शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

भाष्य - शालिनता हरपली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2017 00:14 IST

आपल्या कामाचा सर्वसामान्यांच्या जीवनात प्रभाव दिसला पाहिजे. २० टक्के राजकारण करताना ८० टक्के समाजकारण करत जगावे अशी भूमिका अखेरपर्यंत

आपल्या कामाचा सर्वसामान्यांच्या जीवनात प्रभाव दिसला पाहिजे. २० टक्के राजकारण करताना ८० टक्के समाजकारण करत जगावे अशी भूमिका अखेरपर्यंत ठेवणारे ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक, राज्य मंत्रिमंडळातील दोनवेळचे माजी मंत्री तथा माजी खासदार शिवाजीराव पाटील हे खऱ्या अर्थाने समाजाभिमुख जीवन जगले. त्यातूनच त्यांनी सहकारमहर्षी, विकासपुरुष, सहकार चळवळीचे ज्येष्ठ मार्गदर्शक अशी स्वत:ची ओळख निर्माण केली. स्पष्ट व सुसंस्कृत भाषा, समंजसपणा आणि सहकार व लोकशाही विचारांशी त्यांनी शेवटपर्यंत बांधिलकी घट्ट ठेवली. यामुळेच त्यांच्या जाण्याने सामाजिक भान जपणाऱ्या पिढीचा एक दुवा निखळला असून राजकारणातील शालिनतेचा उत्तम प्रतिनिधी आपण गमावला असल्याच्या श्रद्धांजलीपर भावना उमटल्या आहेत. राष्ट्रसेवा दलाच्या मुशीतून घडलेल्या शिवाजीरावांनी स्वातंत्र्यप्राप्तीच्या लढ्यानंतर राजकारणातून समाजाला भरपूर विधायक योगदान दिले. पेट्रोल कामगार, शेतकरी व शेतमुजरांचे प्रश्न त्यांनी सोडवले. जलसिंचनाचे क्षेत्र ७ हजार एकरावरून तब्बल ४० हजार एकरापर्यंत वाढवले. विजेचा प्रश्नसुद्धा सोडवला आणि शेतकऱ्यांना ऊस लावायचे आवाहन केले. त्यातून खान्देशच्या विकासात महत्त्वाचा ठरलेला शिरपूर साखर कारखाना आणि अनेक प्रकल्प उभे राहिले. शिसाका अल्पावधीत अग्रेसर ठरला. जागतिक साखर संघाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले. आपल्याकडे रिफार्इंड साखरेचे उत्पादन त्यांच्याच प्रयत्नातून सुरू झाले. १९७७ च्या आणीबाणीच्या काळात काँग्रेसची सर्वत्र पीछेहाट होत असताना त्यांनी धुळे जिल्ह्यातील दोन्ही जागा काँग्रेसला जिंकून दिल्या. पुढे सहकार मंत्रिपदही भूषविले. वसंतदादा पाटलांसोबत सबंध महाराष्ट्र पालथा घातला. शरद पवार युवा काँग्रेसचे अध्यक्ष होते तेव्हा शिवाजीराव सचिव होते. सानेगुरुजींच्या धडपडणाऱ्या मुलांपैकी एक असलेले शिवाजीराव हे अतिशय पुरोगामी विचारांचे होते म्हणूनच आपली धाकटी कन्या स्मिता पाटील हिला सिनेअभिनेत्री होण्यास आडकाठी न करता त्यांनी प्रोत्साहनच दिले. मोठी मुलगी डॉ. अनिता व मधली गीता यासुद्धा उच्चशिक्षित असून परदेशात आहेत. कन्येला प्रथम आणि पित्याला नंतर राष्ट्रीय पुरस्कार अशा दुर्मीळ पालकांपैकी ते एक होते. २०१३ मध्ये त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तेव्हासुद्धा आपल्या विधायक समाजकारणाचे फळ आयुष्याच्या उत्तरार्धात मिळाल्याची त्यांची समाधानाची भावना होती.