शहरं
Join us  
Trending Stories
1
Tariff on Pharma: डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा तडाखा! औषधांवर १०० टक्के टॅरिफ, भारतीय कंपन्यांची चिंता वाढली
2
‘मला बळीचा बकरा बनवला जातोय’ सोनम वांगचूक यांचा आरोप; केंद्रीय गृहमंत्रालयाकडून कारवाई सुरूच
3
पंजाब राज्य एका हेक्टरला ५० हजार देते मग महाराष्ट्राने ८५०० का? ओमराजे निंबाळकरांचा सरकारला सवाल
4
मदतीच्या आड आता निकषांचा डोंगर! हातातोंडाशी आलेल्या पिकांचा चिखल, शेतीचे वाळवंट अन् हताश शेतकरी
5
आजचे राशीभविष्य- २६ सप्टेंबर २०२५, मान- सन्मान व प्राप्तीत वाढ होईल;वाद होण्याच्या शक्यतेमुळे वाणी संयमित ठेवा
6
मदत करा...मदत करा...! आपत्तीग्रस्तांचा नेत्यांसमोर टाहो, बांधावर फुटले अश्रूंचे बांध
7
का होतेय ढगफुटी..? दिवसा बाष्पीभवन वेगाने होतेय; ढग जमतात अन् रात्रीतून सुरू होतो कहर
8
मुंबई महानगरातील विकास कामांना ९५४ कोटींचा ‘बुस्टर’; MMRDA ला राज्य सरकारची मदत
9
PAK vs BAN: Live मॅचमध्ये कॉमेडी! दोन्हीं बॅटर स्ट्राइक एन्डला; तरी Run Out करायला नाही जमलं (VIDEO)
10
‘शक्ती’रूप! धावत्या रेल्वेतून मिसाइल लॉन्च; अशी कामगिरी करणारा भारत ठरला जगातील चौथा देश
11
पावसाने गावे खरडली, नेत्यांची धुंदी कधी उतरेल?; निदान पंधरा दिवस राजकारणाला फुलस्टॉप द्या
12
केवळ मुंबईच नव्हे, तर राज्यभर सर्वच शहरांमध्ये जाहिरात फलक (पुन्हा) कोसळण्याच्या आत जागे व्हा
13
भैरप्पा गेले, पण हे लेखनपर्व कधीच काळाच्या पडद्याआड जाणार नाही
14
एलएलबी ३ वर्षे अभ्यासक्रमासाठी यंदा विक्रमी प्रवेश; आतापर्यंत २२ हजार जणांनी प्रवेश घेतले
15
पिके पाण्यात, स्वप्न वाहून गेले; कर्जाचा फास कसा सोडवायचा, पुढे शेती करायला पैसा कुठून आणायचा?
16
एससी उपवर्गीकरणाचा निर्णय तीन महिन्यांत घेऊ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
17
अवैध बांधकामांवर कारवाई न करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी का नाही केली?; हायकोर्टाचा एसआयटीला सवाल
18
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
19
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
20
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!

बुद्धी मिळाली, आता सुबुद्धी यावी...

By किरण अग्रवाल | Updated: September 3, 2020 09:37 IST

यंदा कोरोनामुळे चिंतेची स्थिती असताना गणरायाचे आगमन झाले; पण या संकटाचे गांभीर्य लक्षात घेता सर्वच ठिकाणी पुरेशी खबरदारी घेतली गेल्याचे दिसून आले.

