शहरं
Join us  
Trending Stories
1
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींच्या आरोपावर निवडणूक आयोगाचे उत्तर
2
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
3
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
4
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
5
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
6
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
7
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
8
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
9
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
10
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
11
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
12
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
13
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
14
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
15
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
16
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळायला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
17
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
18
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
19
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
20
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...

लेख: बँकेची कमाई आमच्याच खिशातून! सामान्य माणसासाठी आजची बँकिंग व्यवस्था एक भुलभुलैया

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2025 11:35 IST

कोणत्या सेवांसाठी किती शुल्क आकारावे याला कुणाचाच काही धरबंद राहिलेला नाही. बँका अव्वाच्या सव्वा शुल्क आकारू लागल्या आहेत. ग्राहकांच्या खिशात या बँकांना त्यांचा नफा दिसायला लागला आहे. रिझर्व्ह बँकेनेही हात वर केले म्हटल्यावर ग्राहकांनी न्यायासाठी जावे तरी कुठे?

देवीदास तुळजापूरकर, माजी संचालक, बँक ऑफ महाराष्ट्र

आयसीआयसीआय बँकेने बचत खात्यासाठी किमान शिल्लक रक्कम महानगर आणि शहरांसाठी ५० हजार, निमशहरासाठी २५ हजार आणि ग्रामीण भागासाठी १० हजार रुपये केल्यामुळे कोण गदारोळ उडाला... आता सोशल मिडियावर मोठा गहजब झाल्याने आयसीआयसीआय बँकेला माघार घ्यावी लागली आणि किमान शिल्लक रक्कम १५ हजार रुपयांवर आणावी लागली. पण तरीही इतर बँकांच्या किमान शिल्लक रकमेबाबतचा जो निकष आहे, त्या मानाने ही रक्कम खूप जास्त होती. या प्रश्नावर रिझर्व्ह बँकेने तर चक्क हातच वर केले होते. बँकिंग आता फक्त सेवा राहिली नाही तर ती अत्यावश्यक सेवा झाली आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकाला बँकेत खाते उघडणे अनिवार्य बनले आहे. बँकिंगचा समावेश मूलभूत अधिकारांमध्ये करावा, अशी मागणीही केली जात आहे. या पार्श्वभूमीवर बँकांनी असा दुराग्रह धरणे कितपत उचित आहे, असा प्रश्न पडतो. बँका ग्राहकांना ज्या सेवा देतात त्या सर्व सेवांवर शुल्क आकारले जाते आणि अनेकदा ते अव्वाच्या सव्वा असल्याचे निदर्शनास आले आहे.

खात्याची वार्षिक देखभाल, एटीएम कार्ड, जास्त वेळा पैसे काढणे, निर्धारित रकमेपेक्षा जास्त कॅश भरणे, पिन कोड बदल, सहीत बदल, डुप्लिकेट पासबुक, सहीची पडताळणी,  स्टेटमेंटमध्ये जास्त व्यवहारासाठी जास्त प्रतींची मागणी, चेक बाउन्स होणे,  इसीएस मँडेंट, तो परत जाणे इत्यादी सेवांसाठी बँका सेवाकर आकारतात. ही यादी आणखी वाढू देखील शकते. थोडक्यात, ग्राहकांना दिल्या जाणाऱ्या प्रत्येक सेवेसाठी बँका आता शुल्क आकारतात. यापैकी सर्वच सेवा शुल्क आकारण्याच्या कक्षेत येतात का? कोणत्या सेवांवर शुल्क घेतले पाहिजे, यात काही तर्कसंगतता तर असली पाहिजे की नाही? आणि हे कोण ठरवणार? याचे नियमन कोण करणार? हे प्रश्न घेऊन काही स्वयंसेवी संस्थांनी जनहित याचिका दाखल करून न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते. पण हा धोरणात्मक प्रश्न आहे आणि त्यासाठी रिझर्व्ह बँक सक्षम आहे, असे कोर्टाचे म्हणणे आहे. तर रिझर्व्ह बँकेने हा निर्णय संबंधित बँकांच्या संचालक मंडळावर सोडला आहे.

आकड्यांच्या परिभाषेतला नफा ज्यामुळे भागधारकांना खूश ठेवता येईल त्याला आता सार्वजनिक क्षेत्रातील बँकाही अपवाद राहिलेल्या नाहीत! भलेही किमान शिल्लक या निकषावर त्या खासगी बँकांच्या तुलनेत ग्राहकस्नेही धोरण अवलंबत असल्या तरी इतर अनेक बाबतींत, सेवा शुल्क आकारण्यात त्या खासगी बँकांचीच बरोबरी करतात. बाजारकेंद्रीत अर्थव्यवस्थेचे तत्त्वज्ञान एकाच तत्वावर चालते ते म्हणजे ‘टिकेल तोच जो लायक आहे’. लायक यासाठी निकष एकच, ‘अधिकाधिक नफा’ आणि ‘वाटेल त्या मार्गाने नफा’! 

टॅग्स :bankबँकICICI Bankआयसीआयसीआय बँकhdfc bankएचडीएफसी