शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

जुन्या जखमा उकरणे शहाणपणाचे नव्हे; सूड हा पर्याय कसा होऊ शकतो?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2022 09:36 IST

अल्पसंख्यकांनी पूर्वी केलेल्या चुकांबद्दल त्यांना शिक्षा देण्याचा अधिकार बहुसंख्यकांना आज दिला जात आहे. सूड हा पर्याय कसा होऊ शकतो?

कपिल सिब्बल, ज्येष्ठ विधिज्ञ राज्यसभा खासदार

देशाचा भूतकाळ अनेक बाजूंनी पुन्हा जिवंत करता येतो. ऐतिहासिक घटना या महत्त्वाच्या असतातच, कारण त्या वर्तमानाला भूतकाळाशी जोडण्याचे काम करू शकतात. भविष्यासाठी इतिहास आपल्याला धडे देऊ शकतो. इतिहासाची पुनरावृत्तीही होऊ शकते. भूतकाळ देशाला वैभवाकडे नेण्यासाठी प्रेरणा ठरू शकतो; पण यात काळजीची गोष्ट म्हणजे भूतकाळाचे राक्षसीकरण सहज करता येते. खूप मोठ-मोठ्या चुका, हिंसक कारवायांच्या खुणा किंवा ऐतिहासिकदृष्ट्या लक्षणीय लुटमारीच्या घटना वर्तमान काळातील द्वेषपूर्ण, सुडाच्या कृत्यांना वैधता प्राप्त करून देऊ शकत नाहीत. आपल्यापुढे काय वाढून ठेवले आहे याचे भान जिवंत राहायला हवे असेल तर देशाने आपल्या भूतकाळाकडे अत्यंत काळजीपूर्वक, विश्लेषणात्मक दृष्टीने पाहिले पाहिजे.

१९५४ ते ७५ या काळात अमेरिकेने खुसपट काढून सुरू केलेल्या व्हिएतनाम युद्धात दोन्हीकडचे मिळून सुमारे दहा लाख सैनिक मारले गेले. शिवाय २० लाख नागरिकांना प्राण गमवावे लागले. नंतर अमेरिकेने माघार घेतली आणि सोशालिस्ट रिपब्लिक ऑफ व्हिएतनामची स्थापना झाली. भूतकाळाच्या जखमा भरून निघाल्या. आज व्हिएतनाम अमेरिकेच्या मित्र राष्ट्रात गणला जातो. तिथले लोकमतही या बाजूचे असून भूतकाळ गाडून टाकला गेला आहे. दुसरे उदाहरण दक्षिण आफ्रिकेतील वर्णद्वेषी राजवटीचे देता येईल. वर्णविद्वेषासाठीच ती ओळखली जाते. नेल्सन मंडेला यांचा त्याग आणि ‘सत्य आणि समेट आयोगा’ने बजावलेली भूमिका यामुळे दक्षिण आफ्रिकेमध्ये लोकशाही आली आणि पिढ्यान्-पिढ्यांच्या जखमा भरल्या जाऊ शकल्या. दक्षिण आफ्रिका सोडून जाण्याची इच्छा नसलेले गोरेही आता कृष्णवर्णीयांबरोबर तेथे सुखाने नांदत आहेत.  भूतकाळात काय झाले यावरून दक्षिण आफ्रिकेत आता हिंसक घटना घडत नाहीत. 

इतिहासात असे अनेक दाखले आहेत. युरोप खंडातही येऊन गेलेल्या वावटळीने केलेल्या मानवी शोकांतिकेच्या जखमा ताज्या आहेत. इस्रायलनेही जर्मनी बरोबर सुखाने राहायचे ठरवले आहे. युरोपचा इतिहास हजारो वर्षांच्या संघर्षाने भरलेला आहे. अँग्लो जर्मन किंवा अँग्लो फ्रेंच संघर्षाने युरोपियन एकतेमध्ये बाधा आणलेली नाही. एक देश म्हणून या प्रांतात भारत सध्या  चुकतो आहे. भाजपच्या एका प्रवक्त्याने अलीकडेच केलेल्या विधानांवरून परिस्थिती किती नाजूक झाली आहे, शांतता राखणे किती कठीण झाले आहे ते आपण अनुभवलेच. 

