शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

शाळांच्या सुट्यांचा सावळागोंधळ अन् पालकवर्गात प्रचंड संताप!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2021 08:44 IST

School Holidays : दीड वर्षं शाळा बंद होत्या. हजारो शिक्षक, मुख्याध्यापक, अधिकारी ते सचिवापर्यंत कोणालाही या वाया गेलेल्या दीड वर्षाचे नियोजन करता येऊ नये, याचे आश्चर्य वाटते. शिक्षण क्षेत्रातील हा गोंधळ घराघरांशी संबंधित आहे.

महाराष्ट्रात तीन प्रमुख पक्षांनी महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले आहे, म्हणजे सरकारच्या कारभाराचे तीनतेरा व्हावेत का, असा सवाल शालेय शिक्षण विभागाच्या कारभारावरून उपस्थित होत आहे. सहसचिव, शिक्षण निरीक्षक आणि स्वत: शालेय शिक्षणमंत्री दिवाळीच्या सुट्या जाहीर करण्यावरून सावळागोंधळ घालून मुलांना मानसिक त्रास देत आहेत. लॉकडाऊननंतर दीड वर्षाने शालेय शिक्षण स्तरावरील शाळा सुरू झाल्या. दीड वर्षं शाळा बंद होत्या. हजारो शिक्षक, मुख्याध्यापक, अधिकारी ते सचिवापर्यंत कोणालाही या वाया गेलेल्या दीड वर्षाचे नियोजन करता येऊ नये, याचे आश्चर्य वाटते. शिक्षण क्षेत्रातील हा गोंधळ घराघरांशी संबंधित आहे. नुकत्याच शाळा सुरू झाल्या. शिक्षक, मुख्याध्यापक, शाळा समित्या, शिक्षण निरीक्षक, शिक्षणाधिकारी आदी वर्गाने अभ्यासक्रमाचे नियोजन केले. चाचणी परीक्षांची तयारी चालविली. प्रात्यक्षिके आणि इतर परीक्षांची तयारी सुरू असताना शिक्षणाधिकाऱ्यांनी १ ते २१ नोव्हेंबरपर्यंत दिवाळीची सुटी जाहीर केली. 

या निर्णयाची कागदावरील शाई वाळण्यापूर्वीच शिक्षण खात्याच्या सहसचिवांनी २८ ऑक्टोबर ते १० नोव्हेंबरपर्यंत शाळांना दिवाळी सुटी असल्याचे परिपत्रक काढले. या परिपत्रकासह शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्विट करून सुटी जाहीर करीत दिवाळीच्या शुभेच्छादेखील देऊन टाकल्या. राज्यातील असंख्य शाळांनी आणि हजारो शिक्षकांनी २५ ऑक्टोबरपासून विविध प्रकारच्या चाचण्या आणि परीक्षांचे नियोजन केले होते. वर्षा गायकवाड यांनी २७ ऑक्टोबरला ट्वीट करून, २८ ऑक्टोबरपासून शाळांना सुट्या असतील, असे सांगून टाकले. शाळास्तरावर आणि जिल्हास्तरावर अधिकारी वर्ग काय करतो आहे, शाळा मंत्रालयात नव्हे तर गावोगावी असतात, तेथे काय चालू आहे, त्यांचे मत काय आहे, याचा विचारही न करता वेगळा निर्णय घेण्यात येतोच कसा? 

शिक्षण खात्याच्या सहसचिवांना याची कल्पना नसावी का? शालेय शिक्षण खात्यातील या सावळ्यागोंधळाने पालकवर्गात प्रचंड संताप आहे. शिक्षक आणि मुख्याध्यापकांचा गोंधळ उडाला आहे. या दोनपैकी नेमका कोणता निर्णय अंमलात आणायचा, असा बाका प्रसंग उपस्थित झाला आहे. या निर्णयावर फेरविचार होईल, त्यापैकी एक निश्चित करण्यात येईल. मात्र, हजारो-लाखो लोकांशी संबंध येणाऱ्या निर्णयाची घोषणा करताना, वास्तवात काय चालू आहे, यातील प्रत्येक घटकाचे काय मत आहे, हे जाणून घेणे महत्त्वाचे वाटले नसावे? लॉकडाऊननंतर पुढील संपूर्ण शैक्षणिक वर्षाचे नियोजन कसे असेल, याचा विचार करावा, असे मंत्रालयात बसणाऱ्या अधिकाऱ्यांना वाटले नसेल? लॉकडाऊनमुळे ऑनलाइन शिक्षण देण्याचे धोरण जाहीर केले होते. 

वास्तविक उच्च शिक्षणासाठी हा पर्याय योग्य आहे. शालेय स्तरावरील मुलांची छोट्याशा मोबाइलवर अभ्यासासाठी एकाग्रता निर्माण होईल का? सर्वच पालकांकडे चांगल्या दर्जाचे मोबाइल आहेत का? असतील तर त्यासाठी संपर्काची व्यवस्था आहे का? अनेक निमशहरी भागात मोबाइलला नीट रेंज मिळत नाही. खेड्यापाड्यात, दऱ्या-डोंगरात आणि दुर्गम भागात मोबाइल चालत नाहीत, तेथील मुलांनी ऑनलाइन शिक्षण कसे घेतले असेल? मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी अशा भागाचा दौरा करून ऑनलाइन शिक्षणव्यवस्थेची पाहणी केली का? मुलांना शिक्षण किती मिळाले असेल? हा संशोधनाचा भाग आहे. इतक्या वाईट परिस्थितीनंतर शाळा सुरू करण्याजोगी परिस्थिती निर्माण झाली. त्याचा लाभ उठवून हजारो-लाखो मुला-मुलींचे शिक्षण दर्जेदार होईल, त्यांचे वाया गेलेले आयुष्यातील काही महत्त्वाचे दिवस भरून काढता येतील, यादृष्टीने काही नियोजन करावे, अशी तळमळ कोणत्याही पातळीवर वाटू नये, याची खंत वाटते. 

सुट्यांचे नियोजन करता येऊ नये का? केंद्र सरकारच्या नव्या शैक्षणिक धोरणांची अंमलबजावणी करण्याची तयारी कशी करणार? त्यातून अनेक महत्त्वपूर्ण बदल होणार आहेत. नवा माणूस आणि समृद्ध देशाच्या उभारणीसाठी जागतिकीकरणाच्या पर्वात शिक्षणाला अनन्यसाधारण महत्त्व आले आहे. पालक गरीब असो की श्रीमंत, वाट्टेल ती किंमत मोजून आपल्या पाल्याला जागतिक दर्जाचे शिक्षण मिळावे, यासाठी तो धडपडतो आहे. विविध प्रयोग करून पाहतो आहे. शिक्षण आणि रोजगाराचा योग्य संबंध प्रस्थापित करण्यात आपण अपयशी ठरलो आहोत. भारतासारख्या लोकसंख्येने प्रचंड असलेल्या देशात शिक्षणाला खूप महत्त्व दिले पाहिजे. त्यासाठी बदलाचा वेध घेऊन शिक्षण खात्यानेही आपल्या व्यवस्थापनात अमूलाग्र बदल केला पाहिजे. निर्णय संभ्रमात टाकणारे किंवा गोंधळ निर्माण करणारे असणार नाहीत, याची काळजी घेतली पाहिजे.

टॅग्स :Schoolशाळा