शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
2
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
3
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
4
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
5
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
6
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
7
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
8
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
9
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
10
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
11
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
12
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
13
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
14
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
15
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
16
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
17
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?
18
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
19
इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलचा मोठा निर्णय! जगभरातील दूतावास बंद केले; आता बदल्याची भीती
20
'जे धाडसी होत होते ते मारले गेले'; ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली; म्हणाले, "करार करा नाहीतर..."

दृष्टिकोन: ‘कोरोना’ची काळजी आणि उद्योगक्षेत्रातील विस्ताराच्या संधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2020 02:31 IST

आपल्या देशातील नागरिकांना देशाबाहेर प्रवास करण्यास विशेषत: आशियाई देशांमध्ये जाण्यास अनेक देशांनी प्रतिबंध घातला आहे.

सुकृत करंदीकर । सहसंपादक, पुणेकोरोना विषाणूमुळे एव्हाना जगभर भीती निर्माण केली आहे. जैविक अस्त्रे निर्माण करण्याच्या चीनच्या छुप्या कारस्थानातून या विषाणूचा उद्रेक झाला का? चिनी लोकांच्या मांसाहाराच्या अतिरेकी प्रथा-रिवाजांमुळे हा विषाणू प्राण्यांमधून माणसात संक्रमित झाला का? चीनविरोधी ‘ट्रेड वॉर’चा हा भाग आहे का? जागतिक अर्थकारणाला हादरवून टाकण्यासाठी केलेले हे दहशतवादी कृत्य आहे का? या विविध दृष्टिकोनातून कोरोनाकडे पाहिले जात आहे. या प्रश्नांची उकल केव्हा ना केव्हा होईलच. मात्र, कोरोनाचा उद्रेक कशामुळे झाला, हा याघडीचा महत्त्वाचा प्रश्न नसून कोरोनाचा प्रसार जगभर होऊ नये, यासाठी काय करायचे, संभाव्य मनुष्यहानी कशी रोखायची, याची उत्तरे शोधणे अत्यावश्यक बनले आहे.

भारतासह जगातल्या सत्तर देशांमध्ये कोरोना विषाणूची लागण झालेले रुग्ण आढळून आले आहेत. चीनपाठोपाठ द. कोरियामध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग सर्वाधिक आढळून आला आहे. भारतही चीनचा शेजारी देश. त्यात पुन्हा दाट लोकवस्तीची शेकडो शहरे आणि हजारो गावे या भारत देशात. त्यामुळे कोरोनासंदर्भात काळजी करावी अशी सद्यस्थिती आहे. एकशेतीस कोटींच्या भारतात कोरोनाची साथ पसरली तर काय भीषण स्थिती ओढवू शकते, याची कल्पना करणेही अशक्य आहे. युरोप-अमेरिकेतल्या देशांनी कोरोना विषाणूला अत्यंत गांभीर्याने घेतलेले दिसते. कॉर्पोरेट आणि खासगी क्षेत्रातील अनेक कंपन्यांनी सार्वजनिक वावर कमी करण्यासाठी त्यांच्या कर्मचाऱ्यांना कार्यालयात न येता घरून काम करण्याची (वर्क फ्रॉम होम) मुभा देऊन टाकली आहे. संसर्ग रोखण्यासाठीचे जास्तीत जास्त मार्ग शोधून ते अवलंबले जात आहेत.

