शहरं
Join us  
Trending Stories
1
हिमाचल प्रदेश: बिलासपूरमध्ये बसवर डोंगराचा ढिगारा कोसळला, १५ जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
निलेश घायवळचा पाय खोलात;बनावट पासपोर्ट प्रकरणासह आतापर्यंत ४ गुन्हे दाखल
3
भूस्खलन होऊन बसवर कोसळली दरड, १८ जणांचा मृत्यू, पण ३ मुलं आश्चर्यकारकरीत्या बचावली  
4
Dharashiv: मोठी बातमी! तातडीने मदत द्या, मागणी करणाऱ्या आंदोलक शेतकऱ्यांवर गुन्हे!
5
Bigg Bossचं घर सील, सर्व स्पर्धकांना लवकरच काढणार बाहेर, समोर आलं असं कारण 
6
ICC Womens World Cup 2025 : हेदर नाइटचा हिट शो! इंग्लंडनं बांगलादेशला पराभूत करत भारताला दिला धक्का
7
कस्तुरबा रुग्णालयातील पुस्तक वाटप प्रकरणाला वेगळं वळण, किशोरी पेडणेकरांचा तक्रारदारालाच प्रतिप्रश्न, म्हणाल्या...
8
धक्कादायक!! विरारमध्ये दोन तरूणांनी एकत्र संपवलं जीवन, १८व्या मजल्यावरून मारली उडी
9
अभिषेक शर्मा ICC पुरस्काराच्या शर्यतीत; त्याला कुलदीपसह झिम्बाब्वेचा गडी देणार टक्कर!
10
भर वर्गात महिलेसोबत आक्षेपार्ह चाळे करताना सापडला शिक्षक, मुलांनी रेकॉर्डे केला व्हिडीओ, कुठे घडली घटना
11
...अन् रागाच्या भरात पृथ्वी शॉनं विकेट घेणाऱ्या मुशीर खानवर उगारली बॅट; नेमकं काय घडलं? (VIDEO)
12
मार्कशीटवर दिसले स्वीमीजी... विद्यार्थ्याने ऑनलाइन केला अर्ज, विद्यापीठाने घातला वेगळाच घोळ
13
सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणाचा ठाण्यात निषेध, मूक निदर्शने
14
६८ कोटींचा रस्ता ३ वर्षांपासून पूर्ण होईना; कल्याण-अंबरनाथ रस्त्याच्या कामाला अखेर मुहूर्त
15
सांगलीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का; आमदार पुत्राचा थेट भाजपमध्ये प्रवेश
16
पुणे अपघात प्रकरण: गौतमी पाटीलला अश्रू अनावर, म्हणाली- "सगळे मला ट्रोल करत सुटलेत..."
17
Navi Mumbai Airport: भव्य, दिव्य अन् नजर खिळवून ठेवणारं, पण नवी मुंबई विमानतळाबद्दल 'या' गोष्टी माहिती आहे का?
18
स्मृती मानधना फ्लॉप ठरली तरी टॉपला; आता चुका सुधारून हिट शो द्यावाच लागेल, नाहीतर...
19
ICU मध्ये असलेल्या भाजप खासदाराची ममता बॅनर्जींनी घेतली भेट; म्हणाल्या, "जास्त सीरियस नाहीये."
20
अहो आश्चर्यम! महिलेने कुत्र्याच्या नावाने केलं मतदान; पोलखोल होताच पोलीसही झाले हैराण

वैधानिक विचार देणारे बाबासाहेब

By admin | Updated: April 14, 2016 02:42 IST

भारतामध्ये शिक्षणाबाबत जागृती येत असतानाच्या काळात डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांचा उदय झाला. शिक्षणाने समृद्ध होणे म्हणजे काय व शिक्षणातून आलेल्या सज्ञानतेचा वापर कसा करायचा, याचे उत्तम

- अ‍ॅड. असीम सरोदे

भारतामध्ये शिक्षणाबाबत जागृती येत असतानाच्या काळात डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांचा उदय झाला. शिक्षणाने समृद्ध होणे म्हणजे काय व शिक्षणातून आलेल्या सज्ञानतेचा वापर कसा करायचा, याचे उत्तम उदाहरण त्यांनी स्वत:च्या जीवन प्रगतीमधून घालून दिले. आता प्रश्न इतकाच की, न शिकता किंवा शिक्षणाचे मूल्य समजून न घेता आंबेडकरांच्या नावाने संघटित झालेल्या आणि संघर्र्ष करीत असलेल्या संघटना व चळवळींनी बाबासाहेबांंचे विचार समजून घेतलेत का? त्यांच्या नावाने सत्तास्थानी जाऊन बसलेल्या काही नेत्यांच्या अस्तित्वाचेही विश्लेषण झाले पाहिजे. डॉ. आंबेडकरांनी अनेक हाल सहन केले. पण संविधान लिहिताना त्यांच्या मनातील राग, चीड व दाहकता व्यक्त झाली नाही. डॉ. आंबेडकर यांच्या विचारांचा प्रभाव सातत्याने समाजावर राहणे नैसर्गिक आहे. पण मानवी हक्कांचा व्यापक कैवार घेतलेल्या बाबासाहेबांना दलितांचे नेते म्हणून कैद करून ठेवण्याच्या प्रक्रियेला छेद दिला पाहिजे. बाबासाहेबांना ‘माणूस’ म्हणून समजून घेतले तर कुणी हेलिकॉप्टरमधून त्यांच्या पुतळ्यावर पुष्पवृष्टी करण्याचा, रूचीहीन गाणे व अंगविक्षेपपूर्ण नाच करीत मिरवणुका काढण्याचा नाठाळपणा करणार नाही. न्याय म्हणजे काय, याचा विचार अगदी न्यायव्यवस्थेच्या इतिहासापासून होत आला आहे. वैविध्यपूण भारताचे संविधान लिहिताना सर्वांना वैधानिक विचारांमध्ये बांधण्याचे मोठे काम त्यांनी केले. विधिमंडळ, कार्यकारी मंडळ व न्यायमंडळ यांच्यामार्फत राज्ययंत्रणा चालविणारी तत्त्वप्रणाली देतानाच न्याय व्यक्तिसापेक्ष नसेल ही भूमिका त्यांनी मांडली. घटनात्मक चौकटीत ‘सकारात्मक भेदभाव’ (पॉझिटिव्ह डिस्क्रीमिनेशन) मान्य करून त्याचवेळी समाजातील वंचित व कमजोर वर्गाला समानतेच्या पातळीवर येण्यासाठी संधीची समानता त्यांनी निर्माण केली.