शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
2
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
3
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
4
Kolhapur: क्लासला जाताना ओढ्याच्या पाण्यात वाहून गेलेल्या मुलाचा शोध सुरुच
5
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
6
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?
7
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
8
इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलचा मोठा निर्णय! जगभरातील दूतावास बंद केले; आता बदल्याची भीती
9
'जे धाडसी होत होते ते मारले गेले'; ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली; म्हणाले, "करार करा नाहीतर..."
10
Israel Iran Conflict: इस्रायलच्या हवाई हल्ल्यात मारले गेलेले इराणचे 'ते' सहा अणुशास्त्रज्ञ कोण?
11
इराणच्या अण्वस्त्र ठिकानांवर इस्रायलचा पुन्हा हल्ला, केली तुफान बॉम्बिंग; ट्रम्प यांच्या धमकीनंतर, अ‍ॅक्शन मोडवर नेतन्याहू!
12
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार
13
WTC Final : मिचेल स्टार्कनं अर्धशतकासह रचला इतिहास; हेजलवूडच्या साथीनं ५० वर्षांचा विक्रमही मोडला
14
"आदमी खिलौना है" शेवटचं स्टेटस; अहमदाबाद विमान दुर्घटनेत हरियाणातील अंजू शर्मा यांचा दुर्दैवी अंत!
15
जन्मदाताच बनला हैवान! पत्नीशी झालेल्या भांडणाच्या रागात लेकरांवर केला वार, मुलीचा जागीच मृत्यू 
16
ज्याची होती चर्चा, तेच कारण समोर आलं...! राजाला का मारलं? सोनमनं सगळंच सांगून टाकलं; खरा मास्टरमाइंड आला समोर
17
मृतांचे क्लेम सेटलमेंट लवकर पूर्ण करणार; अहमदाबाद विमान अपघाताबाबत LIC चा मोठा निर्णय
18
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
19
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलरची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
20
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत

आशिष देशमुखांनी भाजपाच्या आमदारकीला लाथ मारली; पण...

By यदू जोशी | Updated: October 2, 2018 15:21 IST

काटोलमध्ये आशिष यांच्या रुपाने पहिल्यांदाच कमळ फुलले, ते २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत. माजी मंत्री आणि काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष रणजित देशमुख यांचे आशिष हे चिरंजीव.

काटोलचे आमदार आशिष देशमुख यांनी अखेर भाजपाचा, आमदारकीचा राजीनामा देऊन काँग्रेसचा झेंडा हाती घेतला. ते अपेक्षितच होते. गेले काही महिने आशिष यांनी भाजपामध्ये बंडाचे निशाण फडकावले होते. पक्षनेतृत्वावर आणि विशेषत: पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टीकेचे लक्ष्य केले होते. त्यामुळे ते पक्षात फार दिवस टिकणार नाहीत हे स्पष्टच होते.

काटोलमध्ये आशिष यांच्या रुपाने पहिल्यांदाच कमळ फुलले, ते २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत. माजी मंत्री आणि काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष रणजित देशमुख यांचे आशिष हे चिरंजीव. नरखेड तालुक्यातील वडविहिरा हे देशमुखांचे गाव. या गावात रणजित देशमुख आणि त्यांचे चुलत बंधू माजी मंत्री अनिल देशमुख यांची घरे आजूबाजूला आहेत. काटोलमध्ये तसेच आहे आणि नागपुरातदेखील त्यांचे बंगले आजूबाजूलाच आणि मुंबईतही.

एकेकाळी रणजित आणि अनिल देशमुख यांचे सख्य होते. अनिल देशमुखांना जिल्हा परिषदेचे अध्यक्ष करण्यात रणजितबाबूंचा अर्थातच वाटा होता. नंतर अनिलबाबू आधी अपक्ष आणि नंतर राष्ट्रवादीचे आमदार झाले. रणजितबाबूंनी राजकारणासाठी बाजूच्या सावनेर मतदारसंघाची निवड केली. २००९ मध्ये आशिष हे भाजपाकडून सावनेरमध्ये लढले आणि हरले. पक्षाने २०१४ मध्ये त्यांना काका अनिल देशमुखांविरुद्ध भाजपाने लढविले आणि दोन घरांमध्ये वितुष्ट आले. चार टर्मच्या अनिलबाबूंचा पर्याय शोधणाऱ्या काटोलकरांनी मग तरुण आशिष यांना पसंती दिली अन् काटोलसारख्या पारंपारिक काँग्रेस विचारांच्या मतदारसंघात कमळ फुलले.

आशिष यांची सासुरवाडी नरखेडची. काटोल मतदारसंघातील नरखेड हे तालुक्याचे गाव. रणजितबाबूंचे कट्टर समर्थक माजी आमदार रमेश गुप्ता हे आशिष यांचे सासरे. बंडखोरीचे गुण आशिष यांनी घेतले ते वडील रणजितबाबूंकडून. स्वतंत्र विदर्भाच्या मुद्यावर पक्षनेतृत्वाला आव्हान देणाऱ्या रणजितबाबूंना त्याची राजकीय किंमतही मोजावी लागली पण त्यांनी चिंता केली नाही. देवेंद्र फडणवीस यांच्याविरुद्ध विधानसभा निवडणुकीत नागपुरात उभे असताना विदर्भ राज्याच्या मुद्यावर काँग्रेसने आधी भूमिका स्पष्ट करावी, असे सांगत रणजितबाबूंनी दोन दिवस प्रचारच बंद केला होता. काँग्रेसने त्यांना मोघम उत्तर दिले पण प्रचाराचा सूर हरपला आणि रणजितबाबू हरले अन् फडणवीस जिंकले होते. आशिष यांच्या ठायी वडिलांसारखीच देशमुखी ठासून भरलेली आहे. वागता-बोलताना त्यांच्यात ती जाणवते. आमदारकीला लाथ मारण्याची हिंमत सहसा कोणी करीत नाही पण त्यांनी ती दाखविली आहे. आता आशिष कुठून लढतील, त्यांचे राजकीय भवितव्य काय असे अनेक प्रश्न आहेतच.

काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी झाली तर काटोलमध्ये काका अनिलबाबूंचा दावा असेल पण सिटींग-गेटिंग म्हणून आशिष अडून बसतील. कोणी म्हणते की आशिष नागपुरातून विधानसभा लढू शकतात. काँग्रेस त्यांना गडकरींविरुद्ध लोकसभेलाही उतरवू शकते. आशिष यांच्यासाठी असे अनेक पर्याय दिसतात खरे पण काँग्रेसमध्ये सहजासहजी काही मिळत नसते. भाजपा सोडून ते काँग्रेसमध्ये जात आहेत. त्यांच्याकडे जात आहे, पर्सनॅलिटी आहे, जिगरही आहे. त्या भरवशावर ते कुठपर्यंत जातील हे दिसेलच. त्यांचा अभिमन्यू होऊ नये एवढेच.

टॅग्स :Ashish Deshmukhआशीष देशमुखDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी