शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने प्रवाशांना उडवले, तिघांची प्रकृती गंभीर; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
3
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
4
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
5
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
6
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
7
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
8
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
9
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
10
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
11
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
12
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
13
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
14
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
15
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
16
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
17
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
18
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
19
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...
20
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार

मनाचिये गुंथी - वर्तुळाकार ब्रह्मांड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2017 00:33 IST

जेव्हा आपण ब्रह्मांडातील हालचालींचे सूक्ष्मपणे अवलोकन करतो, तेव्हा आपल्याला समजते की ब्रह्मांडातील सर्व हालचाली या गोलाकार

जेव्हा आपण ब्रह्मांडातील हालचालींचे सूक्ष्मपणे अवलोकन करतो, तेव्हा आपल्याला समजते की ब्रह्मांडातील सर्व हालचाली या गोलाकार असतात व त्या हालचाली पुन्हा पुन्हा घडतात. ब्रह्मांडाचे सर्व पिंड गोलाकार रूपात फिरत असतात आणि त्याची जी लयबद्धता आहे, तीसुद्धा पुन्हा पुन्हा घडते. खगोलशास्त्रज्ञांच्या मते ब्रह्मांडात विनाश व निर्मितीची प्रक्रि या सतत सुरू आहे. ही प्रक्रिया अनंतकाळापासून अविरत व अखंडितपणे सुरू आहे. जेव्हा आपण मानवी जीवनाच्या कार्याकडे पाहतो, त्यावेळी कळते की ही गोलाकार प्रक्रिया आपल्या जीवनात नेहमीच घडत असते. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत सर्व प्रक्रि या पुन्हा पुन्हा घडत असतात. सकाळी उठल्यावर दात घासणे, शौचाला जाणे, अंघोळ करणे, व्यायाम करणे, जलपान करणे, काम करणे, खेळणे, रात्रीला जलपान, रात्रीचे जेवण आणि त्यानंतर झोपणे. या सर्व क्रिया सतत घडत असतात. असे वाटते की, संपूर्ण ब्रह्मांडाचे जीवन चक्र ाकार आहे, जे सतत फिरत असते. या सृष्टीतील द्वंद्वचा सिद्धांतसुद्धा या गोष्टी उघड करतो. द्वंद्वच्या सिद्धांतानुसार दोन विपरीत शक्ती सतत कार्यरत असतात व विपरीत असतानाही एकमेकांना पूरक असतात. जसे अंधारानंतर प्रकाश व प्रकाशानंतर अंधार असतो. जन्मानंतर मृत्यूचे येणे सुनिश्चित आहे. ऊर्जेच्या नियमानुसार ऊर्जा कधीच नाश पावत नाही. ती कोणत्या ना कोणत्या रूपात असते. म्हणजेच मृत्यूनंतरही ऊर्जास्वरूप अस्तित्व राहतेच व अनेक संस्कृतीमध्ये पुनर्जन्माची खूप मोठी संकल्पना आहे. भारतीय तत्त्वज्ञानानुसार या सृष्टीला केवळ आविर्भाव व तिरोभाव असतो. अर्थातच सृष्टी निर्माणही होत नाही व नष्टही होत नाही. ती केवळ प्रकट होत असते व लुप्त होत असते. भारतीय शास्त्रात असे वर्णन पाहायला मिळते की सृष्टीचा आविर्भाव म्हणजे ब्रह्मदेवाचे श्वास सोडणे व तिरोभाव म्हणजे श्वास आत घेणे. या संबंधी एक दुसरे उदाहरण दिले जाते, ज्यात असे म्हणतात की, कातिन जाळ्याला विणते व उलगडते, त्याचप्रमाणे ब्रह्मदेव या सृष्टीला प्रकट व नष्ट करतात. भारतवर्षात या तत्त्वज्ञांनी संकल्पना हळूहळू वैज्ञानिक आधारसुद्धा घेत आहेत. विज्ञानाचे म्हणणे आहे की ऊर्जा जेव्हा घनस्वरूपात असते तेव्हा पदार्थाचे रूप धारण करते व पदार्थ जेव्हा विरघळतो तेव्हा तो ऊर्जेचे रूप धारण करतो. म्हणजेच पदार्थ व ऊर्जा एकच आहेत. ते चक्राकार रूपात एकमेकांना बदलत असतात.- डॉ. भूषणकुमार उपाध्याय -