शहरं
Join us  
Trending Stories
1
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
2
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
3
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
4
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
5
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
6
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
7
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
8
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
9
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
10
डेटिंग अ‍ॅपवरून सुंदर तरुणी कॅफेत भेटायला आली, १२००० रुपयांचे बिल केले आणि पळून गेली... तरुण बिचारा...
11
एअर इंडियाच्या आणखी एका विमानाला बॉम्बची धमकी; सौदी अरेबियात आपत्कालीन लँडिंग
12
आता पैसे नसल्यामुळे शिक्षण थांबणार नाही; 'या' योजनेद्वारे घरबसल्या मिळेल बिनव्याजी कर्ज...
13
DSP सिराजनं बेन स्टोक्सला केलं 'अरेस्ट'! विकेट गमावल्यावर कॅप्टननं हवेत भिरकावली बॅट (VIDEO)
14
आता डिप्लोमसीला काहीच अर्थ राहिला नाही; इस्रायलने हल्ला केला तेव्हाच..., इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा युरोपवर आरोप
15
"लवकरात लवकर शांतता निर्माण करण्याची गरज"; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर PM मोदींची इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा
16
आम्ही या ठिकाणांवर हल्ला करतोय...! अमेरिकेने एक दिवस आधीच इराणला दिलेली कल्पना...
17
इराणवरील अमेरिकेच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?
18
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: ‘हे’ प्रभावी शिव मंत्र म्हणा, भाग्याची साथ मिळेल; लाभच लाभ होतील!
19
BCCI New Rules For IPL Celebration : बंगळुरुमधील 'त्या' दुर्घटनेनंतर आता BCCI नं घेतला मोठा निर्णय
20
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: पितृदोषातून दिलासा, शिवपूजेसह ‘या’ गोष्टी करून पाहा, चांगले घडेल!

आखुडशिंगी, बहुदुधी- नवीन शैक्षणिक धोरण 2020

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2020 02:25 IST

अशी पिढी तयार करायची जबाबदारी सगळ्या समाजाची की फक्त शिक्षण संस्थांची? नव्या तोंडाने जुनी वाफ दवडल्याने हे कसे काय साधले जाणार?

सामाजिकदृष्ट्या जागरूक असलेली, बंधुता, स्वातंत्र्य आणि सर्वांसाठी न्याय या मानवी मूल्यांवर विश्वास असलेली युवा पिढी निर्माण करणे हे उच्च शैक्षणिक धोरणाचे उद्दिष्ट म्हणून या नव्या धोरणात पुन्हा अधोरेखित करण्यात आले आहे. भारतातील शिक्षण व्यवस्था दर्जेदार असावी आणि त्यामधून सर्वगुणसंपन्न विचारांनी समृद्ध, सर्जनशील युवापिढी घडावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. बहुदुधी आणि आखुडशिंगी पिढ्या निर्माण करण्याचे प्रकरण देशात फार पूर्वीपासून फार जोरात सुरू आहे. मात्र, हे काम फक्त एकटी शिक्षण व्यवस्था कशी काय करू शकते, याचा विचार मात्र इतक्या वर्षांत एकाही धोरणात झालेला दिसत नाही.

व्यक्ती समाजात वावरतात आणि या समाजात वावरताना त्याला चांगले-वाईट अनेक अनुभव येत असतात. त्यातूनच त्यांची जीवनधारणा आणि पद्धती तयार होत असते. समाजात न्याय नसेल, बळी तो कान पिळी अशा प्रकारचे राज्य असेल, पैसे देऊन नोकऱ्या मिळत असतील, जातिधर्माचे विष पेरून हाती सत्ता लागत असेल तर केवळ महाविद्यालयांतून आणि विद्यापीठांतून शिक्षण मिळवून वर उद्दिष्टात नमूद केलेली युवापिढी घडविणे अशक्यच आहे. हे या शिक्षण धोरणाचा मसुदा तयार करणाºया तज्ज्ञांना माहीत नाही असे नाही. मात्र, धोरणाच्या पहिल्या परिच्छेदात या मूल्यांना तोंडपूजेकरिता का होईना नमूद करायचेच हेही यांना माहीत आहे.यानंतर धोरणात भारतीय उच्च शिक्षणातील कमकुवत दुवे मांडण्यात आलेले आहेत. हे दहा मुद्दे म्हणजे कोणताही पाच वर्षे अनुभव असलेला होतकरू प्राध्यापक किंवा हुशार विद्यार्थीही मुत्सद्दीपणे मांडू शकेल, अशा स्वरूपाचे आहेत. भारतीय विद्यापीठांत संशोधनाला कमी महत्त्व दिले जाते, हे सांगायला आम्हाला हार्वर्ड विद्यापीठातून मंजुळ भार्गव लागतील का? भारतातील विद्यापीठांकडे त्यांना न पेलविणाºया महाविद्यालयांची संख्या आहे, ही गेली कित्येक वर्षे स्पष्ट दिसणारी गोष्ट आहे. अर्थात प्रश्न, समस्या सगळ्यांना माहीत आहेत! धोरणात अपेक्षा होती ती त्यावरील उत्तरांची आणि मार्गांची. विद्यापीठातून संशोधनावर कमी भर दिला जात आहे तर का? आणि किती? त्याचे निकष काय? कोणत्या प्रकारच्या संशोधनाला भारताने प्राधान्य द्यायला हवे आणि का? याची स्पष्ट उत्तरे धोरणात अपेक्षित होती. मात्र, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०च्या निमित्ताने या अपेक्षा फोल ठरल्या आहेत.

