शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

मध्यमवर्गाला स्वस्थतेमधून बाहेर ओढले पाहिजे; तरच काहीतरी घडेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2022 06:06 IST

उत्पन्न वाढलेल्या नव्या राष्ट्रवादी मध्यमवर्गीयांना आता भूतकाळच विसरायचाय. स्वातंत्र्य चळवळही विसरायची आहे. त्यांच्यावर ‘स्वस्थते’ची साय धरली आहे!

कुमार केतकर, ख्यातनाम पत्रकार-संपादक, राज्यसभेचे खासदार

‘आपला समाज इतका असंवेदनशील आणि स्वस्थ का झाला आहे?’ असा प्रश्न हल्ली मला सतत पडतो. सध्या आपल्या देशातली परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे. यापुढील काळात आपण आणखी वाईट परिस्थितीमधून जाऊ; तरीही आपल्या समाजात अस्वस्थता दिसत नाही. हे स्वास्थ्य कसे आणि कुठून आले? मुख्य प्रश्न असा, की दयनीय परिस्थिती असूनही समाजात अस्वस्थता का दिसत नाही? आपल्यापुरता विचार केला, तर आपण ज्यांच्या अस्वस्थतेबद्दल बोलत आहोत  ते कोण आहेत? - तर  साहित्यात ज्यांचा अधिकांश दबदबा आहे असे मध्यमवर्गीय!  पन्नास वर्षांपूर्वी दलित पँथर जन्माला येण्याआधी  हा दबदबा सर्वव्यापी होता; ज्याला पुण्या-मुंबईचा मध्यमवर्गीय, उच्चवर्णीय चेहेरा होता. त्यात विदर्भ-मराठवाड्याला स्थान नव्हते.  हळूहळू परिस्थिती बदलत गेली; ती पुढे इतकी बदलली, की या मध्यमवर्गावर स्वस्थतेची साय धरली.

सहज  विचार करा, १९८१ मध्ये आपल्या कुटुंबाचे उत्पन्न किती होते? १९९१ ला ते किती झाले आणि पुढे ते कसे, किती वाढत गेले? १९८१ मध्ये कोणत्याही सोसायटीमध्ये कार पार्किंगवरून भांडणे होत नव्हती. कारण तेव्हा लोकांकडे गाड्याच नव्हत्या. १९९१ च्या आर्थिक उदारीकरणानंतरही हा प्रश्न आला नाही कारण तितक्या प्रमाणात गाड्यांची निर्मितीच झाली नाही. जागतिकीकरणामागोमाग तंत्रज्ञानही आले. त्याच्या परिणामस्वरूप मध्यमवर्गीयांमध्ये १९९१ ते २००१ च्या काळात थक्क व्हायला होईल असे बदल झाले. संगणकामुळे असे काय होणार आहे? शाळा सुरू होणार आहेत का? विहिराला पाणी येणार आहे का, असे म्हणणाऱ्या, बँक- रेल्वेत काम करणाऱ्या मध्यमवर्गीयांनी संगणकाविरुद्ध मोठ्या प्रमाणावर संप केले. 

त्यांना विचारले की, तुमचा मुलगा काय करतो? - तर ते सांगतील अमेरिकेत सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे, कुणी सांगेल नासामध्ये आहे. त्यांना माहितीही नसेल की आपल्या वडिलांनी संगणकाविरोधात कधी काळी संप केला होता! सध्याचा काळ हा सर्वच अर्थांनी आणि सर्वच स्तरांवर इतिहासाला विस्मृतीत लोटण्याचा आहे. ही मतलबी आयडॉलॉजी आहे. उजव्या विचारसरणीच्या लोकांनी फक्त  वल्लभभाई पटेल किंवा सुभाषचंद्र बोस यांना नव्हे, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनाही आपलेसे केले आहे. पूर्वी सर्वांनाच वाटायचे, की मध्यमवर्गीय हा अपरिहार्यपणे सवर्ण आणि शहरी भागातला असतो. नवी वस्तुस्थिती ही आहे की, जागतिक-आर्थिक बदलानंतर आपल्याकडे प्रचंड मोठ्या प्रमाणात ग्रामीण मध्यमवर्ग तयार झाला.  केवळ शहरी, सुशिक्षित  तोच मध्यमवर्ग असे आता म्हणता येणार नाही.  हा नवा मध्यमवर्ग जाणीवपूर्वक स्वास्थ्याचा प्रचार करीत आहे. मध्यमवर्गीयांच्या फ्लॅटची संख्या, फार्महाऊसेस वाढायला लागली आहेत. 

उत्पन्न आणि उत्पादन वाढत नाही तरी शेअर बाजारात  इतक्या उसळ्या कशाच्या जोरावर असतात?  हे पैसे केवळ अदानी, अंबानींचे नव्हेत, तर पाचवा आणि सहावा वेतन आयोग लागू झाल्यामुळे मध्यमवर्गीयांच्या खिशातले हे पैसे आहेत! अनेकांचे निवृत्ती वेतनच ४० ते ८० हजारांच्या घरात असते, त्यामुळे मुलांना आई-वडिलांवर अवलंबून राहावे लागते असे चित्र. यामुळे समाजात स्वस्थता पसरली. आर्थिक उत्पन्न वाढलेल्या नव्या राष्ट्रवादी लोकांना आता दुसरीकडे पाहायचेच नाहीये. त्यांना भूतकाळच विसरायचाय. स्वातंत्र्य चळवळही विसरायची आहे. गेल्या पाच वर्षांत मध्यमवर्गीयांमध्ये नथुराम गोडसे यांच्याबद्दल अचानक  वाढलेले प्रेम धक्कादायक आणि धोकादायक आहे. लोकशाहीत दोन्ही बाजू यायला हव्यात असे सांगून खरा इतिहास पुसून टाकायची ही धडपड! पाठ्यपुस्तकातील इतिहास बदलत चालला आहे. इतिहासातून गांधी-नेहरू लुप्त होत आहेत.  खोटे नायक निर्माण केले जात आहेत. 

या वातावरणात संघर्ष आणि अस्वस्थता टिकवून ठेवावी लागेल. मध्यमवर्गाला स्वस्थतेमधून बाहेर ओढून काढावे लागेल, तरच काहीतरी घडेल! दक्षिणायनच्या वतीने पुण्यात ‘लेखक का बोलतो’? या विषयावर आयोजित चर्चासत्रात केलेल्या तपशीलवार मांडणीचे संपादित

शब्दांकन : नम्रता फडणीस