शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Best Bus Accident: भांडुपमध्ये भीषण अपघात! रिव्हर्स घेताना 'बेस्ट' बसनं प्रवाशांना चिरडलं; ४ जण ठार, ९ जखमी
2
Nashik: नाशिकमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेसेना एकत्र लढणार; भाजपचं काय?
3
TMC: ठाण्यात महायुतीचं जागावाटप फायनल; शिंदेसेना ८७ तर भाजप ४० जागा लढणार!
4
शिवीगाळ, दमदाटी, धक्काबुक्की...;  एबी फॉर्मवरून काँग्रेस कार्यालयात कार्यकर्त्यांमध्ये राडा!
5
Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये शिंदेसेनेची महायुतीकडं पाठ, स्वबळावर लढणार, गणित कुठं बिघडलं?
6
 Mira Bhayandar: भाजपच्या 'त्या' निर्णयामुळे आमदारपुत्र तकशील मेहतांची उमेदवारी धोक्यात!
7
Municipal Election: भाजपचा मोठा निर्णय; मंत्री, खासदार आणि आमदारांच्या नातेवाईकांना महापालिकेचं तिकीट नाही!
8
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
9
तीन कोटींचा विमा आणि सरकारी नोकरीसाठी मुलाने रचला भयंकर कट, वडिलांना सर्पदंश करवला, त्यानंतर...
10
संभाजीनगरात 'हायव्होल्टेज' ड्रामा; जंजाळांच्या डोळ्यात अश्रू, शिरसाटांच्या घराबाहेर कार्यकर्ते जमा
11
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
12
BMC Elections: किशोरी पेडणेकर यांना अखेर एबी फॉर्म मिळाला; उमेदवारी मिळताच ठाकरेंची रणरागिनी गरजली!
13
जेवणावळीत ऐनवेळी भात संपला, संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिळेल त्यावर ताव मारला, व्हिडीओ व्हायरल  
14
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
15
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
16
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
17
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
18
Kishori Pednekar: अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
19
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
20
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
Daily Top 2Weekly Top 5

दहीहंडी एकाची फुटते, लोणी दुसराच मटकावून जातो; त्याचे काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2023 07:28 IST

बक्षिसाच्या रकमा प्रायोजकांकडून घ्यायच्या, राजकीय हस्तक्षेपाने काही गोष्टी चकटफू मिळवायच्या. ‘अमक्या-तमक्याची दहीहंडी...’ म्हणून फुकट मिरवायचे!

- अतुल कुलकर्णी

याही वर्षी मुंबई, पुण्यासह महाराष्ट्रातदहीहंडी उत्साहात साजरी झाली. अनेक गोविंदा पथकांनी मानवी थर रचत विक्रम केले. गोविंदा पथकांची संख्या जशी वाढत गेली, तसे यातून होणारे आर्थिक आणि राजकीय लाभ घेणाऱ्यांची संख्याही वाढत गेली. दहीहंडीसाठी भले मोठे मंडप उभारले जातात. व्यावसायिक ‘डीजे’ला बोलावून दिवसभर नाच गाण्याच्या नशेची फवारणी केली जाते. एका मंडळाकडून दुसऱ्या मंडळाकडे गोविंदा पथके दहीहंडीचे थर रचत फिरत राहतात. जाहीर केलेली बक्षिसे लुटण्याचा प्रयत्न करतात. या सगळ्या आयोजनासाठी गेल्या काही वर्षापासून मोठ्या कंपन्या प्रायोजकत्व देऊ लागल्या. आयोजकांचे उपद्रव मूल्य किती आहे यावर देखील प्रायोजकत्वाची रक्कम कमी जास्त होऊ लागली.

फार जुनी गोष्ट नाही; नाशिकला एका नेत्याने आयोजित केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमासाठी मुंबईतल्या एका बड्या कंपनीने काही कोटी रुपये दिले होते. अर्थात हे कोट्यवधी रुपये विना उपद्रव मूल्य मिळू शकत नाहीत, हे उघड सत्य आहे. राज्यातल्या अनेक शहरांमध्ये दहीहंडी आयोजकांमध्ये राजकीय लोकांचाच जास्त वाटा आहे. कुठलाही राजकारणी स्वतःच्या खिशाला खार लावून दहीहंडीचे आयोजन करत नाही. प्रायोजकांकडून पैसे घ्यायचे. राजकीय हस्तक्षेपाने काही गोष्टी चकटफू मिळवायच्या. बक्षिसाच्या रकमादेखील प्रायोजकांकडून घ्यायच्या. दिवसभर प्रसिद्धी मात्र अमक्याची दहीहंडी... तमक्याची दहीहंडी... या नावाने होत राहते. दहीहंडीला लोकप्रिय करण्यासाठी सिनेक्षेत्रातल्या नट-नट्यांना आमंत्रण द्यायचे. या काळात ज्यांचे चित्रपट येतात, त्यांना प्रमोशनसाठी बोलवायचे. त्यातून लोकप्रियता मिळवायची. थोडक्यात काय तर, आधी पैसा उभा करायचा. त्यातून प्रसिद्धी मिळवायची. प्रसिद्धी मिळू लागली की पुन्हा पैसा मिळवायचा... आणि त्या मार्गे सत्तेचा सोपान गाठायचा... हा ट्रेंड आता सेट झाला आहे. जे नेते आता सत्तेत नाहीत, त्यांनी यंदा दहीहंडी भरवली की नाही हे शोधले तर हा मुद्दा अधिक स्पष्ट होईल.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील एका दहीहंडीत कार्यक्रमात बोलताना “दहीहंडीच्या माध्यमातून आजचे आयोजक आमदार झाले आहेत”, असे बोलून गेले. ज्यांना आमदार व्हायचे आहे ते पैसा आणि प्रसिद्धी मिळवून देणाऱ्या दहीहंडीच्या आयोजनाचा मार्ग स्वीकारू लागले.  जे सक्रिय राजकारणात आहेत ते देखील आपला खुंटा हलवून बळकट करण्यासाठी दहीहंडीच्या उत्सवातही सक्रिय होऊ लागले. गोविंदा पथकात सहभागी होणाऱ्यांना टी-शर्ट द्यायचे. त्यावरही आपल्या नावाची प्रसिद्धी करायची. फिरण्यासाठी गाडी घोड्याची व्यवस्था करायची. दिवसभराचे खाणे पिणे मॅनेज करायचे. एवढे मिळाले की गोविंदा पथके तयार होतात, हे माहीत झाल्यामुळे त्यांच्या जीवावर अनेकांनी स्वतःचे आर्थिक, राजकीय इमले उभे केले. या सगळ्यात गोविंदांना मात्र दुर्दैवाने गृहीत धरणे सुरू झाले आहे. सहभागी होणाऱ्या

गोविंदांना कौतुकाच्या पलीकडे फार काही मिळू शकलेले नाही, हे या दहीहंडीचे कटू वास्तव आहे. जखमी गोविंदांना तेवढ्यापुरते तेवढे उपचार दिले जातात. मात्र एखाद्याचा हात, पाय तुटला तर तो आयुष्यभराचा अधू होतो. एखाद्याचा जीव गेला तर त्याच्यावर विसंबून असणारे पोरके होतात. त्यावेळी त्यांच्याकडे कोणी ढुंकूनही पाहायला तयार होत नाही. “सरकारने दहीहंडीला साहसी खेळाचा दर्जा दिला; मात्र जे गोविंदा मेहनतीने मानवी थर रचतात, त्यांना  सरकार दरबारातून काहीही मदत देऊ शकत नाही. कारण यासाठीचे कोणतेही निकष, नियम बनवलेलेच नाहीत”, असे अनेक अधिकारी खासगीत सांगतात. नेत्यांना देखील हे वास्तव माहिती आहे. मात्र याविषयी स्पष्टपणे कोणालाही बोलायचे नाही. कारण सगळ्यांना त्यातून फक्त स्वतःचा फायदा करून घ्यायचा आहे. क्रिकेटच्या खेळाला जर ग्लॅमर मिळते, तर ते जीवावर उदार होऊन मानवी थर रचणाऱ्या गोविंदांना का मिळू नये..?  गोविंदा पथकांमधील खेळाडूंना मूलभूत सुविधा मिळायलाच हव्यात; तरच परंपरेने चालत आलेला हा वारसा नव्याने येणारी पिढी जपेल आणि पुढे चालू ठेवेल.

टॅग्स :Dahi HandiदहीहंडीMumbaiमुंबईMaharashtraमहाराष्ट्र