शहरं
Join us  
Trending Stories
1
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
2
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
3
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
4
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
5
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
6
निमिषा प्रियासाठी सरकार जनतेकडून ८ कोटी मागत आहे? परराष्ट्र मंत्रालयाने सत्य सांगितले
7
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
8
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार
9
काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली?
10
ऑनलाइन बेटिंग आता दंडनीय गुन्हा, केंद्रीय मंत्रिमंडळाचा गेमिंग विधेयकाला हिरवा कंदील
11
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
12
Viral Video : तरुणीने ट्रक चालकाशी बांधली लग्नगाठ; स्वतः सांगितलं भन्नाट कारण! व्हिडीओ होतोय व्हायरल
13
KBC च्या हॉट सीटवर अमिताभ बच्चन यांच्यासोबत खेळण्याची सुवर्णसंधी! BHIM App वर अशी करा नोंदणी
14
पत्नीचा संशयास्पद मृत्यू, अनेक महिलांशी संबंध...निळ्या ड्रम प्रकरणातील आरोपी प्रियकराचा 'कारनामा'
15
निळ्या ड्रमातील मर्डर मिस्ट्रीचा खुलासा; पहिल्यांदाच प्रियकरासोबत समोर आली आरोपी पत्नी लक्ष्मी
16
Chipi Airport: चिपी विमानतळ सेवा पुन्हा सुरू होणार; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
17
'त्या' ५०० जवानांसाठी सुप्रीम कोर्ट पुढे सरसावलं; केंद्र अन् तिन्ही सैन्य दलाकडे मागितले उत्तर
18
शेवटच्या श्रावण गुरुवारी गुरुपुष्यामृत योग २०२५: सोने खरेदीसाठी शुभ वेळ काय? पाहा, मान्यता
19
Mumbai Rain Updates Live: मुंबईला उद्याही अतिवृष्टीचा इशारा, सतर्क राहण्याचे आवाहन!
20
शेवटचा श्रावण बुधवार: प्रदोष व्रतासह बुध पूजन; ‘अशी’ करा महादेवांची सेवा, शुभ-मंगल होईल!

दादांची ‘झाकली’ मूठ! अजितदादांचा वादा किती मर्यादित होता,  हे आता स्पष्ट होतंय

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2024 05:10 IST

उत्साही कार्यकर्ते ‘अजितदादा, एकच वादा!’ अशी नेहमी घोषणा देतात. एकदा वादा दिला (आश्वासन) तर दादा काम करणारच, असा त्यांना विश्वास आहे. इतका विश्वास असणाऱ्या अजितदादांना आता पुन्हा पराभवाला सामोरे जायला नको, असे का  वाटत असावे?

राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार ऊर्फ दादा अनेकवेळा जोरदार बोलतात. पण, नेहमीच खरं बोलून मन मोकळं करतात. बारामतीत बोलताना पार मूठदेखील मोकळी करून सांगत राहतात. राजकारणात जेवढा वेळ देतो, कष्ट घेतो, धावपळ करतो, ती धावपळ स्वत:चा व्यवसाय टाकून केली असती तर गर्भश्रीमंत होऊन ऐशारामात जगलो असतो, असे एकदा म्हणाले होते. अनेकांना त्यांचा हा स्पष्टवक्तेपणा फटकळ वाटतो. अधिकच स्पष्ट बोलून समोरच्याचे मन दुखावतात, अशी तक्रार त्यांचे समर्थकच करीत असतात. मात्र, कामाचा माणूस आहे, काम होणार नसेल तर नाही म्हणून सांगत भिजत घोंगडं ठेवणार नाही, असेदेखील समर्थक म्हणतात.

बारामतीत रविवारी बोलताना त्यांचा सूर वेगळाच होता. गेली पस्तीस वर्षे ते बारामतीचे विधानसभेत प्रतिनिधित्व करतात. त्यापैकी अनेक वर्षे ते मंत्री, उपमुख्यमंत्री आहेत. परिणामी बारामतीची कोणतीही कामे अडत नाहीत. त्यांचा कामाचा आवाका आणि झपाटाही गतिमान आहे. असे असले तरी झाकली मूठ सव्वा लाखाची म्हणून मते देणार नसाल तर निवडणूक न लढविलेलीच बरी असे  ते बोलून गेले. पस्तीस वर्षे कामे होत राहिली, कोणतीही तक्रार नसेल तर माझ्या अपेक्षेप्रमाणे मतदान का होत नाही, ही त्यांची खंत सारखी मनाला टोचते, असे दिसते.

मे महिन्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्याने सुप्रिया सुळे यांच्याविरुद्ध स्वत:च्या पत्नी सुनेत्रा पवार यांनाच निवडणूक रिंगणात उतरविले. बारामती मतदारसंघात सुनेत्रा पवार यांचा एक लाखापेक्षा अधिक मतांच्या फरकाने पराभव झाला. अजित पवार स्वत: विधानसभेत लाखापेक्षा अधिक मताधिक्याने निवडून येतात, अशा सहा विधानसभा मतदारसंघात मताधिक्य मिळाले नाही, याची त्यांना खंत आहे. आपली बहीण सुप्रिया सुळे हिच्याविरोधात निवडणूक लढायला नको होती, असेही त्यांनी काही दिवसांपूर्वी बोलून दाखविले होते. गडचिरोलीमध्ये पक्षाच्या मेळाव्याला गेले होते. राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांना सल्ला देताना घरात फूट पडू देऊ नका, त्याची किंमत मी मोजली आहे. घरात फूट पडणे लोकांना आवडत नाही, असेही बोलून गेले. आत्राम यांची कन्याच त्यांच्याविरोधात बंडाच्या तयारीत आहे. शिवाय ती शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश करण्याच्या तयारीत आहे.

अजित पवार यांना ‘दादा’ म्हणून त्यांचे समर्थक बोलावतात. उत्साही कार्यकर्ते ‘अजितदादा, एकच वादा!’ अशी नेहमी घोषणा देतात. एकदा वादा दिला (आश्वासन) तर दादा काम करणारच, असा त्यांना विश्वास आहे. इतका विश्वास असणाऱ्या अजितदादांना आता पुन्हा पराभवाला सामोरे जायला नको, असे का  वाटत असावे? १९९१ ते २०२४ इतका दीर्घकाळ आपण आमदार म्हणून काम केले. एकदा नव्या आमदाराचा अनुभव घेऊन पाहा. इतकेही स्पष्ट ते बोलून गेले. अजितदादा यांना एका गोष्टीचा विसर पडतो आहे की, त्यांचे आडनाव ‘पवार’ आहे. पवार नावाचे आडनाव असणाऱ्या माणसानेच १९६७ ते १९९१ पर्यंत बारामतीचे पंचवीस वर्षे विधानसभेत प्रतिनिधित्व केले आहे. भावी आमदारांचा अनुभव घेण्याचा सल्ला ज्यांना देता त्यात पूर्वाश्रमीच्या आमदारांचा अनुभवही त्यांच्या गाठीशी आहे. थोरल्या पवारांशीदेखील बारामतीकर तुलना करीत असतीलच ना? शिवाय सलग पस्तीस वर्षांपेक्षा अधिक काळ विधानमंडळात काढलेले अनेक नेते महाराष्ट्राने पाहिले आहेत. त्यांच्याच वयाचे आर. आर. पाटील होते. जयंत पाटील सलग सात वेळा निवडून आले आहेत. छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील आहेत. अजित पवार हा अपवाद निश्चित नाही. ज्यांना कोणत्याही प्रकारची राजकीय पार्श्वभूमी नव्हती. त्यांनीदेखील प्रभावीपणे काम केले आहे.

अजित पवार यांच्या आधी त्यांनी पक्षाची जबाबदारी घेऊन महाराष्ट्र पिंजून काढला आहे. उपमुख्यमंत्रिपद भूषविले आहे. जयंत पाटील आणि सुशीलकुमार शिंदे यांनीही नऊवेळा अर्थसंकल्प मांडले आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीत अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वाधिक हाल होणार हे आताच दिसू लागले आहे, किंबहुना ते स्वत:च बोलून दाखवत आहेत. त्यांना याची कदाचित जाणीव नसावी की, त्यांच्याबरोबर गेलेले आमदार त्यांच्या मतदारसंघात नारळ वाढवायला कधीही अजित पवार यांना (पुणे जिल्हा वगळून) बोलावत नव्हते. त्यांचा थेट संपर्क थोरल्या पवारांशी होता. त्यामुळे दादांचा वादा किती मर्यादित होता,  हे आता स्पष्ट होत चालले आहे.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसSupriya Suleसुप्रिया सुळेmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Sharad Pawarशरद पवार