शहरं
Join us  
Trending Stories
1
"गोपीनाथ मुंडेंनी मराठा आरक्षणाला विरोध केला नाही, पण..."; पंकजा मुंडे दसरा मेळाव्यात स्पष्टच बोलल्या
2
'आग तो लगी थी घर में...."; धनंजय मुंडेंनी शायरीतून भावना व्यक्त केली, मंत्रिपदाबाबत खंतही बोलून दाखवली
3
कराड आमचे दैवत...; पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्यात झळकले वाल्मिक कराडचे पोस्टर
4
सोन्या-चांदीच्या दरात विक्रमी वाढ; गुंतवणूकदारांनी मात्र टाळाव्यात 'या' ५ चुका
5
Jasprit Bumrah: जसप्रीत बुमराहचा मोठा पराक्रम, घरच्या मैदानावर 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
6
७५ वर्षांचा नवरा अन् ३५ वर्षांची नवरी! लग्नाच्या रात्रीच पतीचा मृत्यू; गूढ उलगडलं, समोर आलं सत्य
7
१९ वर्षे शनि, १८ वर्षे राहु महादशा: शनि महादशेत राहु अंतर्दशा आली? भाग्योदय; अपार पैसा-लाभ!
8
अभिनेता विजयला सोबत घेण्याचा भाजपाचा प्रयत्न; चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर समोर आली नवीन रणनीती
9
भारत गाझामध्ये सैन्य पाठवणार? संयुक्त राष्ट्रांच्या शांती सैनिकांची परिषद बोलावली, चीन आणि पाकिस्तानला बोलावले नाही
10
Gensol Engineering Ltd: ₹२४०० वरुन ₹४१ वर आला 'हा' शेअर, आता ट्रेडिंग झालं बंद; संकटात कंपनी, तुमच्याकडे आहे का शेअर?
11
WhatsApp वापरकर्त्यांची प्रतीक्षा संपली! फक्त नंबर डायल करा आणि कॉल करा, नवीन फिचर आले
12
डोक्याला ताप! दिवसभर इन्स्टाग्रामवर रील बनवायची बायको; नवरा ओरडल्यावर मुलासह गायब
13
शुक्रवारपासून पंचक प्रारंभ: ५ दिवस अत्यंत प्रतिकूल, अशुभ; ‘या’ गोष्टी करूच नयेत, अमंगल काळ!
14
TATA Motors च्या गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी; डीमर्जरची तारीख आली समोर, एकावर १ शेअर मिळणार
15
अश्विन पाशांकुशा एकादशी २०२५: श्रीविष्णूंचे पद्मनाभ स्वरुप पूजन, ‘असे’ करा व्रत; शुभ-लाभ!
16
"बेबी, स्वीटी, तू माझ्यासोबत...!" विद्यार्थीनीसोबत एवढ्या घाणेरड्या गप्पा, समोर आलं चैतन्यानंदचं घृणास्पद चॅट
17
IMD: बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ धडकणार; ओडिशा किनारपट्टीला धोका!
18
काय आहे 'सर क्रिक' वाद? ज्यावरून भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची पाकिस्तानला थेट धमकी
19
IND vs WI : जादूगर आला अन् जादू दाखवून गेला! काही कळायच्या आत कुलदीपनं कॅरेबियन बॅटरचा खेळ केला खल्लास (VIDEO)
20
हायप्रोफाईल चोर! विमानानं दिल्लीला जायचे अन् कार चोरायचे; ५ आलिशान कारसह ८३ लाखांचा माल जप्त

‘संघाबाहेरचे सारे अहिंदूच’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2018 00:36 IST

‘जो संघात जात नाही तो हिंदू नव्हेच’ असे तेजस्वी उद्गार हैदराबादमधील भाजपचे एक आमदार टी. राजसिंह यांनी भोपाळमध्ये काढले आहे. तसे म्हणत असताना संघाचे मैदान हेच केवळ हिंदूंचे स्थान असल्याचेही त्या माणसाने सांगून टाकले आहे.

