शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : पांड्याच्या 'सेंच्युरी'सह चक्रवर्तीची 'फिफ्टी'! शेवटच्या षटकात बर्थडे बॉयचा जलवा अन्....
2
VIDEO: आधी गणपती बाप्पाचा जयजयकार, नंतर CM देवेंद्र फडणवीसांनी मेस्सीला केलं एक 'प्रॉमिस'
3
महिनाभर आधी झालेलं प्रेयसीचं लग्न, पहिल्या प्रियकराने नवऱ्याला भेटायला बोलवलं अन् संपवलं...
4
"दिल्ली को दुल्हन बनाएंगे..., आमच्या समोर S-400, राफेल...!"; लश्करच्या दहशतवाद्यानं ओकली गरळ 
5
U19 Asia Cup, IND vs PAK : टीम इंडियाने उडवला पाकचा धुव्वा; हायव्होल्टेज मॅचमध्ये काय घडलं?
6
"हनुकाची पहिली मेणबत्ती...!", ऑस्ट्रेलियात ज्यूंच्या उत्सवादरम्यान झालेल्या गोळीबारावर इस्रायलची पहिली प्रतिक्रिया 
7
VIDEO : क्रिकेटचा 'देव' सचिन आणि फुटबॉलचा 'जादूगार' मेस्सीची ग्रेट भेट; खास गिफ्ट अन् बरंच काही
8
सत्याच्या बळावर मोदी-शाह अन् RSS ची सत्ता उलथून लावू; राहुल गांधीचे टीकास्त्र
9
सिडनी गोळीबारावर PM मोदी म्हणाले, "हा मानवतेवर हल्ला, भारत ऑस्ट्रेलियासोबत खंबीर उभा..."
10
रेस्टॉरंटमध्ये लपला..; ऑस्ट्रेलियातील गोळीबारात इंग्लंडचा माजी कर्णधार थोडक्यात बचावला
11
नितिन नबीन यांची नड्डांच्या जागी BJP अध्यक्षपदी निवड होताच PM मोदींची पोस्ट, म्हणाले...
12
U19 Asia Cup 2025 : कोण आहे Aaron George? पाक विरुद्धच्या सामन्यात टीम इंडियासाठी ठरला ‘संकटमोचक’
13
भाजपचा मोठा निर्णय; नितीन नबीन यांची राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती, जेपी नड्डांची जागा घेणार
14
IND vs SA T20: स्टेडियममध्ये दिसलेल्या 'मिस्ट्री गर्ल'ची रंगली चर्चा, जाणून घ्या 'ती' कोण?
15
Sydney Shooting: समोर मृत्यू नाचत होता, पण तो घाबरला नाही; गोळीबार करणाऱ्याला पकडले अन्...
16
Pune Crime: "अमोलला सोड, माहेरी जा; नाही गेली तर तुला..."; विवाहितेला पतीच्या गर्लफ्रेंडकडून धमकी, प्रकरण काय?
17
औसा-वानवडा रस्त्यावर जळीतकांड; कारसह तरुणाचा झाला कोळसा, घातपाताची शक्यता
18
Nitin Nabin: चार वेळा आमदार, बिहारमध्ये मंत्री; भाजपचे नवे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष नबीन कोण आहेत?
19
सिडनी येथे जगप्रसिद्ध बॉन्डी बीचवर अंदाधुंद गोळीबार; दोन हल्लेखोर ताब्यात, १० पर्यटकांचा जीव घेतला
20
लियोनेल मेस्सीला भेटून खूश झाली करीना कपूरची दोन्ही मुलंं, फुटबॉलपटूसोबत फोटो व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

संपादकीय - उशिरा सुचलेले शहाणपण

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2023 07:01 IST

एकीकडे सरकारी नोकऱ्या घटत असताना आणि अनेक ठिकाणी भरतीच होत नसताना आरक्षण दिल्यानंतरही रोजगाराचा प्रश्न सुटणार का, हा प्रश्न आहे.

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील वातावरण तापल्यानंतर सामाजिक न्यायाच्या दृष्टीने एक सकारात्मक पाऊल गुरुवारी पडले. राज्य मागासवर्गीय आयोग आता सरसकट सर्वच जातींचे मागासलेपण तपासणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाबाबत राज्य मागासवर्गीय आयोगाला सर्वेक्षण करायला सांगितल्यानंतर आता येत्या आठवडाभरात सर्वेक्षण सुरू केले जाणार आहे. या आयोगाच्या अहवालावर मागासलेपण ठरणार असल्याने या अहवालाला महत्त्व आहे. आयोगाचा मागासलेपणाबाबतीत सर्व्हे करण्याचा निर्णय स्तुत्य असला, तरी ते उशिरा सुचलेले शहाणपण आहे. सामाजिक न्यायाची आणि आरक्षणाची मागणी दीर्घकाळापासून होत आहे; मात्र आंदोलने, उपोषण झाल्याशिवाय समस्येवर उपाय शोधायचा नाही, या ‘सरकारी’ पद्धतीचा फेरविचार करायला हवा. सर्वोच्च न्यायालयानेमराठा आरक्षण फेटाळून लावल्यानंतर आयोगाने याबाबत सर्व्हे करावा, असे सांगितले होते; पण त्यानंतर काहीही झाले नाही. विविध समित्यांची स्थापना, त्यांची निरीक्षणे यांवर प्रामुख्याने भर दिला गेला.

