शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-अमेरिका युद्धाची शक्यता? तेहरानच्या इशाऱ्यानंतर कतारमधील अमेरिकन हवाई तळ केले रिकामे
2
अमेरिकेच्या टॅरिफ धोरणावर आज रात्री फैसला; ट्रम्प यांच्याविरोधात निकाल गेल्यास काय घडू शकतं?
3
हजारीबागमध्ये भीषण बॉम्ब ब्लास्ट, तिघांचा मृत्यू, एकजण गंभीर जखमी
4
मैत्री मैत्रीच्या ठिकाणी...! युद्धात इराणला साथ देणार नाही चीन? कारण काय?
5
धक्कादायक ! नागपुरात बाप झाला सैतान,पत्नीकडे ताबा जाऊ नये म्हणून पोटच्या मुलीची हत्या
6
"JJD हा लालूंचा खरा पक्ष"; राजद विलीनीकरणावर तेजप्रताप यांची तेजस्वींना थेट ऑफर
7
Petrol कार्सच्या तुलनेत Diesel कार्स जास्त मायलेज का देतात? जाणून घ्या यामागील विज्ञान...
8
बांगलादेशचा आडमुठेपणा! भारतात टी-२० वर्ल्डकप खेळण्यास नकार; आता आयसीसीकडे आहेत ३ पर्याय!
9
IND vs NZ : हर्षित राणानं ऑफ स्टंप उडवत डेवॉन कॉन्वेचा केला करेक्ट कार्यक्रम! गंभीरने अशी दिली दाद
10
मुस्लिमबहुल प्रभागांत रंगणार काँग्रेस-एमआयएम सामना! १३ जागांसाठी काँग्रेसची धडपड, शिंदेसेना चारही जागा राखणार?
11
डोंबिवलीत भाजपा अन् शिंदेसेनेत जोरदार राडा; ५ जणांना अटक, जखमींवर रुग्णालयात उपचार
12
Video - ई-रिक्षातील तरुणाचं अश्लील कृत्य; रणरागिणीने रस्त्यावरच घडवली चांगलीच अद्दल
13
"विना परवाना शस्त्र वाटणार, ज्याला हवं त्याने..."; योगी सरकारच्या मंत्र्याचं धक्कादायक विधान
14
भारतीय पासपोर्टला मिळाली ताकद, आता ५५ देशांमध्ये व्हिसा-मुक्त प्रवेशाची परवानगी
15
‘तातडीने इराण सोडा, मिळेल त्या वाहनाने बाहेर पडा’, भारतीय दूतावासाकडून आपल्या नागरिकांना सूचना
16
रॉकेट बनलाय हा पेनी स्टॉक, ५ दिवसांत दिला ६१% परतावा; फक्त २० रुपयांवर भाव! तुमच्याकडे आहे का?
17
भारतातील एक अनोखे मंदिर; जाणून घ्या ९९ लाख ९९ हजार ९९९ दगडी मूर्तींचे रहस्य...
18
"त्यांच्या शेवटाची वाट पाहत होता, हे स्वप्न नाही तर नमकहरामी"; अश्विनी जगतापांच्या स्टेटसने संघर्ष चव्हाट्यावर
19
Bala Nandgaonkar : "रात्र वैऱ्याची आहे, यावेळी मराठी माणूस चुकला तर..."; ठाकरेंच्या निष्ठावंताची भावुक पोस्ट
20
चोर असावा तर असा! आधी देवीची माफी मागितली, मग दागिने केले लंपास; Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

‘संघाबाहेरचे सारे अहिंदूच’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2018 00:36 IST

‘जो संघात जात नाही तो हिंदू नव्हेच’ असे तेजस्वी उद्गार हैदराबादमधील भाजपचे एक आमदार टी. राजसिंह यांनी भोपाळमध्ये काढले आहे. तसे म्हणत असताना संघाचे मैदान हेच केवळ हिंदूंचे स्थान असल्याचेही त्या माणसाने सांगून टाकले आहे.

