शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

जम्मू-काश्मिरात लोकशाही पर्व सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2019 02:41 IST

गेल्या ३० वर्षांत या राज्यात झालेल्या निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळे झाले. केंद्राकडून मिळणारा निधी या भ्रष्ट व्यवस्थेमुळे लोकांपर्यंत पोहोचतच नव्हता.

आलोक मेहता

महाराष्ट्र आणि हरयाणातील निवडणुकींचा प्रचार, प्रत्यक्ष झालेले मतदान आणि लागलेले निकाल यांच्या गदारोळात जम्मू-काश्मिरात लोकशाहीच्या होणाऱ्या पहाटेकडे लोकांचे लक्ष गेले नाही. जम्मू-काश्मीरच्या संदर्भातील घटनेतील कलम ३७० रद्द केल्यानंतर आणि त्या राज्याचे दोन केंद्र प्रशासित राज्यांत विभाजन करण्यात आल्यानंतर निर्माण झालेल्या अशांतीचा सामना करण्यात तेथील प्रशासन व्यवस्था गुंतलेली होती. तेथील अशांत व्यवस्थेबाबत देश-विदेशात काळजी व्यक्त करण्यात येत होती. त्यातल्या त्यात समाधानाची गोष्ट ही होती की त्या भागात दहशतवाद्यांकडून अशांतता निर्माण करण्याचे प्रयत्न प्रशासनाकडून विफल करण्यात आले. त्यामुळे सामान्य लोकांना सुरक्षितता वाटू लागली होती. याच काळात जम्मू-काश्मिरात खंड विकास परिषदेच्या निवडणुका होऊ घातल्या होत्या. त्या २४ ऑक्टोबरला संपन्न झाल्या. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही लोकांनी निर्भयपणे पुढे येत मतदान केल्याने, मतदानाची टक्केवारी ८५ ते ९९ टक्के इतकी व्यापक पाहावयास मिळाली.

राज्यात एकूण ३१६ विकास खंड आहेत. त्यापैकी २७ ठिकाणी अविरोध निवडणुका होऊन प्रतिनिधी निवडण्यात आले. उर्वरित २८९ विकास खंडात शांतिपूर्ण पद्धतीने मतदान झाले. एवढ्या प्रमाणात शांततेने मतदान होणे, हा लोकशाहीचा पहिला विजय होता. राज्यातील २६ हजार पंच आणि सरपंच यांनी मतदानात भाग घेतला. या क्षेत्रात अनेक वर्षांपासून दादागिरी करणाºया नेत्यांना आपण जुमानत नाही, हे त्यांनी दाखवून दिले. काँग्रेस, पीडीपी आणि नॅशनल कॉन्फरन्स या पक्षांनी या निवडणुकीवर बहिष्कार टाकला होता. पण त्याकडे दुर्लक्ष करून संविधानाविषयी आस्था प्रकट करून सरपंचांनी जनहिताला प्राधान्य देत विकास खंडांच्या निर्मितीत स्वत:चे योगदान दिले. या तीन पक्षांनी टाकलेल्या बहिष्काराचा लाभ भाजपला मोठ्या प्रमाणात झाला आहे, असेही पाहावयास मिळाले नाही. २८० विकास खंडांपैकी ८१ विकास खंडांत भाजपचे उमेदवार विजयी झाले, तर तेथील पँथर्स पार्टीला १४८ खंडांत विजय मिळाला. ८८ ठिकाणी अपक्ष उमेदवार विजयी झाले.

या वर्षी जुलै महिन्यात संपादकांच्या एका गटासोबत श्रीनगर येथे ५० सरपंचांसोबत बातचीत करण्याची संधी मला मिळाली होती. त्यांच्या भावना आणि अपेक्षा जाणून घेतल्याने मनाला समाधान लाभले होते. पण त्या वेळी कल्पनाही नव्हती की, काही दिवसांत जम्मू-काश्मिरात फार मोठी राजकीय उलथापालथ घडून येणार आहे. त्या उलथापालथीमुळे ७० वर्षांपूर्वीचे जुने स्वप्न साकार होण्यास सुरुवात झाली आहे. जुलै महिन्यात सरपंचांसोबत बैठक झाली आणि आॅगस्ट महिन्यात केंद्राने ३७० कलम रद्द करून, या राज्याला सर्वांच्या सोबत विकास करण्याच्या मार्गावर आणून सोडले.

