शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
4
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
5
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
6
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
7
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
8
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
9
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
10
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
11
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
12
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
13
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
14
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
15
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
16
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
17
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
18
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
19
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
20
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली

सर्व कामगार रुग्णालयांचे आॅडिट गरजेचे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2018 06:11 IST

अंधेरीच्या कामगार रुग्णालयातील आगीच्या दुर्घटनेत नुकताच ११ रुग्णांचा मृत्यू झाला. एका दिवसाच्या मथळ्यानंतर माध्यमे, सरकार आणि सर्वसामान्यांच्या विस्मरणात ही बातमी गेली.

- डॉ. अमोल अन्नदाते(बालरोग तज्ज्ञ)अंधेरीच्या कामगार रुग्णालयातील आगीच्या दुर्घटनेत नुकताच ११ रुग्णांचा मृत्यू झाला. एका दिवसाच्या मथळ्यानंतर माध्यमे, सरकार आणि सर्वसामान्यांच्या विस्मरणात ही बातमी गेली. यानिमित्ताने कामगार रुग्णालयांच्या ढिसाळ व्यवस्थापनाची लक्तरे वेशीवर टांगली गेली आहेत. एवढा अवाढव्य कारभार असलेली महाराष्ट्रातील अनेक कामगार रुग्णालये, तिथे कामगार रुग्णांच्या गृहीत धरल्या गेलेल्या आरोग्याकडे कोणाचेही लक्ष नाही हेही अधोरेखित झाले.ही घटना हे त्याचे प्रातिनिधिक उदाहरण ठरेल. अंधेरी रुग्णालयाच्या बांधकामाचे कंत्राट देऊन दहा वर्षे उलटली. एका साध्या इमारतीचे काम दहा वर्षे रखडतेच कसे, हा प्रश्न कोणालाही पडला नाही. यासाठी पाठपुरावा करणारे कार्यकर्तेही थकून गेले. जिथे साधी खिडकीही नाही, अशा एका छोट्या अंधाऱ्या खोलीत २०० रुग्ण तपासण्याचे काम रोज सुरू होते. आग लागली तर काय होणार याच्या चर्चा अनेकदा रुग्णालयात होत असत आणि शेवटी जे होऊ नये तेच झाले. एवढे होऊनही पाहणीसाठी आलेल्या आयुक्त पातळीवरच्या अधिकाºयांनी निर्ढावलेपणाने बाह्यरुग्ण विभाग सुरू करा, असे सांगितल्याचे आढळले. प्रशासकीय अधिकारी वर्ग दुसºया ठिकाणी वातानुकूलित कार्यालयात लगेचच हलवण्यात आला. तर डॉक्टर व पॅरामेडिकल स्टाफची रोज संध्याकाळपर्यंत खुल्या प्रांगणात बसून हजेरी घेण्यात आली. एवढी मोठी घटना घडूनही ईएसआयसीचा एकही अधिकारी निलंबित होत नाही आणि वेल्डिंगचे काम करणाºया बाहेरच्या कामगारांना अटक करून विषय संपवला जातो!