शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

या बाळांनो सारे या ! दोन तपांपासूनचा रिवाज

By सुधीर महाजन | Updated: January 21, 2021 09:05 IST

पर्यटनमंत्री आणि छोटे ठाकरे आदित्य हे औरंगाबादला आले. रिवाजाप्रमाणे त्यांनी शहराचे प्रश्न जाणून घेण्यासाठी शहरातील वेगवेगळ्या क्षेत्रांतील नाणावलेल्या मंडळींची बैठक बोलावली.

लहानपणी घरी कोणी तत्कालीन तथाकथित प्रतिष्ठित आले की, आम्ही आपल्याच घरात अंग चोरून पाण्याचा तांब्या, पेला त्यांच्यासमोर ठेवताच ‘हा कोण मुलगा? नाव काय तुझे? कोणत्या वर्गात शिकतो,’ अशा प्रश्नांची सरबत्ती होताच दडपल्या मनानेच सारे सांगितल्यानंतर आता गणिताची कोडी घालतात का, अशी अनामिक भीती अन्‌ पोटात गोळा आलेला असे. एखादी कविता म्हणून दाखव, असे  म्हणताच  ‘या बाळांनो सारे या’ ही कविता तारस्वरात आम्ही सुरू करीत असू. हा प्रसंग परवा डोळ्यासमोर उभे राहण्याचे कारण म्हणजे पर्यटनमंत्री आणि छोटे ठाकरे आदित्य हे औरंगाबादला आले. रिवाजाप्रमाणे त्यांनी शहराचे प्रश्न जाणून घेण्यासाठी शहरातील वेगवेगळ्या क्षेत्रांतील नाणावलेल्या मंडळींची बैठक बोलावली. जसे की पूर्वी बाळासाहेबांनी, फडणवीसांनी, उद्धव ठाकरे यांनी अशा बैठका घेतल्या असल्याने आता हा रिवाजच पडला आहे, तर ही नाणावलेली मंडळीसुद्धा दोन तपांपासून त्याच- त्याच गोष्टी सांगत आहेत. सांगणारे सांगतात, ऐकणारे ऐकतात. म्हणजे ‘नळी फुंकली सोनारे, इकडून तिकडे जाई वारे’ या म्हणीचा प्रत्यय औरंगाबादकरांना सवयीचा झाला आहे. मला तर वाटते तेच सभागृह, त्याच टेबल-खुर्च्या असल्याने ही सगळी भाषणे त्या भिंती, टेबले, खुर्च्यांना तोंडपाठ झाली असतील. आपणच त्यांना बोलण्याची संधी देत नाही.

दोन तपांपासून औरंगाबादची मंडळी पाणी, रस्ते, पर्यटन या त्रिकोणातच अडकून पडली आहे. या त्रिकोणाचा चौथा कोन त्यांना सापडत नाही. या शहराची महानगरपालिका गेल्या पंचवीस वर्षांपासून शिवसेनेच्या ताब्यात आहे. अगदी परवापर्यंत म्हणजे उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदावर आरूढ होईपर्यंत सेना व भाजप हे दोघे, ‘तुझ्या गळा, माझ्या गळा’ गात महापालिकेत झिम्मा खेळत होते; पण ‘वर्षा’तून बेवारस होताच एकमेकांचे गळे पकडण्याचा प्रयत्न करताना दिसतात. आमच्या मराठवाड्याच्या भाषेत याला ‘गच्ची पकडणे’ असेसुद्धा म्हणतात, तर पंचवीस वर्षे शहराची सत्ता उपभोगताना या शहराचे प्रश्न काय आहेत, त्याचा विकास कसा करता येईल. हे माहीत करून घेण्यासाठी शिवसेनेला असे ‘रमणे’ भरवावे लागत असतील, तर पाव शतक त्यांनी काय केले? हा प्रश्न पडतो. पंचवीस वर्षांत या शहराचे वाटोळे केले? एवढेच स्पष्टपणे म्हणता येईल. महापालिकेच्या जागा विकल्या, बळकावल्या. जनकल्याणाचा विचार न करता सरकारी पैसा उधळला. या शहराचे धड नियोजन नाही. ‘आज पाणी येणार’ असा एसएमएस आला की, येथील नागरिकांचा जीव भांड्यात पडतो. ही या शहराची अधोगती आहे. 

आदित्य ठाकरेंनीही त्यादिवशी नवेच काही तरी सांगावे म्हणून ‘को-गव्हर्नमेंट’चा जादूचा रुमाल फेकला. तो रंगीबेरंगी रुमाल पाहताच अनेकांच्या डोळ्यात मोरपंखी स्वप्ने उतरली. काहींना या ‘सीओजी’चे डोहाळे लागले. नेमका हा जादूचा रुमाल आहे काय, हे कळण्यापूर्वीच त्याचा गवगवा सुरू झाला. आता पुन्हा एकदा ‘या बाळांनो सारे या.’

-सुधीर महाजन

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAaditya Thackerayआदित्य ठाकरे