शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
3
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
4
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
5
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
6
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
7
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
8
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
9
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
10
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
11
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
12
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
13
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
14
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
15
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
16
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
17
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
18
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
19
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
20
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
Daily Top 2Weekly Top 5

पुन: राज्यावर पाण्याचे संकट

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2018 05:52 IST

छोटे बंधारे पुरेसे नाहीत, मोठी धरणे पूर्ण होत नाहीत आणि जलशिवारातले पाणी फेब्रुवारी अखेरपर्यंत राहील की नाही याची चिंता शेतकºयांना आत्ताच भेडसावू लागली आहे. समृद्धीचे नियोजन करताना त्यात पाणी व सिंचन या क्षेत्रांना अग्रक्रम देणे गरजेचे आहे.

आपल्या हवामान खात्याचा अंदाज नित्याप्रमाणे चुकला आहे. त्याने वर्तविलेल्या अंदाजाहून देशात ६ टक्के पाऊस कमी पडला आहे. त्याचे परिणाम सारा देशच आज अनुभवत आहे. वेगवेगळ्या राज्यांना तीव्र पाणीटंचाईची झळ बसत असल्याच्या बातम्या येऊ लागल्या आहेत. एकट्या महाराष्ट्राच्या विदर्भ विभागात ५४ तालुक्यांत दुष्काळ असल्याचे जाणवले असून यापुढेही अनेक तालुके व जिल्हे दुष्काळाच्या छायेखाली येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

गेल्या २० वर्षांत महाराष्ट्र सरकारने पाण्याच्या संकटावर मात करण्यासाठी काही लक्ष कोटी रुपये खर्च केले आहेत. त्यातली काही धरणे अर्ध्यावर राहिली तर काहींचे कालवे पूर्ण व्हायचे राहिले. शिवाय या योजनांत प्रचंड भ्रष्टाचारही झाला. ७८ हजार कोटी रुपये खर्च झाल्यानंतरही जास्तीची एक इंच जमीन ओलीताखाली येऊ शकली नाही हा सरकारचा अहवाल या सगळ्यात असलेल्या व राहिलेल्या भ्रष्टाचाराचा राक्षस केवढा मोठा आहे ते सांगणारा आहे. काही दिवसांपूर्वी देशाचे एक ज्येष्ठ मंत्री नितीन गडकरी म्हणाले, ‘शेतकऱ्यांनी सरकार व पाऊस यावर कधी अवलंबून राहू नये’ नेमकी तीच स्थिती आता देश व आपण अनुभवत आहोत. ज्या राज्यांनी पावसाचे व सिंचाईचे नियोजन काळजीपूर्वक केले व अंमलात आणले त्या राज्यात आजही हिरवळ आहे व पाण्याची सुबत्ता आहे. ज्या लोकांनी नुकताच तेलंगणाचा दौरा केला त्यांना त्या राज्याची या क्षेत्रातील श्रीमंती अनुभवता व पाहता आली असेल. निर्मलकडून हैदराबादकडे जाताना व सिद्धी पेठकडून महाराष्ट्राकडे परत येत असताना रस्त्याच्या दुतर्फा पाण्याने तुडुंब भरलेले तलाव, लहान बंधारे, मोठी धरणे आणि त्या बळावर उभी राहिलेली हिरवीगार शेते त्यांना पाहता आली असणार. एकेकाळी दगडांवर दगड ठेवून रचल्यासारखे पाषाणाचे पहाडही आता हिरवाईने झाकल्याचे तेथे दिसू लागले आहेत. पाण्याची टंचाई एकट्या हैदराबादेतच तेवढी आहे. बाकीचे राज्य पाण्याने हिरवेगार झाले आहे. आपल्याकडे एकेकाळी खणलेल्या विंधनविहिरी आता तशाच राहिल्या आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी गावोगाव जाऊन जलयुक्त शिवारांची कामे उभारली. त्यासाठी लोकांना व प्रशासनाला कामी लावले. त्याच्या यशाचे कौतुकही अनेकांनी केले. पण पाण्याची मागणीच एवढी मोठी की ती अशा उपायांनी पूर्ण व्हायची नाही. नव्या योजना उभारताना जुन्यांच्या पूर्तीकडे लक्ष नाही. ही स्थिती राज्याला पुन: एकवार पाणीटंचाईच्या दिशेने नेईल यात शंका नाही. वरचे पाणी कमी झाले की लोक जमिनीखालचे पाणी उपसतात. पण जमिनीखालचे पाणीही आता किती फूट खाली गेले आहे याचा आकडा भीतीदायक आहे.

जलभरणाच्या योजना कागदावरच राहतात, त्यातून ही स्थिती उत्पन्न होते. नळयोजनांवर खर्च होतो. त्याचा करही भरमसाट घेतला जातो. पण लोकांचा नळावर विश्वास नाही ही गोष्ट घरोघरी ऐकायला मिळणारी आहे. ज्या राज्यात नद्यांचे नाले झाले आणि नाल्याही कोरड्या पडल्या तेथे मुबलक पाणी स्वप्नासारखे होणार आहे. अगदी नाग या राज्याच्या उपराजधानीजवळच्या नद्यांचे आताचे भाकडपण साºयांना पाहता येणारे आहे. आगावू नियोजनशून्यता, प्रशासनाचे दुर्लक्ष व प्रशासनातला भ्रष्टाचार या गोष्टी जोवर जात नाहीत तोवर पाण्याचा पुरवठा सुरळीत व्हायचा नाही. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकट्याने राज्यभर भटकून चालणार नाही. सिंचन विभाग, त्याचे मंत्री, अधिकारी व जिल्हास्तरावरील अधिकारी यांची बैठक बोलावून त्यातील संबंधितांच्या जबाबदाºयाच निश्चित केल्या पाहिजेत आणि त्या वेळेत पूर्ण करण्यासाठी त्यांना जबाबदार धरले पाहिजे. सिंचन खात्यातील घोटाळे खणले पाहिजेत. ते करणाºयांना त्यांची जागा दाखविली पाहिजे व सरकारी यंत्रणांवरच अवलंबून न राहता पाणीटंचाईवर मात करण्यासाठी या कामात लोकसहभाग वाढविला पाहिजे. कालवे वर्षानुवर्षे पूर्ण का होत नाहीत, धरणाचे पाणी धरणातच का पडून राहते, धरणात पाणी आणि शेतीच कोरडी असे का होते, या प्रश्नांचा मूलभूत विचार झाल्याखेरीज त्याविषयीचे नियोजन यशस्वीही व्हायचे नाही, हे संबंधितांनी लक्षात घेतले पाहिजे. 

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईwater shortageपाणीटंचाई