आपल्या देशातील नागरिकांना देशाबाहेर प्रवास करण्यास विशेषत: आशियाई देशांमध्ये जाण्यास अनेक देशांनी प्रतिबंध घातला आहे. चीनमधून कोणी माणूसच काय पण शेतमाल, औद्योगिक उत्पादने यांसह कसल्याच प्रकारची आयात होणार नाही, यावर कटाक्षाने लक्ष दिले जात आहे. खुद्द चीनमधल्या अनेक प्रांतांतल्या शाळा, कामाची ठिकाणे बंद ठेवली गेली आहेत. ‘कोरोना’बाधितांची दिवसेंदिवस वाढत चाललेली संख्या आणि त्यामुळे होणारे मृत्यू लक्षात घेऊन जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) ‘कोरोना’चा जगाला अतिधोका असल्याचा गंभीर इशारा दिला आहे. एक प्रकारे कोरोनाची दहशत पसरते आहे. मानवजातीवर घाला घालणारा गेल्या वीस वर्षांतला हा तिसरा विषाणू जग अनुभवत आहे. मात्र, २००२ मधल्या सार्स आणि २०१३ मध्ये एव्हियन फ्लूपेक्षाही कोरोनाचा धोका जास्त असल्याचे ‘डब्ल्यूएचओ’चे म्हणणे आहे. जानेवारीतल्या २३ तारखेला चीनमधल्या वुहानमध्ये कोरोनाचा उद्रेक सर्वप्रथम झाला. त्यानंतरच्या अवघ्या सव्वा महिन्यात या कोरोनामुळे जगाचा जीडीपी ०.२५ टक्क्यांनी घटल्याचे ‘आॅक्सफोर्ड इकॉनॉमिक्स’ने म्हटले आहे.

कोरोना उद्रेकाचा केंद्रबिंदू चीन असल्याने अर्थातच चीनला बसणारा फटका सर्वात मोठा आहे. जगातील सर्वात मोठी पक्का माल तयार करणारी अर्थव्यवस्था (मॅन्युफॅक्चरिंग इकॉनॉमी) म्हणून चीनकडे पाहावे लागते. माल निर्यात करणारा जगातला पहिल्या क्रमांकाचा आणि माल आयात करणारा जगातला दुसºया क्रमांकाचा देशही चीनच. ‘कोरोना’मुळे चीनशी असणारा सर्व प्रकारचा संपर्क जगाने आज तोडला आहे. याचा थेट परिणाम जागतिक अर्थव्यवस्थेवर होतो आहे. अर्थात, वाईटातूनही चांगले घडतेच. वन्यप्राण्यांच्या मांसाहारावर चीनने तातडीने बंदी घातली. कोरोनाच्या उद्रेकानंतर सर्वच देशांना प्राणीजन्य पदार्थांची उत्पादने, विक्री, स्वच्छता आणि आरोग्यसंदर्भातले निकष यादृष्टीने नियम-कायदे कडक करावे लागतील.

शेजारी चीनमधल्या परिस्थितीचा तात्कालिक लाभ भारतासारख्या विकसनशील देशांना घेता येणार आहे. चीनमधून होणारी शेतमाल आणि शेतीपूरक उत्पादनांची निर्यात ठप्प झाल्याने नव्या बाजारपेठा भारताला उपलब्ध होऊ शकतात. दीर्घ दृष्टीने पाहता उत्पादन क्षेत्रातील उद्योगधंद्यांच्या विस्ताराची संधी भारतापुढे असेल. कोरोनामुळे घाबरून जाण्याची गरज अजिबात नाही. मात्र,सगळ्यात महत्त्वाचे काय तर आरोग्य व्यवस्थेतील त्रुटी लक्षात घेऊन त्यावर उपाययोजना करण्याची तातडी ‘कोरोना’ने निदर्शनास आणली आहे.कोरोनाचे रुग्ण भारतात सापडत आहेत. याचे रूपांतर साथीत झाले तर त्याला तोंड देण्यासाठी व्यवस्था सक्षम आहे का, याचा आढावा सरकारने घ्यावा. सार्वजनिक ठिकाणे, अन्ननिर्मिती उद्योग आणि विक्री व्यवस्था, हॉटेल उद्योग, शेतमाल विक्री या सर्वच ठिकाणी स्वच्छता आणि अन्नाचा दर्जा या बाबतीतले बहुतांश नियम-कायदे अपुरे आहेत. कोरोनाच्या निमित्ताने या मुद्द्यावर समाजाने गंभीर व्हायला हवे. यासाठी सरकारवरचा दबाव वाढवला पाहिजे.

टॅग्स :corona virusकोरोनाchinaचीनIndiaभारतbusinessव्यवसाय