शहरं
Join us  
Trending Stories
1
Amit Shah : "दीदींनी 5 वर्षे प्रचार केला तरी..."; अमित शाह यांनी ममता बॅनर्जींना दिलं जाहीर आव्हान
2
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
3
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
4
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
5
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
6
काँग्रेस ५० टक्के आरक्षणाची मर्यादा हटवेल, दलित आणि मागासवर्गीयांचा कोटा वाढवेल: राहुल गांधी
7
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
8
"असं असेल तर MS Dhoni ने खेळूच नये..."; Harbhajan Singh भडकला, CSK vs PBKS सामन्यानंतर व्यक्त केला संताप
9
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
10
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
11
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
12
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
13
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
14
माता न तू वैरिणी; नवऱ्यासोबत भांडणाचा राग, चिमुकल्याला मगरींनी भरलेल्या नदीत फेकले...
15
Eknath Shinde : धर्मवीर चित्रपटात राजन विचारेंबाबत दाखवलेलं सर्व खोटं, विचारे नकली शिष्य; एकनाथ शिंदेंनी सगळंच सांगितलं
16
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला किती मिळणार? देवेंद्र फडणवीसांनी सांगितला आकडा
17
Israel Hamas War : इस्रायली लष्कराचा पॅलेस्टिनी नागरिकांना अल्टिमेटम, मोठ्या हल्ल्याची भीती
18
Closing Bell: सेन्सेक्स किंचित तेजीसह तर, निफ्टी घसरणीसह बंद; टायटनमध्ये मोठी घसरण, IT शेअर्स चमकले
19
IPL 2024 Playoff qualification scenario : १६ सामने, ४ जागा अन् ९ संघ शर्यतीत; वाचा मुंबई इंडियन्सचं गणित कसं जुळेल
20
Income Tax Return : आयटीआर फाईल करण्यासाठी का आवश्यक आहे Form 16? नसेल तर काय करू शकता?

दृष्टिकोन - भारतातील आरोग्य सुविधा सुधारणेचे पाऊल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2019 5:01 PM

आपल्या देशाच्या ७१व्या वर्धापन दिनाला आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व सामान्य लोकांचे आरोग्य सुधारण्यासाठी जगातील सर्वात मोठी आरोग्य योजना हाती घेतली.

डॉ. नितीन मळेकर

आपल्या देशाच्या ७१व्या वर्धापन दिनाला आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व सामान्य लोकांचे आरोग्य सुधारण्यासाठी जगातील सर्वात मोठी आरोग्य योजना हाती घेतली. २0१९च्या सार्वजनिक निवडणुकांआधी ही योजना घोषित केल्यामुळे तिच्याकडे निकोप दृष्टीने पाहाणे जरा कठीण गेले, तरीही हे मान्य करावेच लागेल की, या योजनेमुळे जगभरात भारताची प्रतिमा एक परिवर्तनशील सुधारणावादी आणि प्रचंड कार्यक्षमतेचा देश अशी झाली आहे.

भारतातील गरीब व दारिद्र्य रेषेखालील जनतेसाठी लागणाऱ्या आरोग्यसेवा दर्जेदार आणि अद्यावत करणे हा एक महत्त्वाकांक्षी सुधारणा उपक्रम आहे. आजमितीस दर ६७ टक्के लोकांना आरोग्य विमा संरक्षण नाही. त्यांना आजारपणाचा सर्व खर्च स्वत: करावा लागतो. आजच्या घडीला सार्वजनिक इस्पितळे प्रचंड दबावाखाली काम करीत आहोत. गरीब माणूस अचानक उद्भवलेल्या आजारपणामुळे कर्जबाजारी होतो. ७0 टक्के भारतीय जनता ग्रामीण भागात राहते. त्यांचा कमकुवत आर्थिक कणा अगदीच कोलमडून पडतो. या योजनेंतर्गत हा खर्च केंद्र सरकार व राज्य सरकार ६0 टक्के-४0 टक्के या प्रमाणात देऊ करतील. ‘आयुष्यमान भारत’ या योजनेखाली १0 करोड गरीब कुटुंबांना प्रत्येक ५ लाख इतके विमा संरक्षण दिले जाईल, जेणेकरून ही कुटुंबे आजारपणापातून होणाºया आर्थिक गळचेपीपासून मुक्त राहतील. या उपक्रमातील सरकारकडून निर्धारित आरोग्य सुविधांच्या किमतीविरोधात संबंधित डॉक्टर आणि खासगी इस्पितळे यांनी आधीपासूनच विरोधाचा सूर लावल्याचे आपण अनुभवत आहोत. परिणामी, अनेक शहरी इस्पितळे या उपक्रमाला विरोध असल्याने, बहुतेक रुग्णांना अजूनही लहान रुग्णालयातील कौशल्यहीन, दर्जाहीन आरोग्य सेवांवर अवलंबून राहाणे भाग आहे.

ग्रामीण भागात मूलभूत आरोग्य सुविधा उपलब्ध नसल्याने, तेथील जनतेला शहरी सुविधांवरच अवलंबून राहावे लागते, पण या सुविधा शहरात बाजार भावात उपलब्ध असतात व त्या पैशांअभावी गरिबांपासून दूरच असतात. हा पेच सोडविण्यासाठी खासगी इस्पितळ संघटना अशी आशा करत आहेत की, या सुविधांसाठी सरकार निर्धारित असलेल्या तुटपुंज्या निधीबाबत पुनर्विचार लवकरच करेल.आरोग्यसेवा देऊ करणारे आणि घेणारे (रुग्ण) यांच्यामधील अविश्वास, या अविश्वासामुळे डॉक्टर आणि इस्पितळावर होणारे हिंसाचार वाढत आहेत. यासाठी मुळापासून समस्या समजून घेऊन, ती सोडविण्याकरिता ठोस उपाय केले नाहीत, तर या आरोग्य प्रणालीत अनागोंदी वाढून परिस्थिती आटोक्याच्या बाहेर जाईल. मोठ्या प्रमाणावरील लोकसंख्येला स्वस्त किमतीत गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा देणाºया सर्वांना आरोपीच्या पिंजºयात उभे करणे न्याय होणार नाही. जागतिक मानांकानुसार पाहिले, तर आपल्याकडे रुग्ण अधिक व डॉक्टर अगदीच कमी असे निराशाजनक चित्र आहे. या समस्येचे निराकारण करण्यासाठी दूरदृष्टीची गरज आहे. यासाठी सरकारी आरोग्य यंत्रणा, कायदेतज्ज्ञ, वैद्यकीय संघटना आणि रुग्ण प्रतिनिधी या सर्वांनी एकत्रित काम करणे महत्त्वाचे आहे, तरच या आरोग्य यंत्रणेवरील जनतेने गमावलेल्या विश्वास पुनर्प्रस्थापित होईल. आता ही गोष्ट जर आपण सामंजस्याने हाताळली नाही, तर समाज हिताचे, समाज आरोग्याचे अतोनात नुकसान होईल.(लेखक आरोग्यसेवा संपर्क तज्ज्ञ)

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्सdoctorडॉक्टर