शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
2
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
3
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
4
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
5
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
6
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
7
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
8
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा
9
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
10
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?
11
पाकला पुन्हा मिळाली आर्थिक मदत; भारतासोबतच्या तणावादरम्यान IMF ने दिले ₹8400 कोटी
12
तुर्कस्तान आणि अझरबैजानला विमाने पाठवणार का? इंडिगो कंपनीने दिली मोठी अपडेट
13
Tejasvee Ghosalkar : "भाजपात जाण्याबाबत मी..."; तेजस्वी घोसाळकरांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट
14
Surya Gochar 2025: सूर्य होणार अधिक प्रखर, मात्र 'या' राशींसाठी ठरणार सुखकर; कसा ते पहा!
15
'तुझा मुलगा जिन्न आहे' मांत्रिकाचं ऐकून १२ वर्षांनी झालेल्या मुलाला कालव्यात फेकलं!
16
भारतात Trump Towerचा जलवा, ८ ते १५ कोटींचे फ्लॅट्स; १२५ कोटींचं पेंटहाऊस, पहिल्याच दिवशी सोल्ड आऊट
17
ICC Test Rankings : 'तलवारबाज' जड्डूचा मोठा पराक्रम! टेस्टमध्ये अव्वलस्थान कायम राखत सेट केला नवा विक्रम
18
३६ युद्धनौका, ७ विनाशिका, फ्रिगेट आणि पाणबुड्या..., त्या रात्री नौदलाने केली होती कराची बेचिराख करण्याची तयारी   
19
Mumbai: मुंबईतील महिलेची सातव्या मजल्यावरून उडी, सुसाईड नोटमध्ये लिहिले मृत्युचे कारण
20
दहशतवादी मसूद अजहरला पाकिस्तानी सरकार १४ कोटी रुपये देणार? कारण ऐकून व्हाल हैराण!

मनाचिये गुंथी - वर्तुळाकार ब्रह्मांड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2017 00:33 IST

जेव्हा आपण ब्रह्मांडातील हालचालींचे सूक्ष्मपणे अवलोकन करतो, तेव्हा आपल्याला समजते की ब्रह्मांडातील सर्व हालचाली या गोलाकार

जेव्हा आपण ब्रह्मांडातील हालचालींचे सूक्ष्मपणे अवलोकन करतो, तेव्हा आपल्याला समजते की ब्रह्मांडातील सर्व हालचाली या गोलाकार असतात व त्या हालचाली पुन्हा पुन्हा घडतात. ब्रह्मांडाचे सर्व पिंड गोलाकार रूपात फिरत असतात आणि त्याची जी लयबद्धता आहे, तीसुद्धा पुन्हा पुन्हा घडते. खगोलशास्त्रज्ञांच्या मते ब्रह्मांडात विनाश व निर्मितीची प्रक्रि या सतत सुरू आहे. ही प्रक्रिया अनंतकाळापासून अविरत व अखंडितपणे सुरू आहे. जेव्हा आपण मानवी जीवनाच्या कार्याकडे पाहतो, त्यावेळी कळते की ही गोलाकार प्रक्रिया आपल्या जीवनात नेहमीच घडत असते. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत सर्व प्रक्रि या पुन्हा पुन्हा घडत असतात. सकाळी उठल्यावर दात घासणे, शौचाला जाणे, अंघोळ करणे, व्यायाम करणे, जलपान करणे, काम करणे, खेळणे, रात्रीला जलपान, रात्रीचे जेवण आणि त्यानंतर झोपणे. या सर्व क्रिया सतत घडत असतात. असे वाटते की, संपूर्ण ब्रह्मांडाचे जीवन चक्र ाकार आहे, जे सतत फिरत असते. या सृष्टीतील द्वंद्वचा सिद्धांतसुद्धा या गोष्टी उघड करतो. द्वंद्वच्या सिद्धांतानुसार दोन विपरीत शक्ती सतत कार्यरत असतात व विपरीत असतानाही एकमेकांना पूरक असतात. जसे अंधारानंतर प्रकाश व प्रकाशानंतर अंधार असतो. जन्मानंतर मृत्यूचे येणे सुनिश्चित आहे. ऊर्जेच्या नियमानुसार ऊर्जा कधीच नाश पावत नाही. ती कोणत्या ना कोणत्या रूपात असते. म्हणजेच मृत्यूनंतरही ऊर्जास्वरूप अस्तित्व राहतेच व अनेक संस्कृतीमध्ये पुनर्जन्माची खूप मोठी संकल्पना आहे. भारतीय तत्त्वज्ञानानुसार या सृष्टीला केवळ आविर्भाव व तिरोभाव असतो. अर्थातच सृष्टी निर्माणही होत नाही व नष्टही होत नाही. ती केवळ प्रकट होत असते व लुप्त होत असते. भारतीय शास्त्रात असे वर्णन पाहायला मिळते की सृष्टीचा आविर्भाव म्हणजे ब्रह्मदेवाचे श्वास सोडणे व तिरोभाव म्हणजे श्वास आत घेणे. या संबंधी एक दुसरे उदाहरण दिले जाते, ज्यात असे म्हणतात की, कातिन जाळ्याला विणते व उलगडते, त्याचप्रमाणे ब्रह्मदेव या सृष्टीला प्रकट व नष्ट करतात. भारतवर्षात या तत्त्वज्ञांनी संकल्पना हळूहळू वैज्ञानिक आधारसुद्धा घेत आहेत. विज्ञानाचे म्हणणे आहे की ऊर्जा जेव्हा घनस्वरूपात असते तेव्हा पदार्थाचे रूप धारण करते व पदार्थ जेव्हा विरघळतो तेव्हा तो ऊर्जेचे रूप धारण करतो. म्हणजेच पदार्थ व ऊर्जा एकच आहेत. ते चक्राकार रूपात एकमेकांना बदलत असतात.- डॉ. भूषणकुमार उपाध्याय -