शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

घुसखोरीमुळे ओबीसींसोबत संघर्ष अटळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2019 04:44 IST

ज्या आधारावर मराठा समाजाला आरक्षण देण्यात आले आहे, तेच निराधार आहे. सामाजिकदृष्ट्या मराठा समाज कधीच मागास असू शकत नाही.

- राजाराम पाटील मराठा समाजाचा उल्लेख कुणबी करून याआधीच सवर्णांनी मागासवर्गीय आरक्षणात घुसखोरी केली आहे. मागासवर्गीय आयोगाच्या अहवालावरून ते स्पष्ट झाल्याने भविष्यात संघर्ष अटळ आहे. कुणबी असल्याचा दावा करत मराठा समाजाकडून मागासवर्गाचे दाखले मिळवले जातील. त्याच आधारावर पुढे ओबीसींच्या शैक्षणिक, सामाजिक, राजकीय आरक्षणात घुसखोरी होणार आहे. त्यामुळे वेळीच ओबीसी समाजाने जागृत होण्याची गरज आहे.ज्या आधारावर मराठा समाजाला आरक्षण देण्यात आले आहे, तेच निराधार आहे. सामाजिकदृष्ट्या मराठा समाज कधीच मागास असू शकत नाही. याआधी आणि आजही मराठा समाजाचे आमदार व मुख्यमंत्री अधिक आहेत. शैक्षणिक संस्थांसह शासनातील प्रमुख पदांमध्ये मराठ्यांकडे बहुमत आहे. अशा परिस्थितीत ज्या २७ टक्के आरक्षणाच्या आधारावर ओबीसींचा काही प्रमाणात विकास होत आहे, तो खंडित होण्याची भीती आहे. कारण याच आधारावर मराठ्यांकडून सर्वप्रथम शिक्षणाचा मार्ग रोखला जाण्याची शक्यता आहे.मागासवर्गाचे प्रमाणपत्र मिळाल्यानंतर मराठा समाज स्थानिक स्वराज्य संस्थांमधून सत्तेमध्ये घुसखोरी करेल. विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये मराठा समाजाला आरक्षण देण्याचा अहवाल कोणत्याही चर्चेविना मंजूर झाला, यातच त्या समाजाच्या राजकीय वर्चस्वाची जाणीव होते. दोन्ही सभागृहांत ओबीसी समाजाचे आमदार मूग गिळून गप्प होते. आता स्थानिक स्वराज्य संस्थांतूनही मराठा समाज समाजपातळीवरही वर्चस्व गाजवेल. राजकीय घुसखोरीशिवाय नोकरीद्वारे काही प्रमाणात ओबीसी समाज विकासाच्या पायऱ्या चढत आहे. आंबेडकरी चळवळीमुळे बौद्ध समाज बºयापैकी संघटित आहे, मात्र अशा कोणत्याही प्रकारे ओबीसी समाज आजही एकत्रित दिसत नाही. त्यामुळे आरक्षणाच्या या षड्यंत्रात त्यांचा बळी निश्चित आहे. नोकरी आणि राजकीय पातळीवरील आरक्षणासह शैक्षणिक आरक्षणात समाजाला मोठा फटका सहन करावा लागेल. आधीच समुद्र आणि नदीकिनारी रमलेले आगरी, कोळी भंडारी समाज सध्या भूमिहीन झाले आहेत. वाळू उपशावर पर्यावरणाच्या नावाने बंदी आणल्याने या समाजाकडे रोजगाराचे साधन नाही. अशा परिस्थितीत आरक्षणामुळे काही प्रमाणात विकासाची मिळणारी संधीही मराठा समाजामुळे हिरावली जाऊ शकते.सरकारकडून ‘प्रगतीच्या वाटेवर’ अशा आशयाच्या जाहिराती प्रसिद्ध केल्या जात आहेत. दुसरीकडे प्रस्थापित समाजाला मागासवर्गीय दाखवले जात आहे, हा सर्वात मोठा विरोधाभास आहे. मागासवर्गीय समाजाच्या उन्नतीसाठी ज्या आरक्षणाच्या मदतीचा हात दिला जात होता, त्यातही सवर्ण आणि मराठा आरक्षणाच्या नावाखाली घुसखोरी सुरू झाली आहे. हा लोकशाही आणि संविधानाला मोठा धोका आहे. मनुस्मृतीप्रमाणेच पुन्हा एकदा ठरावीक समाजालाच राज्य करण्यासाठी या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत, असे वाटते. यात बळी जाणार तो मागासवर्गीय समाजाचाच. त्यामुळे त्यांच्या अधिकारांचा प्रश्न निर्माण होईल, तेव्हा संघर्ष अटळ असेल. संघर्ष झाल्यास कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल. भविष्यातील असा संघर्ष टाळायचा असेल, तर संविधान बदलण्याचा हा डाव उधळण्याची गरज आहे. न्यायालयीन लढाईने ‘दूध का दूध’ होणारच आहे. मात्र संघटित होण्याचे आव्हानही ओबीसी समाजासमोर आहे.(लेखक ओबीसी संघर्ष समितीचे सरचिटणीस आहेत)

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणOBCअन्य मागासवर्गीय जाती