शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
2
"मी पुन्हा सांगतो, भारताकडे एक कमकुवत पंतप्रधान", H-1B व्हिसा प्रकरणावरून राहुल गांधींचा हल्लाबोल
3
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
4
डोनाल्ड ट्रम्प यांचा H-1B व्हिसा बॉम्ब होणार बॅकफायर, अमेरिकेचंच होणार नुकसान, तर भारताचा...
5
तुमचा पुण्यातील रोजचा प्रवास ३५ किमी आहे, तर तुम्ही कोणती स्कूटर, मोटरसायकल घ्यावी? 
6
परदेशात फिरायला जाणाऱ्या प्रवाशांनी शोधली 'ही' नवीन युक्ती; नेमका काय आहे 'फ्लाइंग नेकेड ट्रेंड'?
7
आयडियाची कल्पना! "मला १०० रुपये द्या ना...", गाडी खरेदी करण्यासाठी महिलेचा 'कारनामा'
8
ट्रम्प यांच्या एका निर्णयाने अमेरिकेतील भारतीयांची धाकधूक वाढली; मायक्रोसॉफ्टने कर्मचाऱ्यांना पाठवला तातडीचा ईमेल
9
सर्वार्थ सिद्धी योगात सर्वपित्री अमावास्या २०२५: श्राद्ध विधीचा शुभ मुहूर्त; महत्त्व-मान्यता
10
परदेशी पाहुण्यांशी असलं वागणं शोभतं का? 'टपोरी' मुलाच्या Viral Video वर नेटकरी संतापले
11
Navratri 2025: नवरात्रीला घटस्थापना कशी करावी? जाणून घ्या साहित्य, मुहूर्त आणि शास्त्रोक्त विधी!
12
निलेश साबळेनेच मला बाईचं कॅरेक्टर करायला सांगितलं होतं, भाऊ कदमचा खुलासा
13
भूपतीचा शस्त्रसंधीचा प्रस्ताव, जगन म्हणतो शस्त्र ठेवणार नाही ! माओवादी संघटनेतील वाद चव्हाट्यावर
14
अमेरिकेत करिअरचे दार उघडणारा H-1B व्हिसा काय आहे? कोणाला मिळतो? जाणून घ्या संपूर्ण माहिती...
15
पुढच्या आठवड्यात येणार IPO चा पाऊस, २२ आयपीओंमध्ये मिळणार गुंतवणूकीची संधी; कोणत्या आहेत कंपन्या?
16
हृदयस्पर्शी! "आई-वडिलांना सोडून मुलगी गेली लंडनला"; ८० वर्षांचे आजोबा ट्रेनमध्ये विकतात पदार्थ
17
हाफिज सईदने दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचे नाव बदलले; आता 'अल-मुराबितुन' नावाने पैसे गोळा करणार
18
GST Rate Cut: ५०% सूट, ८०% सूट... कपडे आणि बुटांच्या दुकांनावर आता अशा ऑफर्स दिसणार नाहीत! GST कपातीशी संबंध काय?
19
Hanuman Temple: 'या' मंदिरात हनुमान निद्रावस्थेत, तरीही केवळ दर्शनाने पूर्ण होते भक्तांची प्रत्येक इच्छा 
20
Vivo Y50i: झटक्यात चार्ज होणार आणि दिर्घकाळ चालणार; विवोचा बजेट स्मार्टफोन बाजारात!

जनतेशी संवाद, मात्र परस्परांतच विसंवाद!

By किरण अग्रवाल | Updated: September 10, 2023 11:48 IST

Politics : यंदा निवडणुकीत उमेदवारीच्या रिंगणात कोण कोणाकडून असेल, याचीच मोठी उत्सुकता आहे.

- किरण अग्रवाल

पावसाअभावी शेतकऱ्यांच्या कोमेजलेल्या आशांना जिवंत करण्याचे काम दीर्घ प्रतीक्षेनंतर गेल्या आठवड्यात आलेल्या पावसामुळे घडून आले, त्याचप्रमाणे आगामी निवडणुकीच्या रणांगणात नशीब आजमावू पाहणाऱ्यांसोबतच त्यांचे भाग्य ठरविणाऱ्या मतदारांमध्येही सक्रियता व उत्साह भरण्याचे काम राजकीय कार्यक्रमांमुळे पश्चिम वऱ्हाडात घडून आल्याचे म्हणावे लागेल. 

