शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

जुन्या जखमा उकरणे शहाणपणाचे नव्हे; सूड हा पर्याय कसा होऊ शकतो?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2022 09:36 IST

अल्पसंख्यकांनी पूर्वी केलेल्या चुकांबद्दल त्यांना शिक्षा देण्याचा अधिकार बहुसंख्यकांना आज दिला जात आहे. सूड हा पर्याय कसा होऊ शकतो?

कपिल सिब्बल, ज्येष्ठ विधिज्ञ राज्यसभा खासदार

देशाचा भूतकाळ अनेक बाजूंनी पुन्हा जिवंत करता येतो. ऐतिहासिक घटना या महत्त्वाच्या असतातच, कारण त्या वर्तमानाला भूतकाळाशी जोडण्याचे काम करू शकतात. भविष्यासाठी इतिहास आपल्याला धडे देऊ शकतो. इतिहासाची पुनरावृत्तीही होऊ शकते. भूतकाळ देशाला वैभवाकडे नेण्यासाठी प्रेरणा ठरू शकतो; पण यात काळजीची गोष्ट म्हणजे भूतकाळाचे राक्षसीकरण सहज करता येते. खूप मोठ-मोठ्या चुका, हिंसक कारवायांच्या खुणा किंवा ऐतिहासिकदृष्ट्या लक्षणीय लुटमारीच्या घटना वर्तमान काळातील द्वेषपूर्ण, सुडाच्या कृत्यांना वैधता प्राप्त करून देऊ शकत नाहीत. आपल्यापुढे काय वाढून ठेवले आहे याचे भान जिवंत राहायला हवे असेल तर देशाने आपल्या भूतकाळाकडे अत्यंत काळजीपूर्वक, विश्लेषणात्मक दृष्टीने पाहिले पाहिजे.

१९५४ ते ७५ या काळात अमेरिकेने खुसपट काढून सुरू केलेल्या व्हिएतनाम युद्धात दोन्हीकडचे मिळून सुमारे दहा लाख सैनिक मारले गेले. शिवाय २० लाख नागरिकांना प्राण गमवावे लागले. नंतर अमेरिकेने माघार घेतली आणि सोशालिस्ट रिपब्लिक ऑफ व्हिएतनामची स्थापना झाली. भूतकाळाच्या जखमा भरून निघाल्या. आज व्हिएतनाम अमेरिकेच्या मित्र राष्ट्रात गणला जातो. तिथले लोकमतही या बाजूचे असून भूतकाळ गाडून टाकला गेला आहे. दुसरे उदाहरण दक्षिण आफ्रिकेतील वर्णद्वेषी राजवटीचे देता येईल. वर्णविद्वेषासाठीच ती ओळखली जाते. नेल्सन मंडेला यांचा त्याग आणि ‘सत्य आणि समेट आयोगा’ने बजावलेली भूमिका यामुळे दक्षिण आफ्रिकेमध्ये लोकशाही आली आणि पिढ्यान्-पिढ्यांच्या जखमा भरल्या जाऊ शकल्या. दक्षिण आफ्रिका सोडून जाण्याची इच्छा नसलेले गोरेही आता कृष्णवर्णीयांबरोबर तेथे सुखाने नांदत आहेत.  भूतकाळात काय झाले यावरून दक्षिण आफ्रिकेत आता हिंसक घटना घडत नाहीत. 

इतिहासात असे अनेक दाखले आहेत. युरोप खंडातही येऊन गेलेल्या वावटळीने केलेल्या मानवी शोकांतिकेच्या जखमा ताज्या आहेत. इस्रायलनेही जर्मनी बरोबर सुखाने राहायचे ठरवले आहे. युरोपचा इतिहास हजारो वर्षांच्या संघर्षाने भरलेला आहे. अँग्लो जर्मन किंवा अँग्लो फ्रेंच संघर्षाने युरोपियन एकतेमध्ये बाधा आणलेली नाही. एक देश म्हणून या प्रांतात भारत सध्या  चुकतो आहे. भाजपच्या एका प्रवक्त्याने अलीकडेच केलेल्या विधानांवरून परिस्थिती किती नाजूक झाली आहे, शांतता राखणे किती कठीण झाले आहे ते आपण अनुभवलेच. 