देशाच्या इतिहासात २०१४ नंतर  पुनरुज्जीवनाचा कालखंड सुरू झाला आहे. जाणूनबुजून अनेक गोष्टी घडवल्या जात आहेत. नव्या व्याख्या तयार केल्या जात आहेत. अल्पसंख्यकांनी पूर्वी ज्या चुका केल्या त्याबद्दल त्यांना शिक्षा देण्याचा अधिकार बहुसंख्यकांना आज दिला जात आहे. या सगळ्यात काहीतरी गंभीर चूक होत आहे. इतिहासातले वास्तव वर्तमानाच्या तराजूत असे तोलता येणार नाही. मध्ययुगात तलवारीची ताकद राजांना जगवत किंवा मारत असे. शौर्य आणि विरोधकांचे कोथळे काढण्याची क्षमता यावरच राजे लोक खुश असत. भाऊ भावाची निर्घृण हत्या करत असे. नैतिक मूल्यांची जाण नसलेल्या जगात रक्त पाण्यापेक्षा घट्ट असते, असे कधीच मानले गेले नाही. कारस्थाने आणि हव्यास यांनी तेव्हा सतत धुमाकूळ घातला होता. मध्ययुगातील लुटारूंनी भारतावर हल्ले केले, देवळे लुटली. ही मंदिरे संपत्ती आणि प्रतिष्ठेची  प्रतीके होती. देवळातील देवता ही राजाची शक्ती होती.  राजाचा पराभव करायचा असेल तर त्या देवतेलाही लुटले जात असे. राजा आणि देवता यांच्यातील प्रतीकात्मक नाते नष्ट केले नाही, तर विजय अपुरा मानला जायचा. दोन हिंदू राजे एकमेकांसमोर युद्धाला उभे ठाकत तेव्हाही देवळे आणि देवता यांची लूट झाल्याची असंख्य उदाहरणे इतिहासात आहेत. 

मंदिरे आणि प्रार्थना स्थळांवर हल्ले करणे हे धर्माशी संबंधित नव्हते. त्याचा संबंध संस्कृतीशी जोडला जाऊन ती नष्ट करणे महत्त्वाचे मानले जाई! मानवी जीविताला फारच कमी मूल्य होते. स्त्रियांना हे हल्लेखोर एखादा चषक जिंकून यावा तसे उचलून नेत. आजच्या काळातील मूल्यांच्या संदर्भात आपण अशा घटनांचे मूल्यमापन कसे करणार?  जर एखादा देश आज त्याच जुन्या वाटेने गेला तर तो राष्ट्रीय आपत्तीच्या संकटात सापडेल. कृष्णवर्णीयांना दिलेली अमानुष वागणूक, गुलामगिरीला दिलेली मान्यता यासंदर्भात त्याकाळी अस्तित्वात असलेल्या नैतिक मूल्यांचा विचार करायला हवा. खरेदी केले जाणारे आणि विकले जाणारे गुलाम हे श्वेतवर्णीयांनी उपभोग घ्यावयाच्या एखाद्या मालमत्तेसारखे मानले जात. अत्यंत खोलवर झालेल्या या जखमा असून आज त्याच्यातून काही लाभ मिळवावा म्हटले, तर ते अधोगतीचे कारण होणार नाही का?

ईस्ट इंडिया कंपनीच्या काळात पारतंत्र्यातील भारतीयांना ज्या अमानुष वागणुकीला सामोरे जावे लागले त्याच्या यातना फार जुन्या नाहीत.  त्यांनी दिलेली अमानुष वागणूक, केलेली अप्रतिष्ठा यामुळे झालेल्या जखमा कधीही भरून येण्यासारख्या नाहीत तरीही आज आपण ब्रिटिशांबरोबर शांततामय परस्पर संबंध ठेवून आहोत ना? - ते तसेच असले पाहिजे! सूड हा पर्याय होऊ शकत नाही. धर्म हा माणसांना जोडणारा दुवा आहे. पण, तोच फुटीचे मोठे कारणही होऊ शकतो. धर्मगुरू जेव्हा राजकारणाचा धार्मिक व्यवसाय करतात आणि राजकारणी लोक धर्माला राजकीय व्यवसायाचे दुकान बनवतात; तेव्हा या दोघांचे मिश्रण हे लक्षावधी मोलोटोव्ह कॉकटेल्सइतके देशाला कडेलोटाकडे नेणारे घातक रसायन ठरू शकते. भूतकाळातील जखमा पुन्हा उघड्या न करता विचार करण्याची वेळ आली आहे. तसे झाले नाही तर वर्तमान विसरला जाईल आणि भूतकाळ आपल्याला नष्ट करील.