किरण अग्रवालकोरोनाचे महाभयंकर संकट लक्षात घेता सुरक्षितपणे घरच्या घरीच पर्यावरणपूरक गणेश विसर्जन करण्याची बुद्धी यंदा श्री गणरायाने दिल्याने सर्वच ठिकाणच्या नद्यांमध्ये यानिमित्त होणारे प्रदूषण बरेचसे टळले; पण ही केवळ यंदाची किंवा याच कारणापुरतीची प्रासंगिकता न ठरता आता या विचाराचा धागा पुढे नेत यापुढेही अशीच काळजी घेतली गेली तर नद्यांची निर्मळता तर टिकून राहीलच शिवाय पर्यावरणालाही मोठा हातभार लाभून जाईल.यंदा कोरोनामुळे चिंतेची स्थिती असताना गणरायाचे आगमन झाले; पण या संकटाचे गांभीर्य लक्षात घेता सर्वच ठिकाणी पुरेशी खबरदारी घेतली गेल्याचे दिसून आले. गणरायांच्या आगमन व विसर्जनाच्या मिरवणुकांवरील बंदी तसेच मूर्तीच्या उंचीबाबतचे निर्देश शासन पातळीवरून देण्यापूर्वीच अनेक सार्वजनिक गणेश मंडळांनी स्वयंस्फूर्तीने खबरदारीचे निर्णय घेतलेले दिसून आले हे यात विशेष. मुंबईतील लालबागचा राजा म्हणजे सामान्यांपासून सेलिब्रिटी व राजकारण्यांपर्यंत सर्वांसाठी आदराचे व श्रद्धेचे स्थान. तेथे दर्शनासाठी उसळणारी गर्दी हीदेखील उत्सुकतेचा विषय ठरत असते; परंतु यंदा या मंडळानेही मूर्तीच स्थापन न करण्याचा निर्णय घेतला. पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती असो, की अन्य मानाची गणेश मंडळे; त्यांनीही नेहमीची भव्यदिव्य आरास व गर्दी टाळण्याबरोबरच सामाजिक सेवेच्या उपक्रमांवर भर दिला. एरव्ही दोन दोन दिवस चालणारी पुण्यातील विसर्जनाची मिरवणूक यंदा काढलीच गेली नाही. मुंबई, पुण्याप्रमाणेच राज्यातील नाशिक, नागपूर, कोल्हापूर, सोलापूर, औरंगाबाद अशा सर्वच शहरांतील सार्वजनिक गणेश मंडळांनी याबाबत गर्दी टाळून सुरक्षितता जपण्यावर भर दिल्याचे बघावयास मिळाले. एक प्रकारे कोरोनाच्या संकटामुळे आरोग्यपूरक गणेशोत्सव साजरा केला गेलेला दिसून आला.महत्त्वाचे म्हणजे दरवर्षी परंपरेप्रमाणे मुंबईत समुद्रात व अन्य ठिकाणी नद्यांमध्ये बाप्पांचे विसर्जन केले जात असल्याने होणारे जलप्रदूषण पाहता सामाजिक संघटनांकडून मूर्ती दानाचे उपक्रम राबविले जात असतात. नद्यांमधील विसर्जनानंतर दुसऱ्या दिवशी या नदी काठांवर उभे राहून नदीतले चित्र बघणे हे सश्रद्ध मनाला मानवणारे नसते. नाशकातील गोदावरी व धुळ्यातील पांझराकान सारख्या नद्या तर शहराच्या मध्य भागातून गेलेल्या असल्याने तेथे तर धूम असते; पण कोल्हापुरातील पंचगंगा असो, की नाशिक ते नांदेडपर्यंतची गोदा, पंढरपूर- सोलापूरचा भीमाकाठ असो, की नागपुरातील तेलंखडी किंवा शुक्रवारी तलाव; सर्वत्र सारखेच चित्र दिसायचे. मात्र अलीकडे मूर्ती दान किंवा संकलन मोहिमांना चांगला प्रतिसाद लाभत असल्याचे दिसून येत आहे. यंदा सार्वजनिक मंडळांबरोबरच सोसायट्या व घराघरातील बाप्पांचेही घरच्या घरीच विसर्जन केले गेले त्यामुळे त्यांचीही नदी, तलावांवर होणारी गर्दी टळली. परिणामी त्यांची निर्मळताही बºयापैकी टिकून राहिलेली दिसून आली. म्हणजे आरोग्यपूरकतेला पर्यावरणपूरकतेचीही जोड लाभली.अर्थात, बुद्धीची देवता म्हणवणाºया बाप्पांनीच कोरोनापासून बचावासाठी ही बुद्धी दिली म्हणायचे. आज कोरोनाशी संबंधित भयातून जी बुद्धी वापरली गेली, ती यापुढील काळातही शाबुत राहिली तर पर्यावरणास मोठाच हातभार लाभू शकेल. बाप्पांच्या विसर्जनाच्या संदर्भातच नव्हे तर अन्यही कारणातून होणारे नद्यांचे प्रदूषण टाळले जाणे गरजेचे बनले आहे. पाणीवाले बाबा म्हणून ख्यातकीर्त असलेले डॉ. राजेन्द्र सिंह व अन्यही अनेक पर्यावरणप्रेमी यासाठी परिश्रम घेत आहेत. जागोजागी नमामि गंगा, नमामि गोदा, नमामि चंद्रभागा यासारख्या मोहिमा सुरू झाल्या आहेतच. शिवाय गणेशोत्सवाचे स्वरूप अलीकडील काही वर्षात खूप बदलले आहे, तेव्हा सामाजिक भान राखत यंदा ज्या पद्धतीने आरोग्यविषयक व मदतीचे उपक्रम मोठ्या प्रमाणात राबविले गेले, तसे यापुढील काळातही घडून येण्यासाठी बाप्पांनीच सुबुद्धी द्यावी अशी अपेक्षा करूया. आगामी काळ हा ऑनलाइन शिक्षणाचा राहणार आहे; परंतु ग्रामीण भागात अनेक कुटुंबे अशी आहेत जी मुलांच्या ऑनलाइन शिक्षणासाठी आवश्यक ते मोबाइल किंवा टॅब घेण्याच्या आर्थिक स्थितीत नाहीत, अशांना सार्वजनिक गणेश मंडळांकडून मदत मिळू शकली तर ख-या अर्थाने बाप्पांनाही आनंदच होईल इतकेच यानिमित्ताने.

टॅग्स :Ganesh Mahotsavगणेशोत्सवenvironmentपर्यावरण