शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातल्या देशी गायींचा सांभाळ, संशोधन महत्त्वाचे, कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2024 07:48 IST

लालकंधारी, गवळाऊ, खिलार, डांगी आणि देवणी या आपल्या राज्यातील पशुपालकांनी सांभाळलेल्या गायींच्या स्थानिक प्रजातींवर लक्ष देण्याची गरज आहे.

- डॉ. व्यंकटराव घोरपडे(सेवानिवृत्त सहायक आयुक्त, पशुसंवर्धन, सांगली)

पुण्यातील कृषी महाविद्यालयात पशुसंवर्धन व दूध शास्त्र विभागातील देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्रास राज्य सरकारने सेंटर ऑफ एक्सलन्सचा दर्जा नुकताच बहाल केला. त्यामुळे हे देशी गायीसाठीचे देशातील पहिले  संशोधन केंद्र ठरणार आहे. याबद्दल संबंधिताचे मनापासून अभिनंदन! या केंद्रामध्ये दुधासाठी जगप्रसिद्ध असणाऱ्या इतर राज्यांतील सहिवाल, गीर, थारपारकर, लालसिंधी, राठी या देशी गायींच्या जाती व त्यांच्या दूध उत्पादनक्षमता, महाराष्ट्रातील वातावरणात समरस होण्याच्या त्यांच्या क्षमता, त्यांचा ताण सहन करण्याच्या क्षमता, रोगप्रतिबंधक क्षमता, लिंगनिर्धारित वीर्यमात्रेद्वारे प्रजनन, भ्रूण प्रत्यारोपण तंत्रज्ञान आणि त्यांच्या दुधापासून बनवण्यात येणारे दुग्धजन्य पदार्थ, तसेच गोमूत्र व शेण यांच्यावरील प्रक्रियायुक्त पर्यावरणपूरक पदार्थ इत्यादी घटकाबद्दल संशोधन केले जात आहे आणि जाणार आहे. 

मूळ मुद्दा असा आहे की, या ज्या गायींवर संशोधन होणार आहे त्या सर्व गायी त्या-त्या स्थानिक राज्यातील त्यांच्या मूळ प्रजाती आहेत. त्यावर इतर राज्यांमध्ये संशोधन निश्चितपणे सुरू असणार आहे. महाराष्ट्रामधील ज्या पाच जाती आहेत लालकंधारी, गवळाऊ, खिलार, डांगी आणि देवणी या आपल्या राज्यातील पशुपालकांनी अनेक वर्षांपासून सांभाळलेल्या आणि आपल्या वातावरणात समरस झालेल्या स्थानिक प्रजाती आहेत. यांच्याबाबत खरंतर हे संशोधन या ठिकाणी होणं गरजेचं आहे. ते न करता  इतर राज्यांतील गायींच्या बाबतीत संशोधनाला प्राधान्य कशासाठी? त्या राज्यातील पशुपालकांनी स्थानिक वातावरणाचे संदर्भ लक्षात घेऊन महत्प्रयत्नांनी विकसित केलेल्या  त्या जाती आहेत. या जाती आज राज्यामध्ये आणल्या जातात. त्यांचं  संगोपन करत असताना  येणाऱ्या अडीअडचणी याबाबत वेगळं सांगण्याची गरज नाही. मागील दहा वर्षांमध्ये ज्या मंडळींनी या गायी आणून आपला दुग्ध व्यवसाय केला आणि ‘ए टू दूध’ म्हणून बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात विक्री करून नफा मिळवण्याचा प्रयत्न केला त्यांची सद्य:स्थिती जर जाणून घेतली तर  नक्कीच विदारक तपशील कळतील.   

गीर, थारपारकर, राठी गायींचं संगोपन करणारी मंडळी कोण आहेत? एकूणच त्यामागचं अर्थकारण कसं असतं? याच्या अभ्यासाचा राज्यातील पशुपालकांना मोठा फायदा होईल. या केंद्रामध्ये पशुवैद्यकांची संख्या किती आहे, हा देखील एक संशोधनाचा विषय आहे.  या ठिकाणी भ्रूण प्रत्यारोपण करून उच्च वंशावळीच्या ज्यादा दूध देणाऱ्या कालवडी निर्माण करण्यासाठी लागणारं तंत्रज्ञान दिल्लीस्थित संस्थेकडून घेतल्याची माहिती आहे. तेच तंत्रज्ञान पशुसंवर्धन विभागाच्या ताथवडे फार्मवर उपलब्ध असताना दिल्लीच्या संस्थेचे सहकार्य कशासाठी? भ्रूण प्रत्यारोपण तंत्रज्ञान हे एक नाजूक जैवतंत्रज्ञान आहे. त्यावर दुरून नियंत्रण ठेवणे आणि यश संपादन करणे तसेही खूप अवघड आहे. 

केंद्र शासनाच्या मदतीतून देशी गायींच्या बाबतीत अनेक ठिकाणी संशोधन सुरू असताना एकाच बाबीवर अनेक ठिकाणी जर खर्च होत असेल आणि स्थानिक देशी गायीच्या प्रजाती जर दुर्लक्षित राहणार असतील तर त्याला जबाबदार कोण? राज्यातील पशुसंवर्धन विभाग या आणि अशा बाबीसाठी सक्षम असताना आणि पायाभूत सुविधांनी संपन्न असताना अशा प्रकारचे संशोधन इतरत्र कशासाठी?  कमीत कमी दोघांच्या समन्वयातून ही बाब जर राज्यातील पशुपालकांच्या हिताच्या दृष्टीने एकत्रितपणे राबवली तर पशुपालकांच्या हिताचे ठरेल. हा काही विभागीय वाद नाही. राज्यातील एकूणच देशी गोवंश सांभाळणाऱ्या पशुपालकांच्या हिताच्या दृष्टीने काम करणारी शिखर संस्था महाराष्ट्र राज्य गोसेवा आयोगाने याबाबतीत लक्ष घातले पाहिजे. अशा संघटित प्रयत्नांचा देशी गोवंश सांभाळणाऱ्या पशुपालकांना फायदाच होईल.  

टॅग्स :cowगाय