कामगार रुग्णालयांच्या मुंबईतील मध्यवस्तीतील अनेक इमारती ओस पडल्या आहेत. त्यांचा ना केंद्र सरकारला उपयोग आहे ना राज्य सरकारला. अंधेरी रुग्णालयाप्रमाणे अनेक कामे ही खाजगी कंत्राटदारांना दिली आहेत व अनेक वर्षे रखडली आहेत. अनेक भागीदार असल्याने उपचारांमध्ये व कामामध्ये उत्तरदायी कोणीच नाही. मालकीचा पेच असल्याने कोणीही जबाबदारी स्वीकारण्यास तयार नाही. राज्य सरकारचा सहभाग असणाºया रुग्णालयांची अधिकच बिकट परिस्थिती आहे. राज्याकडून निधी आल्याशिवाय केंद्राकडून आलेला निधी खर्च करता येत नाही आणि राज्याच्या अर्थ खात्याकडून निधीच येत नाही. शेवटी ईएसआयसीने स्वत:ची भली मोठी यंत्रणा बाजूला सारत खाजगी रुग्णालयांना पॅनलवर घेतले. पण त्यांचीही देणी राज्य सरकारला देता आली नाहीत. याबाबत सर्वांत वाईट परिस्थिती नागपूरमध्येच आहे. नागपूरचे कामगार रुग्णालय तर देशोधडीला लागले आहे. मे २०१८ मध्ये सर्व कामगार रुग्णालयांच्या कामात समन्वय आणण्यासाठी वेगळी समिती व अधिकारी नेमण्याची घोषणा केली. पण ती हवेतच विरून गेली.रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करून घेतलेले ११ रुग्ण गुदमरून, पडून मरण पावतात आणि याबद्दल सरकारमधील कोणालाच काहीही वाटत नाही. दहा लाखांची मदत ही त्यांच्या जीवाची किंमत असू शकते का? प्रत्येक कामगाराने १.७५ टक्के पगार व कामगारांच्या वाट्यातील ३.७५ टक्के रक्कम मालकांनी या रुग्णालयांच्या निधीला दिली आहे. अशा २५ लाख कामगारांच्या पै आणि पैला हे सरकार बांधील आहे. आयुष्यभर कष्ट उपसलेल्या कामगारांची दया या सरकारला कधी येणार?इतर सरकारी आरोग्य व्यवस्थेप्रमाणे देशभरातील कामगार रुग्णालयांतीलही डॉक्टर आणि पॅरामेडिकल स्टाफची पदे रिक्त आहेत. पण इतर सरकारी खात्यांप्रमाणे असलेल्या स्टाफचे व्यवस्थापन मात्र बरेच चांगले आहे. केंद्र सरकारचा निधी असल्यामुळे डॉक्टर व पॅरामेडिकलचे पगार दांडगे आहेत. तो पगार मात्र वेळेत मिळतो. पण उपचारांसाठी आवश्यक असलेले रुग्णालयामधील व्यवस्थापनाचे वैद्यकीय तंत्रज्ञान ढिसाळ आहे. सर्व प्रमुख निर्णय हे दिल्लीत होत असल्याने बºयाचदा निधीची गरज ही वरपर्यंत लवकर पोहोचतच नाही.काळाच्या ओघात कामगारांच्या हक्कासाठी लढणाºया संघटना, चळवळी इतिहासजमा झाल्या; पण कामगारांना आरोग्याचा हक्क मिळवून देणारी व कामगार रुग्णालयांच्या परिस्थितीत सुधारणा करायला भाग पाडणारी एखादी चळवळ आज खूप गरजेची आहे. ही संपूर्ण आरोग्य व्यवस्था कामगारांनी भरलेल्या व सरकारनेही योगदान दिलेल्या विम्याच्या पैशावर आधारित असल्याने भरलेल्या पैशाचा परतावा मिळणे व जास्तीतजास्त रुग्णांना विम्याचा फायदा मिळणे अपेक्षित आहे. विम्यासाठी भरलेल्या पैशाचा परतावा हा क्लेम इन्कर्ड रेशोमध्ये मोजला जातो. कामगार रुग्णालयाचा क्लेम इन्कर्ड रेशो चिंताजनक आहे. सध्या आगीत सापडलेले अंधेरीचे रुग्णालय राज्यातील सर्व रुग्णालयांत मॉडेल रुग्णालय करण्याचे ठरले होते. त्याचीच अशी दयनीय स्थिती असेल तर बाकी रुग्णालयांच्या आॅडिटमध्ये भयानक गोष्टी समोर येतील. असे आॅडिट सरकारी समितीकडून न करता त्रयस्थ समितीकडून होणे गरजेचे आहे.

टॅग्स :Andheriअंधेरी