देशाच्या इतिहासात २०१४ नंतर  पुनरुज्जीवनाचा कालखंड सुरू झाला आहे. जाणूनबुजून अनेक गोष्टी घडवल्या जात आहेत. नव्या व्याख्या तयार केल्या जात आहेत. अल्पसंख्यकांनी पूर्वी ज्या चुका केल्या त्याबद्दल त्यांना शिक्षा देण्याचा अधिकार बहुसंख्यकांना आज दिला जात आहे. या सगळ्यात काहीतरी गंभीर चूक होत आहे. इतिहासातले वास्तव वर्तमानाच्या तराजूत असे तोलता येणार नाही. मध्ययुगात तलवारीची ताकद राजांना जगवत किंवा मारत असे. शौर्य आणि विरोधकांचे कोथळे काढण्याची क्षमता यावरच राजे लोक खुश असत. भाऊ भावाची निर्घृण हत्या करत असे. नैतिक मूल्यांची जाण नसलेल्या जगात रक्त पाण्यापेक्षा घट्ट असते, असे कधीच मानले गेले नाही. कारस्थाने आणि हव्यास यांनी तेव्हा सतत धुमाकूळ घातला होता. मध्ययुगातील लुटारूंनी भारतावर हल्ले केले, देवळे लुटली. ही मंदिरे संपत्ती आणि प्रतिष्ठेची  प्रतीके होती. देवळातील देवता ही राजाची शक्ती होती.  राजाचा पराभव करायचा असेल तर त्या देवतेलाही लुटले जात असे. राजा आणि देवता यांच्यातील प्रतीकात्मक नाते नष्ट केले नाही, तर विजय अपुरा मानला जायचा. दोन हिंदू राजे एकमेकांसमोर युद्धाला उभे ठाकत तेव्हाही देवळे आणि देवता यांची लूट झाल्याची असंख्य उदाहरणे इतिहासात आहेत. 

मंदिरे आणि प्रार्थना स्थळांवर हल्ले करणे हे धर्माशी संबंधित नव्हते. त्याचा संबंध संस्कृतीशी जोडला जाऊन ती नष्ट करणे महत्त्वाचे मानले जाई! मानवी जीविताला फारच कमी मूल्य होते. स्त्रियांना हे हल्लेखोर एखादा चषक जिंकून यावा तसे उचलून नेत. आजच्या काळातील मूल्यांच्या संदर्भात आपण अशा घटनांचे मूल्यमापन कसे करणार?  जर एखादा देश आज त्याच जुन्या वाटेने गेला तर तो राष्ट्रीय आपत्तीच्या संकटात सापडेल. कृष्णवर्णीयांना दिलेली अमानुष वागणूक, गुलामगिरीला दिलेली मान्यता यासंदर्भात त्याकाळी अस्तित्वात असलेल्या नैतिक मूल्यांचा विचार करायला हवा. खरेदी केले जाणारे आणि विकले जाणारे गुलाम हे श्वेतवर्णीयांनी उपभोग घ्यावयाच्या एखाद्या मालमत्तेसारखे मानले जात. अत्यंत खोलवर झालेल्या या जखमा असून आज त्याच्यातून काही लाभ मिळवावा म्हटले, तर ते अधोगतीचे कारण होणार नाही का?

ईस्ट इंडिया कंपनीच्या काळात पारतंत्र्यातील भारतीयांना ज्या अमानुष वागणुकीला सामोरे जावे लागले त्याच्या यातना फार जुन्या नाहीत.  त्यांनी दिलेली अमानुष वागणूक, केलेली अप्रतिष्ठा यामुळे झालेल्या जखमा कधीही भरून येण्यासारख्या नाहीत तरीही आज आपण ब्रिटिशांबरोबर शांततामय परस्पर संबंध ठेवून आहोत ना? - ते तसेच असले पाहिजे! सूड हा पर्याय होऊ शकत नाही. धर्म हा माणसांना जोडणारा दुवा आहे. पण, तोच फुटीचे मोठे कारणही होऊ शकतो. धर्मगुरू जेव्हा राजकारणाचा धार्मिक व्यवसाय करतात आणि राजकारणी लोक धर्माला राजकीय व्यवसायाचे दुकान बनवतात; तेव्हा या दोघांचे मिश्रण हे लक्षावधी मोलोटोव्ह कॉकटेल्सइतके देशाला कडेलोटाकडे नेणारे घातक रसायन ठरू शकते. भूतकाळातील जखमा पुन्हा उघड्या न करता विचार करण्याची वेळ आली आहे. तसे झाले नाही तर वर्तमान विसरला जाईल आणि भूतकाळ आपल्याला नष्ट करील.