शहरं
Join us  
Trending Stories
1
'जिनपिंग यांची ही गोष्ट चांगली नाही', ट्रम्प यांची थेट प्रतिक्रिया, जिनपिंग यांनी लगेच हिशेब चुकता केला
2
मोठी दुर्घटना! गेरुआ नदीत गावकऱ्यांना घेऊन जाणारी बोट उलटली; १३ जणांना वाचवलं, ८ बेपत्ता
3
Post Office ची जबरदस्त स्कीम; केवळ व्याजातूनच महिन्याला होईल ₹२०,५००ची कमाई, कर सवलतीचाही फायदा
4
Cyclone Montha : मोंथाचा विध्वंस! २.१४ लाख एकर पिकं उद्ध्वस्त, १८ लाख लोकांना फटका, रेल्वे स्टेशन पाण्याखाली
5
भयंकर! हिट अँड रननंतर कारने बाईकस्वाराला १.५ किमी फरफटतं नेलं; धडकी भरवणारा Video
6
आजचे राशीभविष्य, ३० ऑक्टोबर २०२५: सरकारी मदत, आर्थिक लाभ; जुने मित्र भेटतील, आनंदी दिवस
7
'साईबाबा' फेम अभिनेते सुधीर दळवींना मदत केल्याने रणबीर कपूरची बहीण झाली ट्रोल, नेमकं काय घडलं?
8
"खरं सांगायचं तर..."; फिल्मफेअर पुरस्कार विकत घेतल्याच्या आरोपांवर अभिषेक बच्चन स्पष्टच म्हणाला
9
पती झाला हैवान! लेकासमोरच पत्नीची निर्घृण हत्या, डोळ्यांना, चेहऱ्याला...; अपघाताचा रचला बनाव
10
आता ब्लू इकॉनॉमीकडे झेप, तब्बल १२ लाख कोटींचे करार; शिवछत्रपतींच्या विचारांनी भारत प्रगतीपथावर
11
राज ठाकरेही मेळाव्यात फोडणार मतचोरीचा बॉम्ब? बोगस नावे, मतचोरी, EVM घोटाळ्यांवर सादरीकरण
12
वेतन वाढेल, जबाबदारी? आठव्या वेतन आयोगाने सरकारवरील बोजा २० ते २५ हजार कोटींनी वाढणार
13
मुंबई पालिकेची निवडणूक जानेवारीच होणार? आरक्षण सोडत ११ नोव्हेंबरला, आयोगाकडून सूचना प्रसिद्ध
14
५ नोव्हेंबरपर्यंत पाऊसधारांचा अंदाज; कमी दाबाचा पट्टा ओमानकडे जाण्याऐवजी किनारपट्ट्यांवर रेंगाळला
15
सावध व्हा, ‘कॉल मर्जिंग स्कॅम’ धाेका ! नव्या पद्धतीने केवळ काही अवधीत लाखो रुपयांवर डल्ला
16
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
17
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
18
काँग्रेसमध्ये महापालिकेसाठी इच्छुकांची गर्दी; आले ४५० अर्ज, इच्छुकांकडून ५०० रुपये शुल्क
19
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
20
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास

भाजप-मनसे एकत्र येणार? फायदा नेमका कोणाला होणार?

By किरण अग्रवाल | Updated: January 9, 2020 12:19 IST

देवेंद्र फडणवीस-राज ठाकरेंच्या भेटीनंतर भाजप-मनसे एकत्र येणार असल्याची चर्चा

- किरण अग्रवाल

पक्षीय भूमिका वा तत्त्वांचे अडसर दूर ठेवत व राज्यातील सत्तेची समीकरणे जुळवत आकारास आलेली महाविकास आघाडी आणि त्यानंतर अन्य राज्यांतही होऊ घातलेल्या अशाच प्रकारच्या राजकीय आघाड्या पाहता राजकारणात काहीही अशक्य नसते, यावर पुन्हा एकवार शिक्कामोर्तब होऊन गेले आहे; त्यामुळे भाजप व ‘मनसे’चीही ‘युती’ घडून आल्यास आश्चर्य वाटून घेता येऊ नये. पण, असे करून शिवसेनेला काटशह देण्याच्या नादात स्वत:ची मतपेढी असलेल्या महानगरी तंबूत ‘मनसे’च्या उंटाला शिरकाव करू देणे भाजपस राजकीयदृष्ट्या परवडणारे आहे का, असा प्रश्न उपस्थित होणेही गैर ठरू नये.

