शहरं
Join us  
Trending Stories
1
आता सूनच नाही तर सासूलाही करता येणार कौटुंबिक हिंसेविरोधात तक्रार, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय  
2
बीडमध्ये महिला वकिलाला वळ उठेपर्यंत मारहाण! काँग्रेसचे सरकारला चॅलेंज- "पूर्णवेळ गृहमंत्री असेल तर..."
3
केएल राहुल-अथिया शेट्टीच्या लेकीचं झालं बारसं! नाव काय ठेवलं माहितीये? शब्दाला आहे खास अर्थ
4
"क्रिकेटपटूंनी विवस्त्र फोटो पाठवले, शिविगाळ केली, एकाने तर…’’, मुलगी बनलेल्या अनाया बांगरचे सनसनाटी आरोप 
5
सासू जावयानंतर आता बिर्याणीवाला...; कामावर ठेवलेला पोरगाच मालकाच्या पत्नीला पळवून घेऊन गेला
6
बदल्याची आग! उपचाराच्या बिलामुळे झाला कर्जबाजारी, रुग्णालयात चोरी करणारा हायटेक चोर
7
एसबीआयमध्ये १००००० रुपयांवर मिळतंय २४,६०४ चे निश्चित व्याज; एफडीचा कालवधी किती?
8
मोठी बातमी: अपघातग्रस्त रुग्णांवर १ लाखापर्यंत कॅशलेस उपचार करा; बैठकीत आरोग्यमंत्र्यांचे निर्देश
9
"मुख्यमंत्री महोदय, हे फोटो पाहूनही तुम्हाला झोप कशी लागते?"; रोहिणी खडसे यांचा संताप
10
Video - संतापजनक! सर्दीच्या उपचारासाठी आलेल्या मुलाला डॉक्टरने दिलं सिगारेट ओढण्याचं ट्रेनिंग
11
वरमाळा पडली अन् नवरदेवाने दिलेले दागिनेच खोटे निघाले; मग काय नवरीने...
12
मुंबई: शेअर मार्केटमध्ये नुकसान झाले अन् तरुणाने स्वतःच्या गळ्यावर झाडली गोळी, किती लाख बुडाले?
13
पोलिसांचा पुन्हा 'वाल्मीक पॅटर्न'?; फरार PSI कासले काल स्वत:हून पुण्यात आला, अन् आज अटक झाली!
14
बुलढाणा: केसगळतीनंतर आता ‘नखगळती’; ४६ जण बाधित; शेगाव तालुक्यातील ५ गावांत लक्षणे
15
शिक्षक भरती घोटाळ्यात मंत्रालयातील अधिकारी? गुन्हे दाखल करण्याची मागणी
16
"म्हणजे मुलींनी सहनच केलं पाहिजे...", आताच्या मालिकांवर रेणुका शहाणे स्पष्टच बोलल्या
17
"हिंदी ही देशाची राष्ट्रभाषा, त्यामुळे ती लोकांना आली पाहिजे’’, भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळेंचं मोठं विधान    
18
Rahu Mangal Transit 2025: राहू-मंगळ षडाष्टक;'या' पाच राशींच्या आयुष्यात वाढणार अडचणी!
19
अभिमानास्पद! भगवद्गीता, नाट्यशास्त्राला UNESCO ‘मेमरी ऑफ द वर्ल्ड रजिस्टर’मध्ये मिळालं स्थान
20
Video: Mumbai Indians च्या विजयानंतर नीता अंबानी ड्रेसिंग रूममध्ये! 1,2,3 म्हणताच सगळे ओरडले...

संपादकीय - उशिरा सुचलेले शहाणपण

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2023 07:01 IST

एकीकडे सरकारी नोकऱ्या घटत असताना आणि अनेक ठिकाणी भरतीच होत नसताना आरक्षण दिल्यानंतरही रोजगाराचा प्रश्न सुटणार का, हा प्रश्न आहे.

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील वातावरण तापल्यानंतर सामाजिक न्यायाच्या दृष्टीने एक सकारात्मक पाऊल गुरुवारी पडले. राज्य मागासवर्गीय आयोग आता सरसकट सर्वच जातींचे मागासलेपण तपासणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाबाबत राज्य मागासवर्गीय आयोगाला सर्वेक्षण करायला सांगितल्यानंतर आता येत्या आठवडाभरात सर्वेक्षण सुरू केले जाणार आहे. या आयोगाच्या अहवालावर मागासलेपण ठरणार असल्याने या अहवालाला महत्त्व आहे. आयोगाचा मागासलेपणाबाबतीत सर्व्हे करण्याचा निर्णय स्तुत्य असला, तरी ते उशिरा सुचलेले शहाणपण आहे. सामाजिक न्यायाची आणि आरक्षणाची मागणी दीर्घकाळापासून होत आहे; मात्र आंदोलने, उपोषण झाल्याशिवाय समस्येवर उपाय शोधायचा नाही, या ‘सरकारी’ पद्धतीचा फेरविचार करायला हवा. सर्वोच्च न्यायालयानेमराठा आरक्षण फेटाळून लावल्यानंतर आयोगाने याबाबत सर्व्हे करावा, असे सांगितले होते; पण त्यानंतर काहीही झाले नाही. विविध समित्यांची स्थापना, त्यांची निरीक्षणे यांवर प्रामुख्याने भर दिला गेला.

आरक्षणाबाबत ठोस काही हाती लागत नसल्याने आंदोलनांची धार वाढली. आता मात्र सर्वच जातींचे मागासलेपण पाहण्याचा निर्णय झाल्याने त्याआधारे आरक्षणाचा मार्ग मोकळा होणार आहे. हा सर्व्हे आणि त्याचा अहवाल तरी आता वेळेत सरकारला सादर केला जाईल, ही अपेक्षा आहे. तोपर्यंत आंदोलकांनी संयम ठेवण्याची गरज आहे. मागासलेपण संपून सर्वांना मुख्य प्रवाहात घेण्याचा आरक्षण हा एक मार्ग आहे. वास्तविक मागासलेपण ठरविण्यासाठी जे काही निकष असतात, त्यातील जात हा एक निकष आहे. हा निकष महत्त्वाचा आहे. शिवाय सामाजिक, शैक्षणिक, कौटुंबिक, आर्थिक पार्श्वभूमीदेखील महत्त्वाची असते. अशा अनेक निकषांचा अभ्यास करून सामाजिक न्यायाच्या दिशेने जाता येते. आरक्षणाची मागणी वाढण्यामागे देशातील रोजगाराची आणि शिक्षणाची स्थितीदेखील कारणीभूत आहे. शिक्षण सामान्यांच्या आवाक्यात राहिलेले नाही. शेतीप्रधान देशात शेतकऱ्यांसमोर नको तेवढ्या समस्या उभ्या ठाकल्या आहेत. या समस्यांची तीव्रता कमी व्हावी आणि आपल्यालाही संधी मिळावी, असे सर्व समाजघटकांना वाटणे साहजिकच आहे. सामाजिक न्यायाचा अभ्यास करताना त्यामुळेच धोरणकर्त्यांना देशातील स्थिती नेमकी कळायला हवी. जातीनिहाय जनगणनेचीही मागणी दीर्घकाळापासून होत आहे. बिहारमध्ये नुकताच त्याबाबत सर्व्हे केला गेला. राज्यांना वास्तविक जनगणनेचे अधिकार नाहीत. ते सर्व्हे करू शकतात आणि त्याआधारे केंद्राकडे मागणी करू शकतात. सर्वोच्च न्यायालयानेही राज्य मागासवर्गीय आयोगाला असाच सर्व्हे करण्यास सांगितले होते; पण ते करण्यास राज्य सरकारला वेळ मिळाला नाही. राज्यातील राजकीय उलथापालथीमध्ये देखील मोठा वेळ गेला. राज्यांनी सर्व्हे केल्यानंतर मागासलेपणाची आकडेवारी त्यातून निश्चितच समोर येईल. त्याआधारे आरक्षणाचा मार्ग सुकर होणार आहे. राज्यांनी केलेली आकडेवारी महत्त्वाची असली, तरी अंतिम निर्णय केंद्रातच होणार आहे, हे विसरून चालणार नाही. या ठिकाणी विशेष नमूद करण्याची बाब म्हणजे खासगी क्षेत्रात आरक्षण नाही.

एकीकडे सरकारी नोकऱ्या घटत असताना आणि अनेक ठिकाणी भरतीच होत नसताना आरक्षण दिल्यानंतरही रोजगाराचा प्रश्न सुटणार का, हा प्रश्न आहे. खऱ्या अर्थाने तो सामाजिक न्याय होईल का, हे विचारणे गरजेचे वाटते. आरक्षणाची मागणी, त्यासाठी होणारी आंदोलने, विविध सर्व्हे हे सामाजिक न्यायासाठी आहेत, हे विसरून चालणार नाही. राजकारण आणि मतांची टक्केवारी असे या जटिल समस्येकडे कुणी पाहून चालणार नाही. सामाजिक शास्त्रज्ञांना सोबत घेऊन कल्याणकारी समाज घडविण्यासाठी पुढील पावले उचलली पाहिजेत. हा आदर्शवाद सामाजिक न्यायाच्या लढाईमध्ये प्रत्यक्ष राजकीय प्रक्रियेत येईल का, हे पाहणे महत्त्वाचे आहे. मराठा आरक्षणाच्या बाबतीत सुरुवातीला भाजप सरकारच्या काळात आरक्षण दिले गेले. उच्च न्यायालयात ते पात्र ठरले. सर्वोच्च न्यायालयाने मात्र ते फेटाळून लावले. या आरक्षणासाठी लाखोंचे मोर्चे निघाले. मनोज जरांगे पाटील यांचेही आंदोलन सुरू आहे. ओबीसींचे नेते छगन भुजबळ यांनीही एक भूमिका घेतली आहे. ‘सर्वे सुखिनः सन्तु’ अर्थात सर्वजण सुखात राहू देत, हे सांगणारी आपली संस्कृती आहे. या अशा संपन्न देशात सामाजिक न्यायदेखील शांततेच्या मार्गाने होईल, याची खात्री आहे. राज्य मागासवर्ग आयोगाने उचललेले पाऊल त्यासाठीच सकारात्मक आहे. 

टॅग्स :reservationआरक्षणMaratha Reservationमराठा आरक्षणSupreme Courtसर्वोच्च न्यायालय