शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
4
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
5
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
6
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
7
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
8
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
9
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
10
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
11
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
12
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
13
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
14
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
15
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
16
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
17
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
18
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
19
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?
20
ठाकरे बंधू अधिकृतपणे एकत्र येण्याआधीच ठाकरे गट-मनसेत महापौर पदावरून रस्सीखेच? नेत्यांचे दावे

मराठवाडय़ाचा अनुशेष : कथा आणि व्यथा

By admin | Updated: December 6, 2014 23:12 IST

स्वर्गीय गोविंदभाई श्रॉफ यांनी मराठवाडय़ाचे मागासलेपण निश्चित करून अनुशेष काढावा अशी सातत्याने मागणी केली.

स्वर्गीय गोविंदभाई श्रॉफ यांनी मराठवाडय़ाचे मागासलेपण निश्चित करून अनुशेष काढावा अशी सातत्याने मागणी केली. त्यामुळेच राज्य सरकारने दोन्हीही सभागृहांत 29 जुलै 1983 रोजी सत्यशोधन समिती स्थापण्याचा निर्णय घेतला. या समितीचे नांव दांडेकर समिती असे रूढ झाले. या समितीने फक्त 9 क्षेत्रंचाच अनुशेष काढला. नऊ क्षेत्रंच्या अनुशेषाचे सूत्र पुढे कायम झाले. अर्थशास्त्रच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्राच्या एकूण 3,2क्क् कोटी रुपयांपैकी 75क् कोटी रुपयांचा मराठवाडय़ाचा अनुशेष काढला. हा फक्त अर्थव्यवस्थेच्या 6क्} क्षेत्रचा होता. त्याच हिशोबाने साध्या अंकगणिती पद्धतीने उरलेल्या 4क्} क्षेत्रचा अनुशेष 3क्क् कोटी रुपयांचा येतो. 1984 ते 2क्14 र्पयत या अनुशेषाची रक्कम निश्चित करावी आणि अनुशेषापोटी मराठवाडय़ासाठी येणो बाकी दाखवावी. 
 
1984 ते 1994 या 1क् वर्षात महाराष्ट्रातील प्रादेशिक असमतोल साडेचार पटीने वाढला. 2क्क्6-क्7 या वर्षापासून प्रगत भागातील नेत्यांनी घोषणाबाजी सुरू केली की, मराठवाडा विदर्भाचा अनुशेष पूर्ण झाला आहे. आता अनुशेषाच्या तरतुदी बंद करा, आर्थिक अनुशेषाप्रमाणोच भौतिक अनुशेषही तसाच कायम आहे.
औरंगाबाद येथे मंत्रिमंडळाच्या बैठकीत मराठवाडय़ासाठी 3,3क्7 कोटी रुपयांचे ‘मराठवाडा पॅकेज’ घोषित करण्यात आले. नंतरच्या बैठकीत पुन्हा 2,671 कोटी रुपयांचे नवीन एकात्मिक विकास पॅकेज घोषित झाले. या दोन्हीही घोषणा म्हणजे मराठवाडय़ाची फसवणूक होती. मराठवाडा जनता विकास परिषदेच्या शिष्टमंडळाने नंतरचे मुख्यमंत्री स्वर्गीय विलासराव देशमुख यांच्यासोबत झालेल्या चर्चेत प्रधान सचिव आणि इतर अधिका:यांनी मान्य केले, की राज्याच्या अंदाजपत्रकातील विविध तरतुदींची गोळाबेरीज करून तयार केलेली रक्कम म्हणजे मराठवाडा पॅकेज आणि मराठावाडा एकात्मिक विकासाचे पॅकेज. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाने मराठवाडय़ाची अशी फसवणूक केली. 
मराठवाडय़ाच्या वाटय़ाला हक्काचे जे जे देऊ केले, त्यात प्रत्येक वेळी उर्वरित महाराष्ट्राने वाटा मागितला. महाराष्ट्रातील पहिले कृषी विद्यापीठ मराठवाडय़ात स्थापन होणार होते. राजकीय दबावामुळे त्याची स्थापना राहुरीला झाली. आंदोलनामुळे विदर्भासाठी अकोल्याला विद्यापीठ मिळाले. नंतर 1972 साली मराठवाडय़ातील विद्याथ्र्यानी जबरदस्त आंदोलन केले. आंदोलनामुळेच परभणीला कृषी विद्यापीठ मिळाले आणि न मागताच तसेच राग नको म्हणून कोकणसाठी दापोली येथे कृषी विद्यापीठ स्थापन झाले. 
अशीच कथा नॅशनल लॉ स्कूलची आहे. महाराष्ट्रासाठी लॉ स्कूलची स्थापना औरंगाबाद येथे करण्याची घोषणा त्या वेळचे मुख्यमंत्री  विलासराव देशमुख यांनी केली. नंतरच्या मुख्यमंत्र्यांनी विधी विद्यापीठ नागपूर आणि मुंबईला स्थापन होईल, अशा घोषणा केल्या. मराठवाडय़ाला हक्काचे आणि समन्यायी पाणी मिळावे म्हणून महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण कायदा 2क्क्5 साली संमत झाला. तरीही जायकवाडीचे हक्काचे पाणी नगर - नाशिकच्या लोकांनी अडवून ठेवले आहे. विदर्भातील विकास प्रश्नाचे अभ्यासक मधुकरराव किंमतकर यांनी मागीलवर्षी आकडेवारी देऊन सांगितले, की मागील 15 वर्षात विदर्भ-मराठवाडय़ाचे हक्काचे जवळपास 7क् हजार कोटी रुपये प्रगत महाराष्ट्राने पळवले. महाराष्ट्रात स्थापन झालेल्या नव्या सरकारने सत्यशोधन करावे आणि हक्काचे पैसे परत करावेत.
(लेखक स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा 
संशोधन संस्था, औरंगाबादचे संचालक आहेत. 
 
सोलापूर, बीड-औरंगाबाद, धुळे हा मराठवाडय़ातून जाणारा महत्त्वाचा राष्ट्रीय महामार्ग आहे. या महामार्गाची माहिती, नकाशासहित दांडेकर समितीच्या अहवालात इंग्रजी प्रत पान क्र. 86 व 87 वर दिली आहे. म्हणजे 1984 ते 2क्14 अशा तीस वर्षानंतरही या राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण पूर्ण झाले नाही. उर्वरीत महाराष्ट्रातील चौपदरीकरणाचे प्रमाण एक लाख लोकसंख्ये मागे 3.24 किलोमिटर आहे. मराठवाडय़ात राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदीकरणाचे प्रमाण शून्य आहे. एकूण मराठवाडय़ातील रस्ते, जलाशय, कोरडवाहूशेती तसेच येथील माणसांची परवड अशीच चालू आहे. ती कमी होण्या एैवजी वाढत चालली आहे. हीच चिंतेची बाब आहे. 
 
- प्राचार्य डॉ. शरद अदवंत