शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
2
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
3
धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक
4
कोण आहे अविष्कार राऊत?; नेपाळमधील Gen Z आंदोलनापूर्वी केलेले जोरदार भाषण व्हायरल
5
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार ही कंपनी; ३ महिन्यांत पैसे केले डबल, कंपनीत स्टेट बँकेचीही गुंतवणूक
6
Infosys चं बायबॅक 'शॉपिंग'; १९% प्रीमिअमवर खरेदी करणार आपलेच शेअर्स, स्टॉक सुस्साट
7
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
8
उमेश-प्रियाची 'बिन लग्नाची गोष्ट', १३ वर्षांनी पडद्यावर आली रिअल लाईफ जोडी; कसा आहे सिनेमा? वाचा रिव्ह्यू
9
पितृपक्ष २०२५: पितृअष्टमीला करा गजलक्ष्मी व्रत; लक्ष्मीपूजनाएवढेच महत्त्व, सुख संपत्तीने नांदतात सर्व!
10
Pitru Paksha 2025: पितृपक्षाचा एक आठवडा शिल्लक; पितृदोष कसा ओळखावा? उपाय कोणते? ते पाहू
11
ब्राझीलच्या माजी राष्ट्रपतींना सुनावली २७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, निवडणूक हरल्यानंतर केलेली ती कृती भोवली
12
Python Hunting: अजगर मारून त्याचं मांस शिजवलं, दोन जणांना अटक! 
13
सिक्कीममध्ये निसर्गाचा कोप! भूस्खलनात ४ जणांचा मृत्यू, ३ जण बेपत्ता, बचावकार्य सुरू
14
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
15
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
16
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
17
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
18
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
19
आसुरी अहंकार नको, संस्कृतीसोबत सत्कृतीही जोपासायला हवी : मोरारीबापू
20
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले

मनाचिये गुंथी - वर्तुळाकार ब्रह्मांड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2017 00:33 IST

जेव्हा आपण ब्रह्मांडातील हालचालींचे सूक्ष्मपणे अवलोकन करतो, तेव्हा आपल्याला समजते की ब्रह्मांडातील सर्व हालचाली या गोलाकार

जेव्हा आपण ब्रह्मांडातील हालचालींचे सूक्ष्मपणे अवलोकन करतो, तेव्हा आपल्याला समजते की ब्रह्मांडातील सर्व हालचाली या गोलाकार असतात व त्या हालचाली पुन्हा पुन्हा घडतात. ब्रह्मांडाचे सर्व पिंड गोलाकार रूपात फिरत असतात आणि त्याची जी लयबद्धता आहे, तीसुद्धा पुन्हा पुन्हा घडते. खगोलशास्त्रज्ञांच्या मते ब्रह्मांडात विनाश व निर्मितीची प्रक्रि या सतत सुरू आहे. ही प्रक्रिया अनंतकाळापासून अविरत व अखंडितपणे सुरू आहे. जेव्हा आपण मानवी जीवनाच्या कार्याकडे पाहतो, त्यावेळी कळते की ही गोलाकार प्रक्रिया आपल्या जीवनात नेहमीच घडत असते. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत सर्व प्रक्रि या पुन्हा पुन्हा घडत असतात. सकाळी उठल्यावर दात घासणे, शौचाला जाणे, अंघोळ करणे, व्यायाम करणे, जलपान करणे, काम करणे, खेळणे, रात्रीला जलपान, रात्रीचे जेवण आणि त्यानंतर झोपणे. या सर्व क्रिया सतत घडत असतात. असे वाटते की, संपूर्ण ब्रह्मांडाचे जीवन चक्र ाकार आहे, जे सतत फिरत असते. या सृष्टीतील द्वंद्वचा सिद्धांतसुद्धा या गोष्टी उघड करतो. द्वंद्वच्या सिद्धांतानुसार दोन विपरीत शक्ती सतत कार्यरत असतात व विपरीत असतानाही एकमेकांना पूरक असतात. जसे अंधारानंतर प्रकाश व प्रकाशानंतर अंधार असतो. जन्मानंतर मृत्यूचे येणे सुनिश्चित आहे. ऊर्जेच्या नियमानुसार ऊर्जा कधीच नाश पावत नाही. ती कोणत्या ना कोणत्या रूपात असते. म्हणजेच मृत्यूनंतरही ऊर्जास्वरूप अस्तित्व राहतेच व अनेक संस्कृतीमध्ये पुनर्जन्माची खूप मोठी संकल्पना आहे. भारतीय तत्त्वज्ञानानुसार या सृष्टीला केवळ आविर्भाव व तिरोभाव असतो. अर्थातच सृष्टी निर्माणही होत नाही व नष्टही होत नाही. ती केवळ प्रकट होत असते व लुप्त होत असते. भारतीय शास्त्रात असे वर्णन पाहायला मिळते की सृष्टीचा आविर्भाव म्हणजे ब्रह्मदेवाचे श्वास सोडणे व तिरोभाव म्हणजे श्वास आत घेणे. या संबंधी एक दुसरे उदाहरण दिले जाते, ज्यात असे म्हणतात की, कातिन जाळ्याला विणते व उलगडते, त्याचप्रमाणे ब्रह्मदेव या सृष्टीला प्रकट व नष्ट करतात. भारतवर्षात या तत्त्वज्ञांनी संकल्पना हळूहळू वैज्ञानिक आधारसुद्धा घेत आहेत. विज्ञानाचे म्हणणे आहे की ऊर्जा जेव्हा घनस्वरूपात असते तेव्हा पदार्थाचे रूप धारण करते व पदार्थ जेव्हा विरघळतो तेव्हा तो ऊर्जेचे रूप धारण करतो. म्हणजेच पदार्थ व ऊर्जा एकच आहेत. ते चक्राकार रूपात एकमेकांना बदलत असतात.- डॉ. भूषणकुमार उपाध्याय -