शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
3
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
4
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
5
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
6
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
7
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
8
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
9
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
10
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
11
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
12
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
13
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
14
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
15
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
16
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
17
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
18
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
19
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
20
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)

मध्यमवर्गाला स्वस्थतेमधून बाहेर ओढले पाहिजे; तरच काहीतरी घडेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2022 06:06 IST

उत्पन्न वाढलेल्या नव्या राष्ट्रवादी मध्यमवर्गीयांना आता भूतकाळच विसरायचाय. स्वातंत्र्य चळवळही विसरायची आहे. त्यांच्यावर ‘स्वस्थते’ची साय धरली आहे!

कुमार केतकर, ख्यातनाम पत्रकार-संपादक, राज्यसभेचे खासदार

‘आपला समाज इतका असंवेदनशील आणि स्वस्थ का झाला आहे?’ असा प्रश्न हल्ली मला सतत पडतो. सध्या आपल्या देशातली परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे. यापुढील काळात आपण आणखी वाईट परिस्थितीमधून जाऊ; तरीही आपल्या समाजात अस्वस्थता दिसत नाही. हे स्वास्थ्य कसे आणि कुठून आले? मुख्य प्रश्न असा, की दयनीय परिस्थिती असूनही समाजात अस्वस्थता का दिसत नाही? आपल्यापुरता विचार केला, तर आपण ज्यांच्या अस्वस्थतेबद्दल बोलत आहोत  ते कोण आहेत? - तर  साहित्यात ज्यांचा अधिकांश दबदबा आहे असे मध्यमवर्गीय!  पन्नास वर्षांपूर्वी दलित पँथर जन्माला येण्याआधी  हा दबदबा सर्वव्यापी होता; ज्याला पुण्या-मुंबईचा मध्यमवर्गीय, उच्चवर्णीय चेहेरा होता. त्यात विदर्भ-मराठवाड्याला स्थान नव्हते.  हळूहळू परिस्थिती बदलत गेली; ती पुढे इतकी बदलली, की या मध्यमवर्गावर स्वस्थतेची साय धरली.

सहज  विचार करा, १९८१ मध्ये आपल्या कुटुंबाचे उत्पन्न किती होते? १९९१ ला ते किती झाले आणि पुढे ते कसे, किती वाढत गेले? १९८१ मध्ये कोणत्याही सोसायटीमध्ये कार पार्किंगवरून भांडणे होत नव्हती. कारण तेव्हा लोकांकडे गाड्याच नव्हत्या. १९९१ च्या आर्थिक उदारीकरणानंतरही हा प्रश्न आला नाही कारण तितक्या प्रमाणात गाड्यांची निर्मितीच झाली नाही. जागतिकीकरणामागोमाग तंत्रज्ञानही आले. त्याच्या परिणामस्वरूप मध्यमवर्गीयांमध्ये १९९१ ते २००१ च्या काळात थक्क व्हायला होईल असे बदल झाले. संगणकामुळे असे काय होणार आहे? शाळा सुरू होणार आहेत का? विहिराला पाणी येणार आहे का, असे म्हणणाऱ्या, बँक- रेल्वेत काम करणाऱ्या मध्यमवर्गीयांनी संगणकाविरुद्ध मोठ्या प्रमाणावर संप केले. 

त्यांना विचारले की, तुमचा मुलगा काय करतो? - तर ते सांगतील अमेरिकेत सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे, कुणी सांगेल नासामध्ये आहे. त्यांना माहितीही नसेल की आपल्या वडिलांनी संगणकाविरोधात कधी काळी संप केला होता! सध्याचा काळ हा सर्वच अर्थांनी आणि सर्वच स्तरांवर इतिहासाला विस्मृतीत लोटण्याचा आहे. ही मतलबी आयडॉलॉजी आहे. उजव्या विचारसरणीच्या लोकांनी फक्त  वल्लभभाई पटेल किंवा सुभाषचंद्र बोस यांना नव्हे, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनाही आपलेसे केले आहे. पूर्वी सर्वांनाच वाटायचे, की मध्यमवर्गीय हा अपरिहार्यपणे सवर्ण आणि शहरी भागातला असतो. नवी वस्तुस्थिती ही आहे की, जागतिक-आर्थिक बदलानंतर आपल्याकडे प्रचंड मोठ्या प्रमाणात ग्रामीण मध्यमवर्ग तयार झाला.  केवळ शहरी, सुशिक्षित  तोच मध्यमवर्ग असे आता म्हणता येणार नाही.  हा नवा मध्यमवर्ग जाणीवपूर्वक स्वास्थ्याचा प्रचार करीत आहे. मध्यमवर्गीयांच्या फ्लॅटची संख्या, फार्महाऊसेस वाढायला लागली आहेत. 

उत्पन्न आणि उत्पादन वाढत नाही तरी शेअर बाजारात  इतक्या उसळ्या कशाच्या जोरावर असतात?  हे पैसे केवळ अदानी, अंबानींचे नव्हेत, तर पाचवा आणि सहावा वेतन आयोग लागू झाल्यामुळे मध्यमवर्गीयांच्या खिशातले हे पैसे आहेत! अनेकांचे निवृत्ती वेतनच ४० ते ८० हजारांच्या घरात असते, त्यामुळे मुलांना आई-वडिलांवर अवलंबून राहावे लागते असे चित्र. यामुळे समाजात स्वस्थता पसरली. आर्थिक उत्पन्न वाढलेल्या नव्या राष्ट्रवादी लोकांना आता दुसरीकडे पाहायचेच नाहीये. त्यांना भूतकाळच विसरायचाय. स्वातंत्र्य चळवळही विसरायची आहे. गेल्या पाच वर्षांत मध्यमवर्गीयांमध्ये नथुराम गोडसे यांच्याबद्दल अचानक  वाढलेले प्रेम धक्कादायक आणि धोकादायक आहे. लोकशाहीत दोन्ही बाजू यायला हव्यात असे सांगून खरा इतिहास पुसून टाकायची ही धडपड! पाठ्यपुस्तकातील इतिहास बदलत चालला आहे. इतिहासातून गांधी-नेहरू लुप्त होत आहेत.  खोटे नायक निर्माण केले जात आहेत. 

या वातावरणात संघर्ष आणि अस्वस्थता टिकवून ठेवावी लागेल. मध्यमवर्गाला स्वस्थतेमधून बाहेर ओढून काढावे लागेल, तरच काहीतरी घडेल! दक्षिणायनच्या वतीने पुण्यात ‘लेखक का बोलतो’? या विषयावर आयोजित चर्चासत्रात केलेल्या तपशीलवार मांडणीचे संपादित

शब्दांकन : नम्रता फडणीस