शहरं
Join us  
Trending Stories
1
"नशीब..., नाही तर फडणवीस म्हणून 20वे आले असते...!"; मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधत उद्धव ठाकरेंनी भरसभेत नेमकं काय वाचलं?
2
"भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
3
“नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
4
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
5
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
6
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार
7
 तामिळनाडूत संघाच्या शाखेवर मोठी कारवाई, ३९ स्वयंसेवक ताब्यात, समोर आलं असं कारण  
8
“लोकशाहीवर चौफेर हल्ले, चीनला शक्य ते भारत करू शकत नाही”; कोलंबियातून राहुल गांधींची टीका
9
याला म्हणतात ढासू परतावा...! ₹1 च्या शेअरमध्ये तुफान तेजी, ₹184 वर पोहोचला भाव; आता कंपनीनं केली मोठी डील
10
...अन्यथा महाराष्ट्रात निवडणुका होऊ देणार नाही; मनोज जरांगेंनी सरकारविरोधात पुन्हा थोपटले दंड, कोणत्या मागण्या केल्या?
11
IAS Srishti Dabas : शाब्बास पोरी! दिवसा काम अन् रात्री अभ्यास; सुंदर IAS चा नेत्रदीपक प्रवास, अडचणींवर केली मात
12
  ब्रिटनमध्ये ज्यूंच्या प्रार्थनास्थळावर भीषण हल्ला, २ जणांचा मृत्यू, तिघे गंभीर जखमी, संशयित ठार   
13
IND vs WI, 1st Test Day 1 Stumps : KL राहुल लंगडताना दिसला; कुलदीप पॅड बांधून बॅटिंगसाठी नटला,पण...
14
Manoj Jarange Patil : "मी थोड्या दिवसांचा पाहुणा..."; मनोज जरांगे पाटील यांना अश्रू अनावर, मराठ्यांना भावनिक साद
15
उल्हासनगरात गरब्याच्या ठिकाणी शिवसेना शाखाप्रमुखावर पिस्तूल रोखून गोळीबार करणारा गजाआड 
16
दसरा मेळाव्यात मनोज जरांगेंनी दिली पुढील आंदोलनाची हाक; म्हणाले, “सरकारला १ महिन्याची मुदत”
17
"सर्व प्रॉपर्टी देऊन टाका…!" निर्दयी सुनेची वृद्ध सासूला अमानुष मारहाण, केस ओढत केली शिवीगाळ; VIDEO पाहून तुमचाही संताप उडेल
18
Chaitanyananda Saraswati : डर्टी गेम! चैतन्यनंद सरस्वतीच्या मठात सेक्स टॉय, अश्लील CD; दिल्ली ते दुबईपर्यंत नेटवर्क
19
Zubeen Garg : स्कूबा डायव्हिंगमुळे नाही तर.... कसा झाला सिंगर झुबीन गर्गचा मृत्यू? आता मोठा खुलासा
20
VIDEO: बापरे... अगदी सहज उंच बिल्डिंगवरून तरूणाने स्विमिंग पूलमध्ये मारली उडी अन् मग...

लेख: बँकेची कमाई आमच्याच खिशातून! सामान्य माणसासाठी आजची बँकिंग व्यवस्था एक भुलभुलैया

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2025 11:35 IST

कोणत्या सेवांसाठी किती शुल्क आकारावे याला कुणाचाच काही धरबंद राहिलेला नाही. बँका अव्वाच्या सव्वा शुल्क आकारू लागल्या आहेत. ग्राहकांच्या खिशात या बँकांना त्यांचा नफा दिसायला लागला आहे. रिझर्व्ह बँकेनेही हात वर केले म्हटल्यावर ग्राहकांनी न्यायासाठी जावे तरी कुठे?

देवीदास तुळजापूरकर, माजी संचालक, बँक ऑफ महाराष्ट्र

आयसीआयसीआय बँकेने बचत खात्यासाठी किमान शिल्लक रक्कम महानगर आणि शहरांसाठी ५० हजार, निमशहरासाठी २५ हजार आणि ग्रामीण भागासाठी १० हजार रुपये केल्यामुळे कोण गदारोळ उडाला... आता सोशल मिडियावर मोठा गहजब झाल्याने आयसीआयसीआय बँकेला माघार घ्यावी लागली आणि किमान शिल्लक रक्कम १५ हजार रुपयांवर आणावी लागली. पण तरीही इतर बँकांच्या किमान शिल्लक रकमेबाबतचा जो निकष आहे, त्या मानाने ही रक्कम खूप जास्त होती. या प्रश्नावर रिझर्व्ह बँकेने तर चक्क हातच वर केले होते. बँकिंग आता फक्त सेवा राहिली नाही तर ती अत्यावश्यक सेवा झाली आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकाला बँकेत खाते उघडणे अनिवार्य बनले आहे. बँकिंगचा समावेश मूलभूत अधिकारांमध्ये करावा, अशी मागणीही केली जात आहे. या पार्श्वभूमीवर बँकांनी असा दुराग्रह धरणे कितपत उचित आहे, असा प्रश्न पडतो. बँका ग्राहकांना ज्या सेवा देतात त्या सर्व सेवांवर शुल्क आकारले जाते आणि अनेकदा ते अव्वाच्या सव्वा असल्याचे निदर्शनास आले आहे.

खात्याची वार्षिक देखभाल, एटीएम कार्ड, जास्त वेळा पैसे काढणे, निर्धारित रकमेपेक्षा जास्त कॅश भरणे, पिन कोड बदल, सहीत बदल, डुप्लिकेट पासबुक, सहीची पडताळणी,  स्टेटमेंटमध्ये जास्त व्यवहारासाठी जास्त प्रतींची मागणी, चेक बाउन्स होणे,  इसीएस मँडेंट, तो परत जाणे इत्यादी सेवांसाठी बँका सेवाकर आकारतात. ही यादी आणखी वाढू देखील शकते. थोडक्यात, ग्राहकांना दिल्या जाणाऱ्या प्रत्येक सेवेसाठी बँका आता शुल्क आकारतात. यापैकी सर्वच सेवा शुल्क आकारण्याच्या कक्षेत येतात का? कोणत्या सेवांवर शुल्क घेतले पाहिजे, यात काही तर्कसंगतता तर असली पाहिजे की नाही? आणि हे कोण ठरवणार? याचे नियमन कोण करणार? हे प्रश्न घेऊन काही स्वयंसेवी संस्थांनी जनहित याचिका दाखल करून न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते. पण हा धोरणात्मक प्रश्न आहे आणि त्यासाठी रिझर्व्ह बँक सक्षम आहे, असे कोर्टाचे म्हणणे आहे. तर रिझर्व्ह बँकेने हा निर्णय संबंधित बँकांच्या संचालक मंडळावर सोडला आहे.

आकड्यांच्या परिभाषेतला नफा ज्यामुळे भागधारकांना खूश ठेवता येईल त्याला आता सार्वजनिक क्षेत्रातील बँकाही अपवाद राहिलेल्या नाहीत! भलेही किमान शिल्लक या निकषावर त्या खासगी बँकांच्या तुलनेत ग्राहकस्नेही धोरण अवलंबत असल्या तरी इतर अनेक बाबतींत, सेवा शुल्क आकारण्यात त्या खासगी बँकांचीच बरोबरी करतात. बाजारकेंद्रीत अर्थव्यवस्थेचे तत्त्वज्ञान एकाच तत्वावर चालते ते म्हणजे ‘टिकेल तोच जो लायक आहे’. लायक यासाठी निकष एकच, ‘अधिकाधिक नफा’ आणि ‘वाटेल त्या मार्गाने नफा’! 

टॅग्स :bankबँकICICI Bankआयसीआयसीआय बँकhdfc bankएचडीएफसी