शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
5
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
6
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
7
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
8
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
9
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
10
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
11
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
12
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
13
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
14
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
15
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
16
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
17
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
18
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
19
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
20
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले

मल्ल्या व जेटलींचे रहस्य!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2018 06:26 IST

ज्या इसमाने देशाला हजारो कोटींनी गंडविले आहे आणि ज्याच्या कंपनीची विमाने दिवसेंदिवस उडेनाशी झालेली देशाला दिसत आहेत त्याच्या हालचालीवर देशाचे पोलीस खाते व अन्य संरक्षक यंत्रणा नजर ठेवीत नाही हे कोण मान्य करील?

देशाला आठ हजार कोटी रुपयांनी गंडवून विदेशात पसार झालेल्या किंगफिशर या विमान कंपनीचा फरार मालक विजय मल्ल्या हा पळण्यापूर्वी देशाचे अर्थमंत्री अरुण जेटली यांना संसदेच्या संयुक्त सभागृहात भेटला असेल आणि त्यांच्याशी त्याने केलेली चर्चा सीसीटीव्हीच्या कॅमेऱ्यात बंद झाली असेल तर तो केंद्र सरकार व त्याची एकूण अर्थव्यवस्था याविषयी जनतेत संशय उत्पन्न करणारा प्रकार आहे. भारतीय जनता पार्टीचे पुढारी आणि त्यांचे प्रवक्ते असे काही घडलेच नाही असे उच्चरवात सांगत असले तरी त्यांचे ते सांगणेही आता कुणाला फारसे खरे वाटत नाही. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी आणि त्यांचा पक्ष यांनी या आरोपावरून अरुण जेटलींना थेट आरोपीच्या पिंजºयातच उभे केले आहे. त्या पक्षाचे खासदार पुनिया यांनी जेटली व मल्ल्या यांची झालेली भेट सीसीटीव्हीच्या कॅमेºयात बंद असल्याचे व आपण ती प्रत्यक्ष पाहिली असल्याचे म्हटले आहे. आपले म्हणणे खोटे ठरले तर आपण राजकारणातून संन्यास घेऊ, अशी प्रतिज्ञाही त्याने केली आहे. जेटलींची ही कथित भेट झाल्याच्या दुसºया दिवशी मल्ल्या देशातून पळाला आहे. पळताना त्याने सरकारच्या विश्वासातील जेट कंपनीच्या विमानाचे पहिल्या वर्गाचे तिकीट घेतले आहे. जाताना आपल्या खासदारकीचे सारे विशेषाधिकार त्याने दिल्लीच्या विमानतळावर वापरले आहेत. शिवाय देश सोडताना त्याने आपल्यासोबत ३६ बॅगा व एक अपरिचित स्त्रीही सोबत नेली आहे. दिल्लीच्या विमानतळावर एक खासदार असे सारे करीत असताना त्याचा सुगावा सरकारला किंवा त्याच्या विमान वाहतूक मंत्रालयाला लागला नसेल यावर कोण विश्वास ठेवील? ज्या इसमाने देशाला हजारो कोटींनी गंडविले आहे आणि ज्याच्या कंपनीची विमाने दिवसेंदिवस उडेनाशी झालेली देशाला दिसत आहेत त्याच्या हालचालीवर देशाचे पोलीस खाते व अन्य संरक्षक यंत्रणा नजर ठेवीत नाही हे तरी कोण मान्य करील? एकतर आपण जे करत आहोत त्याला सरकारचे संरक्षण आहे किंवा सरकारातले कुणीतरी आपल्या पाठीशी ठामपणे उभे आहे असा विश्वास वाटल्याखेरीज हा मल्ल्या असा पळून जाणे कसे शक्य आहे? मल्ल्याच्या मागेपुढे आणखीही तीन माणसे अशीच देश बुडवून पळाली. त्यात दोन मोदी आणि एक चोकसी आहे. यातल्या नीरव मोदीला देशाच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांचे संरक्षण व पाठिंबा होता हे कधीचेच देशाला ठाऊक झाले आहे. ‘आपल्या आजारी पत्नीला भेटायला मला इंग्लंडला जायचे आहे’ असे खोटे सांगून या मोदीने सुषमा स्वराज यांच्याकडून परदेश भेटीचा परवाना मिळविला व त्याचवेळी त्या परवान्यावर जगातील इतर देशांना भेटी देण्याची परवानगीही प्राप्त केली. देश सोडून गेल्यानंतर हा मोदी साºया जगात हिंडत राहिला. सध्या तो इंग्लंडमध्ये आहे. दुसरा मोदी असाच सरकारला पूर्वसूचना देऊन देशातून बेपत्ता झाला. तिसरा चोकसी हा सध्या अँटिग्वा या देशाच्या आश्रयाने राहात आहे. या तिघांनाही स्वदेशात आणण्याची व त्यांना योग्य ते शासन करण्याची प्रतिज्ञा मोदी सरकारने केली आहे. ते मात्र या सरकारला व देशाला वाकुल्या दाखवत आपापल्या जागी मजेत आहेत. मल्ल्या इंग्लंडच्या राणीच्या नवºयासोबत टेनिस खेळतो आणि अनेक जागतिक नेत्यांच्या पार्ट्यांमध्येही सामील होतो. नीरव मोदी खेळाच्या मैदानावर असतो. दुसरा मोदीही मजेत राहतो आणि चोकसी भारतात पत्रके पाठवतो. हा सारा इतिहास पाहता मल्ल्याने जेटलींची भेट घेतली असणे व त्यांच्याशी चर्चा केली असणे कुणालाही खोटे वाटणारे नाही. सबब या प्रकरणातील सत्य समाजासमोर आले पाहिजे. काँग्रेसचे लोक खोटे आरोप करतात आणि भाजपाचे लोक सत्याला स्मरून बोलतात यावर आता कुणीही विश्वास ठेवायला तयार नाही. त्यातून सीसीटीव्हीचा कॅमेरा खोटे बोलणार नाही आणि संसदेच्या संयुक्त सभागृहात झालेली जेटली व मल्ल्या यांची भेट सरकारच्या दफ्तरातही नोंदविली गेल्याखेरीज राहिली असणार नाही. सबब या प्रकरणातले सत्य देशाला समजले पाहिजे.

टॅग्स :Vijay Mallyaविजय मल्ल्याArun Jaitleyअरूण जेटलीBJPभाजपाNirav Modiनीरव मोदीLalit Modiललित मोदी