शहरं
Join us  
Trending Stories
1
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
2
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
3
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
4
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
5
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
6
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
7
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
8
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
9
२१ डिसेंबर रोजी सुरु होणार पौष मास 'भाकड मास' का म्हटला जातो? शुभ कार्यालाही लागतो विराम!
10
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
11
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
12
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
13
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
14
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
15
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
16
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
17
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
18
अकोला महापालिका: भाजप-शिंदेंच्या शिवसेनेचं युतीबाबत निर्णय कधी? ठाकरेंची शिवसेना-मनसेची बोलणी सुरू
19
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
20
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

आदर्श शिक्षक नाहीत का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2018 06:35 IST

केंद्र सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाने दरवर्षी देण्यात येणाऱ्या राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कारांच्या संख्येत घट केली आहे

समाजातील सर्वच क्षेत्रातील आदर्श माणसांची संख्या दिवसेंदिवस रोडावत चालली आहे. समाजात आज तसे आदर्श नाहीत, मग कुणाच्या पायावर डोके टेकवावे, असा प्रश्न सतत भेडसावत असतो. त्यामुळे आदर्श माणसे शोधायची कुठे, हा प्रश्न नेहमी विचारला जातो. समाजाला अस्वस्थ करीत असलेला हा प्रश्न आता सरकारलाही भेडसावू लागला आहे. त्यामुळेच की काय, केंद्र सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाने दरवर्षी देण्यात येणाऱ्या राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कारांच्या संख्येत घट केली आहे. पूर्वी पावणेचारशे शिक्षक या राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराने गौरविले जायचे. आता ही संख्या दीडशे पेक्षाही कमी होणार आहे. पूर्वी महाराष्ट्रातून २९ राष्ट्रीय शिक्षक निवडले जायचे. आता फक्त सहा शिक्षकांनाच हा पुरस्कार दिला जाईल. मानव संसाधन विकास खाते महाराष्ट्राच्याच प्रकाश जावडेकर यांच्याकडे असताना ‘महाराष्ट्रा’च्या वाट्याला इतके कमी सन्मान यावेत, याबाबत शिक्षक आश्चर्य व्यक्त करीत आहेत. खरे तर आदर्श शिक्षकांची संख्या सरकारने वाढवायला हवी. कारण नवी पिढी घडविण्याचे काम ते करीत असतात. कुठल्याही क्षेत्राच्या तुलनेत हे कार्य अधिक पवित्र आहे. परंतु शिक्षकांच्या बाबतीत राज्यकर्त्यांचा दृष्टिकोन नेहमी उदासीन राहिलेला आहे. अध्यापनाच्या कामाव्यतिरिक्त त्याच्याकडे इतरही अवाजवी कामे सोपविली जातात आणि त्या कामांना राष्ट्रीय कार्याचा मुलामा दिल्याने ते करण्यावाचून त्यांना गत्यंतरही नसते. शिक्षण हे सेवेचे क्षेत्र आहे. परंतु शिक्षण सम्राटांनी व सरकारने त्याला उद्योगधंद्याचे स्वरूप दिल्याने या क्षेत्रात प्रामाणिकपणे काम करणाºया शिक्षकांकडेही पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन दूषित झाला आहे. राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारांच्या संख्येत घट केल्याने प्रामाणिकपणे काम करणाºया शिक्षकांचे कार्य थांबणार नाही. जे खरे शिक्षक आहेत, त्यांना अशा पुरस्काराची अपेक्षाही नसते. पण इथे प्रश्न आहे केंद्र सरकारचा. यातून त्यांचा या पवित्र क्षेत्राबद्दल असलेला नकारात्मक दृष्टिकोन समाजासमोर आला आहे. राज्यात जवळपास तीन लाख शिक्षक संख्या आहे. यापैकी हजारो शिक्षक प्रयोगशिल आहेत. समाजनिष्ठ कार्यातून त्यांनी आपले कर्तृत्व सिद्ध केले आहे. पण, चांगले कार्य करूनही अनेकांच्या वाट्याला हे सन्मान आले नाहीत. त्यांना तसे पाठबळही मिळालेले नाही. राज्य सरकारच्या वतीनेही शिक्षकदिनी राज्य शिक्षक पुरस्काराने शिक्षकांचा गौरव केला जातो. पण ही संख्याही मागील अनेक वर्षांपासून वाढलेली नाही. खरे तर शिक्षकांच्या सहवासातून, संवादातून, आचरणातून आणि चारित्र्यातूनच मनाची श्रीमंती असलेला कर्तबगार विद्यार्थी घडत असतो. देश घडविणाºया या शिक्षकांबद्दल आजही समाजामध्ये कायम आदराचे स्थान आहे. हा मान सरकारने घटवून शिक्षकांच्या कार्यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याची भावना उमटते आहे. आजच्या गुरुपौर्णिमेनिमित्ताने त्यांच्या आदर्श कार्याचे स्मरण सरकारला यानिमित्ताने तरी व्हावे, हीच अपेक्षा.

टॅग्स :Teacherशिक्षकPrakash Javadekarप्रकाश जावडेकर