शहरं
Join us  
Trending Stories
1
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
2
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
3
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
4
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
5
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
6
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
7
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
8
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार
9
रोहित शर्माने खरेदी केली Lamborghini, नंबरने वेधले चाहत्यांचे लक्ष; काय आहे ३०१५ चा अर्थ?
10
ट्रम्प टॅरिफचा पहिला फटका, अनेक कारखान्यांत काम बंद, भारतातील व्यापार गेला पाकिस्तानात
11
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
12
Video : भर पावसात बाबांचा स्वयंपाक, चिमुकल्यांनी डोक्यावर धरलं 'असं' छत, पाहून डोळ्यांत येईल पाणी! 
13
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
14
कियारा अडवाणीच्या बिकिनी सीन्सवर कात्री? 'वॉर २'ला प्रमाणपत्र देताना सेन्सॉर बोर्डाचे निर्देश
15
RCBच्या यश दयालवर बंदीची कारवाई; अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी 'या' स्पर्धेतून बाद
16
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
17
सर्वाधिक धावा कुटल्या, मग कर्णधाराला माघारी धाडलं, २२ वर्षांच्या ऑलराउंडरने जिंकवला सामना
18
सोशल मीडियावर मैत्री केली; चार तरुणींच्या जाळ्यात अडकलेल्या आजोबांनी आयुष्यभराची कमाई गमावली!
19
५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप
20
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...

आजच्या वास्तवाचे तारतम्य असलेला अर्थसंकल्प

By admin | Updated: March 1, 2016 03:20 IST

थिअरीमधे पहिला येणारा विद्यार्थी प्रॅक्टिकल्समध्येही पहिला येईल असे नाही, असे व्यावसायिक क्षेत्रात म्हटले जाते. भारताच्या यंदाच्या अर्थसंकल्पातल्या ‘जेंडर बजेट’विषयी नेमके तसेच म्हणता येईल

थिअरीमधे पहिला येणारा विद्यार्थी प्रॅक्टिकल्समध्येही पहिला येईल असे नाही, असे व्यावसायिक क्षेत्रात म्हटले जाते. भारताच्या यंदाच्या अर्थसंकल्पातल्या ‘जेंडर बजेट’विषयी नेमके तसेच म्हणता येईल. जगाच्या नकाशावर सर्वात मोठे प्रजासत्ताक, उदयोन्मुख आर्थिक महासत्ता असलेल्या देशाच्या बजेटमधून जेंडर बजेटची संकल्पनाच गायब झाली आहे. निर्भया फंडसाठी अतिरिक्त एक हजार कोटी रुपयांची तरतूद करून महिला संरक्षणाचा सोपस्कार सरकारने पार पाडला आहे. सुकन्या समृद्धी योजनेत केलेल्या गुंतवणुकीसाठी करसवलत घोषित केली आहे. त्यामुळे महिलांच्या सबलीकरणाच्या घोषणा करणाऱ्या सरकारला देशाच्या लोकसंख्येपैकी ज्या ४८ टक्के मुली व महिला आहेत, त्यांचा स्वतंत्र विचारच करण्याची गरज वाटत नाही का, असा प्रश्न पडला आहे. या वर्षीचा अर्थसंकल्प अर्थमंत्री जेव्हा त्यांच्या पोतडीतून बाहेर काढत होते त्या वेळी त्याबद्दलच्या अपेक्षा पूर्णपणे उंचावल्या होत्या. कोणत्याही सरकारचा तिसऱ्या वर्षीचा अर्थसंकल्प हा क्रांतिकारी अर्थसंकल्प बनवण्यासाठी पूर्णपणे वाव असलेला ठरतो. या अर्थसंकल्पाची मांडणी नावीन्यपूर्ण आहे. अर्थमंत्र्यांनी आपला अर्थसंकल्प पहिल्यांदाच सरकारच्या ८ धोरणांवर आधारित आहे, असे सांगत सरकारचा ग्रामीण भारत व शेतकरी, शेती उद्योग आणि गरीब भारतीयांना आधार देणारा ठरणार आहे हे पटवण्याचा प्रयत्न केला. २0२२ पर्यंत शेती उद्योग दुपटीने वाढवण्याचा उद्देश सांगत सिंचन योजनांसाठी भरघोस पैशाची तरतूद करून ठेवली आहे. शेतीमालाला चांगला भाव मिळावा यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे आश्वासन देत शेतकऱ्यांचा फायदाच होईल, असे सूतोवाच केले. ग्रामीण विकासासाठी केंद्रीय योजना न राबवता थेट ग्रामपंचायतींना २.८७ लाख कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. विकेंद्रीकरणाच्या या उद्देशाला शुभेच्छा! एकंदरीत एक क्रांतिकारक बदलांची नांदी करणारा अर्थसंकल्प मांडण्याची संधी या सरकारला तिसऱ्या वर्षी होती, पण त्यांनी त्याचा तितकासा फायदा करून घेतला नाही असे दिसते. तरीही हा अर्थसंकल्प भारतीय अर्थव्यवस्थेच्या आजच्या वास्तवाशी तारतम्य ठेवणारा आहे असेच मला वाटते.