शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
2
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
3
भाजपच्या उपमुख्यमंत्र्यांकडेच दोन मतदान ओळखपत्र; निवडणूक आयोगाची नोटीस, बिहारमध्ये काय घडलं?
4
Uddhav Thackeray: निवडणूक आयोग हे राष्ट्रपतींपेक्षाही मोठे झाले का? उद्धव ठाकरेंचा कडवट सवाल!
5
दिवसाढवळ्या बँकेवर दरोडा, बंदुकीच्या धाकावर हिसकावू लागला पैसे, पण कर्मचाऱ्यांनी हिंमत दाखवली आणि...  
6
राहुल गांधींविरोधात वक्तव्य भोवले; काँग्रेसच्या मंत्र्याला द्यावा लागला राजीनामा, नेमकं काय म्हणाले?
7
अमानुष! "आजीला सोडून दे", सुनेची वृद्ध सासूला बेदम मारहाण; वाचवण्यासाठी चिमुकल्याची धडपड
8
एअर इंडियाने मोठा निर्णय घेतला! वॉशिंग्टन डीसीला जाणारी सर्व विमान उड्डाणे रद्द केली; १ सप्टेंबरपासून...
9
'एका व्यक्तीच्या मूर्खपणामुळे देशाचे नुकसान..; केंद्रीय मंत्री किरेन रिजिजूंचा काँग्रेसवर घणाघात
10
मुंबई: दहीहंडीचा सराव करताना दहिसरमध्ये चिमुरड्या बालगोविंदाचा मृत्यू; कुटुंबावर शोककळा
11
अंगारक संकष्ट चतुर्थीच्या मराठी शुभेच्छा: Messages, WhatsApp Status शेअर करा; गणेशभक्तांना द्या शुभेच्छा!
12
बँका मिनिमम बॅलन्स का ठेवतात? 'या' कारणामुळे तुमच्या खात्यातून कापले जातात पैसे!
13
Bigg Boss 19: सलमानच्या शोची उपेंद्र लिमयेंना ऑफर? अभिनेता म्हणाला- "मला अनेकांनी विचारलं..."
14
'भारतात शिक्षण, आरोग्य सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर गेलंय'; सरसंघचालक भागवतांनी व्यक्त केली चिंता
15
एअर इंडियामागची पीडा काही संपेना! आता लँडिंगनंतर दरवाजेच उघडले नाही; तासभर अडकून राहिले प्रवासी
16
भाजपाकडून विधानसभा निवडणूक लढवलेला नेता चकमकीत ठार, अनेक गुन्ह्यांत होता वाँटेड
17
बाजारात तेजी परतली! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, टाटा-SBI सह 'या' शेअर्सचा गुंतवणूकदारांना दिलासा
18
शाब्बास पोरी! देशसेवेचं स्वप्न पाहिलं- सत्यात उतरवलं अन् झाली IAS; हार मानलीच नाही..
19
डोनाल्ड ट्रम्प झाले 'वसुली भाई'; चिप निर्यातीचा लायसन्स देण्यासाठी आता कंपन्यांकडून मागताहेत पैसे
20
Janmashtami 2025: १० ऑगस्ट रोजी सुरू झाली आहे कृष्ण नवरात्र; त्याची सांगता कधी आणि कशी?

विरोधकांशी लढाई नंतर, आधी मित्रांशीच पंगा! सगळेच सावध; कारण हा हिशेब फक्त जागांचा नाही, तर...

By यदू जोशी | Updated: August 23, 2024 10:09 IST

जास्त जागा पदरात पाडून घेण्यासाठीची लढाई आपसातच खेळावी लागणार. हा हिशेब फक्त जागांचा नाही, त्याआडून येणाऱ्या मुख्यमंत्रिपदाचा आहे!

- यदु जोशी(सहयोगी संपादक, लोकमत)

महायुती आणि महाविकास आघाडी म्हणूनच सत्तापक्ष आणि विरोधक निवडणुकीला सामोरे जाणार असेच आजचे चित्र आहे. उद्या काय होईल ते सांगता येत नाही; पण सत्ता मिळविण्यासाठी दोन्ही बाजू एकमेकांसोबत घट्ट राहतील असे वाटते आहे; पण आज दोन्हींकडे आपसांतच एकमेकांना जोखण्याचे काम सुरू आहे. शत्रूशी सामना करण्यापूर्वी सहापैकी प्रत्येक पक्षाला स्वत:ची मांड पक्की करून घ्यायची आहे. सहाही पक्षांना मुख्यमंत्रिपद हवे आहे. त्यामुळे सगळे एकमेकांपासून कमालीचे सावध आहेत, तसे जाहीरपणे कोणी दाखवत नाही; पण राजकारणाची नजर असलेल्यांना ते बरोबर समजते. 

वेगवेगळ्या नेत्यांशी खासगीत बोलण्याची संधी बरेचदा मिळते, त्यातून बरेच काही कळते. कोणाच्या किती जागा निवडून येणार हा या घडीचा खेळच नाही, तो रंगायला अजून वेळ आहे. आजचा खेळ आहे तो वाटपात जास्तीत जास्त जागा आपल्याकडे ओढून घेण्याचा. कोणाला, किती जागा हे एकदा ठरले की, समोरच्यांशी लढाई सुरू होईल. सध्याची लढाई ही आपल्या पदरात जास्तीत जास्त जागा पाडून घेण्यासाठीची आहे आणि ती आपसातच खेळावी लागणार आहे. शत्रूशी लढाईपेक्षा मित्रांचा सामना अधिक कठीण असतो. हिशेब फक्त जागांचा नाही, तर त्याच्या आडून येणाऱ्या मुख्यमंत्रिपदाचा आहे.