‘हो ना, हो ना’ करता करता मेहकरची जागा बदलून बुलढाण्यात का होईना, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ‘सरकार आपल्या दारी’ कार्यक्रम घेतला गेला. त्यानंतर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या जनसंवाद यात्रेपाठोपाठ विरोधी पक्षनेते, काँग्रेसचे विजय वडेट्टीवार यांचीही संवाद यात्रा पश्चिम वऱ्हाडात येऊन गेल्याने राजकीय माहौल तापून गेला आहे. राज्यात ट्रिपल इंजिनचे सरकार आहे तसे विरोधात ट्रिपल पक्षांची महाआघाडी आहे. त्यामुळे यंदा निवडणुकीत उमेदवारीच्या रिंगणात कोण कोणाकडून असेल, याचीच मोठी उत्सुकता आहे. ऐनवेळीच ते स्पष्ट होणार असले, तरी सर्वांनीच राजकीय मशागतीस प्रारंभ करून दिला आहे. बावनकुळे व वडेट्टीवार यांच्या यात्रा त्याचदृष्टीने नांगरणीसाठी येऊन गेल्याचे म्हणता यावे.

बावनकुळे यांनी चिखली, खामगावात जनसंवाद साधला; मात्र जालन्यातील उपोषणकर्त्या मराठा बांधवांवर पोलिसांनी केलेल्या अमानुष लाठीमाराचे पडसाद पाहता अकोल्यातील दौऱ्यात पदयात्रा टाळून पक्ष कार्यकर्त्यांची बैठक व काहींच्या व्यक्तिगत भेटीगाठी घेतल्या. या यात्रेनिमित्त भाजपातील सारे नेते पुन्हा एकवटलेले दिसून आले असले तरी व्यासपीठावर एकाच गुलाबी हारात गुंफलेल्या स्थानिक नेत्यांमधील विसंवाद अकोलेकरांपासून लपलेला नाही. तेच चित्र वडेट्टीवार यांच्या यात्रेनिमित्त काँग्रेसमध्ये बघायला मिळाले. वडेट्टीवार यांच्या अकोला दौऱ्यापूर्वी अवघ्या तीन-चार दिवस अगोदरच अकोटमध्ये पक्षातील जुन्या जाणत्या नेत्यांची एक बैठक होऊन त्यात विद्यमान जिल्हाध्यक्ष अशोक अमानकर यांच्याविरुद्ध अविश्वासाची चर्चा केली गेली असली, तरी वडेट्टीवारांसोबतच्या व्यासपीठांवर मात्र आजी माजी सारेच नेते परस्परांचा हात हाती घेत वावरल्याचे पाहावयास मिळाले. 

अकोल्याच्या काँग्रेसमध्ये जितके नेते तितके गट झाल्याची वास्तविकता आहे. नेते अधिक झाले; परंतु, कार्यकर्त्यांची वानवा आहे. १९८९ पासून लोकसभेतील अकोल्याची जागा काँग्रेसच्या हातून जी गेली ती पुन्हा येऊ शकलेली नाही. मात्र, अशाही स्थितीत या पक्षाकडून आजही ही जागा लढविण्यासाठी महाआघाडीअंतर्गत दावा केला जातो हे विशेष. 

विधान परिषदेतील पदवीधर मतदारसंघात गेल्यावेळी काँग्रेसला अनपेक्षितपणे लॉटरी लागली. भाजपतील अंतस्थ नाराजीमुळे काँग्रेसला हे यश लाभले. आताही एकूण राजकारण बघता महाआघाडीला हायसे वाटावे असे चित्र आहे; पण त्या वातावरणावर स्वार होत आगेकूच करण्यात स्थानिक काँग्रेसचे नेते कमी पडत आहेत. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेनंतर बुलढाणा व वाशिम जिल्ह्यातील काँग्रेस अंग झटकून कामाला लागलेली दिसत आहे, तसे अकोला जिल्ह्यात दिसत नाही. निवडणूक काळातील लाभाची गणिते लक्षात घेता पक्षाची सूत्रे आपल्याच हाती यावीत, म्हणून काहींनी उचल खाल्ल्याचे चित्र समोर येत आहे. सारांशात, सर्वपक्षीय संवाद वाढला असून निवडणुकीसाठीची अस्त्रे परजली जाऊ लागली आहेत. अशात ‘जो जीता वही सिकंदर’ या न्यायाने जो सक्रियता दर्शवेल त्याच्याच वाट्याला अच्छे दिन येणार हे नक्की असले तरी, त्यासाठी अगोदर स्वकीयांतील विसंवाद दुर होणे गरजेचे आहे.   

टॅग्स :congressकाँग्रेसBJPभाजपाPoliticsराजकारण