शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

विकासात पिछाडी; मतदानात मात्र आघाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2019 14:49 IST

मतदारसंघ २०१४ २०१९ जळगाव ५८ ५६ रावेर ६३ ६१ नंदुरबार ५९ ६८ धुळे ५९ ५६

मिलिंद कुलकर्णीलोकसभा निवडणुकीचे महाराष्टÑातील मतदान आटोपले आहे. मतदानाचा टक्का पाहून राजकीय पक्ष आणि उमेदवारांच्या हृदयाचा ठोका चुकला आहे. मुंबई-पुण्यातील मंडळी स्वत:ला प्रगत आणि पुढारलेले समजत असतात. देशहित, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, मानवाधिकार, नागरी स्वातंत्र्य, हक्क व अधिकार यासंबंधी ते कंठाळी भाषणे करीत असले तरी तिथला मतदानाचा टक्का यंदा घसरला आहे. याउलट नंदुरबारसारख्या आदिवासी बहुल मतदारसंघांमध्ये टक्का वाढला आहे. शिक्षणाचे प्रमाण कमी, विकासाचा मोठा अनुशेष, मानव विकास निर्देशांकात पिछाडी अशा बाबी असूनही मतदानासारख्या राष्टÑीय कर्तव्यात मात्र हा मतदारसंघ अग्रभागी राहिला. केवळ नंदुरबारच काय दिंडोरी, पालघर या आदिवासींसाठी राखीव मतदारसंघामध्ये गेल्यावर्षीच्या तुलनेत मतदानाचा टक्का वाढला आहे. सुबुध्द नागरिकांनी आदिवासी बांधवांकडून किमान राष्टÑीय कर्तव्याचा धडा अवश्य घ्यायला हवा.तेच ते उमेदवार, तेच ते प्रश्न, तीच ती भाषणे त्यामुळे मतदान कमी झाले, शहरी मतदारांचा भ्रमनिरास झाला, म्हणून मतदान कमी झाले असा तर्क काही बुध्दीवाद्यांनी लावला आहे. लावोत बापे. मात्र समाजातील आदिवासी बांधवांना तर मतदान न करण्यासाठी ढीगभर कारणे आहेत. भौतिक सुविधांचा अभाव, शासकीय योजनांपासून परावृत्त राहण्यासाठी प्रशासकीय दिरंगाई, अनुत्साह अशी एक ना अनेक कारणे, परंतु, त्यात ते अडकून न पडता मतदानाने प्रश्न सुटू शकतात, यावर विश्वास ठेवत त्यांनी हक्क बजावला. त्यांचा विश्वास लोकशाहीवर आहे, संविधानावर आहे. आज नाही तर उद्या निश्चितच पहाट उजाडेल, असा दुर्दम्य आशावाद त्यांच्यात आहे. त्याचे प्रतिबिंब या मतदानात दिसून आले.जळगाव, धुळे आणि रावेरमध्ये २०१४ पेक्षा यंदा मतदान कमी झाले तर नंदुरबारमध्ये ते वाढले. खान्देशातील चार ही मतदारसंघात शहरी भागात कमी तर ग्रामीण भागात जास्त मतदान झाले. निवडणुकीत विजयाचे दावे सगळेच उमेदवार करीत असले तरी निवडून एकच येणार आहे. तो नेमका कोण हे २३ मे रोजी कळणार आहे.तोवर विजयाविषयी दावे-प्रतिदावे, आडाखे, अंदाज बांधणे सुरु आहे. सट्टाबाजार आणि भविष्य हे दोन राजकीय मंडळींचे आवडते मार्ग आहेत. सट्टाबाजारानुसार रावेर भाजपकडे तर जळगाव राष्टÑवादीकडे जात आहे. ज्योतिषी मात्र अद्याप ठामपणे पुढे आलेले नाहीत. निकालानंतर बहुदा ते पुढे येतील. आमचेच भविष्य खरे ठरले असा दावा करतीलच.अंडरकरंट, ग्राऊंड रिपोर्ट या नावाने सध्या जो तो अंदाज व्यक्त करीत आहे. तालुकानिहाय आकडे मोड मांडत हा ‘प्लस’ तर हा ‘मायनस’ राहील. या समाजाची पक्षावर, उमेदवारावर नाराजी होती. गठ्ठा मतदान झाले. रात्री एसएमएस फिरले. आदेश, फतवे आले. खूप नाराजी होती. अशा एक ना अनेक कथा, उपकथा सामान्यांचे मनोरंजन करीत असल्या तरी उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांचा उन्हाळ्यात आणखी उकाडा वाढवित आहे. या चर्चेत कितपत तथ्य आहे, हे सांगता येत नसले तरी उमेदवारांच्या काळजाचा ठोका मात्र चुकत आहे, हे निश्चित.कमी-अधिक मतदानाचा फायदा नेमका कोणाला होतो, याचे शास्त्रीय अनुमान काढता येणे अवघड आहे. तशी पध्दतीही नाही. सामान्यपणे असे म्हटले जाते की, कमी मतदान असेल तर ते सत्ताधाऱ्यांना फायद्याचे ठरते. प्रतिस्पर्धी उमेदवार अधिक मतदान करुन घेऊ शकला नाही, असा त्यातून अर्थ काढला जातो. या तर्कात फारसे तथ्य वाटत नाही. कारण मतदान कमी झाले, याचा अर्थ दोन्ही उमेदवारांविषयी नाराजी असू शकते. ‘नोटा’ या नव्या पर्यायाची उपलब्धता असली तरी मतदान केंद्रापर्यंत जाण्याचे कष्ट मतदार घेत नाही. मतदानाला दांडी मारुन रोष प्रकट केला जातो. मतदान अधिक झाले तर विरोधी उमेदवाराला फायदा होतो, असा तर्क मांडणारे २०१४ च्या मोदी लाटेच्या परिणामाकडे अंगुलीनिर्देश करतात. १९७७, १९८४ आणि २०१४ या तीन निवडणुका एखाद्या घटनेने प्रेरित होऊन लढल्या गेल्या. त्याचे परिमाण इतर निवडणुकांना लावता येणे अवघड आहे. त्यामुळे शक्यतांवर चर्चा सुरु ठेवूया.

टॅग्स :Jalgaonजळगाव