शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
2
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
3
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
4
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
5
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी
6
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
7
Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी
8
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
9
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
10
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
11
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
12
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
13
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
14
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
15
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
16
Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार
17
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
18
'तुम्ही जीआरमध्ये फेरफार करून बघा, मग तुम्हाला मराठे कळतील'; मनोज जरांगेंचा इशारा
19
VIRAL : चोरांनी कार चालकावर झाडली गोळी, पण पुढे जे झालं त्यानं स्वतःच घाबरले! Video बघून सगळेच झाले हैराण
20
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...

हाकलणे ही हिंसा, सामावणे ही सभ्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2018 05:18 IST

नागरिकांची उचलबांगडी वा त्यांना त्यांच्या राहत्या वस्तीतून हुसकावून बाहेर काढणे हा हिंसाचाराला आमंत्रण देणारा प्रकार आहे आणि तो भारतासह पाकिस्तान, बांगला देश व जगातील इतर अनेक देशांनी याआधी अनुभवला आहे.

आसामचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी आसामातील ४० लक्ष तथाकथित ‘घुसखोरांना’ देशाबाहेर काढण्याचा विचार साऱ्या देशात लागू करा हा दिल्लीच्या परिषदेत मांडलेला प्रस्ताव देश व आसाम या दोहोंच्याही हिताचा नाही. प्रत्यक्षात तो भारतात ट्रम्पशाही आणण्याचा प्रकार आहे. देशाच्या फाळणीनंतर वा फाळणीपूर्वी ‘पूर्व पाकिस्तानसह’ (बांगला देश) आसाम, बंगाल व अन्य प्रांतातून आसामात आलेल्या लोकांची संख्या मोठी आहे. त्यातील कित्येक फाळणीच्याही अगोदर आसामातील चहामळ्यांमध्ये मजुरी करून पोट भरायला आले आहेत. या लोकांना भारतात मताधिकार आहे. नागरिकत्वाची प्रमाणपत्रे आहेत. रहिवासाचा पुरावा आदहे आणि त्यांची या देशातील राहणी कित्येक दशकांच्या वहिवाटीची आहे. आता त्यातील ४० लक्ष लोकांना निवडून देशाबाहेर घालविण्याची भाषा या सोनोवालासारखीच, राम माधव आणि अमित शहा या भाजपाच्या पदाधिकाºयांनी बोलून दाखविली आहे. नागरिकांची उचलबांगडी वा त्यांना त्यांच्या राहत्या वस्तीतून हुसकावून बाहेर काढणे हा हिंसाचाराला आमंत्रण देणारा प्रकार आहे आणि तो भारतासह पाकिस्तान, बांगला देश व जगातील इतर अनेक देशांनी याआधी अनुभवला आहे. सारा दक्षिण मध्य आशिया व युरोपातील देश त्याच्या ज्वाळांनी भाजून निघत आहेत. अशा स्थितीत शांततेत जगणाºया आसामातील व देशातील प्रजेला एकदम अशांततेत लोटणे, त्यांच्यात अविश्वास व संशयाचे वातावरण उभे करून शस्त्राचाराला आमंत्रण देणे यात शहाणपणा नाही. वहिवाटीचाही एक हक्क असतो आणि तो जमीन, रहिवास इ.च्या बळावर दिला जातो. आसामातील ज्या ४० लाख लोकांवर भाजपाने सध्या कुºहाड परजली आहे त्यांच्यातील अनेक कुटुंबातील मुले भारतात जन्माला येऊन भारताच्या जन्मसिद्ध नागरिकत्वावर हक्क प्राप्त केलेली आहेत. ज्या मेक्सिकनांना अमेरिकेबाहेर घालविण्याचा उद्योग ट्रम्प यांनी चालविला आहे त्यातील सर्वाधिक गुंतागुंतीचा मुद्दाही हाच आहे. अमेरिकेच्या भूमीवर जन्म घेतलेल्या प्रत्येकाला त्या देशाचे नागरिकत्व प्राप्त होते. जे मेक्सिकन व अन्य तेथे आले व त्यांना मुले झाली, त्या मुलांनाही अमेरिकेचे नागरिकत्व मिळाले आहे, त्यामुळे मुले नागरिक व आई-बाप विदेशी असा तिढा तेथे निर्माण झाला आहे. ट्रम्पची नजर अमेरिकेतील अन्य विदेशी लोकांवरही आहे आणि त्यांच्या मुलांना अमेरिकेचे नागरिकत्व मिळाले आहे. उद्या मेक्सिकनांवर होणारी कारवाई त्याने तेथील भारतीयांविरुद्ध सुरू केली तर त्यात आईबाप व मुले यांची जी ताटातूट होईल तीच आता आसामात व्हायची आहे. ट्रम्पच्या कारवाईने त्यांचा देश त्यांच्यावर एवढा संतापला की ‘त्यांनी माझ्या अंत्ययात्रेलाही हजर राहू नये’ असा निर्देशच सिनेटर जॉन मॅकेन यांनी त्यांच्या मृत्यूपूर्वी दिला. देशात एकात्मतेचे, हिंदू-मुस्लीम ऐक्याचे व बहुसंख्य आणि अल्पसंख्य यातील स्नेहाचे वातावरण निर्माण करायचे सोडून सोनोवाल आणि शहांना ही जी अवदसा आठवली आहे तिचा विचार या सगळ्या संदर्भात केला पाहिजे. आपण आपल्याच पायावर कुºहाड मारण्याचा संकेत यातून अमेरिका, इंग्लंड, जर्मनी, चीन व आॅस्ट्रेलियासारख्या देशांना देत आहोत काय, याचाही विचार फार गंभीरपणे करण्याची गरज आहे. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या आक्रस्ताळ्या म्हणून ओळखल्या जातात. मात्र त्यांनीच आसामातील त्या ४० लाख अभाग्यांना आपल्या राज्यात स्थान देण्याचे जाहीर केले आहे. अशा अवघड व हिंसेला निमंत्रण देणाºया प्रश्नांबाबत असाच शांततामय तोडगा काढला पाहिजे. आसामातच नव्हे तर देशात सर्व विदेशातून आलेले लोक आहेत. ताप हा की आपली माणसे स्वदेशी लोकांचेच आपल्या राज्यातील वास्तव्य सहन करीत नाहीत हे आपण मुंबईत पाहिले आहे. या स्थितीत आसामातील लोकांना घालवायला आरंभ झाला की देशात त्याचा केवढा डोंब उसळेल याची कल्पनाच करता येणे शक्य आहे. म्हणून सोनोवालांसह त्यांच्या साºया घोषणाबाजांना सांगायचे की अशा गर्जना करू नका. त्या हिंसाचाराला आमंत्रण देतील. देशातील प्रश्न देशातच विचारपूर्वक निकालात काढणे हाच त्यावरचा सर्वात सोयीचा व शांततेचा मार्ग आहे.

टॅग्स :National Register of Citizensराष्ट्रीय नागरिकत्व नोंदयादीSarbananda Sonowalसर्वानंद सोनोवालAmit Shahअमित शाहBJPभाजपाPakistanपाकिस्तानBangladeshबांगलादेश