‘जो संघात जात नाही तो हिंदू नव्हेच’ असे तेजस्वी उद्गार हैदराबादमधील भाजपचे एक आमदार टी. राजसिंह यांनी भोपाळमध्ये काढले आहे. तसे म्हणत असताना संघाचे मैदान हेच केवळ हिंदूंचे स्थान असल्याचेही त्या माणसाने सांगून टाकले आहे. संघ किंवा भाजप या संघटना राजसिंहाच्या या वक्तव्यावर जोवर त्यांचे म्हणणे मांडत नाही तोवर त्यांचा स्वयंसेवक व तिकीटधारी म्हणून या संघटनांनाही त्याचे म्हणणे मान्य आहे असे म्हणावे लागेल. संघाची स्थापना १९२५ मध्ये डॉ. हेडगेवारांनी केली. नंतरची अनेक वर्षे ते स्वत: गांधीजींच्या नेतृत्वातून स्वातंत्र्यलढ्यात भाग घेत होते. राजसिंहाचे तर्कट मागे नेले तर १९२५ पूर्वी भारतात कुणी हिंदू नव्हताच या निष्कर्षावर यावे लागते. त्याच स्थितीत वैदिक ऋषिमुनी, शंकराचार्यांसह सगळे आचार्य, संत आणि छत्रपतींपासून विवेकानंदांपर्यंतचे सारेच अहिंदू ठरतात. आपण काय बोलतो आणि त्याचा परिणाम कसा होऊ शकतो याविषयीचे जराही तारतम्य व ज्ञान नसणारी अशी माणसे संघाच्या मुशीत तयार होत असतील आणि भाजप त्यांना तिकिटे देत असेल तर त्यांच्या तथाकथित सांस्कृतिक राष्ट्रवादाचे खरे स्वरूपही त्यातून उघड होते हे सर्वसंबंधितांना कळतच असणार. तरीही गेल्या तीन वर्षात अशा ‘राजसिंहा’ची संख्या देशात वाढलेली दिसली आहे. या माणसांनी सध्या जो धुमाकूळ घातला त्याची आकडेवारी आता सरकारनेच प्रकाशित केली आहे. गेल्या एक वर्षात देशात झालेल्या धार्मिक दंगलींची संख्या ८२२ एवढी होती. त्याअगोदरच्या वर्षी ती ७०३ होती. मागील वर्षी या दंगलीत १११ जण मृत्यू पावले व २३८४ जबर जखमी झाले. अगोदरच्या वर्षी ही संख्या अनुक्रमे ८६ व २३२१ एवढी होती. मोदींचे सरकार दिल्लीत सत्तारूढ झाल्यापासून अशा दंग्यांची संख्या पूर्वीच्या तुलनेत वार्षिक ३० टक्क्यांहून अधिक वाढल्याचेही आढळले आहे. ‘मोदींना मत देणार नाहीत ते सारे पाकिस्तानी’ असे म्हणून या माणसांनी सगळ्या विरोधी पक्षांवर ते पाकिस्तानी असल्याचा ठपका आधीच ठेवला आहे. पुढे ‘योगी योगी म्हणणार नाहीत त्यांना उत्तर प्रदेशात राहण्याचा हक्क नाही’ असेही या देशबुडव्यांनी त्या राज्यातील साºयांना सांगून टाकले आहे. त्याच घोषणांची निमुळती परिणती ‘संघात येत नाहीत ते हिंदू नाहीत’ या मूर्ख विधानात आता झाली आहे. २०१४ च्या निवडणुकीत मोदींच्या पक्षाला व त्याच्या आघाडीला देशात ३१ टक्के मते मिळाली. ६९ टक्के लोकांनी त्यांना मत द्यायला नकार दिला. संघाच्या या हिशेबाने ते ६९ टक्के भारतीय ‘हिंदू’ ठरत नाहीत. शिवाय ज्या ३१ टक्क्यांनी मोदींना मत दिले त्यातलेही बहुसंख्य लोक संघात जाणारे नव्हते, असे हिशेब मांडण्यात तसा अर्थ नाही कारण तो भाजप व संघ यांच्या नेत्यांनाही चांगला ठाऊक आहे. मात्र त्यांना त्यांच्यातल्या कुणीतरी असे बोलत राहायला हवे आहे. त्यानिमित्ताने नकारात्मक स्वरूपात का होईना आपली चर्चा समाजात चालू राहणे त्यांना महत्त्वाचे वाटणारे आहे. बेरजेच्या राजकारणाने बळकट होता येणार नसेल तर वजाबाकीचे राजकारण चालू करायचे अशी ही उफराटी तºहा आहे. राजसिंह हे तसेही फारसे कुणाला ठाऊक नसलेले नाव आहे. त्याच्या वक्तव्याची दखल घ्यावी एवढी त्याची पात्रता वा आवाकाही नाही. मात्र ही बिनावजनाची माणसे जेव्हा एखाद्या राजकीय पक्षाचे वा संघटनेचे प्रतिनिधी म्हणून अशी वक्तव्ये देतात तेव्हा त्याची दखल घेणे आवश्यक ठरते. या संघटनांचे व पक्षांचे दर्शनी रूप व त्यांचे दडलेले खरेपण यांचीही त्यातून समाजाला ओळख पटते. या राजसिंहासारखी माणसे ज्या संघटनांमध्ये असतात व खपतात त्यांचे दर्शनी रूप केवढे बेगडी असते याचाही साक्षात्कार मग अशावेळी होतो. अशा माणसांनी उघड केलेले त्यांचे अपुरेपण त्यांच्या संघटना एक तर झाकतात किंवा त्यांचे ते व्यक्तिगत मत आहे असे म्हणून त्याकडे दुर्लक्ष करतात. असे दुर्लक्ष करायला ज्या लोकांबाबत आजवर या परिवाराने सांगितले त्यांची संख्याही आता फार मोठी झाली आहे आणि त्यांना आवर घालण्याचा संघटनेकडून प्रयत्न होताना न दिसणे हा प्रकार त्या संघटनांविषयीच लोकांच्या मनात संशय उत्पन्न करणारा आहे.

टॅग्स :RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघBJPभाजपा