शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
3
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
4
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
5
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
6
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
7
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
8
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
9
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
10
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
11
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
12
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
13
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
14
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
15
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
16
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
17
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
18
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
19
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
20
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा

भंडारा-परभणीतील निवडणुकीत चर्चा अकोल्याचीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2018 05:07 IST

पूर्व विदर्भाच्या एका टोकावर असलेला भंडारा अन् मराठवाड्यातील परभणी-हिंगोली हे दोन जिल्हे. येथील राजकीय घडामोडींवर अकोल्याचा प्रभाव

पूर्व विदर्भाच्या एका टोकावर असलेला भंडारा अन् मराठवाड्यातील परभणी-हिंगोली हे दोन जिल्हे. येथील राजकीय घडामोडींवर अकोल्याचा प्रभाव असण्याचे काहीएक कारण नाही; मात्र राजकरणात कोणती परिस्थिती कधी बदलेल, याचा नेम नसतो. हेच प्रत्यंतर आले आहे. भंडाऱ्यात होऊ घातलेल्या पोटनिवडणुकीत अन् परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य मतदारसंघाच्या निवडणुकीत अकोला फॅक्टर महत्त्वाचा ठरणार आहे. त्यामुळे या दोन मतदारसंघांसोबतच अकोल्यातही या निवडणुकीची चर्चा सुरू झाली आहे.माजी खासदार नाना पटोले यांनी दिलेल्या राजीनाम्यामुळे लोकसभेच्या भंडारा-गोंदिया मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे. या मतदारसंघात पोटनिवडणूक लढण्यासाठी उमेदवार निश्चित करण्याचा निर्णय भारिप-बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी घेतला आहे. भारिप-बमसंने अकोला पॅटर्न तयार करून राजकारणातील समीकरणे बदलवून टाकल्याचा इतिहास आहे. भारिपच्या वाढत्या प्रभावामुळेच अकोल्यासारखा एकेकाळी काँग्रेसचा गड असलेल्या जिल्ह्यात सध्या विधानसभा व लोकसभा मतदारसंघ हे काँग्रेसमुक्त झाले आहेत. भारिप-बमसंच्या सामाजिक अभियांत्रिकीचा फटका काँग्रेसच्या व्होट बँकेला बसला तो आजतागायत सावरलेला नाही. या पार्श्वभूमीवर भंडारा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने भारिप-बहुजन महासंघाच्या उमेदवारास जाहीर पाठिंबा देऊन नवीन पर्वाची सुरुवात करावी, असा ठराव भारिप-बहुजन महासंघ प्रदेश कार्यकारिणीने घेतल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष अशोक सोनोने यांनीच दिली आहे. या संभाव्य नव्या पर्वाची सूत्रे अकोल्यातून ठरविली जात असल्याने काँग्रेस-भारिप एकत्र आल्यास पुढील राजकारणाची समीकरणेच बदलणार आहेत. या दोन पक्षांची मैत्री झाल्यास विदर्भातील किमान पाच लोकसभा मतदारसंघातील समीकरणे बदलतील. दुसरीकडे परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य मतदारसंघातून शिवसेनेने अकोल्याचे आ़ गोपीकिशन बाजोरिया यांचे पुत्र विप्लव बाजोरिया यांना उमेदवारी दिली आहे. शिवसेना-भाजपा युतीनुसार परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य मतदारसंघाची जागा भाजपाच्या वाट्याला आली होती; मात्र शिवसेनेने आधीच उमेदवार जाहीर करून टाकला आहे. आता या निवडणुकीसाठी युती एकत्र आली आहे, त्यामुळे विरोधकांसाठी ते आव्हानच आहे. खरे तर आ़ गोपीकिशन बाजोरिया यांच्यावर या मतदारसंघात प्रभारी म्हणून जबाबदारी होती. त्यांनी सर्व चाचपणी करून आपल्या पुत्रालाच निवडणुकीत उतरविण्याचा घेतलेला निर्णय हा त्यांच्या राजकीय अनुभवातून आला आहे. आ. बाजोरिया हे अकोला स्थानिक स्वराज्य मतदारसंघातून सलग तिसºयांदा विजयी झाले आहेत. काँग्रेस-राष्टÑवादीचे बहुमत असतानाही त्यांच्या ‘व्यवस्थापन कौशल्या’ मुळे त्यांनी सेनेच्या विजयाचा झेंडा रोवला होता. नेमकी हीच परिस्थिती आता त्यांच्या पुत्रासमोर आहे. हिंगोली-परभणी मतदारसंघात काँग्रेस-राष्टÑवादीकडे असलेली मते वळविण्यासाठी ते आपला पूर्वानुभव पणाला लावतील, त्यामुळे पुत्रासाठी जणू आ. बाजोरिया हेच रिंगणात आहेत. एकंदरीत या दोन्ही निवडणुकीत अकोला फॅक्टरचा प्रभाव असल्याने अकोल्याच्या राजकारणावरही या निवडणुकीतील निर्णयांचा प्रभाव पडणार आहे.- राजेश शेगोकार