शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor: भारतीय लष्कराचा पाकमध्ये आणखी एक 'धमाका'; लाहोरमधील HQ-9 डिफेन्स सिस्टम केली उद्ध्वस्त
2
Operation Sindoor: पाकिस्तानसोबतच चीनलाही दणका! भारतानं उद्ध्वस्त केलेली लाहोरमधील HQ-9 डिफेन्स सिस्टम काय आहे?
3
'आम्ही तुमच्यासोबत आहोत', ऑपरेशन सिंदूरनंतर सर्वपक्षीय बैठकीत विरोधकांचा सरकारला पाठिंबा
4
“पाकिस्तानने अमृतसर, होशियारपूरमध्ये क्षेपणास्त्रे डागण्याचा प्रयत्न केला, जो सैन्याने हाणून पाडला”
5
आधी सिंदूर आता आणणार पूर! भारताने उघडले बगलिहारचे दरवाजे, पाकिस्तानात पाणीच पाणी
6
Operation Sindoor: मोठी बातमी! कंदहार प्लेन हायजॅकचा मास्टरमाईंड रौफ असगरचा हल्ल्यात खात्मा
7
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर सर्वपक्षीय एकत्र; बैठक संपताच काँग्रेस खासदार राहुल गांधी म्हणाले...
8
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तानच्या दोन मित्रराष्ट्रांचे परराष्ट्र मंत्री भारत दौऱ्यावर, जयशंकर यांची भेट
9
Operation Sindoor : एअर स्ट्राइक दिवशी झाला जन्म, कुटुंबीयांनी मुलीचे नाव 'सिंदूर' ठेवले
10
तुम्हीही वारंवार पर्सनल लोन घेता? मग 'हे' ५ मोठे तोटे समजून घ्या; अनेकजण करतात दुर्लक्ष
11
Mumbai: पत्नीची हत्या करून मृतदेह बेडमध्ये लपवला, मुंबईतील गोरेगाव येथील धक्कादायक प्रकार
12
"मी रात्रभर त्यांच्या फोनची वाट पाहिली, पण..."; ढसाढसा रडली शहीद दिनेश कुमार यांची पत्नी
13
"तुमच्या हातात माईक दिलाय म्हणून तुम्ही काहीही बडबडू नका..."; रोहित शर्मा समालोचकांवर भडकला
14
'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरूच! किती आतंकवादी मारले? संरक्षण मंत्र्यांनी आकडाच सांगितला!
15
Swami Samartha: स्वामींची निरपेक्ष सेवा केलीत तर 'या' दोन गोष्टी तुम्हाला आयुष्यात मिळणारच!
16
राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येणार?; शरद पवारांचं सर्वात मोठं विधान, राजकीय वर्तुळात उधाण
17
पाकिस्तानच्या शेअर बाजारात भूकंप! कराची बाजारातील व्यवहार अचानक बंद; नेमकं काय घडलं?
18
Masood Azhar News: 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये मसूद अजहरच्या कुटुंबातील कोण मारले गेले? मृतदेहांचा फोटो आला समोर
19
२००० किमी प्रवास, आळीपाळीने चालवत होते कार; एका डुलकीनं थांबवला ६ जणांच्या आयुष्याचा प्रवास
20
Video: पाच राफेल पाडल्याचा पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याचा दावा; पुरावा मागताच बोलती बंद...

मराठवाडय़ाचा अनुशेष : कथा आणि व्यथा

By admin | Updated: December 6, 2014 23:12 IST

स्वर्गीय गोविंदभाई श्रॉफ यांनी मराठवाडय़ाचे मागासलेपण निश्चित करून अनुशेष काढावा अशी सातत्याने मागणी केली.

स्वर्गीय गोविंदभाई श्रॉफ यांनी मराठवाडय़ाचे मागासलेपण निश्चित करून अनुशेष काढावा अशी सातत्याने मागणी केली. त्यामुळेच राज्य सरकारने दोन्हीही सभागृहांत 29 जुलै 1983 रोजी सत्यशोधन समिती स्थापण्याचा निर्णय घेतला. या समितीचे नांव दांडेकर समिती असे रूढ झाले. या समितीने फक्त 9 क्षेत्रंचाच अनुशेष काढला. नऊ क्षेत्रंच्या अनुशेषाचे सूत्र पुढे कायम झाले. अर्थशास्त्रच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्राच्या एकूण 3,2क्क् कोटी रुपयांपैकी 75क् कोटी रुपयांचा मराठवाडय़ाचा अनुशेष काढला. हा फक्त अर्थव्यवस्थेच्या 6क्} क्षेत्रचा होता. त्याच हिशोबाने साध्या अंकगणिती पद्धतीने उरलेल्या 4क्} क्षेत्रचा अनुशेष 3क्क् कोटी रुपयांचा येतो. 1984 ते 2क्14 र्पयत या अनुशेषाची रक्कम निश्चित करावी आणि अनुशेषापोटी मराठवाडय़ासाठी येणो बाकी दाखवावी. 
 
1984 ते 1994 या 1क् वर्षात महाराष्ट्रातील प्रादेशिक असमतोल साडेचार पटीने वाढला. 2क्क्6-क्7 या वर्षापासून प्रगत भागातील नेत्यांनी घोषणाबाजी सुरू केली की, मराठवाडा विदर्भाचा अनुशेष पूर्ण झाला आहे. आता अनुशेषाच्या तरतुदी बंद करा, आर्थिक अनुशेषाप्रमाणोच भौतिक अनुशेषही तसाच कायम आहे.
औरंगाबाद येथे मंत्रिमंडळाच्या बैठकीत मराठवाडय़ासाठी 3,3क्7 कोटी रुपयांचे ‘मराठवाडा पॅकेज’ घोषित करण्यात आले. नंतरच्या बैठकीत पुन्हा 2,671 कोटी रुपयांचे नवीन एकात्मिक विकास पॅकेज घोषित झाले. या दोन्हीही घोषणा म्हणजे मराठवाडय़ाची फसवणूक होती. मराठवाडा जनता विकास परिषदेच्या शिष्टमंडळाने नंतरचे मुख्यमंत्री स्वर्गीय विलासराव देशमुख यांच्यासोबत झालेल्या चर्चेत प्रधान सचिव आणि इतर अधिका:यांनी मान्य केले, की राज्याच्या अंदाजपत्रकातील विविध तरतुदींची गोळाबेरीज करून तयार केलेली रक्कम म्हणजे मराठवाडा पॅकेज आणि मराठावाडा एकात्मिक विकासाचे पॅकेज. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाने मराठवाडय़ाची अशी फसवणूक केली. 
मराठवाडय़ाच्या वाटय़ाला हक्काचे जे जे देऊ केले, त्यात प्रत्येक वेळी उर्वरित महाराष्ट्राने वाटा मागितला. महाराष्ट्रातील पहिले कृषी विद्यापीठ मराठवाडय़ात स्थापन होणार होते. राजकीय दबावामुळे त्याची स्थापना राहुरीला झाली. आंदोलनामुळे विदर्भासाठी अकोल्याला विद्यापीठ मिळाले. नंतर 1972 साली मराठवाडय़ातील विद्याथ्र्यानी जबरदस्त आंदोलन केले. आंदोलनामुळेच परभणीला कृषी विद्यापीठ मिळाले आणि न मागताच तसेच राग नको म्हणून कोकणसाठी दापोली येथे कृषी विद्यापीठ स्थापन झाले. 
अशीच कथा नॅशनल लॉ स्कूलची आहे. महाराष्ट्रासाठी लॉ स्कूलची स्थापना औरंगाबाद येथे करण्याची घोषणा त्या वेळचे मुख्यमंत्री  विलासराव देशमुख यांनी केली. नंतरच्या मुख्यमंत्र्यांनी विधी विद्यापीठ नागपूर आणि मुंबईला स्थापन होईल, अशा घोषणा केल्या. मराठवाडय़ाला हक्काचे आणि समन्यायी पाणी मिळावे म्हणून महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण कायदा 2क्क्5 साली संमत झाला. तरीही जायकवाडीचे हक्काचे पाणी नगर - नाशिकच्या लोकांनी अडवून ठेवले आहे. विदर्भातील विकास प्रश्नाचे अभ्यासक मधुकरराव किंमतकर यांनी मागीलवर्षी आकडेवारी देऊन सांगितले, की मागील 15 वर्षात विदर्भ-मराठवाडय़ाचे हक्काचे जवळपास 7क् हजार कोटी रुपये प्रगत महाराष्ट्राने पळवले. महाराष्ट्रात स्थापन झालेल्या नव्या सरकारने सत्यशोधन करावे आणि हक्काचे पैसे परत करावेत.
(लेखक स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा 
संशोधन संस्था, औरंगाबादचे संचालक आहेत. 
 
सोलापूर, बीड-औरंगाबाद, धुळे हा मराठवाडय़ातून जाणारा महत्त्वाचा राष्ट्रीय महामार्ग आहे. या महामार्गाची माहिती, नकाशासहित दांडेकर समितीच्या अहवालात इंग्रजी प्रत पान क्र. 86 व 87 वर दिली आहे. म्हणजे 1984 ते 2क्14 अशा तीस वर्षानंतरही या राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण पूर्ण झाले नाही. उर्वरीत महाराष्ट्रातील चौपदरीकरणाचे प्रमाण एक लाख लोकसंख्ये मागे 3.24 किलोमिटर आहे. मराठवाडय़ात राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदीकरणाचे प्रमाण शून्य आहे. एकूण मराठवाडय़ातील रस्ते, जलाशय, कोरडवाहूशेती तसेच येथील माणसांची परवड अशीच चालू आहे. ती कमी होण्या एैवजी वाढत चालली आहे. हीच चिंतेची बाब आहे. 
 
- प्राचार्य डॉ. शरद अदवंत