विधानसभेत सर्वाधिक संख्याबळ असूनही विरोधी पक्ष नेतेपद सांभाळण्याची वेळ आलेले देवेंद्र फडणवीस व ‘मनसे’चे नेते राज ठाकरे यांची अलीकडेच गुप्त भेट झाल्याची चर्चा असून, भाजप व मनसे एकत्र येणार असल्याचीही वदंता आहे. ‘मनसे’चा झेंडा बदलणार असल्याच्याही चर्चा याचसंदर्भाने घडून येत आहेत. या सर्वच चर्चांना अद्याप कोणीही नाकारलेले नसल्याने त्यात तथ्य असावे, असा अंदाज बांधता यावा. शिवाय, भाजप-मनसे सोबत येणार असेल तर त्यात गैर काही ठरू नये. कारण, भिन्न विचारसरणीचे काँग्रेसशिवसेना एकत्र येऊ शकतात, तर भाजप-मनसेच्या सामीलकीला कशाचा अडसर ठरावा? एकमेकांना टोकाचा विरोध करणारे पक्ष व त्यांचे नेते प्रसंगी हातात हात घेत एकत्र नांदल्याची अनेक उदाहरणे आहेत. गेल्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात राज ठाकरे यांनी उमेदवार उभे न करता नरेंद्र मोदी व अमित शहा यांच्यावर टीकेचा भडीमार केला होता, तर तद्नंतरच्या विधानसभा निवडणुकीत ‘मनसे’चे उमेदवार उभे करून तेच विरोधाचे सूत्र कायम ठेवले होते, त्यामुळे उभयपक्षीयांचे सूर कसे जुळणार, असा बालीश प्रश्न करणारे करतातही; पण त्याला अलीकडच्या राजकीय स्थितीत काडीचाही अर्थ नाही. तसेही तत्पूर्वी राज ठाकरे यांनी मोदींच्या नेतृत्वातील गुजरातच्या प्रगतीचे गोडवे गायले होते, हे विसरता येऊ नये.

महत्त्वाचे म्हणजे, भाजप व मनसे या दोघांनाही कुण्या सहकाऱ्याची गरज आहे. भाजपची पारंपरिक सहकारी असलेली शिवसेना त्यांच्यापासून दुरावल्याने व तिच्यामुळेच सत्ताविन्मुख राहण्याची वेळ ओढवल्याने भाजपला नव्या जोडीदाराचा शोध आहे. एकपक्षीय राजकारण दिवसेंदिवस अवघड होत चालल्याने ही गरज निर्माण झाली आहे. यातही शिवसेनेला काटशह देण्यासाठी ‘मनसे’ला जवळ करणे हाच पर्याय त्यांच्याजवळ असणे स्वाभाविक आहे. ‘मनसे’च्या दृष्टीने विचार करता, राज ठाकरे यांनी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत प्रचाराचे मैदान गाजवूनही या पक्षाला अपेक्षित यश मिळवता आले नाही. विधानसभेत ‘मनसे’चा एकच आमदार निवडून येऊ शकला. खरे तर सत्तेसाठी नव्हे, विरोधकाची भूमिका सक्षमतेने पार पाडण्यासाठी त्यांनी मते मागितली होती. पण, मतदारांनी त्यातही नाकारले. शिवाय, राष्ट्रवादी काँग्रेसशी जवळीकता असली तरी तो पक्षही शिवसेनेसोबत सत्तेत गेला. त्यामुळे ‘मनसे’समोर भाजपखेरीज सक्षम सोबतीचा पर्याय उरलेला नाही. तेव्हा उभय पक्षांची परस्परपूरक गरज वा अपरिहार्यता म्हणून यासंबंधीच्या चर्चांकडे पाहता यावे.

काँग्रेससोबत गेल्याने शिवसेनेला आपला हिंदुत्वाचा मुद्दा मवाळ करावा लागल्याची टीका होत आहेच, त्यामुळे तोच मुद्दा हाती घेऊन व ‘झेंडा’ बदलून ‘मनसे’ला कात टाकता येणारी आहे. असे केल्याने त्यांना भाजपजवळ जाणे शक्य होईल. अर्थात, आजकाल तत्त्व-भूमिकांचे ओझे न बाळगता युती वा आघाड्या साकारतात हा भाग वेगळा; पण हिंदुत्वाचा कॉमन अजेंडा या दोन्ही पक्षांना परस्परांशी जोडून घेण्यास उपयोगी ठरू शकतो. अडचण आहे ती या दोघांच्या कॉमन मतपेढीची. कारण, भाजपचा प्रभाव शहरी व महानगरी क्षेत्रात आहे. ‘मनसे’ही मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक या महानगरी भागात अस्तित्व दर्शवून आहे. यात महापालिका असो, की अगदी विधानसभा; ‘शत-प्रतिशत’ यश मिळवण्याचे भाजपचे स्वप्न लपून राहिलेले नाही. ‘मनसे’ आज अस्तित्वासाठी झगडतेय. त्यामुळे त्यांना भाजपची साथ लाभदायी ठरू शकेलही; पण ‘मनसे’ला सोबत घेऊन आपल्या मतपेढीत वाटे-हिस्सेकरी वाढवून घेणे भाजपला परवडणारे आहे का, हा खरा प्रश्न आहे. अर्थात, लहान भावाची भूमिका स्वीकारण्यास ‘मनसे’ तयार असेल तर सूर जुळून येतीलही. कारण ‘एकला चलो रे’ची स्थिती आता राहिली नाही हे एव्हाना भाजपच्याही लक्षात आले असेलच.   

टॅग्स :Maharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारBJPभाजपाMNSमनसेShiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेस