शहरं
Join us  
Trending Stories
1
कांदा निर्यात धडाम...! केंद्राचे धोरण आड आले;  बांगलादेश, सौदी अरब सारख्या देशांनी फिरवली पाठ
2
अविस्मरणीय अन् ऐतिहासिक! PM मोदींच्या हस्ते गोव्यात ७७ फूट उंच 'श्रीराम मूर्ती'चे अनावरण
3
“काँग्रेसमध्ये काही राहिले नाही, वडेट्टीवारांनी खांद्याला धनुष्यबाण लावावा”; कुणी दिली ऑफर?
4
Ayush Mhatre Century : षटकार-चौकारांची 'बरसात'; आयुष म्हात्रेचा २०० च्या स्ट्राइक रेटसह शतकी धमका!
5
भारताची क्षेपणास्त्र चाचणीची घोषणा, हिंदी महासागरात चौथे चिनी 'हेरगिरी जहाज' दाखल
6
SMAT 2025: अर्जुन तेंडुलकरची हवा! पहिल्या स्पेलमध्ये ५ धावांत २ विकेट्स घेत लुटली मैफील
7
सर्वांनी वयाच्या 30 व्या वर्षापूर्वीच जाणून घ्यायला हवं हे 'सीक्रेट'! असं करा गुंतवणुकीचं प्लॅनिंग; तयार होईल मोठा निधी, आनंदात जगाल म्हातारपणी
8
गौतम गंभीरवर बीसीसीआय नाराज, कसोटी हरल्यानंतर जे बोलला, ते खटकले... 
9
Thailand Flood : हाहाकार! थायलंडमध्ये मुसळधार पावसामुळे विध्वंस; १४५ जणांचा मृत्यू, ३६ लाख लोकांना फटका
10
धक्कादायक! अनियंत्रित कार तलावात कोसळली, चालक बेशुब्ध पडला, नाविक देवदूत बनून आला
11
नेपाळने भारताला डिवचले; 100 रुपयांच्या नवीन नोटेवर भारताचा भूभाग आपला दाखवला
12
हृदयद्रावक! साता जन्माची साथ २ दिवसांत सुटली; लग्नानंतर नवरदेवाचा बाथरुममध्ये संशयास्पद मृत्यू
13
चीनच्या शेजारी देशाने प्रचंड सोने घेतले; एवढे महाग असले तरी..., जगातील सर्वात मोठा खरेदीदार ठरला
14
भारताच्या अर्थव्यवस्थेची ताकद वाढली, दुसऱ्या तिमाहीत देशाचा जीडीपी ८.२% वाढला
15
“प्रभू श्रीरामांच्या पदस्पर्शाने पावन तपोवनातील वृक्ष तोडण्याचे कारण काय?”: उद्धव ठाकरे
16
विकला जाणार रतन टाटांचा व्हिला, खरेदीसाठी जुन्या मित्रानेच 'इंटरेस्ट' दाखवला; किती कोटी मोजणार?
17
हर्बालाइफचा नवा 'लिफ्ट ऑफ' – शून्य साखर असलेलं, ऊर्जा देणारं इफर्व्हेसंट ड्रिंक, तुमचा दिवस बनवा अधिक जोमदार 
18
सोलापूर बसस्थानावरील अस्वच्छतेबाबत आगार व्यवस्थापक निलंबित; प्रताप सरनाईकांचे आदेश
19
उफराटा...! ट्रम्प अमेरिकेत आयकर रद्द करणार, टेरिफ मधून आलेल्या पैशांवर भागवणार; घोडं काय, भाडं काय...
20
China Japan Tensions: जपान आणि चीनमध्ये तणाव वाढला, पंतप्रधानांचं विधान का ठरलं वादाचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

बालक, छे वेठबिगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2018 22:05 IST

