शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

अग्रलेख: पैसे नको, पाणी द्या !

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2023 07:06 IST

जगायचं की मरायचं, असे दोनच पर्याय समोर असतील तर आपण  साहजिकच पहिला पर्याय निवडू.

जगायचं की मरायचं, असे दोनच पर्याय समोर असतील तर आपण  साहजिकच पहिला पर्याय निवडू. मग तरीही काहीजण दुसरा पर्याय का निवडतात? अध्यात्मापासून विज्ञानापर्यंत याबाबतची कारणमिमांसा निराळी असू शकते. मृत्यू ही बाब कितीही अटळ असली तरी ती कोणाच्या स्वप्नातही असू शकत नाही. तरीदेखील काहीजण मृत्यूला का कवटाळतात? या ‘का’ची कारणे, खुलासे आणि स्पष्टीकरणे अनेक असू शकतात. म्हणूनच, मराठवाड्यातील लाखभर शेतकऱ्यांच्या मनाचा तळ खंगाळल्यानंतर  समोर आलेले वास्तव हादरवून टाकणारे आहे. अस्मानी आणि सुलतानी संकटांचा सामना करता-करता झालेल्या दमकोंडीतून, आर्थिक आणि मानसिक विवंचनेतून जगणे असह्य झालेल्या आणि सरकारी उपाययोजनांपेक्षा दोरखंडाचा गळफास जवळ करणाऱ्यांच्या पुढे आपण कोणता सशक्त पर्याय देऊ शकतो? मराठवाड्यातील वाढत्या शेतकरी आत्महत्येतून हाच प्रश्न निर्माण होतो. दहा लाख कुटुंबातील लाखभर कर्त्यापुरुषांना म्हणजेच, शेतकऱ्यांच्या मनात आत्महत्येचे विचार येत असतील तर हे केवळ त्या कुटुंबाचे नव्हे तर समाजाचे आणि अर्थातच धोरणकर्त्या शासनाचेदेखील अपयश मानायला हवे. राज्य स्थापनेनंतरच्या गेल्या ६३ वर्षांत जवळपास पंधरा वर्ष मराठवाड्याकडे मुख्यमंत्रिपद होते. आठ जिल्ह्यांच्या या कोरडवाहू प्रदेशात साठांहून अधिक साखर कारखाने आहेत. ऊस, सोयाबीन, मका आणि कापूस यांसारख्या नगदी पिकाखाली सर्वाधिक क्षेत्र असताना या भागात शेतकरी आत्महत्येचा टक्का अधिक का? 

कर्जमाफी, अनुदाने आणि सामूहिक समुपदेशन यासारख्या उपाययोजनांच्या माध्यमातून आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलू इच्छुकांची संख्या कमी करण्याचे प्रामाणिक प्रयत्न झालेच नाहीत असे नाही. किंबहुना, ज्यांनी जे-जे सुचविले ते-ते करून झाले तरी या मानसिक विकृतीवर अक्सीर इलाज सापडला नाही तो नाहीच ! शासनाच्या महसूल यंत्रणेने केलेल्या दहा लाख कुटुंबांच्या सर्वेक्षणातून समोर आलेले वास्तव नुसते धक्कादायकच नव्हे तर आजवर केल्या गेलेल्या सर्व उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे आहे. सततची नापिकी, कर्जबाजारीपण, नैसर्गिक आपत्ती आणि त्यातून निर्माण होणाऱ्या आर्थिक विवंचनेतून आत्महत्येचा मार्ग शोधू पाहणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या पाहिली तर कोणत्याही संवेदनशील माणसाची झोप उडू शकते. मग अशा परिस्थितीतून मार्ग काढायचा तरी कसा? असा प्रश्न धोरणकर्ते आणि सरकारी यंत्रणेपुढे उभा ठाकू शकतो. पण एखादा रोग कितीही दुर्धर असला तरी त्यावर मात करणारा इलाज शोधला जातोच. म्हणूनच, शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी शेजारच्या तेलंगणात योजण्यात आलेल्या उपायांची मात्रा लागू केली तर इथल्या शेतकऱ्यांची मानसिकता सदृढ होऊ शकते, अशा स्वरूपाचा ‘प्रिस्क्रिप्शन’वजा उपाय सुचविण्यात आला आहे. तो असा की, सर्व प्रकारची अनुदाने बंद करून जर पेरणीपूर्व हंगामात शेतकऱ्यांना प्रति एकरी वीस हजार रुपये अनुदान दिले तर शेतकरी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलणार नाहीत. पण हा उपाय म्हणजे एखाद्या वेदनाशामक औषधाने (स्टेराॅइड) दुर्धर रोगावर इलाज करण्यासारखे आहे. मराठवाड्यातील ८८ टक्के जनता शेतीवर अवलंबून आहे.

 सिंचन आयोगाच्या शिफारशीनुसार हेक्टरभर क्षेत्र सिंचनाखाली आणायचे असेल तर किमान तीन हजार घनमीटर पाण्याची आवश्यकता असते. मराठवाड्यात तर ७,१५४ दशलक्ष घनमीटर पाण्याची तूट ! ही तूट भरून काढायची असेल तर कृष्णा खोरे, विदर्भ आणि पश्चिम वाहिनी नद्यांमधून किमाण २३० अब्ज घनफूट पाणी स्थलांतरित करावे लागेल. विशेषतः दमण, पारगंगासारख्या नदीजोड प्रकल्पातून पाणी आणावे लागेल. त्यासाठी किमान ४० हजार कोटींहून अधिक निधी लागेल. जोवर मराठवाड्यातील शेती सिंचनाखाली येत नाही, तोवर सगळे तात्कालिक उपाय कुचकामीच ठरतील. शेती असो की शेतकरी, पाण्याशिवाय तरणोपाय नाही हेच खरे ! कितीही अनुदाने द्या अथवा देऊ नका, पाणी नसेल तर जगणे असह्य होणारच. म्हणतात ना, रोग म्हशीला असेल तर इलाज पखालीला करून काय फायदा? म्हणूनच, लाखभर शेतकऱ्यांच्या मनात आत्महत्येचे विचार येत असतील तर त्यावर वरवरचा औषधोपचार करण्याऐवजी ही मानसिक ‘बिमारी’ समूळ नष्ट करण्यासाठी दीर्घकालिक; परंतु अक्सीर इलाज शोधावा लागेल. आर्थिक आणि ओलिताचा अनुशेष भरून काढण्याखेरीज दुसरा उपाय असू शकत नाही.

टॅग्स :Farmerशेतकरी