‘जो संघात जात नाही तो हिंदू नव्हेच’ असे तेजस्वी उद्गार हैदराबादमधील भाजपचे एक आमदार टी. राजसिंह यांनी भोपाळमध्ये काढले आहे. तसे म्हणत असताना संघाचे मैदान हेच केवळ हिंदूंचे स्थान असल्याचेही त्या माणसाने सांगून टाकले आहे. संघ किंवा भाजप या संघटना राजसिंहाच्या या वक्तव्यावर जोवर त्यांचे म्हणणे मांडत नाही तोवर त्यांचा स्वयंसेवक व तिकीटधारी म्हणून या संघटनांनाही त्याचे म्हणणे मान्य आहे असे म्हणावे लागेल. संघाची स्थापना १९२५ मध्ये डॉ. हेडगेवारांनी केली. नंतरची अनेक वर्षे ते स्वत: गांधीजींच्या नेतृत्वातून स्वातंत्र्यलढ्यात भाग घेत होते. राजसिंहाचे तर्कट मागे नेले तर १९२५ पूर्वी भारतात कुणी हिंदू नव्हताच या निष्कर्षावर यावे लागते. त्याच स्थितीत वैदिक ऋषिमुनी, शंकराचार्यांसह सगळे आचार्य, संत आणि छत्रपतींपासून विवेकानंदांपर्यंतचे सारेच अहिंदू ठरतात. आपण काय बोलतो आणि त्याचा परिणाम कसा होऊ शकतो याविषयीचे जराही तारतम्य व ज्ञान नसणारी अशी माणसे संघाच्या मुशीत तयार होत असतील आणि भाजप त्यांना तिकिटे देत असेल तर त्यांच्या तथाकथित सांस्कृतिक राष्ट्रवादाचे खरे स्वरूपही त्यातून उघड होते हे सर्वसंबंधितांना कळतच असणार. तरीही गेल्या तीन वर्षात अशा ‘राजसिंहा’ची संख्या देशात वाढलेली दिसली आहे. या माणसांनी सध्या जो धुमाकूळ घातला त्याची आकडेवारी आता सरकारनेच प्रकाशित केली आहे. गेल्या एक वर्षात देशात झालेल्या धार्मिक दंगलींची संख्या ८२२ एवढी होती. त्याअगोदरच्या वर्षी ती ७०३ होती. मागील वर्षी या दंगलीत १११ जण मृत्यू पावले व २३८४ जबर जखमी झाले. अगोदरच्या वर्षी ही संख्या अनुक्रमे ८६ व २३२१ एवढी होती. मोदींचे सरकार दिल्लीत सत्तारूढ झाल्यापासून अशा दंग्यांची संख्या पूर्वीच्या तुलनेत वार्षिक ३० टक्क्यांहून अधिक वाढल्याचेही आढळले आहे. ‘मोदींना मत देणार नाहीत ते सारे पाकिस्तानी’ असे म्हणून या माणसांनी सगळ्या विरोधी पक्षांवर ते पाकिस्तानी असल्याचा ठपका आधीच ठेवला आहे. पुढे ‘योगी योगी म्हणणार नाहीत त्यांना उत्तर प्रदेशात राहण्याचा हक्क नाही’ असेही या देशबुडव्यांनी त्या राज्यातील साºयांना सांगून टाकले आहे. त्याच घोषणांची निमुळती परिणती ‘संघात येत नाहीत ते हिंदू नाहीत’ या मूर्ख विधानात आता झाली आहे. २०१४ च्या निवडणुकीत मोदींच्या पक्षाला व त्याच्या आघाडीला देशात ३१ टक्के मते मिळाली. ६९ टक्के लोकांनी त्यांना मत द्यायला नकार दिला. संघाच्या या हिशेबाने ते ६९ टक्के भारतीय ‘हिंदू’ ठरत नाहीत. शिवाय ज्या ३१ टक्क्यांनी मोदींना मत दिले त्यातलेही बहुसंख्य लोक संघात जाणारे नव्हते, असे हिशेब मांडण्यात तसा अर्थ नाही कारण तो भाजप व संघ यांच्या नेत्यांनाही चांगला ठाऊक आहे. मात्र त्यांना त्यांच्यातल्या कुणीतरी असे बोलत राहायला हवे आहे. त्यानिमित्ताने नकारात्मक स्वरूपात का होईना आपली चर्चा समाजात चालू राहणे त्यांना महत्त्वाचे वाटणारे आहे. बेरजेच्या राजकारणाने बळकट होता येणार नसेल तर वजाबाकीचे राजकारण चालू करायचे अशी ही उफराटी तºहा आहे. राजसिंह हे तसेही फारसे कुणाला ठाऊक नसलेले नाव आहे. त्याच्या वक्तव्याची दखल घ्यावी एवढी त्याची पात्रता वा आवाकाही नाही. मात्र ही बिनावजनाची माणसे जेव्हा एखाद्या राजकीय पक्षाचे वा संघटनेचे प्रतिनिधी म्हणून अशी वक्तव्ये देतात तेव्हा त्याची दखल घेणे आवश्यक ठरते. या संघटनांचे व पक्षांचे दर्शनी रूप व त्यांचे दडलेले खरेपण यांचीही त्यातून समाजाला ओळख पटते. या राजसिंहासारखी माणसे ज्या संघटनांमध्ये असतात व खपतात त्यांचे दर्शनी रूप केवढे बेगडी असते याचाही साक्षात्कार मग अशावेळी होतो. अशा माणसांनी उघड केलेले त्यांचे अपुरेपण त्यांच्या संघटना एक तर झाकतात किंवा त्यांचे ते व्यक्तिगत मत आहे असे म्हणून त्याकडे दुर्लक्ष करतात. असे दुर्लक्ष करायला ज्या लोकांबाबत आजवर या परिवाराने सांगितले त्यांची संख्याही आता फार मोठी झाली आहे आणि त्यांना आवर घालण्याचा संघटनेकडून प्रयत्न होताना न दिसणे हा प्रकार त्या संघटनांविषयीच लोकांच्या मनात संशय उत्पन्न करणारा आहे.

टॅग्स :RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघBJPभाजपा