शहरं
Join us  
Trending Stories
1
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
2
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
3
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
4
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
5
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
6
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
7
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
8
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
9
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
10
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
11
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
12
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
13
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार
14
“धर्म-भाषा काहीही असो, आपण सर्व हिंदू आहोत; ब्रिटिशांनी आपल्यात फूट पाडली”- मोहन भागवत
15
"...तोपर्यंत मी तुरुंगात राहण्यास तयार आहे"; सोनम वांगचुक यांनी जोधपूरहून भावाकडे पाठवला मेसेज
16
INDW vs PAKW: अचानक मैदानात पसरला पांढरा धूर: भारत-पाक सामन्यात नेमकं काय घडलं?
17
IND W vs PAK W : पुरुष असो वा महिला, नो हँडशेक फॉर्म्युला! हरमनप्रीतनं पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ
18
‘’२०२७ चा वर्ल्डकप खेळायला मिळाला तर…’’, बोलता बोलता रोहित झाला होता भावूक, तो व्हिडीओ होतोय व्हायरल  
19
बिहारमध्ये केव्हा होणार विधानसभा निवडणूक? CEC ज्ञानेश कुमार यांची घोषणा; SIR संदर्भातही मोठं विधान
20
गुजरातमधून आणलेला सिंह तामिळनाडूच्या प्राणीसंग्रहालयातून पळाला; स्थानिकांमध्ये घबराट...

दृष्टिकोन: ‘कोरोना’ची काळजी आणि उद्योगक्षेत्रातील विस्ताराच्या संधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2020 02:31 IST

आपल्या देशातील नागरिकांना देशाबाहेर प्रवास करण्यास विशेषत: आशियाई देशांमध्ये जाण्यास अनेक देशांनी प्रतिबंध घातला आहे.

सुकृत करंदीकर । सहसंपादक, पुणेकोरोना विषाणूमुळे एव्हाना जगभर भीती निर्माण केली आहे. जैविक अस्त्रे निर्माण करण्याच्या चीनच्या छुप्या कारस्थानातून या विषाणूचा उद्रेक झाला का? चिनी लोकांच्या मांसाहाराच्या अतिरेकी प्रथा-रिवाजांमुळे हा विषाणू प्राण्यांमधून माणसात संक्रमित झाला का? चीनविरोधी ‘ट्रेड वॉर’चा हा भाग आहे का? जागतिक अर्थकारणाला हादरवून टाकण्यासाठी केलेले हे दहशतवादी कृत्य आहे का? या विविध दृष्टिकोनातून कोरोनाकडे पाहिले जात आहे. या प्रश्नांची उकल केव्हा ना केव्हा होईलच. मात्र, कोरोनाचा उद्रेक कशामुळे झाला, हा याघडीचा महत्त्वाचा प्रश्न नसून कोरोनाचा प्रसार जगभर होऊ नये, यासाठी काय करायचे, संभाव्य मनुष्यहानी कशी रोखायची, याची उत्तरे शोधणे अत्यावश्यक बनले आहे.

भारतासह जगातल्या सत्तर देशांमध्ये कोरोना विषाणूची लागण झालेले रुग्ण आढळून आले आहेत. चीनपाठोपाठ द. कोरियामध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग सर्वाधिक आढळून आला आहे. भारतही चीनचा शेजारी देश. त्यात पुन्हा दाट लोकवस्तीची शेकडो शहरे आणि हजारो गावे या भारत देशात. त्यामुळे कोरोनासंदर्भात काळजी करावी अशी सद्यस्थिती आहे. एकशेतीस कोटींच्या भारतात कोरोनाची साथ पसरली तर काय भीषण स्थिती ओढवू शकते, याची कल्पना करणेही अशक्य आहे. युरोप-अमेरिकेतल्या देशांनी कोरोना विषाणूला अत्यंत गांभीर्याने घेतलेले दिसते. कॉर्पोरेट आणि खासगी क्षेत्रातील अनेक कंपन्यांनी सार्वजनिक वावर कमी करण्यासाठी त्यांच्या कर्मचाऱ्यांना कार्यालयात न येता घरून काम करण्याची (वर्क फ्रॉम होम) मुभा देऊन टाकली आहे. संसर्ग रोखण्यासाठीचे जास्तीत जास्त मार्ग शोधून ते अवलंबले जात आहेत.

