शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी हे ‘ग्राहक’ असतात का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2022 05:30 IST

Consumer Forum: बियाणे,  खते आणि कीटकनाशके याबाबतीत फसवणुकीला सामोरे जावे लागलेल्या शेतकऱ्यांना ग्राहक संरक्षण कायद्याचा आधार मिळू शकतो. सर्वोच्च न्यायालयाने  नॅशनल सीड्स कॉर्पोरेशन व्ही. एम.  मधुसूदन रेड्डी या प्रकरणात दिलेल्या निवाड्याने याबाबतची संदिग्धता संपवून शेतकरी ग्राहकांना ग्राहक कायद्याचा मार्ग पूर्णतः खुला करून दिला आहे.

- - दिलीप फडके(ग्राहक चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते ) शेतकरीग्राहक असतात का?  खते, बियाणे यांच्या संदर्भात होणाऱ्या फसवणुकीबद्दल ते काय करू शकतात ?                                          - एक वाचक बियाणे,  खते आणि कीटकनाशके याबाबतीत फसवणुकीला सामोरे जावे लागलेल्या शेतकऱ्यांना ग्राहक संरक्षण कायद्याचा आधार मिळू शकतो. सर्वोच्च न्यायालयाने  नॅशनल सीड्स कॉर्पोरेशन व्ही. एम.  मधुसूदन रेड्डी या प्रकरणात दिलेल्या निवाड्याने याबाबतची संदिग्धता संपवून शेतकरी ग्राहकांना ग्राहक कायद्याचा मार्ग पूर्णतः खुला करून दिला आहे.    आंध्र प्रदेशातल्या शेतकऱ्यांच्या तक्रारींच्या संदर्भात वेगवेगळ्या निकालांच्या वैधतेला कॉर्पोरेशनने आव्हान दिले होते. ह्या कंपनीने उत्पादित केलेले बियाणे खराब आहे हे लक्षात आल्यावर शेतकऱ्यांनी ग्राहक न्यायमंचांकडे तक्रारी केल्या.  शेतकरी हे व्यावसायिक हेतूने बियाण्यांची खरेदी करून त्यापासून ते लाभ मिळवीत असतात. बियाण्यांबद्दलच्या तक्रारींच्या निराकरणासाठी स्वतंत्रपणे बियाण्याचा कायदा (१९६६) आहे.  त्यामुळे शेतकऱ्यांनी ग्राहक कायद्याचा आधार घेणे चुकीचे ठरेल, असा कंपनीचा युक्तिवाद होता. शेतकरी व्यावसायिक किंवा वाणिज्य हेतूने बियाणे खरेदी करतात, हा कंपनीचा युक्तिवाद न्यायालयाने साफ नामंजूर केला. न्यायालयाने सांगितले की, या शेतकऱ्यांना बियाण्यांचा कायदा आणि  नियमांचे पुरेसे ज्ञान असणे शक्य नाही. सरकार आणि सरकारी संघटनांनी दिलेल्या माहितीवर ते मोठ्या प्रमाणावर अवलंबून असतात.  बियाणे खरेदी केल्यावर त्यातील थोडा नमुना राखून ठेवला पाहिजे, असा सल्लाही न्यायालयाने दिला. बियाण्यांचे नमुने किमान एक वर्षापर्यंत तरी जपून ठेवणे ही उत्पादकांची जबाबदारी आहे.  कायद्यानुसार खराब बियाण्यांच्या संदर्भात उत्पादकाला सहा महिन्यांचा तुरुंगवास आणि एक हजार रुपये दंड इतकीच सीमित शिक्षेची तरतूद आहे. त्यामुळे अशा बियाण्यांमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना ग्राहक संरक्षण कायद्यानुसार योग्य नुकसानभरपाई मिळवता येते.  तुमचे प्रश्न / अडचणी पाठवण्यासाठी ई-मेल पत्ता : tarkaikaral@gmail.com 

टॅग्स :Farmerशेतकरीconsumerग्राहक