शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
3
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
6
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
7
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
8
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
9
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
10
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
11
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
12
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
13
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
14
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
15
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
16
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
17
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
18
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
19
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
20
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण

आजच्या वास्तवाचे तारतम्य असलेला अर्थसंकल्प

By admin | Updated: March 1, 2016 03:20 IST

थिअरीमधे पहिला येणारा विद्यार्थी प्रॅक्टिकल्समध्येही पहिला येईल असे नाही, असे व्यावसायिक क्षेत्रात म्हटले जाते. भारताच्या यंदाच्या अर्थसंकल्पातल्या ‘जेंडर बजेट’विषयी नेमके तसेच म्हणता येईल

थिअरीमधे पहिला येणारा विद्यार्थी प्रॅक्टिकल्समध्येही पहिला येईल असे नाही, असे व्यावसायिक क्षेत्रात म्हटले जाते. भारताच्या यंदाच्या अर्थसंकल्पातल्या ‘जेंडर बजेट’विषयी नेमके तसेच म्हणता येईल. जगाच्या नकाशावर सर्वात मोठे प्रजासत्ताक, उदयोन्मुख आर्थिक महासत्ता असलेल्या देशाच्या बजेटमधून जेंडर बजेटची संकल्पनाच गायब झाली आहे. निर्भया फंडसाठी अतिरिक्त एक हजार कोटी रुपयांची तरतूद करून महिला संरक्षणाचा सोपस्कार सरकारने पार पाडला आहे. सुकन्या समृद्धी योजनेत केलेल्या गुंतवणुकीसाठी करसवलत घोषित केली आहे. त्यामुळे महिलांच्या सबलीकरणाच्या घोषणा करणाऱ्या सरकारला देशाच्या लोकसंख्येपैकी ज्या ४८ टक्के मुली व महिला आहेत, त्यांचा स्वतंत्र विचारच करण्याची गरज वाटत नाही का, असा प्रश्न पडला आहे. या वर्षीचा अर्थसंकल्प अर्थमंत्री जेव्हा त्यांच्या पोतडीतून बाहेर काढत होते त्या वेळी त्याबद्दलच्या अपेक्षा पूर्णपणे उंचावल्या होत्या. कोणत्याही सरकारचा तिसऱ्या वर्षीचा अर्थसंकल्प हा क्रांतिकारी अर्थसंकल्प बनवण्यासाठी पूर्णपणे वाव असलेला ठरतो. या अर्थसंकल्पाची मांडणी नावीन्यपूर्ण आहे. अर्थमंत्र्यांनी आपला अर्थसंकल्प पहिल्यांदाच सरकारच्या ८ धोरणांवर आधारित आहे, असे सांगत सरकारचा ग्रामीण भारत व शेतकरी, शेती उद्योग आणि गरीब भारतीयांना आधार देणारा ठरणार आहे हे पटवण्याचा प्रयत्न केला. २0२२ पर्यंत शेती उद्योग दुपटीने वाढवण्याचा उद्देश सांगत सिंचन योजनांसाठी भरघोस पैशाची तरतूद करून ठेवली आहे. शेतीमालाला चांगला भाव मिळावा यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे आश्वासन देत शेतकऱ्यांचा फायदाच होईल, असे सूतोवाच केले. ग्रामीण विकासासाठी केंद्रीय योजना न राबवता थेट ग्रामपंचायतींना २.८७ लाख कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. विकेंद्रीकरणाच्या या उद्देशाला शुभेच्छा! एकंदरीत एक क्रांतिकारक बदलांची नांदी करणारा अर्थसंकल्प मांडण्याची संधी या सरकारला तिसऱ्या वर्षी होती, पण त्यांनी त्याचा तितकासा फायदा करून घेतला नाही असे दिसते. तरीही हा अर्थसंकल्प भारतीय अर्थव्यवस्थेच्या आजच्या वास्तवाशी तारतम्य ठेवणारा आहे असेच मला वाटते.