आरक्षणाबाबत ठोस काही हाती लागत नसल्याने आंदोलनांची धार वाढली. आता मात्र सर्वच जातींचे मागासलेपण पाहण्याचा निर्णय झाल्याने त्याआधारे आरक्षणाचा मार्ग मोकळा होणार आहे. हा सर्व्हे आणि त्याचा अहवाल तरी आता वेळेत सरकारला सादर केला जाईल, ही अपेक्षा आहे. तोपर्यंत आंदोलकांनी संयम ठेवण्याची गरज आहे. मागासलेपण संपून सर्वांना मुख्य प्रवाहात घेण्याचा आरक्षण हा एक मार्ग आहे. वास्तविक मागासलेपण ठरविण्यासाठी जे काही निकष असतात, त्यातील जात हा एक निकष आहे. हा निकष महत्त्वाचा आहे. शिवाय सामाजिक, शैक्षणिक, कौटुंबिक, आर्थिक पार्श्वभूमीदेखील महत्त्वाची असते. अशा अनेक निकषांचा अभ्यास करून सामाजिक न्यायाच्या दिशेने जाता येते. आरक्षणाची मागणी वाढण्यामागे देशातील रोजगाराची आणि शिक्षणाची स्थितीदेखील कारणीभूत आहे. शिक्षण सामान्यांच्या आवाक्यात राहिलेले नाही. शेतीप्रधान देशात शेतकऱ्यांसमोर नको तेवढ्या समस्या उभ्या ठाकल्या आहेत. या समस्यांची तीव्रता कमी व्हावी आणि आपल्यालाही संधी मिळावी, असे सर्व समाजघटकांना वाटणे साहजिकच आहे. सामाजिक न्यायाचा अभ्यास करताना त्यामुळेच धोरणकर्त्यांना देशातील स्थिती नेमकी कळायला हवी. जातीनिहाय जनगणनेचीही मागणी दीर्घकाळापासून होत आहे. बिहारमध्ये नुकताच त्याबाबत सर्व्हे केला गेला. राज्यांना वास्तविक जनगणनेचे अधिकार नाहीत. ते सर्व्हे करू शकतात आणि त्याआधारे केंद्राकडे मागणी करू शकतात. सर्वोच्च न्यायालयानेही राज्य मागासवर्गीय आयोगाला असाच सर्व्हे करण्यास सांगितले होते; पण ते करण्यास राज्य सरकारला वेळ मिळाला नाही. राज्यातील राजकीय उलथापालथीमध्ये देखील मोठा वेळ गेला. राज्यांनी सर्व्हे केल्यानंतर मागासलेपणाची आकडेवारी त्यातून निश्चितच समोर येईल. त्याआधारे आरक्षणाचा मार्ग सुकर होणार आहे. राज्यांनी केलेली आकडेवारी महत्त्वाची असली, तरी अंतिम निर्णय केंद्रातच होणार आहे, हे विसरून चालणार नाही. या ठिकाणी विशेष नमूद करण्याची बाब म्हणजे खासगी क्षेत्रात आरक्षण नाही.

एकीकडे सरकारी नोकऱ्या घटत असताना आणि अनेक ठिकाणी भरतीच होत नसताना आरक्षण दिल्यानंतरही रोजगाराचा प्रश्न सुटणार का, हा प्रश्न आहे. खऱ्या अर्थाने तो सामाजिक न्याय होईल का, हे विचारणे गरजेचे वाटते. आरक्षणाची मागणी, त्यासाठी होणारी आंदोलने, विविध सर्व्हे हे सामाजिक न्यायासाठी आहेत, हे विसरून चालणार नाही. राजकारण आणि मतांची टक्केवारी असे या जटिल समस्येकडे कुणी पाहून चालणार नाही. सामाजिक शास्त्रज्ञांना सोबत घेऊन कल्याणकारी समाज घडविण्यासाठी पुढील पावले उचलली पाहिजेत. हा आदर्शवाद सामाजिक न्यायाच्या लढाईमध्ये प्रत्यक्ष राजकीय प्रक्रियेत येईल का, हे पाहणे महत्त्वाचे आहे. मराठा आरक्षणाच्या बाबतीत सुरुवातीला भाजप सरकारच्या काळात आरक्षण दिले गेले. उच्च न्यायालयात ते पात्र ठरले. सर्वोच्च न्यायालयाने मात्र ते फेटाळून लावले. या आरक्षणासाठी लाखोंचे मोर्चे निघाले. मनोज जरांगे पाटील यांचेही आंदोलन सुरू आहे. ओबीसींचे नेते छगन भुजबळ यांनीही एक भूमिका घेतली आहे. ‘सर्वे सुखिनः सन्तु’ अर्थात सर्वजण सुखात राहू देत, हे सांगणारी आपली संस्कृती आहे. या अशा संपन्न देशात सामाजिक न्यायदेखील शांततेच्या मार्गाने होईल, याची खात्री आहे. राज्य मागासवर्ग आयोगाने उचललेले पाऊल त्यासाठीच सकारात्मक आहे. 

टॅग्स :reservationआरक्षणMaratha Reservationमराठा आरक्षणSupreme Courtसर्वोच्च न्यायालय