शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

भंडारा-परभणीतील निवडणुकीत चर्चा अकोल्याचीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2018 05:07 IST

पूर्व विदर्भाच्या एका टोकावर असलेला भंडारा अन् मराठवाड्यातील परभणी-हिंगोली हे दोन जिल्हे. येथील राजकीय घडामोडींवर अकोल्याचा प्रभाव

पूर्व विदर्भाच्या एका टोकावर असलेला भंडारा अन् मराठवाड्यातील परभणी-हिंगोली हे दोन जिल्हे. येथील राजकीय घडामोडींवर अकोल्याचा प्रभाव असण्याचे काहीएक कारण नाही; मात्र राजकरणात कोणती परिस्थिती कधी बदलेल, याचा नेम नसतो. हेच प्रत्यंतर आले आहे. भंडाऱ्यात होऊ घातलेल्या पोटनिवडणुकीत अन् परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य मतदारसंघाच्या निवडणुकीत अकोला फॅक्टर महत्त्वाचा ठरणार आहे. त्यामुळे या दोन मतदारसंघांसोबतच अकोल्यातही या निवडणुकीची चर्चा सुरू झाली आहे.माजी खासदार नाना पटोले यांनी दिलेल्या राजीनाम्यामुळे लोकसभेच्या भंडारा-गोंदिया मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे. या मतदारसंघात पोटनिवडणूक लढण्यासाठी उमेदवार निश्चित करण्याचा निर्णय भारिप-बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी घेतला आहे. भारिप-बमसंने अकोला पॅटर्न तयार करून राजकारणातील समीकरणे बदलवून टाकल्याचा इतिहास आहे. भारिपच्या वाढत्या प्रभावामुळेच अकोल्यासारखा एकेकाळी काँग्रेसचा गड असलेल्या जिल्ह्यात सध्या विधानसभा व लोकसभा मतदारसंघ हे काँग्रेसमुक्त झाले आहेत. भारिप-बमसंच्या सामाजिक अभियांत्रिकीचा फटका काँग्रेसच्या व्होट बँकेला बसला तो आजतागायत सावरलेला नाही. या पार्श्वभूमीवर भंडारा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने भारिप-बहुजन महासंघाच्या उमेदवारास जाहीर पाठिंबा देऊन नवीन पर्वाची सुरुवात करावी, असा ठराव भारिप-बहुजन महासंघ प्रदेश कार्यकारिणीने घेतल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष अशोक सोनोने यांनीच दिली आहे. या संभाव्य नव्या पर्वाची सूत्रे अकोल्यातून ठरविली जात असल्याने काँग्रेस-भारिप एकत्र आल्यास पुढील राजकारणाची समीकरणेच बदलणार आहेत. या दोन पक्षांची मैत्री झाल्यास विदर्भातील किमान पाच लोकसभा मतदारसंघातील समीकरणे बदलतील. दुसरीकडे परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य मतदारसंघातून शिवसेनेने अकोल्याचे आ़ गोपीकिशन बाजोरिया यांचे पुत्र विप्लव बाजोरिया यांना उमेदवारी दिली आहे. शिवसेना-भाजपा युतीनुसार परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य मतदारसंघाची जागा भाजपाच्या वाट्याला आली होती; मात्र शिवसेनेने आधीच उमेदवार जाहीर करून टाकला आहे. आता या निवडणुकीसाठी युती एकत्र आली आहे, त्यामुळे विरोधकांसाठी ते आव्हानच आहे. खरे तर आ़ गोपीकिशन बाजोरिया यांच्यावर या मतदारसंघात प्रभारी म्हणून जबाबदारी होती. त्यांनी सर्व चाचपणी करून आपल्या पुत्रालाच निवडणुकीत उतरविण्याचा घेतलेला निर्णय हा त्यांच्या राजकीय अनुभवातून आला आहे. आ. बाजोरिया हे अकोला स्थानिक स्वराज्य मतदारसंघातून सलग तिसºयांदा विजयी झाले आहेत. काँग्रेस-राष्टÑवादीचे बहुमत असतानाही त्यांच्या ‘व्यवस्थापन कौशल्या’ मुळे त्यांनी सेनेच्या विजयाचा झेंडा रोवला होता. नेमकी हीच परिस्थिती आता त्यांच्या पुत्रासमोर आहे. हिंगोली-परभणी मतदारसंघात काँग्रेस-राष्टÑवादीकडे असलेली मते वळविण्यासाठी ते आपला पूर्वानुभव पणाला लावतील, त्यामुळे पुत्रासाठी जणू आ. बाजोरिया हेच रिंगणात आहेत. एकंदरीत या दोन्ही निवडणुकीत अकोला फॅक्टरचा प्रभाव असल्याने अकोल्याच्या राजकारणावरही या निवडणुकीतील निर्णयांचा प्रभाव पडणार आहे.- राजेश शेगोकार