शहरं
Join us  
Trending Stories
1
GenZ पिढीच्या मुलांवर माझा विश्वास, हीच मुलं भारताला 'विकसित राष्ट्र' बनवतील- पंतप्रधान मोदी
2
४५ वर्षाचा गड कोसळला, भाजपानं रचला इतिहास; १ मत फिरवलं अन् 'या' महापालिकेत बसवला महापौर
3
"राजकारण बंद करेन, पण आता..."; काँग्रेसमध्ये प्रवेश करताच प्रशांत जगतापांनी मांडली भूमिका
4
पाकिस्तानला अजूनही 'ऑपरेशन सिंदूर'ची भीती! सीमेवर अँटी-ड्रोन सिस्टीम बसवले
5
'लोक उगवत्या सूर्याला नमस्कार करतात, पण जगताप यांनी वैचारिक लढ्यासाठी काँग्रेसमध्ये प्रवेश केला', हर्षवर्धन सपकाळ यांनी केलं कौतुक 
6
सिंह राशीसाठी नवीन वर्ष 2026 स्वप्नपूर्तीचे वर्ष; आश्चर्याचे धक्के आणि परदेश प्रवासाचे योग!
7
नगरसेविकेच्या पतीच्या हत्येनंतर खोपोलीत पोलीस ठाण्याला घेराव, पोलीस निरीक्षकावर गंभीर आरोप, मागणी काय?
8
अदानी ग्रुपकडून मिळाली ₹3400 कोटींची ऑर्डर, झटक्यात ५% नं वधारला शेअर; आता खरेदीसाठी उडाली लोकांची झुंबड
9
गणपती बाप्पा सांताक्लॉजच्या वेशात? जाहिरातीवर मनसेचा संताप; केंद्र सरकारवर केली टीका!
10
गृहकर्जाचा हप्ता वाढलाय? 'लोन ट्रान्सफर'ने वाचवा लाखो रुपये; कमी व्याजासाठी बँक कशी बदलावी?
11
ठाकरे-शिंदेंनी प्रयत्न केले, पण अखेर काँग्रेसमध्ये गेले; प्रशांत जगताप यांची राजकीय कारकीर्द
12
बापरे! हिवाळ्यात 'या' छोट्या चुकांमुळे वेगाने गळू लागतात केस, टक्कल पडण्याची वाटते भीती
13
भाजपानं 'या' राज्यात इतिहास रचला, पहिल्यांदाच पक्षाचा महापौर बनला; विधानसभा निवडणुकीपूर्वी मोठा संकेत
14
"आम्हाला मुलांमध्ये अजिबात रस नाही"; २ मैत्रिणी एकमेकींच्या प्रेमात झाल्या वेड्या, बांधली लग्नगाठ
15
Swami Samartha: आपल्यावर सद्गुरू कृपा आहे की नाही हे ओळखण्याचा सोपा मार्ग जाणून घ्या
16
अबरारची दहशत अन् रहमान डकैतचा स्वॅग! पडद्यावरच्या 'बॅड बॉईज'ने कशी लुटली लाइमलाइट?
17
५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर 'हा' शेअर; आज जोरदार तेजी, चांदीतील तेजी ठरतेय कारण
18
"हॉस्पिटलनेच माझ्या पतीला मारलं, मला म्हणाले..."; पत्नीने सांगितली काळजात चर्र करणारी गोष्ट
19
२ देशांसोबत मिळून चीननं शेजारील देशात चढवला जोरदार हल्ला, ४५४ इमारती उद्ध्वस्त; शेकडो अटकेत
20
नोकरी गेली तरी आर्थिक चक्र थांबू नका! संकटकाळात EMI आणि SIP चे व्यवस्थापन कसे कराल? तज्ज्ञांचा सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

भाष्य - शालिनता हरपली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2017 00:14 IST

आपल्या कामाचा सर्वसामान्यांच्या जीवनात प्रभाव दिसला पाहिजे. २० टक्के राजकारण करताना ८० टक्के समाजकारण करत जगावे अशी भूमिका अखेरपर्यंत

आपल्या कामाचा सर्वसामान्यांच्या जीवनात प्रभाव दिसला पाहिजे. २० टक्के राजकारण करताना ८० टक्के समाजकारण करत जगावे अशी भूमिका अखेरपर्यंत ठेवणारे ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक, राज्य मंत्रिमंडळातील दोनवेळचे माजी मंत्री तथा माजी खासदार शिवाजीराव पाटील हे खऱ्या अर्थाने समाजाभिमुख जीवन जगले. त्यातूनच त्यांनी सहकारमहर्षी, विकासपुरुष, सहकार चळवळीचे ज्येष्ठ मार्गदर्शक अशी स्वत:ची ओळख निर्माण केली. स्पष्ट व सुसंस्कृत भाषा, समंजसपणा आणि सहकार व लोकशाही विचारांशी त्यांनी शेवटपर्यंत बांधिलकी घट्ट ठेवली. यामुळेच त्यांच्या जाण्याने सामाजिक भान जपणाऱ्या पिढीचा एक दुवा निखळला असून राजकारणातील शालिनतेचा उत्तम प्रतिनिधी आपण गमावला असल्याच्या श्रद्धांजलीपर भावना उमटल्या आहेत. राष्ट्रसेवा दलाच्या मुशीतून घडलेल्या शिवाजीरावांनी स्वातंत्र्यप्राप्तीच्या लढ्यानंतर राजकारणातून समाजाला भरपूर विधायक योगदान दिले. पेट्रोल कामगार, शेतकरी व शेतमुजरांचे प्रश्न त्यांनी सोडवले. जलसिंचनाचे क्षेत्र ७ हजार एकरावरून तब्बल ४० हजार एकरापर्यंत वाढवले. विजेचा प्रश्नसुद्धा सोडवला आणि शेतकऱ्यांना ऊस लावायचे आवाहन केले. त्यातून खान्देशच्या विकासात महत्त्वाचा ठरलेला शिरपूर साखर कारखाना आणि अनेक प्रकल्प उभे राहिले. शिसाका अल्पावधीत अग्रेसर ठरला. जागतिक साखर संघाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले. आपल्याकडे रिफार्इंड साखरेचे उत्पादन त्यांच्याच प्रयत्नातून सुरू झाले. १९७७ च्या आणीबाणीच्या काळात काँग्रेसची सर्वत्र पीछेहाट होत असताना त्यांनी धुळे जिल्ह्यातील दोन्ही जागा काँग्रेसला जिंकून दिल्या. पुढे सहकार मंत्रिपदही भूषविले. वसंतदादा पाटलांसोबत सबंध महाराष्ट्र पालथा घातला. शरद पवार युवा काँग्रेसचे अध्यक्ष होते तेव्हा शिवाजीराव सचिव होते. सानेगुरुजींच्या धडपडणाऱ्या मुलांपैकी एक असलेले शिवाजीराव हे अतिशय पुरोगामी विचारांचे होते म्हणूनच आपली धाकटी कन्या स्मिता पाटील हिला सिनेअभिनेत्री होण्यास आडकाठी न करता त्यांनी प्रोत्साहनच दिले. मोठी मुलगी डॉ. अनिता व मधली गीता यासुद्धा उच्चशिक्षित असून परदेशात आहेत. कन्येला प्रथम आणि पित्याला नंतर राष्ट्रीय पुरस्कार अशा दुर्मीळ पालकांपैकी ते एक होते. २०१३ मध्ये त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तेव्हासुद्धा आपल्या विधायक समाजकारणाचे फळ आयुष्याच्या उत्तरार्धात मिळाल्याची त्यांची समाधानाची भावना होती.