शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
2
रिकामे झाले, दुसरीकडे काम, भाजपचा फॉर्म्युला; अनेक नेत्यांना दुसऱ्या मतदारसंघात पाठवले
3
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
4
PPF Vs NPS: रिटायरमेंटसाठी कोणता प्लान ठरेल बेस्ट? 'हे' आहेत पीपीएफ आणि एनपीएसचे फायदे
5
एकनाथ खडसेंच्या प्रवेशाला विरोध कशाला असेल ? वार्तालापात विनाेद तावडे यांनी मांडली भूमिका
6
Wipro चे संस्थापक अझीम प्रेमजी बँकिंग क्षेत्रात उतरणार; 'या' बँकेतील हिस्सा खरेदी करण्याच्या तयारीत
7
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
8
अमेठीत २५ वर्षांत प्रथमच मैदानात नसेल गांधी घराणे; बालेकिल्ल्यातून काॅंग्रेसने उमेदवार बदलला, भाजप नेत्यांचे टीकास्त्र
9
उद्धव यांच्या आजारपणात मोदी करायचे विचारपूस ; पंतप्रधानांच्या विधानावर राजकीय टोलेबाजी सुरू
10
खासदारांना डावलून आमदार रिंगणात, नव्या चेहऱ्यांमुळे चुरस; रणनीती ठरणार का यशस्वी?
11
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
12
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
13
रावसाहेब दानवे षटकार मारणार ? जालन्यात चुरशीची लढाई, भाजपचा वरचष्मा; मविआ कमकुवत!
14
तिकीट तर कापले, आता पुनर्वसनाचा प्रश्न, महायुतीने १२ विद्यमान खासदारांना बसवले घरी
15
शेतकरी संकटात असताना केंद्राकडून सत्तेचा गैरवापर सुरू ; शरद पवार यांची टीका
16
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
17
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
18
भाजपने १२ केंद्रीय मंत्र्यांना तिकीट नाकारले; निकालावर ११ केंद्रीय मंत्र्यांचे भवितव्य ठरणार
19
ॲड. उज्ज्वल निकम २८ कोटींचे मालक; एक कार, अंधेरी, जळगाव आणि दहिसर येथे घरे
20
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल

एमआयडीसीतील आणखी एका स्फोटाने पुन्हा हादरली डोंबिवली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2017 4:31 AM

गेल्या वर्षी मे महिन्यात प्रोबेस कंपनीतील स्फोटामुळे हादरलेली डोंबिवली सावरण्याची चिन्हे नाहीत, हे एमआयडीसीतील आणखी एका स्फोटाने दाखवून दिले.

गेल्या वर्षी मे महिन्यात प्रोबेस कंपनीतील स्फोटामुळे हादरलेली डोंबिवली सावरण्याची चिन्हे नाहीत, हे एमआयडीसीतील आणखी एका स्फोटाने दाखवून दिले. दुर्घटनेनंतर एमआयडीसी हटवण्याचा नारा देऊन राजकीय नेते मोकळे होतात. पण औद्योगिक वसाहतीतील सुरक्षेच्या मुद्द्यावर गांभीर्याने चर्चेस कोणीच तयार नाही. कारखाने हटवणे इतके सोपे असते, तर आजवर ठिकठिकाणच्या औद्योगिक वसाहती गरजेनुसार स्थलांतरित झाल्या असत्या! डोंबिवलीच नव्हे, तर ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यात बहुतांश औद्योगिक वसाहती सुरक्षेशी फटकून वागत असल्याची परिस्थिती आहे. दरवर्षी लागणाºया आगी, वायुगळती, प्रक्रिया न करता फेकून दिलेला औद्योगिक कचरा आणि सांडपाणी यामुळे आसपासच्या वस्त्यांना त्याचा फटका बसतो. प्रोबेस कंपनीतील स्फोटानंतर अशाच कारणांचा शोध घेण्यासाठी स्थापन केलेल्या समितीने वर्ष उलटले तरी अहवालच सादर केलेला नाही. त्याचे कारण सांगायलाही कोणी तयार नाही. खरेतर, या अहवालातून स्फोटाची जबाबदारी निश्चित होण्यासह सुरक्षेच्या उपाययोजना, त्याचे आॅडिट, कारखान्यांतून सोडले जाणारे रसायनमिश्रित पाणी आणि वायू यावरील प्रक्रियेचा मुद्दा, कामगारांच्या सुरक्षेचे मापदंड, उद्योग आणि निवासी वसाहतीत मोकळ्या सोडलेल्या भूखंडांवर (बफर झोन) बांधलेली घरे, अग्निसुरक्षा, कारखान्यांनी बळकावलेल्या मोकळ्या जागा यांची जबाबदारी निश्चित झाली असती. पण अहवालाच्या दिरंगाईमुळे या पळवाटा तशाच राहिल्या. औद्योगिक वसाहतींना खेटून निवासी वस्त्या असू नयेत, हा नियम आहे. त्यासाठीची मोकळी जागा किती असावी हेही ठरलेले आहे. मात्र हे नियम सर्रास पायदळी तुडवून भूखंड मोकळे करण्याची आणि तेथे घरे बांधून विकण्याची स्पर्धा तेथील रहिवाशांच्या जिवावर बेतते आहे. एमआयडीसी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, औद्योगिक सुरक्षेवर काम करणाºया अन्य संस्था आणि स्थानिक स्वराज्य संस्थांवर याची संयुक्त जबाबदारी येते. पण घटना घडल्यावर जबाबदारी झटकण्याचाच खेळ सुरू होतो आणि ज्या उद्योगांवर त्याची प्राथमिक जबाबदारी येते, ते पायाभूत सुविधांची वानवा असल्याचे सांगत त्याचे खापर यंत्रणांवर फोडतात. पण ज्यांचा जीव जातो किंवा अपंगत्व येते त्यांची मात्र परवड होते. अनेकदा अशा घटना दडपण्याकडेच संबंधितांचा कल असतो. कधी कामगारांच्या नोंदीही अधिकृत नसतात. त्यामुळे पुरेशी भरपाई मिळत नाही. हे टाळण्यासाठी कारखान्यांसह सर्व यंत्रणांची वेळीच झाडाझडती घ्यायला हवी. पण ज्यांनी ती घ्यायची तेच बोटचेपे धोरण स्वीकारत शरण गेल्याचा परिणाम स्फोटाचे भीषण रूप घेऊन समोर येतो; आणि पुन्हा एकदा चौकशीसाठी समितीचा सोपस्कार पार पाडला जातो...

टॅग्स :dombivaliडोंबिवली