शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
2
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
3
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
4
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
5
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
6
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
7
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
8
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
9
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
10
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
11
“महाराष्ट्र विधानपरिषद देशासाठी आदर्श”; विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे कौतुकोद्गार
12
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
13
Mamata Banerjee : "मी माफी मागते"; मेस्सीच्या कार्यक्रमातील गोंधळ पाहून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी नाराज
14
H-1B व्हिसाच्या नव्या नियमांवरुन ट्रम्पच गोत्यात, वॉशिंग्टन ते कॅलिफोर्नियापर्यंत १९ राज्यांनी कोर्टाचा दरवाजा ठोठावला
15
इंडिगोला आणखी एक धक्का; रांचीत लँडिंग दरम्यान 'टेल स्ट्राइक'; थोडक्यात वाचले ७० प्रवासी
16
Lionel Messi: सॉल्ट लेक स्टेडियम तोडफोडप्रकरणी आयोजकाला अटक, प्रेक्षकांनाही तिकिटाचे पैसे परत मिळणार!
17
WhatsApp कॉलवर बोलताय? तुमचं लोकेशन होऊ शकतं ट्रॅक; सुरक्षिततेसाठी ऑन करा 'ही' सेटिंग
18
शोएब मलिकचं तिसरं लग्नही मोडण्याच्या मार्गावर? सना जावेदसोबतच्या नात्यात दुरावा 
19
"आम्ही थांबणार नाही..", दुसऱ्या बाळाच्या जन्माआधीच भारती सिंग करतेय तिसऱ्या बाळाचं प्लानिंग? पती हर्ष म्हणाला...
20
Stock Market Holidays: पुढच्या वर्षी १५ दिवस बंद राहणार शेअर बाजार, पाहा NSE मध्ये सुट्ट्या कधी, पाहा लिस्ट
Daily Top 2Weekly Top 5

हाकलणे ही हिंसा, सामावणे ही सभ्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2018 05:18 IST

नागरिकांची उचलबांगडी वा त्यांना त्यांच्या राहत्या वस्तीतून हुसकावून बाहेर काढणे हा हिंसाचाराला आमंत्रण देणारा प्रकार आहे आणि तो भारतासह पाकिस्तान, बांगला देश व जगातील इतर अनेक देशांनी याआधी अनुभवला आहे.

आसामचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी आसामातील ४० लक्ष तथाकथित ‘घुसखोरांना’ देशाबाहेर काढण्याचा विचार साऱ्या देशात लागू करा हा दिल्लीच्या परिषदेत मांडलेला प्रस्ताव देश व आसाम या दोहोंच्याही हिताचा नाही. प्रत्यक्षात तो भारतात ट्रम्पशाही आणण्याचा प्रकार आहे. देशाच्या फाळणीनंतर वा फाळणीपूर्वी ‘पूर्व पाकिस्तानसह’ (बांगला देश) आसाम, बंगाल व अन्य प्रांतातून आसामात आलेल्या लोकांची संख्या मोठी आहे. त्यातील कित्येक फाळणीच्याही अगोदर आसामातील चहामळ्यांमध्ये मजुरी करून पोट भरायला आले आहेत. या लोकांना भारतात मताधिकार आहे. नागरिकत्वाची प्रमाणपत्रे आहेत. रहिवासाचा पुरावा आदहे आणि त्यांची या देशातील राहणी कित्येक दशकांच्या वहिवाटीची आहे. आता त्यातील ४० लक्ष लोकांना निवडून देशाबाहेर घालविण्याची भाषा या सोनोवालासारखीच, राम माधव आणि अमित शहा या भाजपाच्या पदाधिकाºयांनी बोलून दाखविली आहे. नागरिकांची उचलबांगडी वा त्यांना त्यांच्या राहत्या वस्तीतून हुसकावून बाहेर काढणे हा हिंसाचाराला आमंत्रण देणारा प्रकार आहे आणि तो भारतासह पाकिस्तान, बांगला देश व जगातील इतर अनेक देशांनी याआधी अनुभवला आहे. सारा दक्षिण मध्य आशिया व युरोपातील देश त्याच्या ज्वाळांनी भाजून निघत आहेत. अशा स्थितीत शांततेत जगणाºया आसामातील व देशातील प्रजेला एकदम अशांततेत लोटणे, त्यांच्यात अविश्वास व संशयाचे वातावरण उभे करून शस्त्राचाराला आमंत्रण देणे यात शहाणपणा नाही. वहिवाटीचाही एक हक्क असतो आणि तो जमीन, रहिवास इ.च्या बळावर दिला जातो. आसामातील ज्या ४० लाख लोकांवर भाजपाने सध्या कुºहाड परजली आहे त्यांच्यातील अनेक कुटुंबातील मुले भारतात जन्माला येऊन भारताच्या जन्मसिद्ध नागरिकत्वावर हक्क प्राप्त केलेली आहेत. ज्या मेक्सिकनांना अमेरिकेबाहेर घालविण्याचा उद्योग ट्रम्प यांनी चालविला आहे त्यातील सर्वाधिक गुंतागुंतीचा मुद्दाही हाच आहे. अमेरिकेच्या भूमीवर जन्म घेतलेल्या प्रत्येकाला त्या देशाचे नागरिकत्व प्राप्त होते. जे मेक्सिकन व अन्य तेथे आले व त्यांना मुले झाली, त्या मुलांनाही अमेरिकेचे नागरिकत्व मिळाले आहे, त्यामुळे मुले नागरिक व आई-बाप विदेशी असा तिढा तेथे निर्माण झाला आहे. ट्रम्पची नजर अमेरिकेतील अन्य विदेशी लोकांवरही आहे आणि त्यांच्या मुलांना अमेरिकेचे नागरिकत्व मिळाले आहे. उद्या मेक्सिकनांवर होणारी कारवाई त्याने तेथील भारतीयांविरुद्ध सुरू केली तर त्यात आईबाप व मुले यांची जी ताटातूट होईल तीच आता आसामात व्हायची आहे. ट्रम्पच्या कारवाईने त्यांचा देश त्यांच्यावर एवढा संतापला की ‘त्यांनी माझ्या अंत्ययात्रेलाही हजर राहू नये’ असा निर्देशच सिनेटर जॉन मॅकेन यांनी त्यांच्या मृत्यूपूर्वी दिला. देशात एकात्मतेचे, हिंदू-मुस्लीम ऐक्याचे व बहुसंख्य आणि अल्पसंख्य यातील स्नेहाचे वातावरण निर्माण करायचे सोडून सोनोवाल आणि शहांना ही जी अवदसा आठवली आहे तिचा विचार या सगळ्या संदर्भात केला पाहिजे. आपण आपल्याच पायावर कुºहाड मारण्याचा संकेत यातून अमेरिका, इंग्लंड, जर्मनी, चीन व आॅस्ट्रेलियासारख्या देशांना देत आहोत काय, याचाही विचार फार गंभीरपणे करण्याची गरज आहे. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या आक्रस्ताळ्या म्हणून ओळखल्या जातात. मात्र त्यांनीच आसामातील त्या ४० लाख अभाग्यांना आपल्या राज्यात स्थान देण्याचे जाहीर केले आहे. अशा अवघड व हिंसेला निमंत्रण देणाºया प्रश्नांबाबत असाच शांततामय तोडगा काढला पाहिजे. आसामातच नव्हे तर देशात सर्व विदेशातून आलेले लोक आहेत. ताप हा की आपली माणसे स्वदेशी लोकांचेच आपल्या राज्यातील वास्तव्य सहन करीत नाहीत हे आपण मुंबईत पाहिले आहे. या स्थितीत आसामातील लोकांना घालवायला आरंभ झाला की देशात त्याचा केवढा डोंब उसळेल याची कल्पनाच करता येणे शक्य आहे. म्हणून सोनोवालांसह त्यांच्या साºया घोषणाबाजांना सांगायचे की अशा गर्जना करू नका. त्या हिंसाचाराला आमंत्रण देतील. देशातील प्रश्न देशातच विचारपूर्वक निकालात काढणे हाच त्यावरचा सर्वात सोयीचा व शांततेचा मार्ग आहे.

टॅग्स :National Register of Citizensराष्ट्रीय नागरिकत्व नोंदयादीSarbananda Sonowalसर्वानंद सोनोवालAmit Shahअमित शाहBJPभाजपाPakistanपाकिस्तानBangladeshबांगलादेश