शहरं
Join us  
Trending Stories
1
अधीर रंजन यांना खडसावणाऱ्या खर्गेंवर बंगालमधील काँग्रेस कार्यकर्ते नाराज, काँग्रेस अध्यक्षांच्या फोटोवर फासली शाई 
2
'आरक्षणाची मर्यादा वाढवणार की नाही?', काँग्रेसचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट सवाल
3
"प्रभू श्रीराम हृदयात आहेत, पण राम मंदिर..."; मेनका गांधी यांचे निवडणूक प्रचारादरम्यान विधान
4
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
5
एक दिवस फॅन्स अन् क्रिकेटपटू यांच्यातल्या विश्वासाला तडा जाईल, Rohit Sharma चं विधान
6
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
7
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
8
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
9
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
10
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
11
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
12
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
13
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
14
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
15
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल
16
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
17
श्रेयस अय्यर, इशान किशन यांना BCCI कडून सेकंड चान्स; घेतला गेला मोठा निर्णय 
18
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
19
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
20
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट

वाचनीय लेख - निवडणुकीत संवाद आणि लोकसंपर्काला आडकाठी असू नये!

By वसंत भोसले | Published: April 10, 2024 9:40 AM

सार्वजनिक निवडणुकीत लाेकसंपर्कावर जरुरीपलीकडे मर्यादा असता कामा नयेत. आचारसंहितेच्या नावाखाली संपर्क आणि संवादच खुंटत असल्याचे दिसते आहे!

वसंत भोसले

काेल्हापूरच्या ताराबाई पार्क या उच्चभ्रूंच्या परिसरात मुंबई प्रांताचे पहिले अर्थमंत्री दिवाणबहाद्दूर अण्णासाहेब लठ्ठे यांचा अर्धपुतळा आहे. त्या चाैकातून ये-जा करणाऱ्या दहाजणांना हा पुतळा काेणाचा आहे, असे विचारले तर आठजण सांगतील की, मला माहीत नाही. कारण अण्णासाहेब लठ्ठे यांची काेल्हापूर संस्थानातील दिवाणबहाद्दूर म्हणूनची कामगिरी पहिल्या महायुद्धाच्या काळातली! सुमारे शंभर वर्षांपूर्वीचा हा कालखंड आजच्या पिढीला माहीत नसणे स्वाभाविक आहे. त्या पुतळ्याचे ज्यांनी अनावरण केले, त्या मान्यवरांचे निधन होऊनही आता काही दशके लोटली आहेत. पण, लाेकसभा किंवा विधानसभेच्या निवडणुका जाहीर हाेताच कागद चिकटवून तो अनावरण फलक झाकला जातो. का?- त्या नामवंत राजकारण्यांचा प्रभाव आजच्या मतदारावर पडू नये म्हणून! 

१९८६ च्या डिसेंबर महिन्यात काेलकात्यात जाण्याचा याेग आला हाेता. पुढे मार्चमध्ये विधानसभेच्या निवडणुका हाेत्या. त्या अद्याप जाहीर व्हायच्या हाेत्या. तत्पूर्वीच डाव्या आघाडीने आणि काँग्रेस पक्षाने काेलकात्यात भिंती रंगवून आपली भूमिका मांडली हाेती. उत्तम चित्रे काढली हाेती. व्यंगचित्रे काढून राजकीय टीकाटिप्पणी केली हाेती. काव्य, वात्रटिका लिहिल्या हाेत्या.  राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय राजकारण, अर्थकारणावर भाष्य केले हाेते. त्यातून राजकीय पक्षांची भूमिका समजत हाेती. आचारसंहितेच्या नावाखाली सध्या हा संवादच संपवून टाकला गेल्याचे चित्र दिसते. प्रचारसभा, बैठका, मेळावे, मिरवणुकादेखील सकाळी ६ ते रात्री १० या वेळेतच घेण्याची सक्ती आहे. उन्हाळ्याचे दिवस,  देशभर उष्णतेचा पारा चाळीस अंशांवर पाेहाेचला आहे. सकाळी १० ते दुपारी चार वाजेपर्यंत जाहीर सभा घेणे शक्य आहे का?  अनेक मतदारसंघांचा परीघ २०० ते ४०० किलाेमीटर आहे. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊन फार तर तीन सभा हाेऊ शकतात. सात-आठ तालुक्यांत प्रचाराच्या केवळ तीन आठवड्यांत फिरणे अशक्य आहे. डाेंगरदऱ्या, डाेंगराळ वस्ती, वाळवंटी प्रदेश असेल तर आणखीनच महाकठीण! माेठ्या शहरात सायंकाळी सभा हाेत नाही, झाल्या तर वाहतूक व्यवस्था काेलमडते. तालुक्याच्या गावात उन्हाळ्यात रात्री १२ वाजेपर्यंत लाेक जागे असतात. उन्हाचा तडाखा संपलेला असताे. रात्री १२ वाजेपर्यंत सभा व्हायला काय हरकत आहे? 

