शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

पोलिसांचा धाक संपला आहे का ?

By सुधीर महाजन | Updated: September 25, 2019 14:50 IST

पोलीस दल आहे, प्रमुख म्हणजे फक्त शहरासाठी आयुक्त आहे. महानिरीक्षक आहेत; पण कायदा-सुव्यवस्था आहे का हा सवाल कायम आहे. 

- सुधीर महाजन

परवा मित्राकडे गप्पा मारत बसलो होतो. उद्योजक मित्र कामाच्या रगाड्यात पार अडकलेला; गावाकडे जायला पाहिजे, शेतीवाडीवर चक्कर टाकली पाहिजे, नसता भानगडी व्हायच्या अन् आपल्याला पत्ता नाही अशा काळजीत. त्याची आई म्हणाली ‘मोगलाई लागली की काय? काही होणार नाही.’ मी दचकलोच. विचार केला मोगलाई जाऊन अडीचशे वर्षापेक्षा जास्त काळ उलटला, निजामशाही जावूनही सत्तरी झाली. तरी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आला की विदर्भ-खान्देशच्या लोकांच्या तोंडात हा वाक्प्रचार येतो. कारण तिकडे त्यावेळी इंग्रजांचे राज्य होते. कायद्याचा धाक होता. आजच्या संदर्भातही हाच प्रश्न औरंगाबाद शहरासाठी पडतो. येथे कायद्याचे राज्य आहे काय? असा प्रश्न पडावा अशीच परिस्थिती आहे. पोलीस दल आहे, प्रमुख म्हणजे फक्त शहरासाठी आयुक्त आहे. महानिरीक्षक आहेत; पण कायदा-सुव्यवस्था आहे का हा सवाल कायम आहे. 

कालच्या डॉ. कंधारकर यांच्या घरातील चोरीने तर तो जास्त अधोरेखीत केला. डॉ. कंधारकर हे शहरातील नावाजलेले नाव. ते ज्या टिळकनगर सारख्या भरवस्तीत राहतात. हमरस्त्यावर त्यांचा बंगला आणि तो फोडला जातो तशी ही घटना नवी नाही कारण अशा घटना वारंवार घडतात त्यामुळे ती बाब सवयीची होते. तिची जाणवण्याची तीव्रता कमी होते आणि पुढे पुढे अंगवळणी पडते. जसे मंगळसुत्र चोरी, मोटारसायकल चोरी या घटना आपल्या अंगवळणी पडल्या अशा घटनांची हळहळ ही वाटत नाही. पोलीसांवरील विश्वास उडाल्याने आता नकली मंगळसूत्र वापरण्याची फॅशनच महिलांमध्ये रुजायला लागली. काळ सोकवला असेच म्हणावे लागेल. तर मोठ्या घटनांचा विचार केला तर जुलैमध्ये बीड बायपासवर चोरट्याने एटीएम मशिनच पळवून नेले. अजून ते सापडले नाही त्याच वेळी सलग तीन दिवस शहरात एटीएम फोडण्याचे प्रयत्न झाले होते. एवढे मोठे शहर म्हटले की चोरी चपाटी होणारच. हे काही रामराज्य नाही; पण कायदा व सुव्यवस्था नावाची गोष्ट इथेच संपत नाही. शहरात भर रस्त्यात खून पडतात. रोशनगेट परिसरात खून पडले. परवा परवा तर जिल्हा पोलीस प्रमुखाच्या बंगल्याजवळच भर रस्त्यावर खून झाला. अशा घटना काही सामान्य नागरिकांमध्ये सुरक्षेची भावना निश्चितच निर्माण करत नाही. 

हा झालेला गुन्हेगारीचा विषय ठळक घटनांचा उल्लेख करत आटोपता घेतलेला. आता हा कायदा व सुव्यवस्थेत प्राधान्याने येते तो सामाजिक सलोखा आणि औरंगाबाद शहर तर त्या अर्थाने नाजूक ठिकाण म्हणून पोलीसांच्या दृष्टीने समजले जाते. किंबहुना औरंगाबादसाठी हीच सर्वोच्च प्राधान्य क्रमातील बाब आहे; पण ती सुद्धा नाजूक आहे. म्हणजे शहरात पोलीसांचा धाक राहिला नाही हे सिद्ध करणाऱ्या घटना घडल्या. काही दिवसांपूर्वी लोकसभा निवडणुकीनंतरच्या या घटना आहेत. रात्री उशिरा रस्त्याने जाणाऱ्या मुस्लीम युवकांना बळजबरीने ‘श्रीराम’ म्हणण्यास लावण्याच्या या घटना घडल्या त्याने तणाव निर्माण झाला. प्रत्यक्षात असे काही घडलेच नव्हते; पण पोलीस नेहमीप्रमाणे ‘वेट अँड वॉच’ मोडमध्ये होते. मध्यरात्री घटना घडल्याची वार्ता पसरली आणि जमाव गोळा झाला. पोलीस आयुक्त पोहोचले, पण फौजफाटा धडकला पण तेथे जे काही घडले ते निश्चितच पोलीस दलाचे नीतिधैर्य वाढवणारे नव्हते.

जुन्या गोष्टींचे, व्यक्तींचे दाखले देवू नये. नामोल्लेख न करताही सांगता येईल की अलिकडेच असे आयुक्त होऊन गेले की ज्यांच्या नावाचा शहरभर खरोखरच दरारा होता. नाईलाजाने हा संदर्भ द्यावा लागतो. मध्यंतरी येऊन गेलेल्या एका आयुक्तांनी गुन्ह्यांची संख्या कागदावरच आटोक्यात ठेवण्यासाठी नोंदच न करण्याची हुशारी केली. पोलीस अजूनही तिच ट्रिक वापरतात. त्यामुळे गुन्हेगारी आटोक्यात दिसते. मोठी चोरी झाली. सोने चोरीला गेले तर त्याची नुकसानीची नोंद आजच्या दराने केली जात नाही. खरेदीच्या वेळचा दर लावतात. अशा युक्त्या केल्या जातात. हे पुराण इथेच संपत नाही. वाहतूकीसारखे भीषण असले तरी किरकोळ असणारेही प्रश्न आहेत. ती मालिका संपत नाही. ‘सिंघम’ सिनेमात शेवटी एक दृश्य आहे. पोलीस प्रमुखासह सगळा फौजफाटा जयकांत शिक्रेच्या घरी पोहचतो त्यांचा हेतू लक्षात येताच तो प्रमुखाकडे मदतीसाठी याचना करतो तेव्हा ते प्रमुख म्हणतात ‘आय.जी. कहा है. वो तो निंद की गोली खाके सोगया है.’ खरच असं आहे का?

टॅग्स :PoliceपोलिसatmएटीएमtheftचोरीRobberyचोरी