शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
3
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
4
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
5
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
6
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
7
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
8
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
9
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
10
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
11
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
12
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
13
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
14
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
15
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
16
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
17
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
18
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
19
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
20
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा

अडगळीत गेलेली सायकल पुन्हा रस्त्यावर !

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2020 03:38 IST

bicycle : सायकल निर्मात्यांची राष्ट्रीय संघटना असणाऱ्या ऑल इंडिया सायकल मॅन्युफॅक्चर्स असोसिएशनच्या आकडेवारीनुसार मेपासून सप्टेंबरपर्यंतच्या पाच महिन्यांत देशात एकूण ४१ लाख ८० हजार ९४५ सायकलींची विक्री झालीय. हा नवा ट्रेंड चकीत करणारा ठरलाय...

- श्रीनिवास नागे(उपवृत्तसंपादक, सांगली)कोरोनानं ‘लाइफस्टाइल’च बदलली राव ! फिटनेसबाबत झपाट्यानं जागरूकता वाढलीय. अडगळीत गेलेली सायकल अचानक रस्त्यावर दिसू लागली. व्यायाम-फिटनेस, पर्यावरण हित, पेट्रोलची बचत याचा विचार पुढं आला आणि लॉकडाऊनमध्ये सायकलचा खप वाढला. देशातल्या सायकलविक्रीत गेल्या सात महिन्यांत दुप्पट वाढ झालीय. बहुतांश शहरांमध्ये मनपसंत सायकल खरेदी करण्यासाठी चक्क ‘वेटिंग’ सुरूय. पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणावर सायकलची मागणी नोंदवण्यात आलीय. भारत हा जगातला दुसरा सर्वांत मोठा सायकल उत्पादक देश आहे. सायकल निर्मात्यांची राष्ट्रीय संघटना असणाऱ्या ऑल इंडिया सायकल मॅन्युफॅक्चर्स असोसिएशनच्या आकडेवारीनुसार मेपासून सप्टेंबरपर्यंतच्या पाच महिन्यांत देशात एकूण ४१ लाख ८० हजार ९४५ सायकलींची विक्री झालीय. हा नवा ट्रेंड चकीत करणारा ठरलाय...आठवतात ते सायकल शिकण्याचे दिवस. चोवीस किंवा बावीस इंची काळी सायकल असायची. एका पायानं पायडल मारत ढेंग टाकायची आणि बसायचं. तोल सावरत शिकायचं. पडलं की गुडघे सोलून निघायचे... पन्नासच्या दशकात पंधरा-वीस रुपयांना सायकल मिळायची. सायकल म्हणजे श्रीमंतीचं लक्षण मानलं जायचं ! ती खरेदी करण्यासाठी सरकारी मान्यता लागायची. नगरपालिकेकडून बिल्ला घेऊन सायकल खरेदीला जायचं. तो बिल्ला सायकलला बसवला जायचा. तोच नोंदणी क्रमांक. नंतर सायकली भाड्यानं मिळू लागल्या. अगदी वीस-पंचवीस वर्षांपूर्वीपर्यंत त्या भाड्यानं मिळायच्या. गल्लीबोळात भाड्यानं सायकली देण्याची दुकानं असायची. शाळा-महाविद्यालयं, शासकीय कार्यालयांबाहेर सायकली लावण्यासाठी थांबे असायचे...चित्र बदललं. वीस-पंचवीस वर्षांत सायकली जाऊन दुचाकी आल्या. चारचाकी वाढल्या. दहावी-बारावीनंतर बक्षीस म्हणून सायकल मिळायची, तिथं पोरं दुचाकी गाड्या मागू लागली. सायकली अडगळीत पडल्या... आणि कोरोनाचं संक्रमण सुरू झालं. पुन्हा सायकल बाहेर पडली. सायकल ते दुचाकी, चारचाकी ते पुन्हा सायकल हे वर्तुळ पूर्ण होतंय... सायकलीनंही कात टाकलीय. मोठ्या कंपन्यांची देखण्या डिझाइन्सची नवनवी मॉडेल्स बाजारात आलीत. ‘जो जिता वही सिकंदर’मधला सायकल रेसचा थरार आठवतो का? गिअरच्या तशा सायकलींची क्रेझ आता आलीय. त्यांच्या किमती चार हजारापासून आठ-नऊ लाखापर्यंत. सायकली फिरवणारी तरुण मंडळी सकाळी रस्त्यांवर दिसायला लागलीत, ते त्यामुळंच. जागतिक आरोग्य संघटनेनं सोशल डिस्टन्सिंग आणि व्यायामाला महत्त्व देण्याच्या दृष्टीनं सायकलचा वापर करावा, असा सल्ला दिलाय. विशेष म्हणजे विविध देशांतील अनेक शहरांत सायकल वापरण्याचा निर्णय घेतला गेलाय. मिलान, जिनिव्हा, ब्रुसेल्स आणि लंडनसारखी शहरं त्यात आहेत. भारतातही तशा निर्णयांची चाहूल लागलीय. सायकलिंग करणाऱ्यांची मंडळं स्थापन झालीत. ‘सायकल वापरा’ चळवळ जोमानं सुरू झालीय. आरोग्य आणि रोगप्रतिकारशक्ती याबाबत जागरूकता वाढल्यानं व्यायामासाठी सायकलींच्या मागणीत वाढ होतेय. सायकलमुळं शरीराच्या सर्व भागांचा उत्तम व्यायाम होतो. शरीर तंदुरुस्त राहतं. सायकलिंगमुळे मानसिक आरोग्य जपलं जातं. मनाचाही व्यायाम होतो. तग धरून राहण्याची, टिकाव धरण्याची क्षमता सायकल चालवण्यानं वाढते. हृदय आणि फुफ्फुस उत्तम राहतं. हात, गुडघे, कंबर, पाठीचा उत्तम व्यायाम होतो. हे फायदे समजल्यामुळं सायकल चालवणाऱ्यांची संख्या वाढली नसती तरच नवल! अनलॉकच्या काळात रस्त्यांवरील वाहनांची घटलेली संख्या आणि प्रदूषण कमी झाल्यानं लोकांनी सायकल चालवण्यावर भर दिला. गंमत म्हणजे या कालावधीत बहुतांश लोकांनी पहिल्यांदाच सायकल खरेदी केली! मार्चमध्ये देशव्यापी लॉकडाऊन सुरू झाला. त्यामुळं देशभर एप्रिलमध्ये सायकलची विक्री शून्यावर आली. मेमध्ये मात्र देशात ४ लाख ५६ हजार ८१८ सायकलींची विक्री झाली. जूनमध्ये ती दुपटीनं वाढली. सप्टेंबरमध्ये ती ११ लाख २१ हजार ५४४वर पोहोचली! 

आता तर संयुक्त राष्ट्र संघाच्या पर्यावरणविषयक समितीनं सांगितलंय की, सायकलचा वापर केला तर अनेकांचे जीव वाचतील. पर्यावरणही सुरक्षित राहील. त्यामुळं कोरोनाच्या काळात सार्वजनिक परिवहन व्यवस्था जोपर्यंत पूर्णपणे रुळावर येत नाही, तोपर्यंत दैनंदिन वापराला, कामावर घरापासून ते इच्छितस्थळी पोहोचण्यासाठी आणि परत येण्यासाठीही सायकल हा एकमेव साधा, सहज मार्ग दिसतोय. मध्यंतरी स्मार्ट सिटी योजनेंतर्गत भाडेतत्त्वावर सायकल योजना सुरू झाली. तिचा विस्तार आता सगळ्याच शहरांत झाला, तर ही सायकलसफर आणखी बहारदार होईल.

टॅग्स :Indiaभारत