शहरं
Join us  
Trending Stories
1
एक दिवस फॅन्स अन् क्रिकेटपटू यांच्यातल्या विश्वासाला तडा जाईल, Rohit Sharma चं विधान
2
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
3
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
4
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
5
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
6
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
7
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
8
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
9
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
10
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
11
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल
12
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
13
श्रेयस अय्यर, इशान किशन यांना BCCI कडून सेकंड चान्स; घेतला गेला मोठा निर्णय 
14
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
15
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
16
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
17
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
18
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
19
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
20
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत

काँग्रेसमधील भांडणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 02, 2017 3:48 AM

२०१४ मध्ये देशात व नंतर राज्यात भाजपाची लाट आली. भाजपाला एकतर्फी बहुमत तर काँग्रेसचे पुरते पानिपत झाले. या पराभवातून पुढील दोन-अडीच वर्षे काँग्रेस सावरली नाही. काँग्रेसचा गड मानल्या जाणा-या विदर्भातही काँग्रेसच भुईसपाट झाली होती.

२०१४ मध्ये देशात व नंतर राज्यात भाजपाची लाट आली. भाजपाला एकतर्फी बहुमत तर काँग्रेसचे पुरते पानिपत झाले. या पराभवातून पुढील दोन-अडीच वर्षे काँग्रेस सावरली नाही. काँग्रेसचा गड मानल्या जाणा-या विदर्भातही काँग्रेसच भुईसपाट झाली होती. काँग्रेसचे वाईट दिवस पाहता स्वत:साठी अच्छे दिनच्या शोधात काँग्रेसचे अनेक नेते भाजपावासी झाले. काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांना अलीकडेच मिळत असलेला जनतेचा प्रतिसाद, सोशल मीडियावर वाढते पाठबळ हे सर्व त्यावेळी नव्हते. अशा परिस्थितीत केंद्र व राज्य सरकारला तीन वर्षे पूर्ण झालीत. जसजसा काळ लोटला तसतसे नोटाबंदी, जीएसटी यासारख्या मुद्यांवरून सरकारच्या लोकप्रियतेचा ग्राफ घसरत गेला. या संधीचा फायदा घेऊन गमावलेला जनाधार परत मिळविण्यासाठी, स्वत:मधील आत्मविश्वास जागविण्यासाठी, काँग्रेस नेते ताकदीने एकत्र येतील, अशी अपेक्षा होती. मात्र, विदर्भात नेमके याउलट होत आहे. नागपूरसह विदर्भात सुरू असलेली पक्षांतर्गत गटबाजी व नेत्यांच्या भांडणाचा फायदा अप्रत्यक्षपणे भाजपालाच होत आहे. नागपूर महापालिकेच्या निवडणुकीत भाजपासारखा बलाढ्य शत्रू समोर असताना काँग्रेसने आपसातच ‘पंजा’ लढविला. गटनेता बदलण्याचा वाद कोर्टापर्यंत गेला. सरकारच्या तीन वर्षे पूर्तीच्या पार्श्वभूमीवर प्रदेश काँग्रेसने राज्यात विभागनिहाय ‘जन आक्रोश मेळावा’ घेण्याचा कार्यक्रम आखला. चंद्रपुरात ६ नोव्हेंबरला हा मेळावा होत आहे. मात्र, माजी खा. नरेश पुगलिया यांनी त्याच दिवशी समातंर मेळावा आयोजित करून त्यात विदर्भातील नाराज नेत्यांना निमंत्रित केले आहे. प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वालाच अप्रत्यक्ष आव्हान दिले जात आहे. या बाबी काँग्रेसला मजबूत करणाºया नाहीत. उलट कार्यकर्त्यांचा उत्साह नष्ट करणाºया आहेत. आज सर्व नेत्यांनी एकत्र येऊन काँग्रेसचे ‘हात’ मजबूत करण्याची गरज असताना नेते आपसात भांडत आहेत. यामुळे अप्रत्यक्षपणे भाजपाला बळ मिळत असून कार्यकर्त्यांचा उत्साहही मारला जात आहे. या नेत्यांना यातून नेमका काय संदेश द्यायचा आहे, असा प्रश्न कार्यकर्त्यांकडून उपस्थित होत आहे. ३१ आॅक्टोबर रोजी नागपुरातील काँग्रेस नेत्यांनी दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीचे दोन वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले. पुण्यतिथीलाही गटबाजीचे दर्शन घडले. हा एकूणच प्रकार दुर्दैवी आहे. वैयक्तिक महत्त्वाकांक्षा आणि ईर्षेने पछाडलेले विदर्भातील काही काँग्रेस नेते पक्षाचेच नुकसान करीत आहे. काँग्रेसच्या पुण्याईवर या नेत्यांनी खूप काही कमावले. पण आज पक्ष संघर्ष करीत असताना हे नेते आपल्याच पक्षाला बुडवायला निघाले आहेत.

टॅग्स :congressकाँग्रेस