शहरं
Join us  
Trending Stories
1
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
2
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
3
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
4
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
5
पातूरच्या घाटात भीषण अपघात; सहा जण ठार, चार गंभीर जखमी!
6
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
7
ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण
8
संजय चव्हाण, विजय करंजकरांचे बंड; शांतीगिरी महाराज नाशिकमधून अपक्ष लढणार
9
शरद पवार यांच्या ताफ्यातील दोन वाहने धडकली
10
देशातील कर प्रणालीवर राजीव बजाज यांची टीका, सरकारकडे केली 'ही' मागणी...
11
पाकिस्तान भारताची कॉपी करायला गेला, चीनच्या मदतीनं लॉन्च केलं 'मून मिशन'; झाला 'खेला'!
12
'आम्ही तेथे राहुल गांधींविरोधात जिंकू शकणार नाही...'; भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचा टोमणा
13
सायकल बिल्डिंगखाली लावली म्हणून पित्रा-पुत्राने केली एकाची हत्या; गिरगावात धक्कादायक प्रकार
14
“उद्धव ठाकरे वीर सावरकरांचे नाव भाषणात घेण्याची हिंमत करु शकतात का?”; अमित शाहांचे आव्हान
15
'भारतावर संकट आले की, राहुल गांधी इटलीला पळून जातात', योगी आदित्यनाथांचा घणाघात
16
अमृता खानविलकर या कारणामुळे सोशल मीडियावर शेअर करत नाही नवऱ्यासोबतचे फोटो, म्हणाली - एकमेकांना...
17
Mouni Roy : "दिवसाला खाल्ल्या 30 गोळ्या, वजन वाढलं, आयुष्य संपलं..."; मौनी रॉयला आला भयंकर अनुभव
18
“राजकारणात माझा जन्म ४ दिवसांचा, पण...”; उज्ज्वल निकम मैदानात, विरोधकांना थेट आव्हान
19
राहुल गांधींनी रायबरेलीतून भरला उमेदवारी अर्ज, रस्त्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांची गर्दी
20
Share Market: सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, गुंतवणूकदारांनी 4 लाख कोटी गमावले...

स्वबळानंतर शिवसेनेची पाऊले युतीकडे

By यदू जोशी | Published: October 20, 2018 6:21 AM

उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील आत्मविश्वास दिवसेंदिवस वाढत असल्याचा पूर्वानुुभव असला तरी कालचे त्यांचे भाषण निराशा करणारे होते.

विचारांचे सोने लुटण्यासाठी शिवाजी पार्कवर गुरुवारी आलेल्या तमाम शिवसैनिकांनी खरेच हे सोने लुटले असेल की पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे भाषण ऐकून त्यांचा वैचारिक गोंधळ वाढला असेल, असा प्रश्न पडतोय. त्यांच्या भाषणाच्या आधी उद्योगमंत्री सुभाष देसाई, खा. संजय राऊत आणि पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी ज्या पद्धतीने भाषणे केली त्यावरून युती तोडण्याचीच घोषणा उद्धव त्यांच्या भाषणात करतील, असे वातावरण तयार झाले होते. भाजपा, नरेंद्र मोदींना आता गाडूनच आम्ही शांत होऊ, असा देसाई-राऊत-कदमांचा आवेश होता. प्रत्यक्षात ठाकरे यांनी शिवसेना लोकसभेची वा विधानसभेची निवडणूक स्वबळावर लढणारच, असा कोणताही निर्धार बोलून न दाखविता आपल्या पक्षातील नेत्यांच्या भावनांवर पाणी फिरवले.

ठाकरे यांच्या भाषणातील आत्मविश्वास दिवसेंदिवस वाढत असल्याचा पूर्वानुुभव असला तरी कालचे त्यांचे भाषण निराशा करणारे होते. ठोस भूमिकेचा अभाव दिसून आला. पक्षाचे नेते एक बोलतात आणि सर्वोच्च नेता मात्र त्याला तिलांजली देत कुठलीही ठोस भूमिका घेत नाही असा विरोधाभास क्षणोक्षणी जाणवला. रा.स्व. संघाचे सरसंघचालक नागपूरच्या विजयादशमी उत्सवात आणि इकडे शिवाजी पार्कवर ठाकरे काय बोलतात हे अनुक्रमे स्वयंसेवक आणि शिवसैनिकांसाठी आगामी वर्षाच्या दृष्टीने मार्गदर्शक सूचनांसारखेच असते. शिवसैनिकांच्या मनातील शंकाकुशंका दूर करीत त्यांना दिशा देण्याचे काम बाळासाहेब शिवाजी पार्कवरील भाषणातून करीत असत. या ठाकरी शैलीच्याच अपेक्षेने शिवसैनिक हे उद्धव यांनाही ऐकायला येतात. ‘मी काय बोलणार? माझ्या आधीचे लोक बोलले आहेतच. मी राजकारणावर बोलणार नाही. आता ज्योतिषावर, हवामानावर बोलतो’ ही उद्धव यांच्या कालच्या भाषणातील वाक्ये ठाकरेंकडून अपेक्षित असलेल्या टोकदार भूमिकेशी मेळ खाणारी नव्हती. सध्या देशभर गाजत असलेल्या आणि विशेषत: काँग्रेसने ज्यावर रान उठविले आहे त्या राफेल प्रकरणाविषयी एक शब्दही उद्धव बोलले नाहीत हेही अनाकलनीय होते. राम मंदिराचा मुद्दा हाती घेऊन शिवसेनेने पुन्हा एकदा भावनिक राजकारण सुरू केले आहे. स्वत: उद्धव ठाकरे २५ नोव्हेंबरला अयोध्येत जाणार आहेत. आपले जाणे हा पहिला इशारा असेल. त्यानंतरही मंदिर बांधले गेले नाही तर तमाम हिंदूंना घेऊन आम्ही ते बांधू, असे उद्धव यांनी जाहीर केले. मात्र, त्याविषयीचा कोणताही ठोस कार्यक्रम त्यांनी दिला नाही.

भाजपाध्यक्ष अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापासून भाजपाचे सगळे नेते लोकसभा व विधानसभा निवडणुकीत युती होणारच असे सांगत आले आहेत. मात्र, शिवसेनेने स्वबळावरच लढू आणि भाजपाला जागा दाखवू अशी भाषा चालविली आहे. उद्धव यांनी मात्र कालच्या सभेत स्वबळाला बगल दिली. स्वबळाचा नारा देणाऱ्या उद्धव यांचे पाऊल कालच्या सभेत मात्र युतीच्या दिशेने पडले. मोदीजी! तुम्ही पुन्हा सत्तेत येऊ नये अशी विकृती आमच्या मनात नाही, असे सांगत त्यांनी तुटेपर्यंत ताणणार नसल्याचे संकेत दिले.

(लेखक 'लोकमत'मध्ये वरिष्ठ साहाय्यक संपादक आहेत.)

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेDasaraदसराBJPभाजपा