शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: नागरोटा येथे लष्कराच्या तळावर गोळीबार, १ जवान जखमी
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

वैधानिक विचार देणारे बाबासाहेब

By admin | Updated: April 14, 2016 02:42 IST

भारतामध्ये शिक्षणाबाबत जागृती येत असतानाच्या काळात डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांचा उदय झाला. शिक्षणाने समृद्ध होणे म्हणजे काय व शिक्षणातून आलेल्या सज्ञानतेचा वापर कसा करायचा, याचे उत्तम

- अ‍ॅड. असीम सरोदे

भारतामध्ये शिक्षणाबाबत जागृती येत असतानाच्या काळात डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांचा उदय झाला. शिक्षणाने समृद्ध होणे म्हणजे काय व शिक्षणातून आलेल्या सज्ञानतेचा वापर कसा करायचा, याचे उत्तम उदाहरण त्यांनी स्वत:च्या जीवन प्रगतीमधून घालून दिले. आता प्रश्न इतकाच की, न शिकता किंवा शिक्षणाचे मूल्य समजून न घेता आंबेडकरांच्या नावाने संघटित झालेल्या आणि संघर्र्ष करीत असलेल्या संघटना व चळवळींनी बाबासाहेबांंचे विचार समजून घेतलेत का? त्यांच्या नावाने सत्तास्थानी जाऊन बसलेल्या काही नेत्यांच्या अस्तित्वाचेही विश्लेषण झाले पाहिजे. डॉ. आंबेडकरांनी अनेक हाल सहन केले. पण संविधान लिहिताना त्यांच्या मनातील राग, चीड व दाहकता व्यक्त झाली नाही. डॉ. आंबेडकर यांच्या विचारांचा प्रभाव सातत्याने समाजावर राहणे नैसर्गिक आहे. पण मानवी हक्कांचा व्यापक कैवार घेतलेल्या बाबासाहेबांना दलितांचे नेते म्हणून कैद करून ठेवण्याच्या प्रक्रियेला छेद दिला पाहिजे. बाबासाहेबांना ‘माणूस’ म्हणून समजून घेतले तर कुणी हेलिकॉप्टरमधून त्यांच्या पुतळ्यावर पुष्पवृष्टी करण्याचा, रूचीहीन गाणे व अंगविक्षेपपूर्ण नाच करीत मिरवणुका काढण्याचा नाठाळपणा करणार नाही. न्याय म्हणजे काय, याचा विचार अगदी न्यायव्यवस्थेच्या इतिहासापासून होत आला आहे. वैविध्यपूण भारताचे संविधान लिहिताना सर्वांना वैधानिक विचारांमध्ये बांधण्याचे मोठे काम त्यांनी केले. विधिमंडळ, कार्यकारी मंडळ व न्यायमंडळ यांच्यामार्फत राज्ययंत्रणा चालविणारी तत्त्वप्रणाली देतानाच न्याय व्यक्तिसापेक्ष नसेल ही भूमिका त्यांनी मांडली. घटनात्मक चौकटीत ‘सकारात्मक भेदभाव’ (पॉझिटिव्ह डिस्क्रीमिनेशन) मान्य करून त्याचवेळी समाजातील वंचित व कमजोर वर्गाला समानतेच्या पातळीवर येण्यासाठी संधीची समानता त्यांनी निर्माण केली.