शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

अग्रलेख-द पाकिस्तान स्टोरी !

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2023 07:52 IST

पाकिस्तानात ज्या घडामोडीची अनेक दिवसांपासून अपेक्षा होती, ती माजी पंतप्रधान इम्रान खान यांची अटक अखेर मंगळवारी झालीच!

पाकिस्तानात ज्या घडामोडीची अनेक दिवसांपासून अपेक्षा होती, ती माजी पंतप्रधान इम्रान खान यांची अटक अखेर मंगळवारी झालीच! गत अनेक दिवसांपासून निवासस्थानी व न्यायालयाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात समर्थक गोळा करून, इम्रान खान अटक टाळत आले होते; पण ती कधीतरी अपेक्षित होतीच! त्यांना ज्या प्रकारे अटक करण्यात आली, ते मात्र सुसंस्कृत जगासाठी अनपेक्षित होते. इम्रान खान यांच्या विरोधात अनेक गुन्हे दाखल आहेत. अशाच एका प्रकरणात ते न्यायालयात उपस्थित झाले असताना, पाकिस्तानी रेंजर्स या निमलष्करी दलाचे जवान चक्क न्यायालयाच्या इमारतीच्या खिडकीची काच फोडून आत शिरले आणि त्यांना अटक केली. एवढेच नव्हे तर रेंजर्स त्यांना चक्क धक्काबुक्की करीत, गळा पकडून घेऊन गेले. राजकीय नेत्यांना, माजी सत्ताधाऱ्यांना अटक होणे तसे नवे नाही. जगभर अनेकदा असे झाले आहे; पण ते करताना किमान कायदेशीर प्रक्रियेचे पालन केले जाते. इम्रान खान यांना अटक करताना मात्र तमाम स्थापित प्रक्रिया धाब्यावर बसविण्यात आल्या, हे दूरचित्रवाणी वाहिन्यांवरून बघायला मिळाले.

मुळात एखाद्या आरोपीला पोलिसांऐवजी निमलष्करी दलांनी अटक करणे, हेच अनाकलनीय आहे. इम्रान खान न्यायालयातील प्रक्रिया पूर्ण करून बाहेर पडल्यावरही त्यांना अटक करता आली असती. मंगळवारी न्यायालयाच्या परिसरात इम्रान खान यांचे समर्थक खूप मोठ्या संख्येने उपस्थित होते, असेही नाही. त्यामुळे इम्रान खान यांना नाट्यमय रीतीने अटक करून सत्ताधारी, सेना व गुप्तचर संस्था आयएसआयला एक संदेश द्यायचा होता, असे दिसते. इम्रान खान सत्तेत असताना, त्यांचे सेना आणि आयएसआयसोबत चांगलेच गूळपीठ होते; परंतु सत्तेतून पायउतार झाल्यापासून ते सेना व आयएसआयलाच धारेवर धरत होते. इम्रान खान पंतप्रधान असताना, विद्यमान पंतप्रधान शाहबाज शरीफ, त्यांचे बंधू व माजी पंतप्रधान नवाज शरीफ, नवाज शरीफ यांची कन्या मरियम शरीफ, सत्ताधारी युतीतील प्रमुख पक्ष असलेल्या पाकिस्तान पीपल्स पार्टीचे नेते आसिफ झरदारी या सगळ्यांना अटक झाली होती. त्यामुळे इम्रान खान यांनाही कधी ना कधी अटक होणे अपरिहार्य होतेच! पाकिस्तानचा इतिहासच त्याची साक्ष देतो. सत्तेतून पायउतार झाल्यावर झुल्फिकार अली भुट्टो यांना फासावर लटकविण्यात आले, तर नवाज शरीफ व परवेज मुशर्रफ यांना देशातून परागंदा व्हावे लागले, हा पाकिस्तानचा इतिहास आहे. अन्य एक लष्करशहा झिया उल हक पदासीन असताना विमान अपघातात झालेला त्यांचा मृत्यूही संशयास्पदच आहे.

त्यामुळेच आता जिवाचे बरेवाईट होण्याची भीती इम्रान खान यांनाही वाटत आहे. तसे त्यांनी अनेकदा बोलूनही दाखविले आहे. त्या भीतीपोटीच त्यांनी आजवर प्रत्येक वेळी स्वत:च्या निवासस्थानी आणि न्यायालयाच्या परिसरात समर्थकांना मोठ्या प्रमाणात गोळा केले. वातावरण चिघळण्याच्या भीतीने पोलिसांनी त्यांना अटक करण्याचे टाळले आणि न्यायाधीशांनीही ते न्यायालय कक्षात उपस्थित नसतानाही त्यांना जामीन मंजूर केले. बहुधा त्यामुळेच त्यांना धडा शिकविण्यासाठी जिद्दीला पेटलेल्या सत्ताधारी, सेना व आयएसआयने मंगळवारी इम्रान खान यांचे फार समर्थक न्यायालय परिसरात उपस्थित नसल्याचे बघून, न्यायालयाची बेअदबी होण्याचीही तमा न बाळगता, निमलष्करी दलाकरवी त्यांना अटक केलीच! सत्ताधाऱ्यांना जे करायचे होते, ते तर त्यांनी केले; पण त्यासाठी जो मार्ग पत्करण्यात आला, त्यामुळे न्यायालयाने कडक ताशेरे ओढले आहेत; तर दुसरीकडे, इम्रान खान यांच्या पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ या पक्षाने उग्र निदर्शने सुरू केली आहेत. इम्रान खान हे तसे लोकप्रिय नेते आहेत. त्यांच्या आवाहनावर लाखो समर्थक रस्त्यावर उतरत असत; पण आता त्यांच्या अनुपस्थितीत पक्षाचे दुसऱ्या फळीतील नेतृत्व समर्थकांना कितपत प्रेरित करू शकेल, या संदर्भात शंकाच आहे. इम्रान खान यांना लवकर जामीन मिळू शकला नाही आणि समर्थकांचा प्रारंभीचा उत्साह कालौघात ओसरला, तर इम्रान खान यांना कदाचित बराच काळ गजाआड घालवावा लागेल. सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न तोच असणार आहे. तसे झाल्यास त्यांच्या पक्षापुढे अस्तित्वाचेच संकट उभे ठाकण्याची शक्यता नाकारता येत नाही. अभूतपूर्व आर्थिक संकटामुळे आधीच अराजकतेच्या वाटेवर निघालेल्या पाकिस्तानची स्टोरी यापुढे कशी उलगडत जाते, हे आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या अभ्यासकांसाठी औत्सुक्याचे ठरणार, हे मात्र निश्चित!