शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
4
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
5
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
6
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
7
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
8
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
9
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
10
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
11
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
12
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
13
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
16
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
17
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
18
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
19
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
20
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?

मुंबईचा जन्म आणि आदिमानवाच्या पाऊलखुणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2019 04:14 IST

साधारण साडेसहा कोटी वर्षांपूर्वी मुंबईच्या जन्माची कथा सुरू होते.

- डॉ. सूरज पंडितसाधारण साडेसहा कोटी वर्षांपूर्वी मुंबईच्या जन्माची कथा सुरू होते. तेव्हा हिमालयाचा जन्म व्हायचा होता, गंगा अजून उत्तर भारतात अवतरायची होती, डायनासॉर्सच्या युगाचा अंत जवळजवळ निश्चित झाला होता, पृथ्वीच्या भूगर्भात अनेक हालचाली होत होत्या. भारतीय उपखंड हिंदी महासागरात तरंगत होता आणि भूगर्भातल्या अनेक हालचालींनी ईशान्येकडे होणारी त्याची घोडदौड सातत्याने सुरू होती. भूपृष्ठाच्या कुठल्यातरी कमकुवत पापुद्र्यावरून जाताना भूगर्भातील मॅग्मा उफाळून वर आला आणि या परिसरात ज्वालामुखीने उत्पात मांडला. शेकडो वर्षे लाव्हारसाचे पाट वाहत होते आणि यातूनच दख्खनच्या पठाराची आणि मुंबई परिसराची निर्मिती झाली. या घडामोडी होत असताना इथले पर्जन्यमान, वातावरण, तापमान सारेच वेगळे होते. हळूहळू पृथ्वीवर मानव उत्क्रांत होत गेला. या त्याच्या उत्क्रांतीच्या विविध टप्प्यांमध्ये त्याला या परिसराशी काहीच देणेघेणे नव्हते. पृथ्वीवरील तापमानात चढ-उतार होत होता. हिमयुगे येत-जात होती आणि समुद्राची पातळी सातत्याने बदलत होती.विसाव्या शतकाच्या सुरुवातीपासूनच मुंबई परिसरात अश्मयुगीन पुरातत्त्वीय अवशेष शोधण्यासाठी गवेषणे केली गेली. त्यातूनच समुद्राने वेढलेल्या साष्टी बेटावर, विषेशत: कांदिवली परिसरात काही अश्मयुगीन हत्यारे सापडली. के.आर.यू. टोड, एस. सी. मलिक आणि नंतर डॉ. सांकलिया अशा विद्वानांनी या हत्यारांवर संशोधन केले. त्यांचे निष्कर्ष एकूणच मुंबईच्या ज्ञात इतिहासाला कलाटणी देणारे होते. याच काळातील काही अश्मयुगीन हत्यारे वज्रेश्वरी परिसरात तानसा नदीच्या खोऱ्यात सापडली होती. या दोन्ही परिसरात वस्ती करणाºया माणसांचा परस्परांशी काही संबंध असावा, अथवा ही हत्यारे एकाच मानवसमूहाची असावी असा विद्वानांचा कयास आहे.साधारण तीस ते पस्तीस हजार वर्षांपूर्वी मुंबईच्या परिसरातील सागरीजलाची पातळी फारच कमी होती. याच काळात हे पहिले मानवी स्थलांतरण मुंबईत झाले असावे. १९व्या शतकात मुंबईतील प्रिन्सेस डॉकचे बांधकाम चालू असताना समुद्राखाली अश्मीभूत जंगलाचे अवशेष मिळाले होते. काही तज्ज्ञांच्या मते ते जंगलही अश्मयुगातील असावे. यानंतर बराच काळ मानव वसाहतीचे कुठलेही अवशेष या परिसरात पाहायला मिळत नाहीत. दगडाच्या छिलक्यावर केलेली छोटी हत्यारे (मायक्रोलिथस) मुंबईतील अनेक पुरातत्त्वीय स्थळांवर सापडली होती. टोड आणि मलिक यांनी केलेल्या गवेषणाच्या अहवालात अशा साधारण पंधरा स्थळांचा उल्लेख ते करतात.नवाश्मयुगीन काळात या दगडी हत्यारांचा वापर करणारी मानव वस्ती येथे होती. प्रामुख्याने या हत्यारांचा उपयोग मासेमारीसाठी केला जात असावा असा तज्ज्ञांचा कयास आहे. यांचा काळ ठरविण्यासाठी आज तरी कोणतेही ठोस शास्त्रीय मापदंड आपल्याकडे नाहीत. त्यांच्या एकूणच रचना, वैशिष्ट्यांवरूनच त्यांचा काळ इसवीसनपूर्व सहा हजार ते दोन हजार असावा असे अनुमान तज्ज्ञांनी मांडले आहे. हीच मुंबईतील मानव वसाहतीची सुरुवात होती.जेव्हा गंगेच्या खोºयात दुसºया नागरीकरणातून मौर्य साम्राज्याची मुहूर्तमेढ रोवली जात होती, तेव्हा मुंबईतील मानव नवाश्मयुगातून लोहयुगामध्ये प्रवेश करत होता. उत्तरेतील नागरीकरणाचा विस्तार होत असताना मुंबई प्रदेशातील नैसर्गिक साधनसंपत्तीने व्यापाºयांचे लक्ष वेधले; आणि मुंबईच्या परिसरात नागरीकरणाची पहाट झाली!(लेखक पुरातत्त्व वास्तूंचे अभ्यासक आहेत.)