कमी जागा मिळाल्या तर कमीच निवडून येणार अन् मग जास्त जागा निवडून आणलेल्या पक्षाकडे मुख्यमंत्रिपद जाईल, हे उघड आहे. जे आपल्याला कळते ते सहा पक्षांच्या नेत्यांना आपल्यापेक्षा आधी कळते. मुख्यमंत्रिपद एकमेकांना देण्यासाठी कोणीही बसलेले नाही. महायुतीत शिंदेसेनाच निक्षून सांगत आहे की, आमचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा शिंदेच; भाजपचे काही नेतेही तसे म्हणतात; पण ते किती मनापासून बोलतात हे सगळ्यांनाच ठाऊक आहे. अजित पवार गट तर तसे म्हणतदेखील नाही.

उद्या सत्तेत हे आले काय अन् ते आले काय, मुख्यमंत्रिपदासाठी भांडणे अटळ आहेत. आपल्या खास माणसांना विधानसभेत आणण्यासाठी आपल्याच मित्रपक्षाच्या उमेदवारांना पाडण्याचे प्रकार दोन्हीकडे घडतील. याबाबतचे तज्ज्ञ महायुतीपेक्षा महाआघाडीकडे जास्त आहेत; काही तर आद्यगुरू आहेत त्या विषयातले. बाहेरून मित्रपक्षासोबत असल्याचे दाखविले जाईल; आतून पाडापाडी होईल. दोस्तांना आजमावताना कुठे-कुठे दुष्मनांशी दोस्ती होऊ शकेल. राजकारणाची चाल कधीही सरळ नसते, ती तिरकीच असते.

सत्ता मिळविण्याच्या आशेच्या चिकटपट्टीने महाविकास आघाडीला एकमेकांसोबत चिकटवून ठेवले आहे. महायुतीजवळ सत्ता असल्याने त्या चिकटपट्टीची गरज नसल्यासारखे ते वागत आहेत. खरेतर तिघांची तोंडे एकाच दिशेला असायला हवीत; पण एकमेकांची तोंडे फोडण्याची भाषा केली जात आहे. महायुतीचे सरकार एक शिवायला गेले तर दुसरीकडे उसवते अशी स्थिती आहे. महायुतीत आज ही स्थिती, निवडणूक जवळ येईल तसे महाविकास आघाडीतही भांडणे वाढतील असा अंदाज आहे.  

राजकारणाचा डबल गेम इकडे आणि तिकडेही एकमेकांबद्दल कुठेना कुठे काही ना काही संशय जरूर आहे. एकमेकांना मदत तर करायची आहे; पण एकमेकांना मुख्यमंत्रिपदापासून रोखायचेही आहे, असा हा डबल गेम इकडे आणि तिकडे सुरू झाला आहे. त्याचे पुढचे अंक लवकरच  बघायला मिळतील. मित्रपक्ष वाढले पाहिजेत असे प्रत्येकालाच वाटते; पण त्याच वेळी ते आपल्यापेक्षा वाढता कामा नयेत, ही भावनाही असणारच. मित्रांना कांस्य, रजतपदक मिळणार असेल तर कोणाचीच हरकत नाही, सुवर्णपदक मात्र आपल्याकडेच राहायला हवे, हा अट्टहास राहणारच.

एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस, नाना पटोले, सुप्रिया सुळे, अजित पवार असे सहा चेहरे मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत आहेत. कोणालाही उपमुख्यमंत्री व्हायचे नाही. अजितदादा उपमुख्यमंत्रिपदासाठी राजी होतीलही; कारण त्यांना स्वप्नेच उपमुख्यमंत्रिपदाची पडत असावीत. विधानसभेत ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री हा फॉर्म्युला आपसांतच पाडापाडीला उत्तेजन देतो हे खरेच आहे. याआधी तसा अनुभव दोन-तीन वेळा आलेला आहे. पूर्वानुभव असल्याने उद्धव ठाकरे या फॉर्म्युल्याला विरोध करत असावेत, भाजपसोबतच्या युतीत तसा अनुभव आल्याचे त्यांनी नमूद केलेले आहेच. काँग्रेसपेक्षा आपल्या जागा जास्त निवडून येणार नाहीत, अशी शंका असल्याने तर ते ‘जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री’ या फॉर्म्युल्याला विरोध करत नाहीत ना? 

जाता जाता : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मध्यंतरी देवेंद्र फडणवीसांवर खूप आरोप केले. फडणवीसांनी त्यावर उत्तरेही दिली. देशमुख अचानक फडणवीसांवर का बरसले असावेत? एक तर्क असा की, ते दक्षिण-पश्चिम नागपुरात फडणवीसांविरुद्ध विधानसभेची निवडणूक लढतील. त्यांचे पुत्र सलील काटोलमधून लढतील. तसे झालेच तर फडणवीसांविरुद्ध लढणारे अनिलबाबू हे तिसरे देशमुख असतील. पहिल्या निवडणुकीत त्यांचे चुलतभाऊ रणजित देशमुख लढले होते, गेल्या निवडणुकीत रणजितबाबूंचे पुत्र आशिष लढले होते. आता आशिष भाजपमध्ये आहेत. 

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रPoliticsराजकारण