शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
4
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
5
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
6
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
7
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
8
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
9
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
10
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
11
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
12
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
13
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
14
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
15
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
16
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
17
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
18
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
19
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
20
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट

औरंगाबादला कच-याचा विळखा

By सुधीर महाजन | Published: February 28, 2018 12:18 AM

बारा दिवस झाले औरंगाबाद शहरातील कचरा उचलला गेला नाही, शहरभर दुर्गंधी, शहरात रोज पाचशे टन कचरा निर्माण होतो. नारेगाव येथे कचरा डेपोवर कचरा टाकण्याविरोधात त्यालगतच्या गावक-यांचे आंदोलन चालू आहे.

बारा दिवस झाले औरंगाबाद शहरातील कचरा उचलला गेला नाही, शहरभर दुर्गंधी, शहरात रोज पाचशे टन कचरा निर्माण होतो. नारेगाव येथे कचरा डेपोवर कचरा टाकण्याविरोधात त्यालगतच्या गावक-यांचे आंदोलन चालू आहे. त्यांनी शहराची कचराकोंडी केली. उच्च न्यायालयानेही या ठिकाणी कचरा टाकू नये, वेगळी व्यवस्था करावी, असा निकाल दिला त्याला बराच काळ उलटला. नारेगावकरांनी यापूर्वी अनेकदा मुदत वाढवून दिली तरी महानगरपालिका कचºयाचा प्रश्न सोडवू शकली नाही, पर्यायाने शहरच कचराकुंडी बनले आहे. या सगळ्याला प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांचा नाकर्तेपणा कारणीभूत आहे. उच्च न्यायालयाच्या निकालानंतर येथे औरंगाबाद शहराचा कचरा टाकला जाऊ नये ही त्या परिसरातील नागरिकांची भूमिका योग्यच आहे; पण वर्षानुवर्षे यावर तोडगा न काढण्याचा महापालिकेचा निष्काळजी आणि बेजबाबदारपणाचाही कळस आहे. प्रत्येक वेळी हा प्रश्न उद्भवला की, वेळ निभावून नेता येते, ही मानसिकता यावेळी नडली. बारा दिवसांनंतरही नगरसेवक आणि लोकप्रतिनिधी सामूहिकपणे या प्रश्नावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करतात असे चित्र दिसत नाही. नगरसेवक एकत्र नाहीत. शहराचे प्रतिनिधित्व करणाºया आमदार-खासदारांना या प्रश्नाचे गांभीर्य वाटत नाही. खासदारांनी एकदाच आंदोलकांची भेट घेतली. आंदोलक कुणाचाही शब्द मानण्यास तयार नाहीत. हा प्रश्न मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यापर्यंत पोहोचला. मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली. त्यांच्या वतीने पालकमंत्री डॉ. दीपक सावंत आले; पण आंदोलकांनी त्यांनाही परत पाठवले. एकूणच आता लोकप्रतिनिधींनाही यात स्वारस्य उरले नाही, असेच दिसते.एकीकडे हे वातावरण असताना दुसरीकडे औरंगाबाद शहरालगतची सर्व खेडी जागी झाली. कारण हा कचरा आपल्या दारात आणून टाकला जाऊ शकतो ही भीती त्यांना वाटत असल्याने गावागावातील गावकरी जागले बनले. महापालिकेने कचरा टाकण्याचा असा प्रयत्न केला; पण तो गावकºयांनी उधळून लावला. चाळीस वर्षांपासून औरंगाबादचा कचरा नारेगावात टाकला जातो. त्यावेळी शहराचा विस्तार झाला नव्हता. आता या कचरा डेपोभोवती वस्ती झाली. शिवाय झालर क्षेत्र विकासाला मंजुरी मिळाल्याने या परिसरातील गावांच्या जमिनीचे मूल्यांकन वाढले, परंतु कचरा डेपोमुळे हवा तसा प्रतिसाद मिळत नाही. शिवाय हा डेपो येथून हलविण्याचा निर्णय उच्च न्यायालयाने दिलेला आहे. यामुळेच नागरिक कचºयाच्या विरोधात एकवटले. याला काँग्रेस आणि भाजपमधील राजकारणाचाही पदर आहे. औरंगाबाद ग्रामीण मतदारसंघ हा पूर्वी काँग्रेसकडे होता. कल्याण काळेंचा पराभव करून विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे येथे विजयी झाले. कचºयाच्या प्रश्नावर कल्याण काळे आंदोलकांसमवेत आहेत. हे आंदोलन पेटते ठेवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.राजकारणाचा भाग तसा दुय्यम मानता येईल. गेल्या पंचवीस वर्षांपासून औरंगाबाद महानगरपालिका शिवसेना-भाजपच्या ताब्यात आहे. या पाव शतकात एकही नागरी सुविधा देता आलेली नाही. जायकवाडी धरणात पाणी असूनही तीन दिवसाआड नियमित पाणी मिळू शकत नाही. मुख्यमंत्र्यांनी शहरातील रस्त्यांसाठी दीडशे कोटी रुपये देऊन वर्ष झाले तरी रस्त्याची कामे अजून सुरू झालेली नाहीत. शहरातील कचºयाचा प्रश्न डोंगरासारखा आहे. पंचवीस वर्षांत तुम्ही काय केले, असा हिशेब मतदार मागत नाहीत, त्यामुळे दोष कुणाला देणार, हाच प्रश्न आहे.- सुधीर महाजन (sudhir.mahajan@lokmat.com)

टॅग्स :Aurangabadऔरंगाबाद