तेला पर्याय आहे.

भारतीय राज्यघटनेला मानणाऱ्या अनेक पक्षांपैकी सर्वात जवळचा पर्यायी पक्ष काँग्रेसच आहे. या देशात धार्मिक विभाजनाच्या आधारे सत्तांतर कधी होणार नाही, या गृहीतकासच तडा गेला आहे. त्यामुळे नेतृत्वाने पक्ष संघटनांकडे अधिक गांभीर्याने बघण्याची मागणी अनेक काँग्रेसजन करीत आहेत. गेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाल्याने राहुल गांधी यांनी पक्षाध्यक्षपदाचा त्याग करून पराभवाची जबाबदारी स्वीकारली होती. तेव्हापासून काँग्रेसचे अध्यक्षपद प्रभारी म्हणून श्रीमती सोनिया गांधी यांच्याकडे आले आहे. पक्षाला अध्यक्षच नाही, पूर्ण वेळ अध्यक्ष असावा, अशी मागणी करतानाच सौम्य हिंदुत्वही स्वीकारले जावे, असाही एक मतप्रवाह काँग्रेसमध्ये आहे. श्रीमती सोनिया गांधी यांना तो मान्य होणार नाही. आयडिया ऑफ इंडिया किंवा भारताची संकल्पना जी राज्यघटनेला अभिप्रेत आहे, त्या विचारावर काँग्रेस पक्ष उभा आहे. त्यासाठी अधिक आक्रमक काम करणे आवश्यक आहे. त्याला जनता प्रतिसाद देते. शिवाय प्रादेशिक पातळीवर नव्या दमदार नेतृत्वाला संधी दिली पाहिजे. नव्या कल्पना घेऊन काम करणाऱ्या तरुणांना संधी दिली पाहिजे. अशा तरुणांना पुढे आणले पाहिजे, तरच काँग्रेस पुन्हा जनतेचा विश्वास संपादन करू शकेल.
काँग्रेस पक्षानेच संगणकाचा स्वीकार केला, आर्थिक उदारीकरण आणून, जागतिकीकरणाला प्रोत्साहन दिले. परिणाम आज जो आधुनिक भारत दिसतो त्याचा पाया काँग्रेसने घातला आहे, हे सांगायचे कोणी? माजी पंतप्रधान डाॅ. मनमोहन सिंग यांनी १९९१ पासून भारतीय अर्थकारणाला नवे वळण दिले. म्हणून आज जगाच्या पाठीवर सर्वत्र तरुण वर्ग नेतृत्व करतो आहे, हे विसरून चालणार नाही. स्वातंत्र्यानंतर भारत या कल्पनेला पंडित नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल आदींनी आकार दिला. तशी उत्क्रांती डाॅ. मनमोहन सिंग यांनी केली. हा विश्वास भारतीय जनतेला देण्यासाठी काँग्रेस पुन्हा लढण्यासाठी बदलणार आहे? श्रीमती सोनिया गांधी यांना आरोग्याच्या कारणांनी मर्यादा आल्या असल्याने राहुल गांधी यांनी नेतृत्व स्वीकारायला हवे. उद्या सरकार सत्तेवर आल्यावर पंतप्रधान म्हणून नेतृत्व कोणी सांभाळायचे हे ठरविता येऊ शकते. आपण अध्यक्षीय पद्धत अजून स्वीकारलेली नाही. आपली लोकशाही प्रातिनिधिकच आहे. ज्या पक्षाचे बहुमत त्यांनी नेता निवडून देश चालवायचा, असे अभिप्रेत आहे.भाजपमध्ये प्रतिनिधी निवडण्याचा निर्णय सदस्यांमधून न होता  दुसराच कोणी नेता जाहीर केला जातो. ही प्रथा लोकशाहीला घातक आहे. यासाठी काँग्रेसने नेतृत्वापासून देशाला कोणत्या धोरणाने वाटचाल करावी याची भूमिका स्पष्ट मांडली पाहिजे. यासाठी श्रीमती सोनिया गांधी यांनी ‘मी आहेच, मला कधीही भेटा’, असे सांगून थांबु नये. जनता राजवटीचा खेळखंडोबा पावणेतीन वर्षातच झाल्याने श्रीमती इंदिरा गांधी यांनी आयडिया ऑफ इंडियाला तडा जातो आहे, हे भारतीयांना पटवून दिले होते. त्यासाठी देश पिंजून काढला होता. सध्याच्या भाजप सरकारची वाटचालही तशीच दिसते आहे. आयडिया ऑफ इंडिया टिकली तरच देशाची एकात्मता आणि अखंडता टिकणार आहे. हे देशातील आम जनतेला पटवून देण्यासाठी काँग्रेसलाही तशी मोहीम राबवावी लागेल. संपूर्ण देश पिंजून काढावा लागेल. हे करण्यासाठी पक्षाची भूमिका ठाम असावी लागेल. यासाठी श्रीमती सोनिया गांधी यांनी पुढाकार घ्यावा. भाजपचा विजयापेक्षा पराभवच अनेकवेळा झाला होता. तरीही त्यांनी चिकाटी आणि जिद्द सोडली नव्हती. त्यांचा पराभव करणे अवघड नाही, त्यासाठी काँग्रेसने बदल स्वीकारला पाहिजे.

टॅग्स :congressकाँग्रेसSonia Gandhiसोनिया गांधीRahul Gandhiराहुल गांधीBJPभाजपा