सार्वजनिक निवडणुकीत लाेकसंपर्कासाठी मर्यादा असता कामा नये. पाेस्टर्स लावायची नाहीत, भिंती रंगवायच्या नाहीत, पुतळे उघडे ठेवायचे नाहीत हा आग्रह कशासाठी? लाेकसभेच्या प्रत्येक मतदारसंघात सरासरी अठरा ते वीस लाख मतदार असतात. त्यांच्यापर्यंत पाेहाेचण्यासाठी, राजकीय पक्ष आणि उमेदवारांना  माेकळीक नकाे का? १९९० पर्यंत २४ तास जाहीर सभा घेण्यास परवानगी हाेती.  तत्कालीन पंतप्रधान विश्वनाथ प्रताप सिंह यांची महाराष्ट्र विधानसभेच्या प्रचारार्थ २६ फेब्रुवारी १९९० राेजी सांगलीत पहाटे साडेतीन वाजता सभा सुरू झाली आणि चार वाजून पाच मिनिटांनी संपली. रात्री दहापासून तीस हजार लाेक थांबले हाेते. अनेकजण वळकटी आणून मैदानावर चक्क झाेपले हाेते. १९८५ च्या विधानसभा निवडणुकीत शरद पवार यांची विटा (जि. सांगली) येथे पहाटे पाच वाजता सभा झाली हाेती. तत्पूर्वी ११ वाजता काेल्हापुरात  सभा करून ते निघाले हाेते. 

राजकीय पक्षांना तसेच नेते तथा उमेदवारांना मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी भरपूर वेळ दिला पाहिजे. साधने वापरात आली पाहिजेत. डिजिटल फलकांनी बारा महिने शहरांचे विद्रुपीकरण होते, तेव्हा काेणी तक्रार करीत नाही. अमेरिकेत एका व्यासपीठावर येऊन दाेन्ही पक्षांचे उमेदवार वाद-प्रतिवाद करतात. त्याला उत्तम प्रतिसाद मिळताे. आपल्याकडे असे हाेतच नाही. सार्वत्रिक निवडणुकांमध्ये राजकीय, आर्थिक, आराेग्य, शिक्षण, परराष्ट्र धाेरण, आदींवर जाेरदार चर्चा घडून आली पाहिजे. मतदान वाढावे म्हणून निवडणूक आयाेगातर्फे काम होते. ताे जनजागृतीचा भाग असेल तर राजकीय जागृती करण्यासाठी प्रचारावर मर्यादा का?  

निवडणूक आयाेग मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी प्रयत्न करते, तसे राजकीय पक्षांचा संवाद वाढविण्यासाठीही प्रयत्न करायला हवेत. आचारसंहिता म्हणजे प्रचारावर निर्बंध असे असू नये. लाेकसहभाग वाढत असेल तर काही मर्यादा पाळून चाेवीस तासही प्रचारासाठी माेकळीक देण्याचा विचार जरूर झाला पाहिजे!

(लेखक लोकमत कोल्हापूर आवृत्तीचे संपादक आहेत)

टॅग्स :Electionनिवडणूकlok sabhaलोकसभाlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४