शासन, प्रशासन आणि समाजाचा बालकांविषयीचा दृष्टीकोन बदलत गेला

मिलिंद कुलकर्णीभारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या जयंतीदिनी देशभर ‘बालदिन’ साजरा होत आहे. चाचा नेहरु म्हणून बालकांशी त्यांचे नाते होते, त्याला यादिवशी उजाळा दिला जातो. नेहरु किती दूरदृष्टीचे नेते होते, हे बालकांविषयी त्यांचा असलेला जिव्हाळा, प्रेम यातून दिसून येते. महात्मा गांधी, सानेगुरुजी या थोर स्वातंत्र्यसेनानींचे बालकांशी वेगळे नाते होते. देशाचे भवितव्य असलेल्या बालकांवर विशेष लक्ष देण्याची या नेत्यांची तळमळ, कळकळ त्यांच्या छोट्या कृतीतून दिसून येत असे.काळ लोटला, तसा शासन, प्रशासन आणि समाजाचा बालकांविषयीचा दृष्टीकोन बदलत गेला, असे म्हणावे लागेल. आता बालकांची स्थिती काय आहे, याचा विचार आम्ही करणार आहोत काय, असा प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे. बालकांना आम्ही वेठबिगार बनविले आहे. आमीर खान अभिनित ‘थ्री इडियटस्’ चित्रपटात मुलांना लहानपणापासूनच डॉक्टर, इंजिनीयर बन असे जे बिंबविण्यात येते, त्यावर मार्मिक भाष्य करण्यात आले आहे. चित्रपटातील हे भाष्य आम्हाला भावते. परंतु वास्तवात आम्ही पुन्हा पारंपरिक पालकच बनतो. पुन्हा आमीर खानचाच ‘तारे जमीन पर’ हा चित्रपट आठवतो. प्रत्येक मुलात वेगळेपण आहे. त्याचे वेगळेपण, कल, आवड लक्षात घेऊन पालकांनी अभ्यासक्रमाची निवड करायला हवी. पण तसे होत नाही. नर्सरीपासून आम्ही मुलांना शिकवण्या लावतो. कोवळ्या हातात पेन, पेन्सिली देऊन लिखाणाचे वळण लावण्याची सक्ती करतो. दिवाळी आणि उन्हाळी सुट्यांमध्ये किती पालक आपल्या पाल्यांना विचारात घेऊन नियोजन करतात. मुले घरी रहायला नको आणि त्याला ‘सगळं’ आलं पाहिजे म्हणून अ‍ॅथलेटिक्स, नृत्य, व्यक्तीमत्व विकास अशा शिबिरांमध्ये कोंबले जाते.शाळांमध्ये दुसरे काय होते? नामांकित शाळांमध्ये एका वर्गात ७०-८० विद्यार्थी असतात. एवढी संख्या असताना शिक्षक तरी प्रत्येक विद्यार्थ्याकडे कसे लक्ष देणार? आणि अभ्यासक्रमातील अडचण, शंका असली तरी विद्यार्थी ती विचारु शकेल काय? शकतो काय? याचा विचार केला जाणार आहे काय? राज्य शासन शिक्षणाच्या नावे मूल्यमापन, मूल्यशिक्षण, कलचाचणी, शिष्यवृत्ती, खिचडी, खेलकूद, क्रीडा स्पर्धा, वेगवेगळ्या वक्तृत्व, वादविवाद, बालनाट्य अशा स्पर्धा, उपक्रम घेत असताना त्यात खरोखर बालकांचा सर्वांगीण विकास होत आहे का, याची खातरजमा कोण करणार?कोपर्डी घटनेच्या निमित्ताने विद्यार्थिनी, त्यांच्या अपडाऊनसाठी बसची सुविधा, सुरक्षा असे विषय ऐरणीवर आले होते. त्यावर पुढे काहीही झाले नाही. राज्य शासन आणि एस.टी.महामंडळाने हिरकणी, मानव मिशन अशा उपक्रमांमधून विद्यार्थिनींसाठी स्वतंत्र गाड्या उपलब्ध करुन दिल्या. परंतु, त्याची स्थिती फारशी समाधानकारक नाही. आजही अनेक खेड्यांमध्ये विद्यार्थी खाजगी वाहनांमधून शाळेत ये-जा करतात. त्यांच्या सुरक्षेचा विषय तर दूरच राहिला.शाळा, सार्वजनिक कार्यक्रम, मोर्चा, आंदोलने यात बालकांच्या सहभागाविषयी काहीही नियम नसल्याने उपस्थिती वाढविण्यासाठी हमखास विद्यार्थ्यांना वेठीस धरले जाते. मध्यंतरी जळगावातील एका शिक्षणसंस्थेने विक्रमासाठी एक कलाकृती साकारली, पण त्यासाठी पुन्हा शाळेतील मुलांनाच कामाला जुंपण्यात आले. गणेश विसर्जनानंतर मिरवणूक मार्ग आणि तलावाची स्वच्छता करण्यासाठी एका संस्थेनेही शाळकरी मुलांनाच जुंपले. हे सगळे करताना मुलांना श्रमानुभवाची शिकवण देण्याचा प्रयत्न असल्याचा तात्विक मुलामा देण्यात येतो. आंदोलनातही मुलांना सहभागी करुन उपस्थिती वाढविण्याचे दोन प्रकार मध्यंतरी घडले. त्यासाठी समर्थन असे करण्यात आले की, मुलांना ही समस्या भेडसावते म्हणून त्यांचा सहभाग घेतला. बालपणापासून त्यांच्यात देशप्रेमाची आवड निर्माण व्हावी, म्हणून त्यांना आंदोलनात सहभागी करुन घेण्यात आले. आता या लंगड्या समर्थनावर विश्वास कसा ठेवायचा?खान्देशात कापूस वेचणीचा हंगाम सुरु आहे. दिवाळीच्या सुट्या असल्याने बहुसंख्य विद्यार्थी शेतात कापूस वेचणी करतात आणि कुटुंबाला अर्थसहाय्य करत असल्याचे चित्र आहे. शिष्यवृत्ती, पाठ्यवृत्ती, मोफत शिक्षण, खिचडी, मोफत धान्य, मोफत घरकूल अशा मोठमोठ्या योजना असताना बालकांना कुटुंबासाठी आर्थिक योगदान द्यावे लागते, ही आपल्यासाठी लाजीरवाणी बाब नाही काय? त्यांचे बालपण करपते, कोमेजते याचा विचार किमान बालदिनाचे निमित्त साधून आम्ही करणार आहोत की नाही? केवळ उपचार म्हणून हा दिन साजरा करणार आहोत?

टॅग्स :children's dayबालदिनJalgaonजळगाव