शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
2
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
3
Operation Sindoor Live Updates: स्फोटाचा आवाजांमुळे अमृतसरमध्ये रात्रभर ब्लॅक आऊट; पोलिस म्हणतात काहीच सापडले नाही
4
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
5
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
6
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
7
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
8
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! पाकिस्तान काय करेल आणि काय नाही...
9
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
10
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
11
पाकिस्तान प्रतिहल्ला करेल?-शक्यता नाकारता येत नाही!
12
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
13
१८ विमानतळांवरील कामकाज तात्पुरते बंद; एकट्या इंडिगोने सुमारे १६० उड्डाणे रद्द केली
14
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  
15
विनाअपघात एसटी बस चालकांना बक्षीस देणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
16
चंद्रावर उमटणार भारतीय अंतराळवीराचे पदचिन्ह
17
राज्यात गारपिटीची, तर मुंबईत मुसळधारेची शक्यता; मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याला इशारा
18
रोहितने ‘तो’ निर्णय तेव्हाच घेतलेला? गंभीर आलेला, पण रोहित शर्मा अनुपस्थित होता... 
19
रोहित शर्माने घेतली कसोटीतून तडकाफडकी निवृत्ती; इंग्लंड दौऱ्यात मिळणार होता डच्चू...
20
गोष्ट मिठी नदीच्या न उपसलेल्या गाळाची..., गाळाने भरले भ्रष्ट अभियंत्याचे खिसे; चौकशीतून स्पष्ट 

निदान कुलगुरुंना तरी राजकारणापासून दूर असू द्या !

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2024 08:09 IST

कुलगुरुंच्या निवडीची पद्धत राजकारणविरहित असणे अत्यावश्यक आहे. अन्यथा, उच्च शिक्षण क्षेत्राचे कधीही भरून न येणारे नुकसान अटळ होय!

- डॉ. विजय पांढरीपांडे(माजी कुलगुरू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ)

पुण्याच्या गोखले इन्स्टिट्यूटचे कुलगुरू अजित रानडे यांना न्यायालयाच्या आदेशाने का होईना परत मूळ पदावर रुजू करून घेण्यात आले आहे. आधीचा निर्णय घेणाऱ्या प्रशासनाची ही नामुष्कीच म्हटली पाहिजे.  कोण चूक, कोण बरोबर हे कालांतराने कायद्याचा कीस काढून ठरेल देखील. पण, अशा घटना उच्च शिक्षण क्षेत्रात किती अनागोंदी, बेशिस्त आहे, याचाच पुरावा देतात. काही महिन्यांपूर्वी नागपूर विद्यापीठातील कुलगुरुंविरोधात देखील असाच प्रकार घडला. तिथेही दोष कुणाचा हे तारीख पे तारीख पडल्यानंतर न्यायालयाने ठरवले असते.

पण, मधल्या काळात या कुलगुरुंचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यामागे या आरोपाचा, न्यायालयीन प्रक्रियेचा ताण किती कारणीभूत होता, हाही वादाचा विषय ठरू शकतो. अशा घटना सर्वच राज्यांत घडताना दिसतात. याचा अप्रत्यक्ष परिणाम विद्यापीठ प्रशासनावर होतो. त्या काळात दोन गट पडतात. निर्णय प्रक्रियेवर, चांगल्या योजना पुढे नेण्याच्या प्रयत्नांवर विपरीत परिणाम होतो. एरवी प्रत्येक बाबतीत पाश्चात्य देशाची कॉपी करण्यात तत्पर असलेले आपण उच्च शिक्षण क्षेत्रात परदेशी विद्यापीठातील सुशासन व्यवस्थेची मात्र कॉपी करत नाही.

शैक्षणिक क्षेत्रातील नेमणुका तरी राजकारणाने प्रेरित नसाव्यात. कुलगुरुंची एक निवड चुकीची ठरली, तर पाच वर्षे त्या विद्यापीठाला त्याचे परिणाम भोगावे लागतात. ही अनागोंदी, निष्क्रियता नंतर येणाऱ्या चांगल्या कुलगुरुंनादेखील छळत बसते! विद्यापीठांच्या कुलगुरुंसारख्या उच्च पदावर नेमणूक करण्याआधी केवळ बायोडेटा नव्हे, तर संबंधित व्यक्तीचे शैक्षणिक, सामाजिक, नैतिक चारित्र्यदेखील तपासले पाहिजे. भूतकाळ तपासला पाहिजे. या पदावरील व्यक्तीची निर्णयक्षमता, नैतिकता, पारदर्शिता, नेतृत्वक्षमता हे गुण अधिक महत्त्वाचे असतात.

पण, आपल्याकडील निर्णय प्रक्रियेत याकडे पार दुर्लक्ष केले जाते. महाराष्ट्रापुरते बोलायचे, तर ‘कुलगुरू शोध समिती’ने दिलेल्या अंतिम पाच नावांची तरी मुलाखतीला बोलावण्यापूर्वी राज्यपाल कार्यालयाकडून वर उल्लेखलेल्या गुणांच्या संदर्भात छाननी व्हायला हवी. कारण, राज्यपाल कार्यालय हे राजकीय पक्ष, राजकारण यापासून दूर असते, असे समजले जाते. (निदान तसे अपेक्षित तरी आहे) पण, राज्यपाल कार्यालय हे काम नीट करत नाही, असेच अनेक अंतिम निवडीवरून दिसते. 

सरकार कोणतेही असो, पक्ष नेते कोणीही असोत, उच्च शिक्षण या क्षेत्राकडे ज्या गांभीर्याने लक्ष द्यायला हवे त्या पद्धतीने लक्ष दिले जात नाही. कुलगुरू निवड, प्राध्यापकांच्या नेमणुका, सर्वांगीण वाढीसाठी संशोधन, प्रयोग शाळांसाठीचे अनुदान, अशा सर्वच बाबींकडे पार दुर्लक्ष केले जाते. मतदारांना आकर्षित करावयाच्या अजेंड्यात शालेय, उच्च शिक्षणाला शेवटचे स्थान असते! विद्यापीठ प्राधिकरणांसाठी होणाऱ्या निवडणुका, मतदान यामुळे विद्यापीठ परिसराला राजकीय आखाड्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे.  निवडून आलेल्या किंवा राजकारणी नेत्यांच्या/राजभवनातील शिफारसींमुळे नियुक्त झालेल्या सभासदांशी जुळवून घेताना कुलगुरुंची खरी दमछाक होते.

एकाची बाजू घेतली की, दुसरी बाजू डोके वर काढते. आरोप-प्रत्यारोप सुरू होतात. चौकशीचा ससेमिरा मागे लागतो. कुलगुरूंची टर्म संपली, तरी ‘खरे खोटे नेमके काय?’ याचा निकाल लागत नाही. फाइल केव्हा कशी बंद होते कुणालाच कळत नाही. या अशा गढूळ वातावरणात प्रामाणिक कोण, दोषी कोण हे ठरवणे सोपे नसते. कुणी दोषी आढळले, तरी शिक्षा होत नाही.  एकूणच उच्च शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल गरजेचे आहेत. कुलगुरुंच्या निवडीची पद्धत राजकारण विरहित करणे, त्यात पूर्ण पारदर्शित्व असणे, विद्यापीठ परिसर राजकारण विरहित असणे, तिथले वातावरण केवळ अध्ययन, अध्यापन, संशोधन यांसाठीच प्रेरक असणे, सर्वांनीच शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी एकजुटीने प्रयत्न करणे, ही काळाची गरज आहे. 

टॅग्स :Courtन्यायालयEducationशिक्षण