शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
2
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
3
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
4
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
5
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
6
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
7
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
8
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
9
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
10
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
11
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
12
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
13
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
14
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
15
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
16
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
17
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
18
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
19
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
20
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका

या बाळांनो सारे या ! दोन तपांपासूनचा रिवाज

By सुधीर महाजन | Updated: January 21, 2021 09:05 IST

पर्यटनमंत्री आणि छोटे ठाकरे आदित्य हे औरंगाबादला आले. रिवाजाप्रमाणे त्यांनी शहराचे प्रश्न जाणून घेण्यासाठी शहरातील वेगवेगळ्या क्षेत्रांतील नाणावलेल्या मंडळींची बैठक बोलावली.

लहानपणी घरी कोणी तत्कालीन तथाकथित प्रतिष्ठित आले की, आम्ही आपल्याच घरात अंग चोरून पाण्याचा तांब्या, पेला त्यांच्यासमोर ठेवताच ‘हा कोण मुलगा? नाव काय तुझे? कोणत्या वर्गात शिकतो,’ अशा प्रश्नांची सरबत्ती होताच दडपल्या मनानेच सारे सांगितल्यानंतर आता गणिताची कोडी घालतात का, अशी अनामिक भीती अन्‌ पोटात गोळा आलेला असे. एखादी कविता म्हणून दाखव, असे  म्हणताच  ‘या बाळांनो सारे या’ ही कविता तारस्वरात आम्ही सुरू करीत असू. हा प्रसंग परवा डोळ्यासमोर उभे राहण्याचे कारण म्हणजे पर्यटनमंत्री आणि छोटे ठाकरे आदित्य हे औरंगाबादला आले. रिवाजाप्रमाणे त्यांनी शहराचे प्रश्न जाणून घेण्यासाठी शहरातील वेगवेगळ्या क्षेत्रांतील नाणावलेल्या मंडळींची बैठक बोलावली. जसे की पूर्वी बाळासाहेबांनी, फडणवीसांनी, उद्धव ठाकरे यांनी अशा बैठका घेतल्या असल्याने आता हा रिवाजच पडला आहे, तर ही नाणावलेली मंडळीसुद्धा दोन तपांपासून त्याच- त्याच गोष्टी सांगत आहेत. सांगणारे सांगतात, ऐकणारे ऐकतात. म्हणजे ‘नळी फुंकली सोनारे, इकडून तिकडे जाई वारे’ या म्हणीचा प्रत्यय औरंगाबादकरांना सवयीचा झाला आहे. मला तर वाटते तेच सभागृह, त्याच टेबल-खुर्च्या असल्याने ही सगळी भाषणे त्या भिंती, टेबले, खुर्च्यांना तोंडपाठ झाली असतील. आपणच त्यांना बोलण्याची संधी देत नाही.

दोन तपांपासून औरंगाबादची मंडळी पाणी, रस्ते, पर्यटन या त्रिकोणातच अडकून पडली आहे. या त्रिकोणाचा चौथा कोन त्यांना सापडत नाही. या शहराची महानगरपालिका गेल्या पंचवीस वर्षांपासून शिवसेनेच्या ताब्यात आहे. अगदी परवापर्यंत म्हणजे उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदावर आरूढ होईपर्यंत सेना व भाजप हे दोघे, ‘तुझ्या गळा, माझ्या गळा’ गात महापालिकेत झिम्मा खेळत होते; पण ‘वर्षा’तून बेवारस होताच एकमेकांचे गळे पकडण्याचा प्रयत्न करताना दिसतात. आमच्या मराठवाड्याच्या भाषेत याला ‘गच्ची पकडणे’ असेसुद्धा म्हणतात, तर पंचवीस वर्षे शहराची सत्ता उपभोगताना या शहराचे प्रश्न काय आहेत, त्याचा विकास कसा करता येईल. हे माहीत करून घेण्यासाठी शिवसेनेला असे ‘रमणे’ भरवावे लागत असतील, तर पाव शतक त्यांनी काय केले? हा प्रश्न पडतो. पंचवीस वर्षांत या शहराचे वाटोळे केले? एवढेच स्पष्टपणे म्हणता येईल. महापालिकेच्या जागा विकल्या, बळकावल्या. जनकल्याणाचा विचार न करता सरकारी पैसा उधळला. या शहराचे धड नियोजन नाही. ‘आज पाणी येणार’ असा एसएमएस आला की, येथील नागरिकांचा जीव भांड्यात पडतो. ही या शहराची अधोगती आहे. 

आदित्य ठाकरेंनीही त्यादिवशी नवेच काही तरी सांगावे म्हणून ‘को-गव्हर्नमेंट’चा जादूचा रुमाल फेकला. तो रंगीबेरंगी रुमाल पाहताच अनेकांच्या डोळ्यात मोरपंखी स्वप्ने उतरली. काहींना या ‘सीओजी’चे डोहाळे लागले. नेमका हा जादूचा रुमाल आहे काय, हे कळण्यापूर्वीच त्याचा गवगवा सुरू झाला. आता पुन्हा एकदा ‘या बाळांनो सारे या.’

-सुधीर महाजन

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAaditya Thackerayआदित्य ठाकरे