आपल्या देशातील नागरिकांना देशाबाहेर प्रवास करण्यास विशेषत: आशियाई देशांमध्ये जाण्यास अनेक देशांनी प्रतिबंध घातला आहे. चीनमधून कोणी माणूसच काय पण शेतमाल, औद्योगिक उत्पादने यांसह कसल्याच प्रकारची आयात होणार नाही, यावर कटाक्षाने लक्ष दिले जात आहे. खुद्द चीनमधल्या अनेक प्रांतांतल्या शाळा, कामाची ठिकाणे बंद ठेवली गेली आहेत. ‘कोरोना’बाधितांची दिवसेंदिवस वाढत चाललेली संख्या आणि त्यामुळे होणारे मृत्यू लक्षात घेऊन जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) ‘कोरोना’चा जगाला अतिधोका असल्याचा गंभीर इशारा दिला आहे. एक प्रकारे कोरोनाची दहशत पसरते आहे. मानवजातीवर घाला घालणारा गेल्या वीस वर्षांतला हा तिसरा विषाणू जग अनुभवत आहे. मात्र, २००२ मधल्या सार्स आणि २०१३ मध्ये एव्हियन फ्लूपेक्षाही कोरोनाचा धोका जास्त असल्याचे ‘डब्ल्यूएचओ’चे म्हणणे आहे. जानेवारीतल्या २३ तारखेला चीनमधल्या वुहानमध्ये कोरोनाचा उद्रेक सर्वप्रथम झाला. त्यानंतरच्या अवघ्या सव्वा महिन्यात या कोरोनामुळे जगाचा जीडीपी ०.२५ टक्क्यांनी घटल्याचे ‘आॅक्सफोर्ड इकॉनॉमिक्स’ने म्हटले आहे.

कोरोना उद्रेकाचा केंद्रबिंदू चीन असल्याने अर्थातच चीनला बसणारा फटका सर्वात मोठा आहे. जगातील सर्वात मोठी पक्का माल तयार करणारी अर्थव्यवस्था (मॅन्युफॅक्चरिंग इकॉनॉमी) म्हणून चीनकडे पाहावे लागते. माल निर्यात करणारा जगातला पहिल्या क्रमांकाचा आणि माल आयात करणारा जगातला दुसºया क्रमांकाचा देशही चीनच. ‘कोरोना’मुळे चीनशी असणारा सर्व प्रकारचा संपर्क जगाने आज तोडला आहे. याचा थेट परिणाम जागतिक अर्थव्यवस्थेवर होतो आहे. अर्थात, वाईटातूनही चांगले घडतेच. वन्यप्राण्यांच्या मांसाहारावर चीनने तातडीने बंदी घातली. कोरोनाच्या उद्रेकानंतर सर्वच देशांना प्राणीजन्य पदार्थांची उत्पादने, विक्री, स्वच्छता आणि आरोग्यसंदर्भातले निकष यादृष्टीने नियम-कायदे कडक करावे लागतील.

शेजारी चीनमधल्या परिस्थितीचा तात्कालिक लाभ भारतासारख्या विकसनशील देशांना घेता येणार आहे. चीनमधून होणारी शेतमाल आणि शेतीपूरक उत्पादनांची निर्यात ठप्प झाल्याने नव्या बाजारपेठा भारताला उपलब्ध होऊ शकतात. दीर्घ दृष्टीने पाहता उत्पादन क्षेत्रातील उद्योगधंद्यांच्या विस्ताराची संधी भारतापुढे असेल. कोरोनामुळे घाबरून जाण्याची गरज अजिबात नाही. मात्र,सगळ्यात महत्त्वाचे काय तर आरोग्य व्यवस्थेतील त्रुटी लक्षात घेऊन त्यावर उपाययोजना करण्याची तातडी ‘कोरोना’ने निदर्शनास आणली आहे.कोरोनाचे रुग्ण भारतात सापडत आहेत. याचे रूपांतर साथीत झाले तर त्याला तोंड देण्यासाठी व्यवस्था सक्षम आहे का, याचा आढावा सरकारने घ्यावा. सार्वजनिक ठिकाणे, अन्ननिर्मिती उद्योग आणि विक्री व्यवस्था, हॉटेल उद्योग, शेतमाल विक्री या सर्वच ठिकाणी स्वच्छता आणि अन्नाचा दर्जा या बाबतीतले बहुतांश नियम-कायदे अपुरे आहेत. कोरोनाच्या निमित्ताने या मुद्द्यावर समाजाने गंभीर व्हायला हवे. यासाठी सरकारवरचा दबाव वाढवला पाहिजे.

टॅग्स :corona virusकोरोनाchinaचीनIndiaभारतbusinessव्यवसाय