शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदानाच्या टक्केवारीत अचानक ११ दिवसांनी वाढ कशी?; संजय राऊतांनी व्यक्त केली शंका
2
'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
3
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक
4
दक्षिण भारतातील सर्वात तरुण उमेदवार! जाणून घ्या कोण आहेत मोहित रेड्डी? 
5
राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या सिनेमामुळे प्रसाद झाला होता कर्जबाजारी; विकावं लागलं घर; म्हणाला, 'कर्जाचे हप्ते, बँकेचे फोन..';
6
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
7
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
8
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
9
हिट अँड रन: सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर, कारने स्कूटीला धडक दिल्याने अपघात, मामेभावाचा मृत्यू   
10
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
11
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
12
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
13
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
14
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
15
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
16
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
17
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
18
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
19
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
20
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर

ही तर नव्या पेशवाईची सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2018 2:51 AM

घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २० मार्च १९२७ या दिवशी मानवमुक्तीसाठी जनलढा उभारुन निसर्गस्त पाणी पिण्याचा - लोटीबंदीचा कार्यक्रम महाड मुक्कामी पार पाडला.

- ज. वि. पवारघटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २० मार्च १९२७ या दिवशी मानवमुक्तीसाठी जनलढा उभारुन निसर्गस्त पाणी पिण्याचा - लोटीबंदीचा कार्यक्रम महाड मुक्कामी पार पाडला. पाण्याला आग लावणा-या व त्या योगे सरपटणा-या कणाहिन समुहाला ताठ कणा प्रदान करणा-या या क्रांतीशस्त्राचा विसर पडावा म्हणून याच दिवशी सर्वोच्च न्यायालयाने सामाजिक न्याय व दुर्बल घटकांच्या संरक्षणासाठी विशेष तरतुदी नाकरण्याचे पहिले पाऊल टाकले. भारतीय संविधान नाकारणे व लोकशाही उध्वस्त करणे हा एककलमी कार्यक्रम राबविण्यात आला आहे. त्यामुळे न्यायव्यवस्थेवर असलेला विश्वासाला तडा गेला आहे.या निकालाला २० मार्चच्या बाबासाहेबांच्या महाडच्या धर्मसंगराची किनार आहे तशीच ती कोरेगाव भीमा प्रकरणी नं. १ चे आरोपी मनोहर कुलकर्णी तथा संभाजी भिडे यांच्या अटकपूर्व जामिनाची किनार आहे. या कोरेगाव भीमा दंगल प्रकरणी दोन नंबरचे आरोपी मिलिंद एकबोटे यांना सर्वोच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन नाकारल्यामुळे त्यांना पुणे ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. एकबोटे यांचे प्रभावक्षेत्र लक्षणीय नाही. परंतु भिडे हे राज्य व केंद्र सरकारचे ‘गुरू’ आहेत. प्रधानसेवक नरेंद्र मोदी यांना त्यांची सेवा करण्यात अलौकिक आनंद मिळतो. त्यांना या नव्या कायदेशीर तरतुदीनुसार अटकपूर्व जामीन नाकारलाच जाईल असे नाही. म्हणजे एका व्यक्तीच्या संरक्षणासाठी करोडो लोकांच्या भवितव्याशी खेळ मांडियला. बरे हे ‘जामीन’ प्रकरण निकालात काढण्यासाठी पोलीस यंत्रणेवर विश्वास ठेवायचा, संबंधित न्यायिक यंत्रणेवर नाही ही संविधानाची प्रतारणा नाही का?यासंदर्भात प्रा. पी.एस. कृष्णन यांनी केंद्रीय न्यायमंत्र्यांना लिहिलेल्या पत्राचा उल्लेख करणे मला क्रमप्राप्त आहे. कृष्णन हे या खात्याचे राजीव गांधींच्या काळात सेक्रेटरी होते. ‘अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्ट’ संदर्भात त्यांचे योगदान होते. त्यांनी आपल्या पत्रात लिहिले आहे की, या निर्णयामुळे सामाजिक न्यायव्यवस्था लुळीपांगळी झाली आहे. एखाद्या प्रकरणी पोलीस खात्याने तपास करून खरा प्रकार कोर्टासमोर आणला की पीडितांनाच बळी देण्याचे प्रकार केल्याच्या संदर्भात काही अन्यायाची प्रकरणे समोर आणली आहेत.सरकारी कर्मचाºयांना बढती मिळू नये म्हणून त्यांचे सी.आर. खराब करणे हे तर सार्वत्रिक आहे. अशा अवस्थेत बळी जाणाºयांची संख्या वाढेल हे सांगायची आवश्यकता नाही. डॉ. सुभाष महाजन प्रकरणी न्याय देताना अ‍ॅट्रॉसिटी कायद्याचा दुरुपयोग होतो हा निष्कर्ष नोंदविला आहे. हा निष्कर्ष नोंदविताना त्यांनी राष्ट्रीय गुन्हे अभिलेख यंत्रणेचा २०१६ चा अहवाल गृहीत धरला आहे. या अहवालात ५,३४७ गुन्हे खोटे असल्याचे नोंदविले असल्याचे त्यांनी सांगितले. परंतु त्याच वर्षात ४०,८०१ नोंदविलेले गुन्हे खरे होते याकडे त्यांनी का डोळेझाक केली? म्हणजे आपल्याला जो निर्णय द्यायचा आहे तो आधीच ठरविलेला असतो हे यावरून स्पष्ट होते.अ‍ॅट्रॉसिट अ‍ॅक्ट नोंदविणाºयांना आर्थिक मदत मिळते म्हणून हे गुन्हे नोंदविले जातात, असेही काही महाभाग म्हणतात. मराठा मोर्चाने हा प्रश्न ऐरणीवर आणला होता. त्यांना आरक्षण पाहिजे आहे. तो समाजही सत्ताधारी आहे. त्यांना आरक्षण असण्यापेक्षा दलितांचे आरक्षण नष्ट करायचे आहे. अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्ट निकामी करण्याचे पाऊल उचलणे म्हणजे विशेषाधिकार असलेले नोकरी व शिक्षणविषयक आरक्षण रद्द करणे, हे समग्र दलितांना, त्यांच्या पोटभरू नेत्यांना कळले तरच पुढील अरिष्ट टळेल. अन्यथा नवी पेशवाई जन्माला आलीच आहे. दु:ख या गोष्टीचे की या पेशवाईला न्यायव्यवस्थेचे समर्थन मिळत आहे.

टॅग्स :Courtन्यायालय