शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

मायबाप सरकार, फक्त कागदावर नको, बांधांवर या! निकष बाजूला सारून मदतीचा हात पुढे केला पाहिजे

By नंदकिशोर पाटील | Updated: September 25, 2025 06:53 IST

नेहमीचे सरकारी घोळ घालू नका. आकड्यांचा खेळ करू नका! पिकं गेली, संसार उघडा पडला; पण मदत म्हणजे थेंबभर पाणी; असं होता कामा नये!

नंदकिशोर पाटील, संपादक, लोकमतछत्रपती संभाजीनगर

मराठवाड्यावर निसर्गाचा कोप झाला आहे की, पाऊस रझाकार झाला आहे, हा प्रश्न भेडसावतोय. कायम पाण्यासाठी आसुसलेला हा भूप्रदेश आज अक्षरशः पाण्यात बुडालेला आहे. वयोवृद्ध सांगतात,  पावसाचं इतकं भयावह ‘निजामी’ रूप कधीच पाहिलं नव्हतं. मुसळधार पावसाने शेतं चिखलात गाडली, माती खरवडून नेली, हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला. अनेकांचे संसार उघड्यावर पडले; डोळ्यांतलं पाणीही पावसात मिसळलं. 

या पावसाने तब्बल ३६०० गावे झोडपली, १२९ मंडलांत अतिवृष्टी केली, तर ७ लाख हेक्टरवरील पिके पूर्णपणे नष्ट झाली. लाखो शेतकरी उद्ध्वस्त झाले. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आणि नैर्ऋत्य मान्सूनची दिशा अचानक बदलली. ढगांचा डोंगर जमा झाला आणि मराठवाड्यावर आभाळच कोसळलं! जयकवाडीसह सर्व धरणं काठोकाठ भरून वाहू लागली. यंदा तहान भागवायला नाशिक-अहिल्यानगरचं पाणी मागण्याची वेळच आली नाही; उलट जयकवाडीतून जलक्षमतेच्या दुप्पट पाणी नदीत सोडावं लागलं. ५०० अब्ज घनफूट पाणी वाहून गेलं. माजलगाव, मांजरा, तावरजा, सिद्धेश्वर.. हीच अवस्था. लातूर, धाराशिव, बीड जिल्ह्यात तर पावसाने कहर केला. ७ लाख हेक्टरवरील मका, सोयाबीन, उडीद, मूग पाण्यात गाडले गेले. पैठण-पाचोड भागात मोसंबी, डाळिंबाच्या बागा बुडाल्या. उसाचे फड भुईसपाट झाले.

पावसाने केवळ शेतीच नाही तर जीवितहानीही केली. आजवर १८ जणांचे बळी गेले, गायी-म्हशी, बैल अशा पशुधनाची तर किती हानी झाली, याची गणनाच करता येणार नाही. शेकडो घरं, शाळा कोसळल्या. रस्ते, पूल वाहून गेले. हा विध्वंस पाहून १९९३ च्या भूकंपाच्या आठवणी जाग्या होतात. तो धरणीकंप होता, हे आभाळाचं रौद्ररूप आहे. मराठवाडी माणसांच्या नशिबी झोपायला धरणी आणि पांघरायला आकाश एवढंच; पण धरणी उसवली आणि आभाळच फाटलं तर शिवायचं तरी कसं? 

पिकांचा चिखल आणि उघड्यावर पडलेला संसार पाहून धाय मोकलून हंबरडा फोडणाऱ्या माता-भगिनींना कोणत्या शब्दाने धीर देणार? पाण्यात बुडालेली शेती पाहून हताश झालेल्या शेतकऱ्यांच्या अंत:करणात किती कोलाहल असेल, याची कल्पना करता येणार नाही.  सरकारने पंचनाम्याचे आदेश दिले आहेत. मंत्री पाहणी दौऱ्यासाठी मुंबईबाहेर पडले आहेत. अधिकारी सांगत आहेत की, ‘ही नैसर्गिक आपत्ती आहे; निकषांनुसार मदत दिली जाईल’, पण एवढ्या मोठ्या विध्वंसावर ही तुटपुंजी मदत म्हणजे शेतकऱ्याच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार. मराठवाड्यातील नुकसानभरपाईपोटी राज्य सरकारने केंद्राकडे १४४९ कोटींची मदत मागितली, मिळाले फक्त ७२१ कोटी. हा आकड्यांचा खेळ आहे की, शेतकऱ्यांची थट्टा? पिकं गेली, संसार उघडा पडला; पण मदत म्हणजे थेंबभर पाणी! 

आज गरज आहे तातडीच्या आणि थेट मदतीची. नुकसानभरपाईचे निकष शिथिल करून, लालफितीच्या विळख्यात न अडकवता शेतकऱ्यांच्या खात्यात त्वरित मदत पोहोचली पाहिजे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ‘लाडक्या बहिणींच्या’ खात्यात कोट्यवधी रक्कम जमा करण्याची तत्परता दाखवली गेली, तेवढीच तत्परता शेतकऱ्यांना वाचवण्यासाठी दाखवायला काय हरकत आहे? आकडे, जीआर, पंचनामे अशा प्रकारच्या कसरतीत शेतकरी आणखी खचून जाईल. त्याऐवजी जर तुम्ही प्रत्यक्ष गावात जाऊन शेतकऱ्यांचे दुःख डोळ्यांनी पाहिलंत, तर कदाचित तुमच्या डोळ्यांतही पाणी येईल. तोच दिलासा आज गरजेचा आहे. नुकसानभरपाईचे सगळे निकष बाजूला सारून सरकारने मदतीचा हात पुढे केला पाहिजे. मदत देताना जुना जीआर की नवा, हा सरकारी घोळ घालण्याचा हा प्रसंग नाही.    nandu.patil@lokmat.com

English
हिंदी सारांश
Web Title : Government, Come to the Fields, Not Just Paper: Help Needed!

Web Summary : Marathwada faces devastating floods, destroying crops and homes. Farmers need immediate aid, not bureaucratic delays. Existing relief is insufficient. The government should relax norms and provide direct financial assistance to affected farmers urgently.
टॅग्स :floodपूरMaharashtraमहाराष्ट्रRainपाऊस