धोरणात विद्यापीठातून कला, वाणिज्य, विज्ञान शाखांचे विलगीकरण न करता आंतरविद्याशाखीय शिक्षण घेता येईल, असे सांगण्यात आले आहे. मात्र, इतकी मोठी विद्यार्थिसंख्या असलेल्या विद्यापीठांत हे राबवायचे कसे, त्याचे वेळापत्रक, परीक्षांचे नियोजन व नियमन कसे करायचे, याचा काहीच आराखडा धोरणात स्पष्ट करण्यात आला नाही. सध्याच्या परिस्थितीत परीक्षा घ्यायच्या की नाही, यावरूनच घाम फुटला आहे. ही गुंतागुंतीची व्यवस्था राबविण्यासाठी मनुष्यबळ आणि संसाधनांची वानवा आहे. मग हे आंतरविद्याशाखीय शिक्षणाचे दिवास्वप्न सत्यात आणणार कसे, हा प्रश्न अनुत्तरितच आहे. नवीन संसाधनांसाठी पैसे लागतात, ते मिळत नाहीत. मनुष्यबळ अपुरे पडते. इतकेच काय शिक्षकांच्या जागाही भरल्या जात नाहीत. मग नवीन तज्ज्ञांनी जुनीच मात्रा उगाळून दिल्याने ती काही अमलात येईलच असे नाही. अव्यवहार्य संकल्पना नव्या पद्धतीने मांडल्यावर त्या नवीन होत नाहीत, हे नवीन तज्ज्ञांना कळलेले नाही.सर्व विद्यापीठांसाठी अभ्यासक्रमाची एकच चौकट करायची आहे. या चौकटीच्या आत विद्यापीठांना आपापले अभ्यासक्रम बसवायचे आहेत. विद्यार्थ्यांना भारतीय संस्कृतीप्रमाणे ६४ कलांमध्ये पारंगत करायचे आहे. मात्र, ही चौकट कोण ठरविणार? आपल्या देशात जुन्या आध्यात्मिक गोष्टींना जपणारी मंडळी अनेक ठिकाणी सत्तेवर आहेत. अशांना या चौकटी ठरवायची परवानगी देणार का? बहुपदरी आणि गुंतागुंतीच्या भारतीय समाजाला सामावून, कोणावरही अन्याय होऊ देणार नाही, अशी चौकट कोणी निर्माण करू शकणार असेल, तर गोष्ट वेगळी आहे. त्यामुळे नाही म्हटले तरी ही बाब धोकादायक ठरू शकते.महाविद्यालये आणि विद्यापीठे किंवा शिक्षण संस्थांच्या मूळ प्रश्नांना हात घालायचा सोडून हवेतील इमले बांधले तर काहीच हाती येणार नाही. शिक्षणासाठी सहा टक्के जीडीपी खर्च व्हावा ही सूचना कोठारी आयोगापासूनची आहे; मात्र अद्याप ती पूर्ण झालेली नाही. ते का होऊ शकले नाही? या मागच्या कारणांचा व्यवस्थेने शोध घेणे आवश्यक आहे. त्यामुळे नवीन शैक्षणिक धोरण म्हणजे नवीन तोंडातून आलेली जुनीच वाफ आहे, असे म्हणावे लागेल.प्रा. नीरज हातेकरअर्थशास्त्र विभाग, मुंबई विद्यापीठ

 

टॅग्स :Educationशिक्षणEducation Sectorशिक्षण क्षेत्र