शहरं
Join us  
Trending Stories
1
Red Fort Blast Video: अनेकांच्या उडाल्या चिंधड्या! स्फोटानंतरची दृश्ये बघून होईल थरकाप, नेमकी कुठे घडली घटना?
2
Prem Chopra : दिग्गज अभिनेते प्रेम चोप्रा यांच्या प्रकृतीत सुधारणा; लीलावती रुग्णालयात दाखल
3
Red Fort Blast:  कार हळूहळू सिग्नलजवळ येऊन थांबली अन् झाला स्फोट; पोलीस आयुक्तांनी सांगितली घटना
4
लाल किल्ल्याजवळील स्फोटानंतर महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये हाय अलर्ट! तपास यंत्रणा सतर्क
5
Delhi Red Fort Blast: मोठी बातमी! दिल्लीत लाल किल्ल्याजवळ भीषण स्फोट, 8 जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
6
कुणाचा हात तुटून पडला, कुणाचा कोथळा बाहेर आला; प्रत्यक्षदर्शीने सांगितली दिल्ली स्फोटाची हादरवून टाकणारी घटना
7
'त्या' जमीन गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवार, शीतल तेजवानींना पोलिसांकडून क्लीन चिट
8
भयानक कोसळणार ...! मी १९७१ पासून सोने खरेदी करतोय, पण...; रॉबर्ट कियोसाकी यांच्या दाव्याने खळबळ 
9
दहशतवाद्यांच्या टोळीत महिला डॉक्टरही सामील, थेट पाकिस्तानशी कनेक्शन; कारमध्ये घेऊन फिरत होती एके ४७!
10
जडेजाला संघाबाहेर काढण्यात धोनी सगळ्यात पुढे असेल! माजी क्रिकेटरनं त्यामागचं कारणही सांगून टाकलं
11
भारताच्या शेजारी देशांत भरतो 'नवरीचा बाजार', खरेदी करण्यासाठी चीनमधून येतात लोक! काय आहे प्रकार?
12
राष्ट्रवादीने हटवले तरी रुपाली ठोंबरे पाटील 'प्रवक्त्या'च; पोस्ट करत म्हणाल्या, 'अजित पवारांना भेटून...'
13
ताजमहालसमोर साखरपुडा...! दोनवेळा ऑस्ट्रेलियाला वर्ल्डकप जिंकविणारी भारताची सून होणार; कोण आहे ती...
14
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...
15
"मी तुझ्या बापाला मारलं, मृतदेह सुटकेसमध्ये..."; बायकोने नवऱ्याला संपवलं, लेकीला केला फोन
16
Honeymoon Destinations : गुलाबी थंडीत रोमँटिक हनिमून प्लॅन करताय? भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट!
17
"पंक्चर बनवणारे येऊन...!", बिहारमध्ये योगी आदित्यनाथांची तुफान बॅटिंग; विरोधकांवर थेट हल्लाबोल
18
"जबरदस्तीनं मिठीत घ्यायचा, शारीरिक जवळीक साधायचा, अन्..."; महिला क्रिकेटरच्या आरोपांनी खळबळ
19
धर्मेंद्र यांच्या तब्येतीबद्दल कळताच हेमा मालिनी रुग्णालयात पोहोचल्या, म्हणाल्या, "आम्ही सगळेच..."
20
मुंबईत काँग्रेस स्वबळावर लढणार तर उद्धव ठाकरेंसोबत युतीआधीच मनसेने 'इतक्या' जागांची केली तयारी

मध्यमवर्गाला स्वस्थतेमधून बाहेर ओढले पाहिजे; तरच काहीतरी घडेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2022 06:06 IST

उत्पन्न वाढलेल्या नव्या राष्ट्रवादी मध्यमवर्गीयांना आता भूतकाळच विसरायचाय. स्वातंत्र्य चळवळही विसरायची आहे. त्यांच्यावर ‘स्वस्थते’ची साय धरली आहे!

कुमार केतकर, ख्यातनाम पत्रकार-संपादक, राज्यसभेचे खासदार

‘आपला समाज इतका असंवेदनशील आणि स्वस्थ का झाला आहे?’ असा प्रश्न हल्ली मला सतत पडतो. सध्या आपल्या देशातली परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे. यापुढील काळात आपण आणखी वाईट परिस्थितीमधून जाऊ; तरीही आपल्या समाजात अस्वस्थता दिसत नाही. हे स्वास्थ्य कसे आणि कुठून आले? मुख्य प्रश्न असा, की दयनीय परिस्थिती असूनही समाजात अस्वस्थता का दिसत नाही? आपल्यापुरता विचार केला, तर आपण ज्यांच्या अस्वस्थतेबद्दल बोलत आहोत  ते कोण आहेत? - तर  साहित्यात ज्यांचा अधिकांश दबदबा आहे असे मध्यमवर्गीय!  पन्नास वर्षांपूर्वी दलित पँथर जन्माला येण्याआधी  हा दबदबा सर्वव्यापी होता; ज्याला पुण्या-मुंबईचा मध्यमवर्गीय, उच्चवर्णीय चेहेरा होता. त्यात विदर्भ-मराठवाड्याला स्थान नव्हते.  हळूहळू परिस्थिती बदलत गेली; ती पुढे इतकी बदलली, की या मध्यमवर्गावर स्वस्थतेची साय धरली.

सहज  विचार करा, १९८१ मध्ये आपल्या कुटुंबाचे उत्पन्न किती होते? १९९१ ला ते किती झाले आणि पुढे ते कसे, किती वाढत गेले? १९८१ मध्ये कोणत्याही सोसायटीमध्ये कार पार्किंगवरून भांडणे होत नव्हती. कारण तेव्हा लोकांकडे गाड्याच नव्हत्या. १९९१ च्या आर्थिक उदारीकरणानंतरही हा प्रश्न आला नाही कारण तितक्या प्रमाणात गाड्यांची निर्मितीच झाली नाही. जागतिकीकरणामागोमाग तंत्रज्ञानही आले. त्याच्या परिणामस्वरूप मध्यमवर्गीयांमध्ये १९९१ ते २००१ च्या काळात थक्क व्हायला होईल असे बदल झाले. संगणकामुळे असे काय होणार आहे? शाळा सुरू होणार आहेत का? विहिराला पाणी येणार आहे का, असे म्हणणाऱ्या, बँक- रेल्वेत काम करणाऱ्या मध्यमवर्गीयांनी संगणकाविरुद्ध मोठ्या प्रमाणावर संप केले. 

त्यांना विचारले की, तुमचा मुलगा काय करतो? - तर ते सांगतील अमेरिकेत सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे, कुणी सांगेल नासामध्ये आहे. त्यांना माहितीही नसेल की आपल्या वडिलांनी संगणकाविरोधात कधी काळी संप केला होता! सध्याचा काळ हा सर्वच अर्थांनी आणि सर्वच स्तरांवर इतिहासाला विस्मृतीत लोटण्याचा आहे. ही मतलबी आयडॉलॉजी आहे. उजव्या विचारसरणीच्या लोकांनी फक्त  वल्लभभाई पटेल किंवा सुभाषचंद्र बोस यांना नव्हे, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनाही आपलेसे केले आहे. पूर्वी सर्वांनाच वाटायचे, की मध्यमवर्गीय हा अपरिहार्यपणे सवर्ण आणि शहरी भागातला असतो. नवी वस्तुस्थिती ही आहे की, जागतिक-आर्थिक बदलानंतर आपल्याकडे प्रचंड मोठ्या प्रमाणात ग्रामीण मध्यमवर्ग तयार झाला.  केवळ शहरी, सुशिक्षित  तोच मध्यमवर्ग असे आता म्हणता येणार नाही.  हा नवा मध्यमवर्ग जाणीवपूर्वक स्वास्थ्याचा प्रचार करीत आहे. मध्यमवर्गीयांच्या फ्लॅटची संख्या, फार्महाऊसेस वाढायला लागली आहेत. 

उत्पन्न आणि उत्पादन वाढत नाही तरी शेअर बाजारात  इतक्या उसळ्या कशाच्या जोरावर असतात?  हे पैसे केवळ अदानी, अंबानींचे नव्हेत, तर पाचवा आणि सहावा वेतन आयोग लागू झाल्यामुळे मध्यमवर्गीयांच्या खिशातले हे पैसे आहेत! अनेकांचे निवृत्ती वेतनच ४० ते ८० हजारांच्या घरात असते, त्यामुळे मुलांना आई-वडिलांवर अवलंबून राहावे लागते असे चित्र. यामुळे समाजात स्वस्थता पसरली. आर्थिक उत्पन्न वाढलेल्या नव्या राष्ट्रवादी लोकांना आता दुसरीकडे पाहायचेच नाहीये. त्यांना भूतकाळच विसरायचाय. स्वातंत्र्य चळवळही विसरायची आहे. गेल्या पाच वर्षांत मध्यमवर्गीयांमध्ये नथुराम गोडसे यांच्याबद्दल अचानक  वाढलेले प्रेम धक्कादायक आणि धोकादायक आहे. लोकशाहीत दोन्ही बाजू यायला हव्यात असे सांगून खरा इतिहास पुसून टाकायची ही धडपड! पाठ्यपुस्तकातील इतिहास बदलत चालला आहे. इतिहासातून गांधी-नेहरू लुप्त होत आहेत.  खोटे नायक निर्माण केले जात आहेत. 

या वातावरणात संघर्ष आणि अस्वस्थता टिकवून ठेवावी लागेल. मध्यमवर्गाला स्वस्थतेमधून बाहेर ओढून काढावे लागेल, तरच काहीतरी घडेल! दक्षिणायनच्या वतीने पुण्यात ‘लेखक का बोलतो’? या विषयावर आयोजित चर्चासत्रात केलेल्या तपशीलवार मांडणीचे संपादित

शब्दांकन : नम्रता फडणीस