शहरं
Join us  
Trending Stories
1
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
2
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
3
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
4
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
5
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
6
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 
7
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
8
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
9
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 
10
Agni-6 Missile : मोठी तयारी! अग्नि-६ क्षेपणास्त्र किती धोकादायक? भारत चाचणी करू शकतो, २ दिवसांचा नोटम जारी
11
पालघर: मालवाहू जहाजाची मासेमारी करणाऱ्या बोटीला धडक, चार मच्छिमार पडले समुद्रात; 15 मच्छिमारांना कुणी आणले किनाऱ्यावर?
12
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
13
कोट्यवधीची रोकड, ६.७ किलो सोनं आणि..., काँग्रेसच्या आमदाराकडे सापडलं घबाड, EDची कारवाई   
14
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
15
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
16
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
17
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
18
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
19
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
20
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!

‘संघाबाहेरचे सारे अहिंदूच’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2018 00:36 IST

‘जो संघात जात नाही तो हिंदू नव्हेच’ असे तेजस्वी उद्गार हैदराबादमधील भाजपचे एक आमदार टी. राजसिंह यांनी भोपाळमध्ये काढले आहे. तसे म्हणत असताना संघाचे मैदान हेच केवळ हिंदूंचे स्थान असल्याचेही त्या माणसाने सांगून टाकले आहे.

‘जो संघात जात नाही तो हिंदू नव्हेच’ असे तेजस्वी उद्गार हैदराबादमधील भाजपचे एक आमदार टी. राजसिंह यांनी भोपाळमध्ये काढले आहे. तसे म्हणत असताना संघाचे मैदान हेच केवळ हिंदूंचे स्थान असल्याचेही त्या माणसाने सांगून टाकले आहे. संघ किंवा भाजप या संघटना राजसिंहाच्या या वक्तव्यावर जोवर त्यांचे म्हणणे मांडत नाही तोवर त्यांचा स्वयंसेवक व तिकीटधारी म्हणून या संघटनांनाही त्याचे म्हणणे मान्य आहे असे म्हणावे लागेल. संघाची स्थापना १९२५ मध्ये डॉ. हेडगेवारांनी केली. नंतरची अनेक वर्षे ते स्वत: गांधीजींच्या नेतृत्वातून स्वातंत्र्यलढ्यात भाग घेत होते. राजसिंहाचे तर्कट मागे नेले तर १९२५ पूर्वी भारतात कुणी हिंदू नव्हताच या निष्कर्षावर यावे लागते. त्याच स्थितीत वैदिक ऋषिमुनी, शंकराचार्यांसह सगळे आचार्य, संत आणि छत्रपतींपासून विवेकानंदांपर्यंतचे सारेच अहिंदू ठरतात. आपण काय बोलतो आणि त्याचा परिणाम कसा होऊ शकतो याविषयीचे जराही तारतम्य व ज्ञान नसणारी अशी माणसे संघाच्या मुशीत तयार होत असतील आणि भाजप त्यांना तिकिटे देत असेल तर त्यांच्या तथाकथित सांस्कृतिक राष्ट्रवादाचे खरे स्वरूपही त्यातून उघड होते हे सर्वसंबंधितांना कळतच असणार. तरीही गेल्या तीन वर्षात अशा ‘राजसिंहा’ची संख्या देशात वाढलेली दिसली आहे. या माणसांनी सध्या जो धुमाकूळ घातला त्याची आकडेवारी आता सरकारनेच प्रकाशित केली आहे. गेल्या एक वर्षात देशात झालेल्या धार्मिक दंगलींची संख्या ८२२ एवढी होती. त्याअगोदरच्या वर्षी ती ७०३ होती. मागील वर्षी या दंगलीत १११ जण मृत्यू पावले व २३८४ जबर जखमी झाले. अगोदरच्या वर्षी ही संख्या अनुक्रमे ८६ व २३२१ एवढी होती. मोदींचे सरकार दिल्लीत सत्तारूढ झाल्यापासून अशा दंग्यांची संख्या पूर्वीच्या तुलनेत वार्षिक ३० टक्क्यांहून अधिक वाढल्याचेही आढळले आहे. ‘मोदींना मत देणार नाहीत ते सारे पाकिस्तानी’ असे म्हणून या माणसांनी सगळ्या विरोधी पक्षांवर ते पाकिस्तानी असल्याचा ठपका आधीच ठेवला आहे. पुढे ‘योगी योगी म्हणणार नाहीत त्यांना उत्तर प्रदेशात राहण्याचा हक्क नाही’ असेही या देशबुडव्यांनी त्या राज्यातील साºयांना सांगून टाकले आहे. त्याच घोषणांची निमुळती परिणती ‘संघात येत नाहीत ते हिंदू नाहीत’ या मूर्ख विधानात आता झाली आहे. २०१४ च्या निवडणुकीत मोदींच्या पक्षाला व त्याच्या आघाडीला देशात ३१ टक्के मते मिळाली. ६९ टक्के लोकांनी त्यांना मत द्यायला नकार दिला. संघाच्या या हिशेबाने ते ६९ टक्के भारतीय ‘हिंदू’ ठरत नाहीत. शिवाय ज्या ३१ टक्क्यांनी मोदींना मत दिले त्यातलेही बहुसंख्य लोक संघात जाणारे नव्हते, असे हिशेब मांडण्यात तसा अर्थ नाही कारण तो भाजप व संघ यांच्या नेत्यांनाही चांगला ठाऊक आहे. मात्र त्यांना त्यांच्यातल्या कुणीतरी असे बोलत राहायला हवे आहे. त्यानिमित्ताने नकारात्मक स्वरूपात का होईना आपली चर्चा समाजात चालू राहणे त्यांना महत्त्वाचे वाटणारे आहे. बेरजेच्या राजकारणाने बळकट होता येणार नसेल तर वजाबाकीचे राजकारण चालू करायचे अशी ही उफराटी तºहा आहे. राजसिंह हे तसेही फारसे कुणाला ठाऊक नसलेले नाव आहे. त्याच्या वक्तव्याची दखल घ्यावी एवढी त्याची पात्रता वा आवाकाही नाही. मात्र ही बिनावजनाची माणसे जेव्हा एखाद्या राजकीय पक्षाचे वा संघटनेचे प्रतिनिधी म्हणून अशी वक्तव्ये देतात तेव्हा त्याची दखल घेणे आवश्यक ठरते. या संघटनांचे व पक्षांचे दर्शनी रूप व त्यांचे दडलेले खरेपण यांचीही त्यातून समाजाला ओळख पटते. या राजसिंहासारखी माणसे ज्या संघटनांमध्ये असतात व खपतात त्यांचे दर्शनी रूप केवढे बेगडी असते याचाही साक्षात्कार मग अशावेळी होतो. अशा माणसांनी उघड केलेले त्यांचे अपुरेपण त्यांच्या संघटना एक तर झाकतात किंवा त्यांचे ते व्यक्तिगत मत आहे असे म्हणून त्याकडे दुर्लक्ष करतात. असे दुर्लक्ष करायला ज्या लोकांबाबत आजवर या परिवाराने सांगितले त्यांची संख्याही आता फार मोठी झाली आहे आणि त्यांना आवर घालण्याचा संघटनेकडून प्रयत्न होताना न दिसणे हा प्रकार त्या संघटनांविषयीच लोकांच्या मनात संशय उत्पन्न करणारा आहे.

टॅग्स :RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघBJPभाजपा