शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
3
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
4
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
5
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
6
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
7
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
8
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
9
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
10
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
11
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
12
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
13
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
14
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
15
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
16
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
17
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
18
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
19
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
20
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!

भंडारा-परभणीतील निवडणुकीत चर्चा अकोल्याचीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2018 05:07 IST

पूर्व विदर्भाच्या एका टोकावर असलेला भंडारा अन् मराठवाड्यातील परभणी-हिंगोली हे दोन जिल्हे. येथील राजकीय घडामोडींवर अकोल्याचा प्रभाव

पूर्व विदर्भाच्या एका टोकावर असलेला भंडारा अन् मराठवाड्यातील परभणी-हिंगोली हे दोन जिल्हे. येथील राजकीय घडामोडींवर अकोल्याचा प्रभाव असण्याचे काहीएक कारण नाही; मात्र राजकरणात कोणती परिस्थिती कधी बदलेल, याचा नेम नसतो. हेच प्रत्यंतर आले आहे. भंडाऱ्यात होऊ घातलेल्या पोटनिवडणुकीत अन् परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य मतदारसंघाच्या निवडणुकीत अकोला फॅक्टर महत्त्वाचा ठरणार आहे. त्यामुळे या दोन मतदारसंघांसोबतच अकोल्यातही या निवडणुकीची चर्चा सुरू झाली आहे.माजी खासदार नाना पटोले यांनी दिलेल्या राजीनाम्यामुळे लोकसभेच्या भंडारा-गोंदिया मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे. या मतदारसंघात पोटनिवडणूक लढण्यासाठी उमेदवार निश्चित करण्याचा निर्णय भारिप-बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी घेतला आहे. भारिप-बमसंने अकोला पॅटर्न तयार करून राजकारणातील समीकरणे बदलवून टाकल्याचा इतिहास आहे. भारिपच्या वाढत्या प्रभावामुळेच अकोल्यासारखा एकेकाळी काँग्रेसचा गड असलेल्या जिल्ह्यात सध्या विधानसभा व लोकसभा मतदारसंघ हे काँग्रेसमुक्त झाले आहेत. भारिप-बमसंच्या सामाजिक अभियांत्रिकीचा फटका काँग्रेसच्या व्होट बँकेला बसला तो आजतागायत सावरलेला नाही. या पार्श्वभूमीवर भंडारा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने भारिप-बहुजन महासंघाच्या उमेदवारास जाहीर पाठिंबा देऊन नवीन पर्वाची सुरुवात करावी, असा ठराव भारिप-बहुजन महासंघ प्रदेश कार्यकारिणीने घेतल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष अशोक सोनोने यांनीच दिली आहे. या संभाव्य नव्या पर्वाची सूत्रे अकोल्यातून ठरविली जात असल्याने काँग्रेस-भारिप एकत्र आल्यास पुढील राजकारणाची समीकरणेच बदलणार आहेत. या दोन पक्षांची मैत्री झाल्यास विदर्भातील किमान पाच लोकसभा मतदारसंघातील समीकरणे बदलतील. दुसरीकडे परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य मतदारसंघातून शिवसेनेने अकोल्याचे आ़ गोपीकिशन बाजोरिया यांचे पुत्र विप्लव बाजोरिया यांना उमेदवारी दिली आहे. शिवसेना-भाजपा युतीनुसार परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य मतदारसंघाची जागा भाजपाच्या वाट्याला आली होती; मात्र शिवसेनेने आधीच उमेदवार जाहीर करून टाकला आहे. आता या निवडणुकीसाठी युती एकत्र आली आहे, त्यामुळे विरोधकांसाठी ते आव्हानच आहे. खरे तर आ़ गोपीकिशन बाजोरिया यांच्यावर या मतदारसंघात प्रभारी म्हणून जबाबदारी होती. त्यांनी सर्व चाचपणी करून आपल्या पुत्रालाच निवडणुकीत उतरविण्याचा घेतलेला निर्णय हा त्यांच्या राजकीय अनुभवातून आला आहे. आ. बाजोरिया हे अकोला स्थानिक स्वराज्य मतदारसंघातून सलग तिसºयांदा विजयी झाले आहेत. काँग्रेस-राष्टÑवादीचे बहुमत असतानाही त्यांच्या ‘व्यवस्थापन कौशल्या’ मुळे त्यांनी सेनेच्या विजयाचा झेंडा रोवला होता. नेमकी हीच परिस्थिती आता त्यांच्या पुत्रासमोर आहे. हिंगोली-परभणी मतदारसंघात काँग्रेस-राष्टÑवादीकडे असलेली मते वळविण्यासाठी ते आपला पूर्वानुभव पणाला लावतील, त्यामुळे पुत्रासाठी जणू आ. बाजोरिया हेच रिंगणात आहेत. एकंदरीत या दोन्ही निवडणुकीत अकोला फॅक्टरचा प्रभाव असल्याने अकोल्याच्या राजकारणावरही या निवडणुकीतील निर्णयांचा प्रभाव पडणार आहे.- राजेश शेगोकार