शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

निदान कुलगुरुंना तरी राजकारणापासून दूर असू द्या !

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2024 08:09 IST

कुलगुरुंच्या निवडीची पद्धत राजकारणविरहित असणे अत्यावश्यक आहे. अन्यथा, उच्च शिक्षण क्षेत्राचे कधीही भरून न येणारे नुकसान अटळ होय!

- डॉ. विजय पांढरीपांडे(माजी कुलगुरू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ)

पुण्याच्या गोखले इन्स्टिट्यूटचे कुलगुरू अजित रानडे यांना न्यायालयाच्या आदेशाने का होईना परत मूळ पदावर रुजू करून घेण्यात आले आहे. आधीचा निर्णय घेणाऱ्या प्रशासनाची ही नामुष्कीच म्हटली पाहिजे.  कोण चूक, कोण बरोबर हे कालांतराने कायद्याचा कीस काढून ठरेल देखील. पण, अशा घटना उच्च शिक्षण क्षेत्रात किती अनागोंदी, बेशिस्त आहे, याचाच पुरावा देतात. काही महिन्यांपूर्वी नागपूर विद्यापीठातील कुलगुरुंविरोधात देखील असाच प्रकार घडला. तिथेही दोष कुणाचा हे तारीख पे तारीख पडल्यानंतर न्यायालयाने ठरवले असते.

पण, मधल्या काळात या कुलगुरुंचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यामागे या आरोपाचा, न्यायालयीन प्रक्रियेचा ताण किती कारणीभूत होता, हाही वादाचा विषय ठरू शकतो. अशा घटना सर्वच राज्यांत घडताना दिसतात. याचा अप्रत्यक्ष परिणाम विद्यापीठ प्रशासनावर होतो. त्या काळात दोन गट पडतात. निर्णय प्रक्रियेवर, चांगल्या योजना पुढे नेण्याच्या प्रयत्नांवर विपरीत परिणाम होतो. एरवी प्रत्येक बाबतीत पाश्चात्य देशाची कॉपी करण्यात तत्पर असलेले आपण उच्च शिक्षण क्षेत्रात परदेशी विद्यापीठातील सुशासन व्यवस्थेची मात्र कॉपी करत नाही.

शैक्षणिक क्षेत्रातील नेमणुका तरी राजकारणाने प्रेरित नसाव्यात. कुलगुरुंची एक निवड चुकीची ठरली, तर पाच वर्षे त्या विद्यापीठाला त्याचे परिणाम भोगावे लागतात. ही अनागोंदी, निष्क्रियता नंतर येणाऱ्या चांगल्या कुलगुरुंनादेखील छळत बसते! विद्यापीठांच्या कुलगुरुंसारख्या उच्च पदावर नेमणूक करण्याआधी केवळ बायोडेटा नव्हे, तर संबंधित व्यक्तीचे शैक्षणिक, सामाजिक, नैतिक चारित्र्यदेखील तपासले पाहिजे. भूतकाळ तपासला पाहिजे. या पदावरील व्यक्तीची निर्णयक्षमता, नैतिकता, पारदर्शिता, नेतृत्वक्षमता हे गुण अधिक महत्त्वाचे असतात.

पण, आपल्याकडील निर्णय प्रक्रियेत याकडे पार दुर्लक्ष केले जाते. महाराष्ट्रापुरते बोलायचे, तर ‘कुलगुरू शोध समिती’ने दिलेल्या अंतिम पाच नावांची तरी मुलाखतीला बोलावण्यापूर्वी राज्यपाल कार्यालयाकडून वर उल्लेखलेल्या गुणांच्या संदर्भात छाननी व्हायला हवी. कारण, राज्यपाल कार्यालय हे राजकीय पक्ष, राजकारण यापासून दूर असते, असे समजले जाते. (निदान तसे अपेक्षित तरी आहे) पण, राज्यपाल कार्यालय हे काम नीट करत नाही, असेच अनेक अंतिम निवडीवरून दिसते. 

सरकार कोणतेही असो, पक्ष नेते कोणीही असोत, उच्च शिक्षण या क्षेत्राकडे ज्या गांभीर्याने लक्ष द्यायला हवे त्या पद्धतीने लक्ष दिले जात नाही. कुलगुरू निवड, प्राध्यापकांच्या नेमणुका, सर्वांगीण वाढीसाठी संशोधन, प्रयोग शाळांसाठीचे अनुदान, अशा सर्वच बाबींकडे पार दुर्लक्ष केले जाते. मतदारांना आकर्षित करावयाच्या अजेंड्यात शालेय, उच्च शिक्षणाला शेवटचे स्थान असते! विद्यापीठ प्राधिकरणांसाठी होणाऱ्या निवडणुका, मतदान यामुळे विद्यापीठ परिसराला राजकीय आखाड्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे.  निवडून आलेल्या किंवा राजकारणी नेत्यांच्या/राजभवनातील शिफारसींमुळे नियुक्त झालेल्या सभासदांशी जुळवून घेताना कुलगुरुंची खरी दमछाक होते.

एकाची बाजू घेतली की, दुसरी बाजू डोके वर काढते. आरोप-प्रत्यारोप सुरू होतात. चौकशीचा ससेमिरा मागे लागतो. कुलगुरूंची टर्म संपली, तरी ‘खरे खोटे नेमके काय?’ याचा निकाल लागत नाही. फाइल केव्हा कशी बंद होते कुणालाच कळत नाही. या अशा गढूळ वातावरणात प्रामाणिक कोण, दोषी कोण हे ठरवणे सोपे नसते. कुणी दोषी आढळले, तरी शिक्षा होत नाही.  एकूणच उच्च शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल गरजेचे आहेत. कुलगुरुंच्या निवडीची पद्धत राजकारण विरहित करणे, त्यात पूर्ण पारदर्शित्व असणे, विद्यापीठ परिसर राजकारण विरहित असणे, तिथले वातावरण केवळ अध्ययन, अध्यापन, संशोधन यांसाठीच प्रेरक असणे, सर्वांनीच शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी एकजुटीने प्रयत्न करणे, ही काळाची गरज आहे. 

टॅग्स :Courtन्यायालयEducationशिक्षण