मला आठवते की, गेल्या ३० वर्षांत या राज्यात झालेल्या निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळे झाले. केंद्राकडून मिळणारा निधी या भ्रष्ट व्यवस्थेमुळे लोकांपर्यंत पोहोचतच नव्हता. त्यामुळे लोकांमध्ये असलेल्या असंतोषाचा फायदा घेऊन पाकिस्तान समर्थित विभाजनवादी गटांनी जम्मू-काश्मीर राज्यात असंतोषाची आग पेटती ठेवली. काँग्रेस, पीडीपी आणि भाजप यांनी सत्तेत सहभागी होत आपले प्रभावक्षेत्र वाढविण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, दहशतवादी हिंसाचारात ५० हजारांहून अधिक लोकांना प्राण गमवावा लागला.

राज्यात राष्ट्रपती शासन लागू झाल्यामुळे सत्तेचे विकेंद्रीकरण करण्यास सुरुवात झाली. राज्यपाल सत्यपाल मलिक आणि त्यांच्या सल्लागारांनी एका अभिनव कार्यक्रमाचा आरंभ केला. महात्मा गांधींनी घालून दिलेल्या ‘खेड्याकडे चला’ या आदर्शाचे पालन करीत २० ते २७ जून २०१९ या कालावधीत सरकारी अधिकाऱ्यांनी गावागावांत जाऊन लोकांचे प्रश्न समजावून घेत, ते सोडविण्यासाठी पावले उचलायला सुरुवात केली. त्यामुळे ग्रामीण क्षेत्रात प्रशासनाविषयी विश्वास निर्माण होण्यास मदत मिळाली. जम्मू-काश्मिरात पंचायतींना तसेच विकास खंडांना अधिक अधिकार आणि अधिक निधी उपलब्ध झाल्यामुळे, शांतता व सद्भावना यांच्यासोबत विकासाचे नवे पर्व सुरू झाले आहे. सत्तेचे विकेंद्रीकरण होऊ लागल्याने भ्रष्टाचाराचे मार्ग बंद होण्यास साह्य होऊ शकते. त्याचबरोबर राजकीय पूर्वग्रह बाजूला ठेवून जम्मू-काश्मिरात दहशतवाद समाप्त करण्यासाठी आणि राज्य आर्थिक दृष्टीने आत्मनिर्भर होण्यासाठी आगामी काही वर्षे तरी सातत्याने प्रयत्न करावे लागतील.

दहशतवादी हल्ल्यांपासून लोकांचे संरक्षण करण्यासाठी भारतीय सेना प्रयत्न करीतच आहे. त्यात बाधा आणण्याचे काम पाकिस्तानकडून सातत्याने सुरू आहे. त्याला तोंड देत काश्मीरचा विकास स्वित्झर्लंड आणि अन्य युरोपियन राष्ट्रांप्रमाणे करता येणे शक्य आहे. हिमालयाचे पर्वतीय क्षेत्र तसेच तेथील दºयाखोºयांचे सौंदर्य आणि तलावांचे देखणेपण पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरू शकते. जम्मू-काश्मीर आणि लडाख या राज्यांतील ग्रामीण जनता स्वत:चा आर्थिक विकास करण्यासाठी हपापलेली आहे. त्यांना राजकारणाशी काहीही देणे-घेणे नाही. संपूर्ण भारतवर्षात दिवाळीचा सोहळा अत्यंत उत्साहाने साजरा झाला. जम्मू-काश्मिरात सुखाचे दिवे पेटावेत यासाठी भारतीयांनी तेथील जनतेला शुभेच्छा देण्याची खरी गरज आहे.

(लेखक प्रिंटर्स गिल्ड ऑफ इंडियाचे माजी अध्यक्ष आहेत)

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरVotingमतदान