शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

गुंतूनी गुंत्यात साऱ्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2025 07:09 IST

देशाचे ५२ वे सरन्यायाधीश भूषण गवई यांचा तीन दिवसांचा महाराष्ट्र दाैरा नुकताच आटोपला. मोकळ्या स्वभावाचे, बोलके, सहजपणे लोकांमध्ये मिसळणारे, मित्रमंडळीत हास्यविनोदात रमणारे लोकांचे न्यायाधीश अशी न्या. गवई यांची प्रतिमा आहे.

देशाचे ५२ वे सरन्यायाधीश भूषण गवई यांचा तीन दिवसांचा महाराष्ट्र दाैरा नुकताच आटोपला. मोकळ्या स्वभावाचे, बोलके, सहजपणे लोकांमध्ये मिसळणारे, मित्रमंडळीत हास्यविनोदात रमणारे लोकांचे न्यायाधीश अशी न्या. गवई यांची प्रतिमा आहे. त्यानुसारच ते सर्वत्र वावरले. अमरावतीत घरच्या लोकांनी केलेल्या सत्कारात, तसेच नागपुरातही एका कार्यक्रमात ते दिवंगत दादासाहेब गवई यांच्या आठवणींनी गहिवरले. ‘आपल्याला वास्तुविशारद व्हायचे होते; परंतु वडिलांची इच्छा आपण वकील व्हावे, अशी होती. कारण, त्यांची ती इच्छा स्वातंत्र्यलढ्यामुळे पूर्ण झाली नव्हती. त्यानुसार आपण केवळ वकीलच नव्हे तर त्यांच्याच इच्छेनुसार न्यायाधीशही झालो’, असे सांगताना त्यांचे डोळे पाणावले.

आपण सरन्यायाधीश झाल्याचे पाहायला वडील नाहीत, ही वेदना व्यक्त करतानाच त्यांनी मातोश्री कमलताई गवई यांनी जडणघडणीसाठी खाल्लेल्या खस्तांचा कृतज्ञ उल्लेख केला. सरन्यायाधीशांचा हा विदर्भ, मराठवाड्यातील पहिला दाैरा असल्यामुळे एकूणच न्यायव्यवस्था, समाज आणि पंचाहत्तरी साजरी करणाऱ्या भारतीय प्रजासत्ताकाने दिलेल्या घटनात्मक मूल्यांबद्दल ते काय बोलतात, याकडे सर्वांचे लक्ष होते आणि त्यांनी अजिबात निराश केले नाही. त्यांनी देशाच्या सर्व प्रकारच्या स्थैर्याचे श्रेय राज्यघटनेला दिले. त्याचप्रमाणे घटनाकार डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या एक देश, एक संविधान या विचारांच्या प्रेरणेतूनच आपण ज्याचे सदस्य होतो त्या पाच सदस्यीय घटनापीठाने काश्मीरशी संबंधित ३७० कलम हटविण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका फेटाळल्याचे सांगितले.

हा बऱ्यापैकी राजकारणाचा विषय असल्याने आणि सर्वोच्च न्यायालयाचा तो निर्णय आधीच येऊन गेलेला असल्याने यातील बाबासाहेबांची प्रेरणा एवढाच मुद्दा न्या. गवई यांच्या विधानातून उचलायचा. छत्रपती संभाजीनगर येथे बोलताना न्या. भूषण गवई यांनी एका व्यापक मुद्द्याला हात घातला. न्यायाधीशांनी आपल्या कक्षात बसून समोर येणाऱ्या साक्षी-पुराव्याच्या आधारे न्यायदान करण्यापेक्षा त्यांनी अधिक सामाजिक बनण्याची, लोकांमध्ये मिसळण्याची आणि जनतेमधील विविध वैचारिक, सामाजिक व सांस्कृतिक प्रवाह समजून घेण्याची गरज आहे, असा त्यांनी मांडलेल्या मुद्द्याचा एकंदरित आशय आहे. हे थोडे चाकोरीबाहेरचे आहे. प्रचलित संकेत असा की, पक्षपात, भेदभावाविना न्यायासाठी न्यायदान करणाऱ्यांनी थेट जनतेत मिसळू नये. न्यायाधीशांची निष्पक्षता ही न्यायव्यवस्थेचा पाया आहे. जनतेत जास्त मिसळल्याने त्यांच्यावर सामाजिक दबाव किंवा प्रभाव पडण्याची शक्यता वाढते. त्यामुळे त्यांच्या निष्पक्षतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाऊ शकते. म्हणून न्यायाधीशांनी सामाजिक गटांपासून काहीसे अलिप्त राहायला हवे. जेणेकरून त्यांचे निर्णय पक्षपातमुक्त राहतील. न्यायदेवतेच्या डोळ्यावर यासाठी पट्टी असते.

अर्थात, हे प्रतीक पाश्चात्त्य. इजिप्त, रोमन व ग्रीक संस्कृतीमधून ते आपल्याकडे आले. वर्षभरापूर्वी त्यात सांकेतिक बदल झाला. तत्कालीन सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी सर्वोच्च न्यायालयातील त्या देवतेच्या डोळ्यांवरील पट्टी हटविली, तिच्या हातात तलवारीऐवजी राज्यघटना दिली. या बदलाला भारतीय संदर्भ आहेत. न्याय निष्पक्ष असावाच, तथापि सांस्कृतिक व सामाजिक विविधतेच्या भारतात तो समता आणि संवैधानिक मूल्यांवर आधारित असावा, या अपेक्षेनुसार न्या. चंद्रचूड यांनी हा बदल केला. न्या. भूषण गवई त्यापुढे जाऊ इच्छितात. ते ज्या दुबळ्या समाजातून आले आहेत त्यांच्या किंवा इतर आकांक्षी वर्गाच्या आशा-आकांक्षा हस्तीदंती मनोऱ्यात बसणाऱ्यांना समजणार नाहीत. शिवाय, अलीकडे अनुसूचित जाती व जमातीच्या उपवर्गीकरणासारखे न्यायालयांपुढे निवाड्यासाठी येणारे विषय सामाजिक व सांस्कृतिकदृष्ट्या अधिक संवेदनशील असतात. असे विषय हाताळताना न्यायासन अधिक संवेदनशील असायला हवे आणि ही संवेदनशीलता, तळागाळातील वास्तवाचे भान केवळ आणि केवळ समाजात मिसळल्यानेच येऊ शकते. न्यायाधीशांनी समाजात मिसळण्याने ते अधिक मानवीय विचार करू लागतील, त्यांचे निर्णय अधिक संवेदनशील व व्यावहारिक होऊ शकतील. या साऱ्यामुळे न्यायव्यवस्थेवरील लोकांचा विश्वास वाढेल. सरन्यायाधीशांचा हा दृष्टिकोन नवा आणि स्वागतार्ह आहे. अट एकच, निष्पक्षता, निस्पृहता टिकविण्यासाठी या वाटेवर चालणाऱ्यांनी कवी सुरेश भट यांच्या ‘गुंतूनी गुंत्यात साऱ्या, पाय माझा मोकळा’ या ओळी सतत आठवत राहायच्या.