शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

रायगडमध्ये भोपाळचीच पुनरावृत्ती

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2018 9:29 PM

सुमारे ३४ वर्षांपूर्वी म्हणजेच २, ३ डिसेंबर १९८४ रोजी मध्य प्रदेश येथील भोपाळमध्ये वायु गळती झाली होती.

- विनायक पात्रुडकर

सुमारे ३४ वर्षांपूर्वी म्हणजेच २, ३ डिसेंबर १९८४ रोजी मध्य प्रदेश येथील भोपाळमध्ये वायु गळती झाली होती. या वायुगळतीत हजारोंचा बळी गेला. हजारोंना कायमचे व्यंगत्त्व दिले. ही घटना भारताला नव्हे, तर संपूर्ण जगाला हादरा देणारी होती. आजही या घटनेच्या जखमा कायम आहेत. या घटनेची आठवण व्हावी, अशीच एक घटना गेल्या आठवड्यात रायगड येथे घडली.

येथील रासायनिक कंपनीत वायु गळती झाली. या वायुगळतीने प्राणी व पक्षांचे बळी घेतले. या कंपनीतील निदर्यी अधिकाऱ्यांनी मृत प्राणी व पक्षांचे मृतदेह पुरून पुरावे नष्ट केले. ही बाब नक्कीच निंदनीय आहे. येथील जागरुक गावकऱ्यांनी ही घटना उजेडात आणली. याची दखल घेत लोकमतने या घटनेला सर्वप्रथम प्रसिद्धी दिली. त्यामुळे प्रशासन खडबडून जागे झाले. कारवाई सुरू झाली. लोकमतमुळे इतर माध्यमांनाही या वृत्ताची दखल घ्यावी लागली. कारवाईचा वेग प्रचंड असल्याने प्राणी व पक्षांचे मृतदेह पुरणाऱ्या कंपनीच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा नोंदवण्यात आला. पुढे दोषींवर खटला चालून त्यांना शिक्षा होईल. ही शिक्षा तुरळक असेल, कारण वायुगळतीने प्राणी व पक्षांचा बळी जाणे, अशा घटनेला गंभीर शिक्षा देणारे कलम नाही. या घटनेत काही कामगारांनाही बाधा झाली. ही बाधा किरकोळ आहे.

त्याआधारावरही अधिकाधिक शिक्षेची मागणी करता येणार नाही. त्यातूनही विरळातील विरळ घटना म्हणून आरोपींना गंभीर शिक्षा द्यावी, अशी मागणी करता येणे शक्य आहे. कारण प्राणी व पक्षी हे अधिक संवेदनशील असतात. वायुगळतीचा परिणाम सर्वप्रथम त्यांच्यावर होतो. हा परिणाम जाणवल्यानेच प्राणी व पक्ष्यांचा बळी गेला. तेथील अधिकाऱ्यांना या घटनेचे गांभीर्य लक्षात आल्यानंतर त्यांनी तात्काळ पुरावे नष्ट करण्याचे काम केले. 

ही वायुगळती अजून काही वेळ सुरू राहिली असती तर बळी जाणाऱ्यांची संख्या मोठी असती. त्याचा आधार घेत गंभीर शिक्षेची मागणी करता येईल. हा कायदेशीर भाग असला तरी महाराष्ट्रातील भोपाळ अशा नावाने ही घटना ओळखली गेली असती. याचे परिणाम अनेक वर्षे येथील भूमीला व नागरिकांना भोगावे लागले असते. तेव्हा या घटनेकडे भविष्यातील गंभीर धोका, या दृष्टीनेच प्रशासनासह सर्वांनाची बघायला हवे. आज अनेक रासायनिक प्रकल्प महाराष्ट्रात ठिकठिकाणी सुरू आहेत. त्याने नद्या दुषित होत आहेत. वायुचे प्रदुषण होत आहे. पर्यावरणाची हानी होत आहे. मात्र, आपल्या दफ्तरी कारभाराला समाधी लागली आहे. जनता काही प्रमाणात जागरुक असल्याने डाऊ सारखे प्रकल्प प्रस्तावित असतानाच हद्दपार झाले. तरीही अनेक रासायनिक प्रकल्प हे जीवघेणे असतानाही सुरू आहेत. अशा प्रकल्पांना निर्बंध घालणे आवश्यक आहे. किमान या घटनेनंतर तरी या दृष्टीने विचार करायला हवा. तरच भविष्यातील अशा घटनांना आळा बसेल. 

टॅग्स :MonkeyमाकडRaigadरायगड